Breking News

शनिवार, १५ मार्च, २०१४

काठी येथील राजवाडी होळी

                            ! नंदुरबार जिल्ह्यातील काठी येथील राजवाडी होळी!

काठीच्या होळीला आदिवासी समाजात मोठे स्थान आहे.या होळीला राजवाडी होळी असे संबोधले जाते.सातपुड्यात वसलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेले काठी संस्थान आजही राजवडी होळीसाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्यातील आदिवासींचे कुलदैवत राजाफांटा,गांडा ठाकूर यांनी होलिकोत्सवास प्रारंभ केला. त्यानंतर काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांच्या कारकीर्दीपासून 1246 पासूनची
ऐतिहासिक परंपरा आजही टिकून आहे. आजही हा पारंपरिक उत्सव मोठ्या जलोश्यात साजरी केला जातो. या काळात ढोलाचा आवाज सातपुड्याच्या कानाकोप- यात निनादतो. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करण्यात येते.तसेच शस्त्रपूजन करुण आपले शक्ती प्रदर्शन देखील करता येते
होळीच्या दिवशी काठी येथील राजा उमेदसिंह यांच्या सरकारची राजगादीची व शस्त्रास्त्रांची पूजाअर्चा करून गादीची माती कपाळाला लावतात. नर्मदा परिसरातील गुजरात मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून अबालवृद्ध एकत्र येतात. सर्वप्रथम होळी मातेची पूजा वडाच्या वृक्षाखाली होळी मातेचे भक्त सतीराम महाराज,गोमऱ्या पुजारा यांच्या हस्ते होऊन सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन ढोलताशांच्या गजरात भोंगऱ्या मेळावासह वाद्यासह मिरवणूक काढून येथील हनुमान मंदिर, राम मंदिर, पीरबाबा दर्गा आदी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने पूजा विधी केली जातो. तसेच गाव भर सशस्त्र मिरवणूक काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. आदिवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात मेळावासह वाद्यासह मिरवणूक काढून
येथील हनुमान मंदिर,राम मंदिर, पीरबाबा दर्गा आदी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने पूजा विधी केली जातो. तसेच गाव भर सशस्त्र मिरवणूक काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. आदिवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात तलवार तर महिला गळ्यात चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या, पायात पैंजण असा साजशृंगार करतात. मोलगी येथील भोंगऱ्या बाजारात काठी संस्थानचे वारस, गावातील पोलिसपाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आदींना मान दिला जातो. तसेच जिल्ह्यातील नामांकित लोकानची देखील प्रामुख्याने उपस्थिती असते. त्यात केंद्रीय मंत्री माणिकरावदादा गावीत,
माजी मंत्री सुरूपसिंगदादा नाईक, पलाक मंत्री नंदुरबार जिल्हा तथा क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री
महा.राज्य पद्माकरजी वळवी, स्थानिक आमदार के.सी.पाडवी, विधान परिषद् आमदार चंद्रकांत रघुवंशी, तलोदा नगरपालीका प्रतोद भरतभाई माळी, फलोत्पादन मंत्री विजयकुमार गावीत,अक्कलकुवा माजी आमदार नरेंद्र पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उदेसिंगदादा पाडवी, सह स्थानिक विविध पक्ष्यांचे अधिकारी व पदाधिकारी काठीची होळी पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहातात. तसेच मोलगी येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधव हातात तलवार, कुऱ्हाड, भाला, धनुष्यबाण यासह विविध परंपरागत शस्त्रांसह मिरवणुकीत सहभागी होतात. काठीच्या होळीला दांड्याची उंचीचे देखील महत्व लाभले आहे. काठी येथील राजवडी होळीसाठी 70 फूट
चीचा बांबूचा दांडा आणला जातो. तो गाडण्यासाठी  टिकाव किंवा
 पावडीचा वापर न करता नवस फेडणारे म्होरके जागा हाताने कोरतात. त्याच ठिकाणी दांडा
गाडून रात्री जागरण करून पहाटे पाचला होळी पेटवितात. होळीचा दांडा पूर्वेला झुकल्यास व खाली पडल्यास ते वर्ष सुख-समृद्धीचे जाते, अशी आख्यायिका आहे. होळीच्या दांड्याला जांभूळ, आंब्याची पाने, खोबऱ्याची वाटी, हार-कंगन, खजूर, डाळ्यांचा नैवेद्य चढविला जातो. होळी पेटताच क्षणी सर्व मोरबी बाबा ढाण का डोडे हे सर्वजण होळीच्या आजूबाजूला फेर धरून रामढोलच्या तालावर गोल- गोल फिरून नाचतात काठीच्या होळी उत्सवाला लाख ते
दीड लाख आदिवासी बांधव उपस्थित असतात. हा उत्सव पाहण्यासाठी थेट मुंबई, दिल्लीचे नागरिक येतात. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीही या ठिकाणी हजेरी लावली होती.ढोलाच्या तालावर रात्रभर साजरी होते होळी हा उत्सव सायंकाळी सुरू होऊन सूर्योदयापर्यंत चालतो. जंगलातून आणलेली लाकडे, गोव- या बांबूभोवती रचतात. सूर्योदयापूर्वी होळी पेटवतात. होळीच्या आधी येणारा हा विशेष बाजार. 10 ते 12 पाड्यांपैकी एका मध्यवर्ती गावात हा बाजार सर्वानुमते भरवतात. प्रत्येक पाड्याचे मुखिया एकत्र येऊन बाजाराचा दिवस ठरवतात. व अश्या आंनद व गुण गौरवाने काठी येथील राजवाडी होळी साजरी करतात


 
 









                                                                                                                                                                                                शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे 
                                                                                                           उपशिक्षक
 न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा


रविवार, २ मार्च, २०१४

माझे अविस्मरणीय क्षण

                                                         माझे अविस्मरणीय क्षण
                               
                                       आमच्या परिसरातील मनाला मोहक करणारी काही क्षण


                                               वाल्हेरी धबधब्याचा निसर्गरम्य वातावरणात

                           
                                          मित्रांशी मोज करताना टिपलेल काही अविस्मरनीय क्षण


निसर्गासारखा नाही रे सोयरा 
गुरू सखा बंधू मायबाप 
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप 
मिटती क्षणात आपोआप


                                                 निसर्गरम्य वातावरणात प्रेमळ मित्रांची साथ

   श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
 क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे


                                                   मित्रांसोभत पोहन्याचा आनंद घेताना



                                     वाल्हेरी येथील नदी ओलांडून शेतकरी निघाला आपल्या घराकडे


                                                   कोसळनारा धबधब्याचा आनंद घेताना


                                              निसर्गरम्य वातावरणात मित्रांसोभत घालवलेले
                                                         कधीही न विसरणारे क्षण

                            मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण

                                               
                            मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट...
                    

                                                   मनाला मोहक घालणारे काही दृश्य!!!!!!!