Breking News

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

तळोदा येथील चिंतेश्वर महादेव मंदीर

तळोदा  शहरासह जिल्ह्याभरात महादेवी मंदीरे महाशिवरात्री निमित्त सजली असून मंदिरांवर आकर्षक
रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र महादेव मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी भजन किर्तन, महाप्रसाद, यात्रोत्सव आदी कार्यक्रम घेण्यात आले. हर हर महादेव या जयघोषात तलोदा शहरातील चिंतेश्वर मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली़ मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता़. यावेळी महिला, लहान मुलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती़. सकाळी आरती, पूजा आदी कार्यकम पार पडले़ याशिवाय गावातील महादेव मंदिरांमध्येही भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली़........ शहरातील वानी गल्लीतील सिद्धेश्वर महादेव मंदिरात भंडाराचा आयोजन करण्यात आले असून गावातील पाताळेश्वर मंदिर, काकाशेठ महादेव मंदिर,त्रिपाळेश्वर महादेव मंदिर,तर शहादा रस्त्यावरील कंकेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर महादेव मंदीरावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तर
 तलोदा शहराच्या पश्चिमेकड़े मोठ्या माळी वाडयात कालिका देवी गल्लीला लागून 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वीचे चिंतेश्वर महादेव मंदीर आहे. ह्या मंदिरात जावून भाविकांच्या चिंता दूर होते अशी ख्व्याति ह्या मंदिराला प्राप्त झाली आहे. चिंतेश्वर मंदिर हे आहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले गेले असुन ह्या मंदिराच्या स्थापनेपूर्वी गावातील नागरिक वेगवेगळ्या रोगानी व आजारानी ग्रस्त झाले होते.व अश्या काळात मंदिराची स्थापना झाली व योगायोगाने लोकांचे आजार नष्ट होऊ लागले. व लोकां ची अशी भावना झाली की या मंदिराचा स्थापनेमुळे लोकांच्या चिंता दूर होतात. अशी आख्यायिका प्राप्त झाली आहे. म्हणून मंदिराला चिंतेश्वर म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. ह्या मंदिराचा परिसराची लांबी 17 फूटापेक्षा अधिक असून रुंदी 24 फुट आहे. चिंतेश्वर मंदिरात श्री. गणपती श्री. कृष्ण तर माता लक्ष्मी अश्या दीड दीड फुटाच्या 4 मुर्त्या आहेत. तर मध्यभागी 24×29 इंचची महादेव पिंड असून पिंडच्या प्रवाह उत्तरेस आहे. मंदिराच्या
गाभाऱ्या समोर पश्चिमेस तोड़ करुण नंदी बसविला आहे. स्थळाच्या गाभाऱ्यात चारही बाजुनी कोरीव गोखले असुन मंदिराला 14 फुट व्यासाच्या घूमट असुन त्यावर 3 फुटाचा कोरिव कळस आहे..... सध्या असलेल्या मुर्त्यांच्या जागी सन् 2001 पुर्वी या वर्षापुर्वी जुन्या मुर्त्या होत्या, त्या मूर्तीची झिज झाल्याने त्यांचे तापी नदीत विसर्जन केले. व त्यांच्या जागी राजस्थान येथून नविन मुर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे. सदर मुर्त्या ह्या संगम रवरच्या पाश्याणाने कोरलेल्या आहेत. श्रावण महीना व् महाशिवरातत्रीला, भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. पाउसाळयात पाऊस येण्यास उशीर झाला तर परिसरातील नागरिक मंदिर पाण्याने भरतात ह्यामुळे पाऊस यतो अशी भावना आहे. तसेच ह्या मंदिरावर येवून मनातील इच्छा पूर्ण होवून लोकांची चिंता दूर होत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते.



तलोदा शहरात मगरे चौक व कालिका देवी गल्लीला लागून 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वीचे चिंतेश्वर महादेव मंदीर आहे. ह्या मंदिरात जावून भाविकांच्या चिंता दूर होते अशी ख्व्याति ह्या मंदिराला प्राप्त झाली आहे. चिंतेश्वर मंदिर हे आहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले गेले असुन ह्या मंदिराच्या स्थापनेपूर्वी गावातील नागरिक वेगवेगळ्या रोगानी व आजारानी ग्रस्त झाले होते. अश्या काळात मंदिराची स्थापना झाली व योगायोगाने लोकांचे आजार नष्ट होऊ लागले. ह्यामुळे लोकांची भावना झाली की या मंदिराचा स्थापनेमुळे लोकांच्या चिंता दूर होते. व ह्यामुळे मंदिराला आख्यायिका प्राप्त झाली. म्हणूनच मंदिराला चिंतेश्वर म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. ह्या मंदिराचा परिसराची लांबी 17 फूटापेक्षा अधिक असून रुंदी 24 फुट आहे. चिंतेश्वर मंदिरात श्री. गणपती श्री. कृष्ण तर माता लक्ष्मी अश्या दीड दीड फुटाच्या 4 मुर्त्या आहेत. मध्यभागी 24×29 इंचची महादेव पिंड असून पिंडच्या प्रवाह उत्तरेस आहे. मदिराच्या गाभाऱ्या समोर पश्चिमेस तोड़ करुण नंदी बसविला आहे. स्थळाच्या गाभाऱ्यात चारही बाजुनी कोरीव गोखले असुन मंदिराला 14 फुट व्यासाच्या घूमट आहे त्यावर 3 फुटाचा कोरिव कळस देखील आहे.. सध्या असलेल्या मुर्त्यांच्या जागी सन् 2001 या वर्षापुर्वी जुन्या मुर्त्या होत्या, त्या मूर्तीची झिज झाल्याने त्यांचे तापी नदीत विसर्जन केले. व त्या जागी राजस्थान येथून नविन मुर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे. सदर मुर्त्या ह्या संगम रवरच्या पाश्याणाने कोरलेल्या आहेत. श्रावण महिना व महाशिवरात्रि काळात भाविकांची प्रचंड गर्दी असते. पाउसाळयात पाऊस येण्यास उशीर झाला तर परिसरातील नागरिक मंदिर पाण्याने भरतात ह्यामुळे पाऊस यतो अशी भावना आहे. तसेच ह्या मंदिरावर येवून मनातील इच्छा पूर्ण होवून लोकांची चिंता दूर होत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. (आपल्या आठवणी शेयर करा) सुधाकर मराठे http://sudhaspari.blogspot.in/2015/02/blog-post_42.html?m=1

पाडळपुर वटवाघुळाचे गाव

शहरापासून उत्तरेला अवघ्या 15 km अंतरावर पाडळपुर हे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे सदर गाव सातपुड्याच्या पायथ्याशी वेसले असून हे गाव एका विशिष्ट कारणाने तालुक्यात परिचित आहे. ह्या गावात प्रवेश करतानाच आपल्याला एका मोठ्या झाडावर शेकडो वटवाघूड़े उलटे लटकलेले आढळून येतात. जणू गावात येणाऱ्या पाहुन्यांचे ते वटवाघुळे स्वागतच करीत असावेत असे वाटते. रात्रीच्या प्रावासानंतर दिवस उजाडण्यापूर्वी सर्व वटवाघुळे पुन्हा त्या झाडावर विसावतात ते आधार होण्यापर्यन्त हां दररोजच्या उपक्रम असुन दिवसा झाडावर उलटे लटकलेले हे वटवाघुळे आकर्षणाच्या विषय ठरतात. महाराष्ट्रात मुंबई नजिक मामाचे गाव आहे. ते पर्यटकांचे आकर्षण असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्यालागत असलेले नंदुरबार जिल्ह्यातील तलोदा तालुक्यात पाडळपुर हे गाव वटवाघुळाचे गाव म्हणून परिचित आहे. ह्या गावात वटवाघुळे हजारोच्या संखेने चिंचेचा झाडावर वास्तव्य असल्याने ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे आकर्षण ठरते.. तलोदा तालुक्यातील पाडळपुर हे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव,गावात सुमारे एक हजार लोक वास्तव्यास आहेत.
गावाला लागुणच सातपुड्याच्या पर्वतरांगा चहुबाजुनी लहान मोठ्या टेकड्या पाडळपुर,गढ़वली नजिक लघुप्रकल्प वरपाड़ा गावा नजिक छोटेसे मातीचे बांध ह्यांच्यात गावाचे वास्तव्य शेती व शेतमजुर हां गावकऱ्याचा पारंपारिक व्यवसाय असला तरी गावाला राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. गावाचे पोलीस पाटील म्हणून ओळख असलेले ग्रामपंचायत सदस्य ते जि.प.सभापती राहीलेले माजी जि.प.सदस्य धनसिंग ठाकरे ह्यांच्या घराजवळ चिंचेचे दोन तीन झाडे आहेत.सदर झाडे हे सुमारे सव्वाशे वर्षापुर्वीचे असल्याचे जानकार सांगतात. सुरवातीपासूनच ह्या झाडांवर वटवाघुळाचे वास्तव्य आहे. दिवसभर पक्ष्याचा किलबिलाट सायंकाळी आधार पडल्यावर अन्न व पाण्याच्या शोधात निघालेली ही वटवाघुळे दिवस उजाळण्या अगोदर पुन्हा ह्या झाडावर येवून विसावतात गावकरी देखील वटवाघुळावर प्रेम करतात.लग्न असो वा इतर समारंभ वटवाघुळाना त्रास जानवेल म्हणून गावात कधीच फटाकडे फ़ोडले जात नाहीत. सदर पक्षयांचे उड़ने व परत येणे ह्यातून
गावकऱ्याना वेळ समजत असे, सदर वटवाघुळे पुरातन काळात दुष्काळाच्यावेळी येथे वास्तव्याला आले असावेत असे जानकार म्हणतात.पाडळपुर हे निसर्गाच्या वास्तव्यात वेसले आहे सातपुद्यांच्या पर्वत रांगा लहान मोठ्या टेकड्या गढ़वली,रोझवा, ह्यासह विविध गावातील लहान मोठे बंधारे ह्यामुळे श्रावन महिन्यात निसर्गप्रेमी व पर्यटक ह्या गावास भेटी देतात. चिंचेच्या झाडावर वटवाघुळाच्या वास्तव्याने व त्यांची किलबिलाट पर्यटकांचे लक्ष्य वेधुन घेते. मोठ्या कुतुहलाने पर्यटक ह्याबबतची माहिती गावकऱ्याकडून जाणून घेतात. पर्यटक व्म निसर्गप्रेमिना ही वेगळीच नेजवानी असते.आपला मोबाईल व कैमेरात ह्या वटवाघुळाचे चित्र कैद करण्याचा मोह पर्यटकाना होने स्वाभाविक आहे.



मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

तळोदा नगरपालीका

तळोदा नगरपालीका नगराध्यक्ष 

गोंविंद दिनुराम राठोड़ 
मुरार हरी माळी 
अमृत मगन सोनार 
गंगाराम तुकाराम सुर्यवंशी 
जीवन नारायण वाणी 
शंकर गुलाल माळी 
गुलाल बुलाखी माळी 
धजा चुनीलाल माळी 
गोरख सदु कुकावलकर 
ईश्वर अमृत माळी 
नटवर विनायक जोशी 
हिरालाल हुलाजी टवाळे 
जगदीश संभु चौधरी 
भरत बबनराव माळी 
दिपाली राजेंद्र वळवी 
वंदना हेमलाल मगरे 
एस.के.पाडवी (प्रभारी) 
ताराबाई हिरालाल बागुल
सौ. हेमलता बच्चुसिंग परदेशी 
विमलबाई काशीनाथ सोनवणे 
भरत बबनराव माळी 
सौ.हेमलता विलास डामरे 
सौ.योजना भरत माळी 
सौ.रत्नाताई सुभाष चौधरी

 तळोदा नगरपालीका प्रशासक 

 झेड.एस.पाटील 
जी.सी.फलक 
जे.एस.कुलकर्णी 
ए.द.खरवंडीकर 
एस.जी.कोकणी
एस.डी.सोनवणे 
आर.बी.गोसावी 
एस.के.भंडारी
के.---दहाड़े 
जे.पी.पवार 

 तळोदा पंचायत समिती सभापती 

 गणपत आनाजी चव्हाण 
वेडू गबु शिंदे 
गोरजी सुरजी वळवी 
प्रतापसिंग बिलाड्या भामरे 
लालसिंग नुऱ्या वळवी 
शांतु रामु वसावे 
धनसिंग खेत्या ठाकरे 
पद्माकर विजेसिंग वळवी 
उमताबाई हंबरसिंग गिरासे 
जितेंद्र चंद्रसेन पाड़वी 
सतीश वेडू वळवी 
प्रभु गोरजी वळवी 
जहांगीर बोलगा पावरा 
मोहन सक्कन ठाकरे 
रेखाबाई वसंत पाडवी 
आकाश सतीश वळवी

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

चिमणी

चिमणी (house sparrow
साधारण १५ सेमी लांबीचा हां पक्ष भारतभर सर्वत्र आढळतो. नर-मादी आकाराने सारखे असले तरी रंग रूप भिन्न आहे. मादी फिकट मातकर रंगाची, पंखांवर, तपकीरी भूरकट रेषा असलेली असते. तर नाराचा कंठ छातीचा वरचा भाग काळा व पोट पांढरे असते. पंखावर तपकीरी, गडद रेषा आणि माथा करडा असतो. दोघांचाही चोच तपकीरी आखुड जाड असते. यांचा थवा जमिनीवर उतरून दाणा टिपताना दिसतो. दोन्ही पायांवर उड्या मारीत चालण्याची यांची वेगळी पद्धत आदी यांचा `चिवचिवाट' सर्वश्रुत आहे. दिल्लीचा राज्य पक्षी आहे. सुंदर फुललेल्या बागेतील फूल कळ्या फस्त करतात. 1960 च्या दशकात चीनमध्ये चिमण्या मारण्यात आल्या होत्या. कारण एक चिमणी 50 ग्रॅम धान्य खाते, असा हिशेब त्यांनी केला होता. चिमण्या मारल्यास तेवढ्या धान्याची बचत होईल, असे चीन सरकारचे गणित होते. त्यानंतर एक-दोन वर्षांत चीनमध्ये धान्य उत्पादनात वाढ झाली, पण नंतरच्या कालावधीत किडे व कीटकांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली, की त्यांची पिके नष्ट होण्याची वेळ आली. त्या वेळी चिमणीचे महत्त्व चीनसह सर्वांनाच समजले. तसेच चिवू ये! दाना खा! पाणी पी' असे म्हणुन बाळासाठी घरात बोलावलेली ही चिमणी फोटो फ्रेम,दिव्याची शेंड, खिड़क्याची तावदाने, वळचण सगळीकडे घूसखोरी करुण असायची आणि चाहूल लागताच भुरर्कन उडायची. वाङा संस्कृती लोप पावली. त्याच बरोबर चिमणी ही हद्दपार झाली. मात्र अजुनही परस, अंगन, बगीचा, जिथे आहे तिथे बरवस्तित सुद्धा या पक्षाचा तुरळक वावर आहे.



हुबेहूब चित्र तुझे




हुबेहूब हे चित्र तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
ओठ गुलाबी, गहिरे डोळे
त्यांत परी ना तूच कुठे!


हुबेहूब हे शिल्प तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
हसरा चेहरा, सुडौल बांधा
त्यांत परी ना तूच कुठे!



घेता हात हातांत तुझा मी
कळले मज ते काय उणे
हुबेहूब हे चित्र, शिल्प तरी स्पर्श,
गंध त्यां तुझा कुठे?




निरभ्र आकाश,
झरे खळाळते चंद्र
तूच अन तूच चांदणे
उमलते फुल, तान मधुर पहाट
तूच अन तूच धुके आकाश,
धुके हे चंद्र, चांदणे फुल,
तान जरी रूप तुझे पहाट
धुक्यापरी सर्व हि खोटे कारण.........
स्पर्श, गंध त्यां तुझा कुठे?

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

कुशल मार्गदर्शक नेतृत्व: लक्ष्मणराव माळी

कुशल मार्गदर्शक नेतृत्व: लक्ष्मणराव माळी
शिक्षण महर्षी आप्पा साहेब लक्ष्मण बबनराव माळी ह्यांच्या वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था पी.ई.सोसायटीचे ते गेल्या 15 वर्षापासुन अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळात संस्थेने वैभव प्राप्त केले. आदिवासी भागात शाळा कॉल्लेजेसच्या माध्यमातून तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी विध्यार्थ्याना त्यानी शिक्षणाची द्वारे मुक्त केली. पी.ई.सोसायटीच्या शाळेत शिकुन असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. त्यांचे श्रेय आप्पासाहेबाना जाते. मागास भागातील संस्थांची अवस्था काय असते हे सर्वाना माहीत आहे. मात्र आप्पासाहेब लक्ष्मण माळी ह्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेला एक वेगळे स्वरुप प्राप्त करुण दिले. ह्यासंस्थेतून ज्ञानाची दिशा घेणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजे असा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे संस्थेतील शिक्षक कर्मचारी वर्ग मोठ्या परिश्रमाने संस्थेच्या नाव लौकीकात भर घालत आहे. परिसरातील मुले शिकुन मोठे व्हावेत व आपल्या भागाचा विकास करावा हेच आप्पाचे धेय आहे. पिताश्री स्व.बबनराव माळी पेहलवान व आई विमलबाई माळी ह्यांच्या आशिर्वादाने आप्पासाहेबानी हे यश मिळवले आहे. लहान बंधु भरतभाई माळी व संजय माळी ह्यांची त्याना साथ मिळाल्याने आप्पासाहेबानी कधी मागे वळून पाहिले नाही. वडिलांच्या निधनानंतर सारे कुटुंबाला आप्पासाहेबानी आधार दिला. वटवृक्षा सारखी मायेची सावली दिली. शैक्षणिक संस्थेच्या व्यापात देखील आप्पा घरच्या शेतीत चांगलेच रमतात नवनविन प्रयोग राबवुन चांगले उत्पन्न घेतल्याने त्यांची प्रगतशील शेतकरी म्हणुन ते प्रसिद्ध आहेत. आप्पासाहेबाना त्यांच्या पत्नी सौ.शारदाताई ह्यांची मोलाची साथ लाभली आहे. त्यांच्या सुन सौ योजनाताई भरत माळी ह्या तलोदा नागरपालिकेच्या नगराध्यक्षा आहेत. आप्पा साहेबांचे जीवन म्हणजे एक मार्गदर्शक दीपस्तंभासारखे आहे. अश्या मार्गदर्शक नेतृत्वास मनपूर्वक शुभेच्छा....                
                                                                सुधाकर मराठे ( उपशिक्षक )
                                                          न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु कॉल्लेज अक्कलकुवा.

रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

कोणत्याही रिलायन्स युजर चे आडनाव जाणून घ्या !

कोणत्याही रिलायन्स युजर चे आडनाव जाणून घ्या ! रिलायन्स नंबर च्या मालकाचे डीटेल्स कसे शोधयाचे.

1.सर्वप्रथम या लिंक वर जा
2. तुमच्या पुढे एक पेज उघडेल त्यात तो नंबर टाका . (इमेल अड्रेस देण्याची काही आवशकता नाही )
3.आता  Continue या बटणावर क्लिक करा * या द्वारे आपण फक्त त्या वापरकर्त्याचे आडनाव आणि ठिकाण जणू शकतो.


3.आता Continue या बटणावर क्लिक करा 
* या द्वारे आपण फक्त त्या वापरकर्त्याचे आडनाव आणि ठिकाण जणू शकतो.



प्रेरणादायी व्यतिमत्व: भरतभाई माळी

प्रेरणादायी व्यतिमत्व: भरतभाई माळीतळोदा पालिकेचे प्रतोद व समस्त माळी समाज सुधारणा मंडळाचे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशाचे अध्यक्ष भरतभाई माळी यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. भरतभाईच्या व्यक्तिमत्व व कर्तुत्व १९८० दशकात नावारुपाला आले. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी परिषद् निवडणुकीत भाग घेवुन राजकारणाचा कित्ता गिरवायला सुरुवात केली. १९९१ साली वयाचा केवळ २४ व्या वर्षी तळोदा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होण्याचा मान त्यानी मिळवला. तेव्हापासुन ते आजतागत भरतभाई माळी व तळोदा शहर हे समीकरण तयार झाले आहे. आज तळोदा शहराचे वा किंबहुना नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण असो वा समाजकारण असो भरतभाईना वगळून पुर्ण होवु शकत नाही. मागील २० वर्षापासुन या राजकारण व समाजकारण महत्वाचे केंद्रबिंदु राहिले आहेत. त्यांच्या स्वभावातील महत्वाचे गुणवैशिष्टयामुळे त्यांच्यावर प्रेम व आस्था राखणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पक्षाबरोबरच राजकारणातील विरोधकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. नगराध्यक्षापदी विराजमान होवुन त्यानी शहराला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले आहे. रस्ता दुभाजकाचे पडलेले काम पूर्णत्वाकडे आणले आहे. रस्ते विकास,चौक सुशोभिकरण व तापी पाणीपुरवठा योजना मंजुर करुण तळोदा शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्याच्या पर्यत्न सुरु आहे. हे सर्व करीत असताना समाजकारण अजिबात सोडले नाही. माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष म्हणुन ज्या ज्या ठिकाणी माळी समाज राहतो. त्या त्या गावी जावुन समाजात बैठक घेणे व चालिरिती, परंपरा यांची चर्चा करणे, त्यात सुधारणा घडवुन आणणे हे अविरतपने सुरु आहे. जळगाव येथे विद्यार्थ्याना शिक्षणासाठी हाल अपेष्टा भोगाव्या लागतात. हे हेरुण सुधारणा मंडळाचे वस्तीगृह त्यांच्या नेतृत्वाखाली नावारुपाला येत आहे. भरतभाई माळी खरेखुरे समाजभुषण, तळोदा भुषण आहेत. या सर्व कामी पिताश्री कै. बबनराव पहेलवान यांनी दिलेल्या मंत्र सदैव प्रेरणादायी आहे. मातोश्री विमलबाई माळी, मोठे बंधु आप्पासौ. लक्ष्मण माळी यांचे आशीर्वाद मार्गदर्शन लहान बंधु नगरसेवक तसेच गणेश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय माळी, पत्नी नगराध्यक्षा सौ.योजना माळी यांची साथ या जोरावर भरतभाईनी या शहराचा गाड़ा समर्थपने चालविला आहे. शाहराची पर्यायाने जिल्ह्याची उत्त्तरोतर प्रगती होवो यासाठी भरतभाईना उदंड आयुष्य लाभों. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

२० वर्षाचा प्रतिक्षेनंतर पोहचली ठाण्याविहीरला बस

२० वर्षाचा प्रतिक्षेनंतर पोहचली ठाण्याविहीरला बस 
        `पुण्यनगरी' वृत्ताची दखल,
गावकऱ्यानी साखर वाटून साजरा केला आनंद.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या उत्तरेकाडील 10 ते 15 गावातील 16 हजारापेक्षा अधिक नागरिकांना मागील विस वर्षापासुन बससेवे पासुन वंचित राहावे लागले. सुमारे 20 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टित फरशी पुल तुटलाने बससेवा बंद करण्यात आली होती. बससेवा सुरु करण्याकरिता परिसरातील          ग्रामस्थ ठाण्याविहीरचे पदाधिकारी व न्यू इंग्लिश स्कुलच्या शिक्षकांच्या नियमित पाठपुरावामुळे 26 जानेवारी गणतंत्रदिनी सदर बस सेवा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. याबाबत पुण्यनगरी मधुन आमचे प्रतिनिधी सुधाकर मराठे ह्यांनी वारंवार बस सेवा सुरु करण्याबाबत मागणी सातत्याने केली.
त्या वृताची वरिष्ठ पातळीवर द्खल घेवुन बससेवा सुरु झाली आहे. गावात आलेली बस पाहण्याकरीता गावकऱ्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ग्रामस्थानी साखर वाटप करुण आपला आनंद साजरी केला... अक्कलकुवा तालुक्यांतील ठाणाविहीर परिसरात पक्के रस्ते असुनही गावकऱ्याना बससेवा पासून वंचित राहावे लागत होते. तालुक्यातील उत्तरे भागातील ठाणाविहिर, आमली, सावर, गुलीआंबा, पिंपळगाव, कुंडलेश्वर, इच्छागव्हान, पिंपरपाड़ा, मोवलीपाड़ा, सिंगपुर, हुजुड़बा, अलिविहिर, नवलपुर, सोजड़ांन, अश्या 10 ते 15 खेड़े गाव आहेत. ह्या गावांची एकूण लोकसंख्या 16 हजारापेक्षा अधिक आहे.
वरील सर्वच गावातुन 300 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेण्याकरीता अक्कलकुवा, तलोदा, येथे पायपीठ करीत येत असतात. 20 वर्षापुर्वी झालेल्या अतिवृष्टित ठाण्याविहीर फरशी पुल वाहून गेल्याने सदर बससेवा बंद झाली होती. काही दिवसांनी फरशी पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र अक्कलकुवा आगाराकडून रस्ते सर्वेक्षण अभावी गावकऱ्याना बस सेवा सुरु करण्यात आली नव्हती. ह्याबाबत ठाण्याविहीर ग्रुपग्रांमपंचायतचे सरपंच मानसिंग वळवी, रामसिंग नाईक(गुरूजी) ग्रामसेवक जी जे वसावे, आदिनी बससेवा सुरु करण्याकरिता सातत्याने आगार प्रमुखांकडे मागणी केली. मात्र यावर पोकळ आश्वासने देण्यात
येत होती. न्यू इंग्लिश स्कुल येथील प्राचार्य एस.एस.साळवे, पर्यवेक्षक व्ही.बी.पाटील व शिक्षक ह्यांच्या सहकार्याने नविन नियुक्त झालेले अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील ह्यांची भेट घेतली. श्री पाटील ह्यांनी त्वरित धुळे विभागीय कार्यालयाकडे रस्ता सर्वे करण्याचा मागणी प्रस्ताव सादर केला. मंत्रालयाकडून रस्ता सर्वे करुण जीपीएस ट्रक मिळाला. 26 जानेवारी ह्या दिवसाचे औचित्य साधुन त्वरित बससेवा सुरु करण्यात आली. तब्बल विस वर्षानंतर गावात सुरु झाल्यामुळे गावकऱ्यानी अबाल वृद्धसह गर्दी केली. ह्यावेळी गावकऱ्यांचा
आनंद वाखाडणाजोगा होता. आणि त्याहुन अधिक आनंद झड़कत होता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कारण शिक्षणासाठी मैलोमेल करावी लागणारी पायपीठ त्यांची थांबणार होती. यावेळी अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील,स्थानक प्रमुख रविंद्र जगताप, वाहन चालक अनिल वसावे, कंडक्टर पोपटराव गोफने, वाहतूक निरीक्षक सागर पाडवीं, आगार लेखाकार बी.के.वसावे, सहायक वाहतूक निरीक्षक एस.एस.खरडे,कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रताप वळवी, इंग्लिश स्कुलचे पर्यवेक्षक व्ही.बी.पाटील, शिक्षक एम्.जी.मगरे, व्ही.एस.साळवे, के.आर.वळवी,सुधाकर मराठे, टी.आर.सावरे ह्यांच्या सरपंच मानसिंग वळवी,
उपसरपंच पाडवी, ग्रामसेवक जी.जे.वसावे, सुरूपसिंग नाईक, सरवरसिंग नाईक,भगतसिंग सुनीताबाई पाडवी, कविताबाई पाडवी, शंकर कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर ग्रामस्थ, सरपंच व विद्यार्थ्यांकडून शिक्षक तथा पुण्यनगरी प्रतिनिधी सुधाकर मराठे ह्यांच्या विशेष सत्कार करुण त्यांचे आभार मानले...
न्यू इंग्लिश शाळेतील शिक्षकांकडून
विद्यार्थ्यांना फुकट बस पासेस, ठाण्याविहिर परिसरातील 70 ते 80 विद्यार्थी नियमित पने अक्कलकुवा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेण्याकरिता पायपीठ करुण यावे लागत होते. तर काही विद्यार्थी हे खाजगी वाहनात कोंबुन शाळेत येत होते, ह्याकरिता न्यू इंग्लिश स्कुल येथील  प्राचार्य एस.एस.साळवे, प्रयवेक्षक व्ही.बी.पाटील शिवदे, सुधाकर मराठे, एम्.जी.मगरे ह्यांनी नियमित अर्ज फाटे करुण बससेवा सुरु
करण्याबाबत पाठ पुरावा केला. सदर बससेवा सुरु झाल्याने गावातील ग्रामस्थानी शिक्षकाचे शॉल पुष्पगुच्छ देवून आभार मानले. ठाण्याविहीर परिसरातील 65 विद्यार्थ्याना शिक्षकांच्या वैयक्तिक खर्चातून बस पासेस काढून देण्यात आले. त्यात मानवविकास योजना व सावित्रीबाई योजना अश्या विविध योजनाचा फायदा विद्यार्थ्याना मिळवून दिला. सदर पासेस काढण्या करिता व्ही.बी.पटेल,एस.डी.शिवदे, के.के.आर.वळवी, एम्.जी.मगरे,सुधाकर मराठे टी.सावरे आदिनी परिश्रम घेतले                             
(महेंद्र पाटील आगार प्रमुख अक्कलकुवा) अक्कलकुवा ते इच्छागव्हन हि बस दररोज अक्कलकुवा येथून पहाटे 6:30 वाजता निघणार आहे , तसेच दुपारी 12:30 वाजता व सायंकाळी 5 वाजता अश्या तीन वेळेस बसचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. तसेच सदर बसचा विविध योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील ह्यांनी केले आहे. (तब्बल विसवर्षानंतर गावात बससेवा सुरु झाल्याने ग्रामस्थानी आनंद साजरी केला.. विस् वर्षापुर्वी वंनविभागाकडून ठाणाविहीर परिसरात बससेवा सुरु होती. मात्र अतिवृष्टित ठाणाविहीर रसत्यावरील फरशी पुल वाहून गेल्याने सदर बससेवा बंद करण्यात आली होती. तदनंतर तब्बल 20 वर्षानंतर बससेवा सुरु झाल्याने गावातील ग्रामस्थाचा आनंद गगनात महावेनसा झाला. बस पाहण्याकरिता गावातील बालक गृहस्थ सर्वाणीच् मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लहान बालकानी नाचुन तर मोठ्यानी साखरेचा प्रसाद वाटून आपला आनंद साजरी केला.

10 जुन ह्या रोजी दै.पुण्यनगरी वृत्तपत्रात छापुन आलेली बातमी. पत्रकार सुधाकर मराठे ह्यांच्या सत्कार करुण आभार मानताना सरपंच व ग्रामस्थ