Breking News

रविवार, २ जून, २०१९

७१ वर्षाची लालपरी ग्रामीण भागात झाली खिळखिळी

७१ वर्षाच्या लालपरीची चाके खिळखिळी झाल्याचा अनुभव दुर्गम भागातील जनतेला येत आहे.
अक्कलकुवा आगारातील परिवहन मंडळाच्या बसेसला स्टेपनी व टायर नसल्याने चालक-वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. अनेकवेळा टायर व स्टेपनी अभावी बसेस रस्त्यातच बंद पडत असून सुविधा उपलब्ध होईपर्यंत प्रवाश्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकीकडे 'बहुजन सुखायय बहुजन हिताय' हे ब्रीद घेवून गावोगावी धावणाऱ्या या लालपरीचा आज ७१ वा वर्धापण दिवस साजरा होत असतांना मात्र तीच्या खिळखिळ्या झालेल्या सुविधांकडे लक्ष देण्यात येत नसल्याने अनेकवेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. . एकेकाळी एसटीनेच प्रवास करण्यास अनेकजण आग्रही असत. मात्र, स्थिती बदलत चालली आहे. विविध कारणास्तव एस.टी.बस चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अक्कलकुवा आगार एक वेगळ्याच अडचणीत सापडले असून बसेसला टायर व स्टेपनीचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकुवा आगारात एकूण ७० बसेस आहेत. त्यापैकी १६ बसेस ह्या मानव विकासाच्या असून तीन मिनी बसेस आहेत. यापैकी दरदिवशी दोन बसेस नाशिक, तीन पुणे, तर जळगाव, मालेगाव, सुरत यासाठी दोन बसेस व मुंबई, औरंगाबाद, ब्राम्हणपूर, वापी या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नियमित एक बस सुरु आहे. मात्र, केवळ या लांब पल्ल्याच्या बसेसलाच स्टेपनी उपलब्ध करून दिली जात आहे. मध्येच चाक पंक्चर अथवा काही अडचण आल्यास दुसऱ्या आगाराकडून उधारीवर काम चालवले जात आहे. सध्या ८० टक्के बसेसला पुरेसे टायर व स्टेपनी नसल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. . प्रवासात बसचे एखादे चाक नादुरुस्त झाले तर प्रवाशांना रस्त्यावरुन जाणाऱ्या खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो आहे. खाजगी वाहन येईपर्यंत रस्त्यातच ताटकळत थांबावे लागते आहे. रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्था याला कारणीभूत असल्याचे अक्कलकुवा आगर प्रमुखाचे मत आहे
. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून निकृष्ट कामामुळे लोखंडी सळई, खडी निखळून पडली आहे. यामुळे अनेकवेळा टायरमध्ये खडी, लोखंडी सळई रुतून टायर व साईडवॉल निकामी होतात. परिणामी ते टायर वापरातून निकामी होते. टायर खराब झाल्यास धुळे येथील विभागीय कार्यशाळा (वर्कशॉप) येथे पाठविण्यात येते. ते रिमोल्ड करुन त्याचा स्टेपनी म्हणून उपयोग केला जातो. यामुळे जुनेच टायर बराच अंतर गाठून घेतात. दर महिन्याला सुमारे २५ हजार रकमेचे ४० ते ५० टायर रस्त्याअभावी बाद होत असल्याने अक्कलकुवा आगाराला आर्थिक फटका सोसावा लागत आहे. . एकेकाळी एसटीनेच प्रवास करण्यास अनेकजण आग्रही असत. मात्र, स्थिती बदलत चालली आहे. विविध कारणास्तव एस.टी.बस चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अक्कलकुवा आगार एक वेगळ्याच अडचणीत सापडले असून बसेसला टायर व स्टेपनीचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकुवा आगारात एकूण ७० बसेस आहेत. त्यापैकी १६ बसेस ह्या मानव विकासाच्या असून तीन मिनी बसेस आहेत. यापैकी दरदिवशी दोन बसेस नाशिक, तीन पुणे, तर जळगाव, मालेगाव, सुरत यासाठी दोन बसेस व मुंबई, औरंगाबाद, ब्राम्हणपूर, वापी या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नियमित एक बस सुरु आहे. मात्र, केवळ या लांब पल्ल्याच्या बसेसलाच स्टेपनी उपलब्ध करून दिली जात आहे. मध्येच चाक पंक्चर अथवा काही अडचण आल्यास दुसऱ्या आगाराकडून उधारीवर काम चालवले जात आहे. सध्या ८० टक्के बसेसला पुरेसे टायर व स्टेपनी नसल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. . एकेकाळी एसटीनेच प्रवास करण्यास अनेकजण आग्रही असत. मात्र, स्थिती बदलत चालली आहे.
विविध कारणास्तव एस.टी.बस चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अक्कलकुवा आगार एक वेगळ्याच अडचणीत सापडले असून बसेसला टायर व स्टेपनीचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकुवा आगारात एकूण ७० बसेस आहेत. त्यापैकी १६ बसेस ह्या मानव विकासाच्या असून तीन मिनी बसेस आहेत. यापैकी दरदिवशी दोन बसेस नाशिक, तीन पुणे, तर जळगाव, मालेगाव, सुरत यासाठी दोन बसेस व मुंबई, औरंगाबाद, ब्राम्हणपूर, वापी या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नियमित एक बस सुरु आहे. मात्र, केवळ या लांब पल्ल्याच्या बसेसलाच स्टेपनी उपलब्ध करून दिली जात आहे. मध्येच चाक पंक्चर अथवा काही अडचण आल्यास दुसऱ्या आगाराकडून उधारीवर काम चालवले जात आहे. सध्या ८० टक्के बसेसला पुरेसे टायर व स्टेपनी नसल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. . अक्कलकुवा आगाराकडे ६९ बसगाड्या असून त्यापैकी १६ बसेस या मानवविकासाच्या असून तीन मिनी बसेस आहेत.

 ६९ बसेस पैकी १३ बसेस या १० लाख किलोमीटरपेक्षा अधिक धावल्या असून कालबाह्य होण्याचा मार्गावर असल्या तरी त्याच बसेस रस्त्यावर धावत आहेत. सध्या अक्कलकुवा आगारात स्टीलबॉडी असलेली नवीन वाहन दाखल झालेले पाहावयास मिळत आहे. मात्र ते वाहन पूर्णत: नवीन नसून केवळ त्या वाहनांची बॉडी स्टीलची असल्याचे समजते. त्याचे इंजिन आदी बाबी जुन्याच आहेत. तर यापूर्वी देखील अशीच दोन वाहने आगरासाठी देण्यात आली होती. अक्कलकुवा आगाराला मागील पाच वर्षांपासून एकही नवीन बस न मिळाल्यामुळे जुन्या गाड्यांवर आपली गरज भागवावी लागत आहे. आगाराकडे असलेल्या गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.. 

 जिल्ह्यात रस्त्याची दुरवस्था आहे. अनेकठिकाणी रस्त्यावर खडी व लोखंडी सळई बाहेर आल्या आहेत. परिणामी दर महिन्याला ४० ते ५० टायर निकामी होत आहेत. अक्कलकुवा आगारात सध्याच्या स्थितीत स्टेपनी व टायरची आवश्यकता आहे. पर्याय म्हणून वाहन बंद पडलेल्या ठिकाणी स्टेपनी उपलब्ध करून दिली जात आहे. धुळे कार्यशाळेकडे स्टेपनी, टायर्सची मागणी करण्यात आलेली आहे. . 
 -अनुजा दुसाने, . अक्कलकुवा आगार प्रमुख.




बुधवार, २२ मे, २०१९

चारा छावणी-पाण्याची समस्या सोडवा ; तहसीलदारांच्या आश्वासनाने रात्री उशिरा आंदोलन मागे

तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कुवलीडाबरी येथे पाणी टंचाई बाबत प्रशासनाने गाढवाच्या
सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र ३१५ मानवी लोकसंख्या व ५९२ जनावरे संख्या असलेल्या या गावाला १७ गाढव प्रत्येकी ३२ लिटर प्रमाणे साधारणत: ११०० लिटर पाणी दोन खेपा करून नेत आहेत. प्रत्येकी व्यतीला दरडोई २० लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, प्रत्येक एका व्यक्तीला केवळ तीन लिटर पाणी मिळत असल्याने पाण्याची तृष्णा भागवणे अवघड ठरत आहे. चारा छावणीची अत्यंत आवश्यकता आहे. केवळ परंपरा पडू नये यासाठी शासन छावणी उभारत नसल्याचा आरोप लोकसंघर्ष मोर्चाने केला. याबाबत तातडीने उपाययोजना व्हावी म्हणुन काल तहसील कार्यालयात हंडा मोर्चा काढण्यात आला. मागणी मान्य होत नसल्याने सायंकाळ उशिरापर्यंत आंदोलक ठाण मांडून बसले होते. दरम्यान चारा छावणी बाबतची जाहिरात आज (दि.२१) प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. २५ तारखेपर्यंत चारा छावणी सुरु होणार असल्याचे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. .
तळोदा तालुक्यापासून अवघ्या ९ किमी. असलेले रापापूर व चौगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुयलीडाबरी, पालबारा, गोऱ्यामाळ, माळखुर्द, चिलमाळ, डेब्रामाळ आदी गावांना मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता नसल्याने याठिकाणचे प्रश्न गंभीर बनलेले आहेत. वन अधिकार कायदा झाला, कायदा अंतर्गत वनसामुदायिक अधिकार मिळाला ते मालक झाले. तरी देखील आदिवासींचा रस्त्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका हा संपूर्ण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर आहे. असे असताना ही शासनाने कुठलेही पूर्व
नियोजन व उपाययोजना न केल्याने तब्बल दुष्काळाचा झळा या ग्रामस्थाना पोहचल्यानंतर ग्रामस्थ व लोकसंघर्ष मोच्र्या या संघटनेचा माध्यमातून संघर्ष केल्यानंतर अखेर गाढवांवर पाणी पुरवठा करण्याचा निर्णयापुढे शासनाला झुकावे लागले. प्रत्येकी व्यक्तीमागे २० लिटर पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, याठिकाणी एका कुटुंबामागे मागे केवळ तीन लिटर पाणी दिले जात आहे. याठिकाणी गाय, बैल, बकरी असे ५९२ जनावरे असून त्यांच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. ग्रामस्थांनी महिन्याभरपूर्वीच चारा छावणी उभारण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले व अनधिकृतपणे असा पायंडा पाडला जाऊ नये. याबाबतीत शासन लोकांना न्याय देण्याऐवजी ही भूमिका घेतली, असा आरोप लोकसंघर्ष मोर्चाने केला आहे. ग्रामस्थाना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, तेथील मूलभूत सुविधा मार्गी लागव्यात, जनावरांसाठी चारा छावणी तात्काळ सुरू करावी, यासाठी संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हंडा मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयात ठिया मांडला. यावेळी खेमजी गवल्या वसावे, विनायक कुर्ता वसावे, रेवा सोत्या वसावे, पालाबार येथील नरपत राजा
पाडवी, इला पेचरा पाडवी, मैथून मोजा पाडवी, बोर्डीबाई खेमजी वसावे,अनिता कालुसिंग वळवी, लासु बाई काल्या वसावे, वळवी रमेश, गुलाबसिगं वळवी, दिलीप वळवी, कालूसीग नाईक,आमशा वसावे, राकेश पाडवी, सायसिग वसावे, ठाकूरसिग वसावे,बोखां वसावे, दिलवर वसावे, दिलीप नाईक, बाबुसिंग वसावे, राजा पाडवी, देविसिंग वसावे महाजन, निशांत मगरे, गणेश पराडके आदी उपस्थित होते..

 गाढवांचा सहाय्याने स्थानिक निधीतून पाणी पुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच कुयलीडाबरी हे गाव वनक्षेत्रात येते. दरम्यान सदर रस्त्यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केवलापाणी पावेतो रस्त्याची परवानगी प्राप्त झालेली असून कामे प्रगतीपथावर आहेत. . -

सावित्री खर्डे, गटविकास अधिकारी.

 तळोदा तालुक्यापासून अवघ्या ९ किमी.असलेल्या या गावात स्वातंत्र प्राप्तीनंतर सुद्धा मूलभूत सुविधा नाहीत. आदिवासीच्या जीवाशी आजही खेळ सुरूच आहे. गाढवांच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी प्रतिडोई तीन लिटर पाणी पुरविले जाते आहे. जनावरांसाठी आजही चारा पाण्याचा प्रश्न बिकट आहे. प्रधासनाने तातडीने यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. .
 -प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा.

 दीड वर्षाचे बाळ घेऊन हंडा मोच्र्यात सहभागी झाले आहेत. गावात उच्च शिक्षित तरुण-तरुणी आहेत. मात्र केवळ गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने तरुणांचे लग्न होत नाही. कोणी मेलेच तर दशक्रिया विधीसाठी सुद्धा करणे अवघड ठरते, सपूर्ण गाव एकवटून त्याठिकाणी सहकार्य करते. पाहुणे आले तर त्यांची सोय करणे अवघड ठरते..
 -उषा वळवी, कुयलीडाबरी.



सोमवार, २० मे, २०१९

अखेर गाढवाच्या मदतीने पोहचले पाणी

तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चारा व पाणी टंचाई बाबतचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. प्रशासन प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी कागदी घोडे नाचवत असल्याचा ग्रामस्थ आरोप करीत असून लोकसंघर्ष मोरच्यांच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात काल तळोदा कार्यालय गाठून सम्बधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.0 दरम्यान तातडीने उपपयोजना न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. पाण्याची गँभिर समस्यां बघता जिल्हाधिकारी यांनी गाढवांचा सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिल्यानंत गाढवांचा सहाय्याने कुयलीडांबरी येथे पाणीपुरवठा केला जात आहे. स्वातंत्र्याचा सत्तरी नंतर अतिदुर्गम भागातील तळोदा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रापापुर व चौगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुयलीडाबरी, पालबारा, गोऱ्यामाळ, माळखुर्द, चिलमाळ आदी गावांना मूलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने याभागात पाण्याची भीषण समस्यां भेडसावत आहे. याबाबतची कैफियत येथील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडे मांडल्यानंतर संबंधित विभागांना भेटी देऊन पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 11 रोजी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वास्तव पाहिले. त्यानंतर उपाय योजनांचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी
 यांच्याकडे सादर केला होता..मात्र आठ दिवस उलटूनही कुठलीच उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थाना घोटभर पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. यावर तातडीने मार्ग निघावा यासाठी कुयलीडाबरी, पालाबारी आदी गावांतील ग्रामस्थांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी 12 वाजेचा सुमारास तळोदा तहसील कार्यालय गाठून संबधित गटविकास अधीकारी सावित्री खर्डे यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला होता. तातडीने उपपयोजना न संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्यानंतर नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजना बाबत जिल्हाधिकरी बालाजी मंजुळे, लोकसंघर्ष मोर्च्याचा नेत्या प्रतिभा शिंदे,
तहसीलदार पंकज लोखंडे, आदींसह विविध विभागाचे अधिकारी यांची सयुक्तिक बैठक घेण्यात आली. गाढवाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र ही बाब शासकीय निष्कात बसत नसल्याने टाळाटाळ केली जात होती. यावर फेर चर्चा करण्यात आली. दरम्यान पाण्याची भीषण समस्यां व तेथील भौगिलीक परिस्थिती बघता गाढवांचा सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जि
ल्हाधिकारी यांनी दिले. शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी जाऊन पाहणी केली. दरम्यान रापापुर येथून सहाय्यक गटविकास अधिकारी सोनवणे, रापापुर सरपंच भिकलाल वळवी, ग्रामसेवक वळवी ग्रा.सदस्य व ग्रामस्थाच्या प्रमुख उपस्थितीत रापापुर येथून कुयलीडाबरी येथे एका गाढवावर 16 लिटचे 2 प्लास्टिकचे ड्रम बांधून 17 गाढव रवाना करण्यात आले आहेत. कुयली डाबरी येथे 51 कुटुंब राहत असून 315 एवढी लोकसंख्या आहे. दररोज 2 वेळा गाढव फेऱ्या मारणार असून यामाध्यमातून अकराशे लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

*चौकट*
 तळोदा तालुका हा पाण्यासाठी सदन तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र मोठ्या प्रमाणात झालेली वृक्ष तोड, कमी पर्जन्यमान व पाण्याची योग्य नियोजन नसल्याने यंदा प्रथमच गाढवाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात यापेक्षा बिकट समस्यां उदभवणार असे सांगणे वावगे ठरणार ना

 *प्रतिक्रिया🔸🔸🔸 
 मा.जिल्हाधिकारी यांचा आदेशांव्ये गाढवाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. चौगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चेरीमाळ येथे नाल्यात विहिर खोदण्यात आली असून पाईप लाईनच्या सहाय्याने जेंदाफडीमार्गे वरील गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे... *सावित्री खर्डे* *गटविकास अधिकारी*

 *प्रतिक्रिया🔸🔸🔸 
 पाणीटँचाई व चारा टँचाई बाबत ग्रामपंचायत मार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला होता. चारा टँचाई बाबत ठराव व संमती पत्र दिले होते. मात्र भौगोलिक परिस्थिती अभावी कायमस्वरूपी उपयोजना करण्यास प्रशासन हतबल असल्याचे सांगत होते. सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाला उपाययोजना करण्यास भाग पाडण्यात आम्ही यशस्वी झालो... *भिकलाल वळवी* *सरपंच रापापुर*

 *प्रतिक्रिया🔸🔸🔸 
 तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाणी टँचाईबाबतची भीषण परिस्थिती व भौगोलिक परिस्थिती बघता त्या ठिकाणी केवळ गाढवांचा सहाय्याने पाणीपुरवठा करणे शक्य असल्याने स्थानिक निधीतुन गाढवाच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचे आदेश सम्बधित विभागाला दिलेले आहेत. तसेच इतर समस्यां देखील तातडीने मार्गी लावल्या जाणार आहेत.. *बालाजी मंजुळे* *जिल्हाधिकारी नंदुरबार*

 *प्रतिक्रिया*🔸🔸🔸 
गाढवाच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची समस्यां मिटणार आहे. प्रशासनाने मूलभूत सुविधाकडे देखील जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. दिपक वसावे कुयली डाबरी ग्रामस्थ


कुयली डाबरी येथील ग्रामस्थ पाणीपासून झाले वंचित

तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चारा व पाणी टंचाई बाबत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून
उपाययोजना बाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. मात्र यास १० दिवस उलटूनही कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. पाण्यासाठी हाल सोसणाऱ्या ग्रामस्थांनी लोकसंघर्ष मोर्चाचे नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात प्रशासन जाब विचारण्यासाठी काल तळोदा गाठले. दरम्यान, संबधित अधिकाऱ्याला धारेवर धरत उपाययोजना केवळ कागदावर न नाचवता प्रत्यक्ष कृती करा अशी मागणी केली. तातडीने उपपयोजना न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.. तळोदा शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रापापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुयलीडाबरी, पालबारा, गोऱ्यामाळ, माळखुर्द, चिलमाळ आदी गावांना मूलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने याभागात पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. . याबाबतची कैफियत येथील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडे मांडल्यानंतर संबंधित विभागांना भेटी देऊन
पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले होते. त्या अनुशंगाने दि.११ रोजी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वास्तव पाहिले. त्यानंतर उपाय योजनांचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आठ दिवस उलटूनही कुठलीच उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. . यावर तातडीने मार्ग निघावा यासाठी कुयलीडाबरी, पालाबारी आदी गावांतील ग्रामस्थांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी १२ वाजेचा सुमारास तळोदा तहसील कार्यालय गाठले. दरम्यान, तहसीलदार पंकज लोखंडे उपस्थित नसल्याने गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांच्याशी चर्चा करत ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. .

गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी... ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा

कोयलीडाबर येथे दोन विहिरींचे खोलीकरणाचे काम सुरू आहे. तर माळखुर्द येथे चार बोअरवेल मंजूर केल्या आहेत. तसेच चिडीमाळ येथे नवीन पाईपलाईन ही प्रस्तावित केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही कामे पूर्ण होईपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा यावर कुठलेही ठोस उत्तर मिळू शकले नाही. याबाबतीत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बडगुजर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी या बाबतीत ग्रामस्थांना केवलापाणी पर्यंत पाणी टँकरने पोहचवणे, त्यापुढे चिडीमाळ व कोयलीडाबर पर्यंत गाढवाने पाणी पोहचविण्या बाबत मार्ग सुचवला होता. मात्र ही बाब शासकीय नियमात बसत नसल्याने इतर पर्यायाबाबत विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. .

जनावरांसाठी हवी चारा छावणी!
संतप्त गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व गुरांसाठी चारा छावणी तात्काळ सुरू करा अन्यथा, सोमवारपासून तहसील कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी खेमजी गवल्या वसावे, विनायक कुर्ता वसावे, रेवा सोत्या वसावे, पालाबार येथील नरपत राजा पाडवी, इला पेचरा पाडवी, मैथून मोजा पाडवी, बोर्डीबाई खेमजी वसावे, अनिता कालुसिंग वळवी, लासुबाई काल्या वसावे, वळवी रमेश, गुलाबसिंग वळवी, दिलीप वळवी, कालूसिंग नाईक, आमशा वसावे, राकेश पाडवी, सायसिंग वसावे, ठाकूरसिंग वसावे, बोखां वसावे, दिलर्व वसावे, दिलीप नाईक, बाबुसिंग वसावे, राजा पाडवी, देविसिग वसावे महाजन, निशांत मगरे, गणेश पराडके आदी उपस्थित होते..

घोटभर पाण्यासाठी तरसले आंदोलक .
दुपारी १२ वाजेदरम्यान भरउन्हात पाण्याची व्यथा मांडण्यासाठी आलेल्या कुयरीडाबरी, पालाबारा येथील ग्रामस्थांना कार्यालयाचा आवारात पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले नाही. कार्यालयात पाण्यासाठी शोध घेऊनही घोटभरी पाणी मिळाले नाही. प्रशासना मार्फत ठेवण्यात आलेले माठ देखील कोरडेच असल्याने संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. .



शुक्रवार, १७ मे, २०१९

मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला केराची टोपली

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे सुरेश नाईक यांनी गमावला पाय ; तीन वर्ष उलटूनही भरपाईच्या प्रतिक्षेत
अक्कलकुवा तालुक्यातील भाबलपूर येथील सुरेश नाईक रस्त्याने जात असतांना ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत त्यांना जबर दुखापत झाली होती. पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर रुग्णालयात दुखापत झालेल्या त्यांच्या उजव्या पायावर नुसतेच बॅण्डेज लावून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. मात्र येथेही त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. नाईक वेदनेने विव्हळत असतांना त्यांच्यावर योग्य उपचार न झाल्याने त्यांना कायमचाच पाय गमवावा लागला. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे नाईक यांना कायमचे अपंगत्व आले. डॉ.अभिजीत मोरे यांनी आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणाबाबत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीनुसार नाईक यांना झालेल्या शारिरीक त्रासाबद्दल एक महिन्याच्या आत दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश २६ एप्रिल २०१६ मध्ये आयोगाने दिले होते. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे सुरेश नाईक यांना प्रदान केलेल्या रकमेची पावती व कृत्रिम पाय लावण्याबाबतची सद्यस्थिती यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना सहा आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने
दि.१० जुलै २०१८ रोजी दिलेले आहेत. याबाबत नाशिक येथील आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार जिल्हा रुग्णालय यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. सदरच्या अहवालात सुरेश नाईक यांना दि.२७ फेब्रुवारी २०१६ रोजी कृत्रिम पाय बसविण्यात आला आहे. तसेच रक्ताच्या बाटल्यांसाठी चार हजार ६५० रुपये इतकी रक्कम परत करण्यात आलेली आहे. परंतू अद्यापही दोन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्याचे बाकी असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र अजूनही त्यांना नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दिलेल्या आदेशाला सुमारे तीन वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटूनही भरपाई न मिळाल्याने सुरेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकाला न्याय तर दुसऱ्याला प्रतिक्षा ६ जानेवारी २०१६ रोजी मुंबई येथे जनआरोग्य अभियानातर्फे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची जनसुनवाई आयोजित करण्यात आली होती. या जनसुनवाईत नंदुरबार जिल्ह्यातून दोन खटले मांडण्यात आले होते. नर्मदा बचाव आंदोलनाने वाडी पुनर्वसन येथील गरोदर मातेसाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलाविली होती. यावेळी सदर गरोदर मातेला सरकारी दवाखान्यात न नेता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी २५ हजार रुपये घेतले. या खटल्यात आयोगाच्या अध्यक्षांनी ्ल्हिहा आरोग्य विभागास सदर महिलेला ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर महिलेला ५० हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मिळाली आहे. तर जनार्थ आदिवासी विकास संस्थेने सादर केलेल्या खटल्यात आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे सुरेश नाईक यांना पाय गमवावा लागल्याने भरपाईची मागणी केली. त्यानुसार आयोगाने नाईक यांना महिन्याभराच्या आत दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले. यास तीन वर्ष उलटूनही अद्याप भरपाई अदा करण्यात आलेली नाही.

बुधवार, १५ मे, २०१९

कुयरीडाबरसह परिसरात उपाययोजनांसाठी बीडीओंचा सीईओंकडे अहवाल सादर

अतिदुर्गम भागातील तळोदा तालुक्यातील कुयरीडाबर, पालाबार, गौऱ्यामाळ, चिडमाळ या पाड्यांमध्ये मुलभूत सुविधा नसल्याने येथील रहिवाश्यांचे हाल होत आहेत. याबाबतची कैफियत येथील रहिवाश्यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडे मांडल्यानंतर संबंधित विभागांना भेटी देवून पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली. यामुळे उपाययोजनांबाबत अहवाल गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे काल सादर केला आहे. . स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही अतिदुर्गम भागातील तळोदा शहरापासून २० कि.मी. अंतरावर असणाऱ्या रापापूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कुयरीडाबर, पालाबार, गौऱ्यामाळ, चौगाव खुर्द ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गौऱ्यामाळ, चिडमाळ येथील रहिवाश्यांना मुलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत होता. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार दि.११ रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून तेथील दाहक वास्तव पाहिले. यामध्ये कुयरीडाबर येथे ३१५ लोकवस्ती असून पिण्याच्या पाण्यासाठी तीन कच्च्या विहीरी असून दोन कोरड्या ठाक पडल्या आहेत. तर एका विहीरीतून झऱ्याच्या स्वरूपात पाण्याची गरज भागविली जात असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. यामुळे येथे दोन कोरड्या विहीरींचे खोलीकरण, पालाबार किंवा केलापाणी येथून गाढवावरून पाण्याची वाहतूक, केलापाणी ते कुयरीडाबरपर्यंत चार कि.मी.अंतराचा रस्ता करण्याच्या उपाययोजना अहवालात नमुद करण्यात आल्या आहेत. तसेच पालाबार येथे दोन विहीरी असून पाणी पुरेसे नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. यामुळे एका विहीरीचे खोलीकरणाची उपाययोजना सुचविण्यात आली आहे. तसेच सुमारे तीन कि.मी.चा रस्ता करण्याबाबतची उपाययोजनादेखील सुचविण्यात आली आहे. अहवालात गौऱ्यामाळ येथे पाण्यासाठी चार हातपंप प्रस्तावित असून ग्रा.पं.निधीतून एक हातपंप प्रस्तावित करण्याची उपाययोजना सुचविण्यात आली आहे. तर चिडमाळ येथे नविन पाईपलाईन प्रस्तावित करणे, माळखुर्द ते चिडमाळपर्यंत तीन कि.मी.अंतराचा रस्ता करण्याबाबत अहवालात नमुद करण्यात आले आहे..

जिल्हा प्रशासनाने आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जावुन पाहणी केली आहे. त्यात चौघा पाड्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्याचे दिसून आले आहे. तसेच पाणी टंचाईची समस्या मोठी असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. असे असले तरी आता प्रत्यक्षात उपाययोजना होणार कधी याची प्रतिक्षा येथील रहिवाश्यांना आहे..


मंगळवार, १४ मे, २०१९

पायपीट करीत तहसीलदारांसह अधिकारी पोहचले कुयलीडाबरी

तळोदा तालुक्यातील कुयलीडाबरी, केलापाणी, पालाबारी, गोरामाळ, चिडीमाळ अशा दुर्गम भागातील पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गावात जाऊन पाणी व चारा छावण्यांबाबत तालुका प्रशासनास प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पायवाट तुडवित तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे, विस्तार अधिकारी बी.के.पाटील, ग्रामसेवक वसावे, माळखुर्दचे ग्रामसेवक आर.डी.पावरा, ग्रामीण पाणी
पुरवठा शाखा अभियंता सोनवणे, भूजल सर्वेक्षणचे अहिरे, डॉ.विश्वास नवले, रापापुर येथील सरपंच भिकलाल वळवी, अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक यांनी शनिवारी भेट दिली. केवलापाणी पर्यंत सर्व अधिकारी वाहनाने त्याठिकाणी पोहचले.त्यानंतर ७ ते ८ किमी अंतर पायपीट करीत पोहचतांना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली होती. गावात पहिल्यांदा अधिकारी पाहून ग्रामस्थ देखील अवाक झाले होते. ग्रामस्थांनी अधिकारी पाहून आनंद व्यक्त करत विविध समस्यांचा पाढा वाचला.. गावात रस्ताच नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. यामुळे तहान भागविण्यासाठी रानोवनी करावी लागणारी भटकंती व डोंगराळ भागात पाण्यासाठी तेथील रहिवाशांचे हाल पाहून तहसीलदार देखील अवाक झाले. रोजगार सोडून तहानेसाठी काय दिव्य पार पाडावे लागते याची प्रत्यक्ष अनुभूमी अधिकाऱ्यांनी घेतली. अनेकांना डोंगर उतरून खाली जावे लागत असल्याचे यावेळी सांगितले.
दररोज डोंगरावर चढून पाणी आणणे अवघड आहे. तसेच ग्रामस्थांकडे १७ गाढव असुन केलीपाणी व पालबारी येथील विहीरीच्या माध्यमातून कुयलीडाबरी येथे गाढवाच्या मदतीने पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. दरम्यान कुयलीडाबरी येथे ३ विहीरी असून केवळ एका विहिरीत झरा पाझरता आहे. त्यातून गावाची पाण्याची तहान भागवणे शक्य नसल्याने ग्रामपंचायत मार्फत खोलीकरण व ब्लास्टींगचे कामे सुरू असून २० ते २५ फूट खोलीकरण करूनही याठिकाणी पाणी लागलेले नाही. पर्याय म्हणून केवलापाणीपर्यंत ट्रॅकरने पाणी नेऊन पुढे गाढवाच्या साहाय्याने पाणी पोहचविण्यासाठी नियोजन करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान केलीपाणी,कुयलीडाबरी, पालाबारी या गावांच्यामध्ये एका खाजगी विहीरीला पुरेसे पाणी आढळले. सदर विहीर अधिग्रहण करून ते ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. .