Breking News

व्यक्ती विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्ती विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

शाळेच्या संस्कारांचा पहारेकरी ; चार दशकांचा निष्ठावंत सेवक : शिपाई भटू भाऊ

           काही व्यक्ती पदाने लहान असतात, पण त्यांच्या सेवेतून त्या संस्थेचे मूल्य मोठे करतात. असेच येथील पी. सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, अक्कलकुवा येथे दि. 16 डिसेंबर 1985 रोजी भटू त्रंबक मराठे, हे शिपाई या पदावर रुजू झाले. त्या काळात संस्थेचे मुख्याध्यापक म्हणून कै. व्ही. एन. तिवारी (चाचा) यांचे मार्गदर्शन लाभत होते. शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व दिले जात असलेला तो सुवर्णकाळ होता. शाळा व ज्युनिअर कॉलेजमध्ये अत्यंत प्रफुल्लित, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण होते. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असायची, वर्ग अक्षरशः फुललेले असायचे आणि शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना होत होती.
        अशा सकारात्मक आणि जबाबदार वातावरणात भटू भाऊंनी आपल्या सेवेला सुरुवात केली. शिपाई पदावर असूनही त्यांनी केवळ कामगार म्हणून नव्हे, तर शाळेचा एक अविभाज्य घटक म्हणून आपली ओळख निर्माण केली. शाळेची स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त राखण्याची जबाबदारी त्यांनी सुरुवातीपासून अत्यंत प्रामाणिकपणे स्वीकारली आणि ती जबाबदारी त्यांनी तब्बल 2026 पर्यंत अखंडपणे निभावली.
        दररोज सकाळी लवकर शाळेत येणे, सर्वप्रथम शाळेची स्वच्छता करणे, पटांगण झाडणे, वर्गखोल्या स्वच्छ करणे, बाके पुसणे- ही सर्व कामे त्यांनी नित्यनेमाने आणि मनापासून केली. मात्र, त्यांच्या कार्याला वेगळी उंची देणारी बाब म्हणजे त्यांची धार्मिक व संस्कारशील वृत्ती.

       शाळा परिसरातील पिंपळ, वड व औदुंबर अशा वृक्षांची पूजा करणे, त्यांना फेऱ्या घालणे, तसेच शाळेत असलेल्या देवतांच्या फोटोंना रोज अगरबत्ती लावणे—हे सर्व त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा अविभाज्य भाग होते. या कृतींमुळे शाळा परिसरात एक वेगळीच प्रसन्न, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनाही त्या वातावरणाचा लाभ होत असे.
            भटू भाऊंची सेवा ही केवळ कर्तव्यापुरती मर्यादित नव्हती; ती समर्पण, निष्ठा आणि आत्मीयतेने भरलेली होती. शाळेप्रती असलेली आपुलकी, संस्थेच्या प्रतिष्ठेची जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला आदर त्यांच्या वागणुकीतून सातत्याने दिसून येत होता.
         दि. 1 मे 2026 रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्या दिवशी ते शाळेचा निरोप घेतील, पण त्यांच्या पावलांच्या खुणा, त्यांच्या प्रार्थनेचा गंध आणि त्यांच्या सेवेतून रुजलेले संस्कार या शाळेच्या भिंतींमध्ये, वृक्षांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या आठवणींमध्ये कायम जिवंत राहतील. दि. 31 मे 2026 रोजी भटू त्रंबक मराठे हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्या दिवशी ते शाळेला निरोप देतील, पण त्यांनी दिलेली सेवा, रुजवलेले संस्कार आणि निर्माण केलेली सकारात्मक परंपरा ही कायम स्मरणात राहील.
             भटू भाऊंची सेवा ही निश्चितच प्रशंसनीय, अनुकरणीय आणि गौरवास्पद आहे. अशा निष्ठावंत सेवकांमुळेच शैक्षणिक संस्था केवळ ज्ञानाचे केंद्र न राहता संस्कारांची देवभूमी बनते....

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

कालू भाऊ - एक दिलदार, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व

जीवनात काही व्यक्ती अशा भेटतात, की त्यांची ओळख ही फक्त नावापुरती राहत नाही; तर त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे मन, आणि त्यांची माणूसकी यामुळे ते आपले मार्गदर्शक बनतात.
सुनील भाऊ सूर्यवंशी, म्हणजेच आपले लाडके कालू भाऊ, हे असेच एक व्यक्तिमत्त्व!

       कालू भाऊंचा स्वभाव म्हणजे दिलदार, सदाबहार आणि मनमोकळा. त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं, आणि त्यांच्या बोलण्यात एक वेगळंच आकर्षण असतं. कोणाशीही मनमोकळेपणाने बोलायचं, ओळखीचं नात्यात रुपांतर करायचं - हे त्यांच्याचकडे जमणारे गुण.
  
       कालू भाऊंना एक खास गुण लाभला आहे.
जे मनात ते तोंडावर!
त्यांच्या बोलण्यात खोटेपणा, दिखावा किंवा अन्यायाला जागा नाही. सत्य आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे दोन मजबूत खांब आहेत.

        आजच्या काळात पैसा सर्वकाही वाटत असताना, कालू भाऊंचं वेगळेपण इथेच जाणवतं. पैसा हा त्यांच्या जीवनातील उद्देश नाही; माणुसकी, नाती, आणि मैत्री हेच त्यांचं खऱ्या अर्थानं धन.

       जगात मैत्री ही खरीच असेल तर ती कालू भाऊंची! ते मित्रांसाठी आणि आपल्याच लोकांसाठी नेहमी पुढे असतात. त्यांचं नाव घेतलं की सगळ्या आठवणी हसू आणतात. कारण ते खरोखरच अजातशत्रू आहेत. त्यांच्या मनात कोणाबद्दल राग, कटुता, वा वैरभाव नसतो.  

      अभ्यास असो किंवा खेळ, कालू भाऊंचं योगदान नेहमीच उजवं! एक उत्तम क्रिकेटर आणि कौशल्यवान हँडबॉल खेळाडू असंख्य खेडाळू त्यांच्या मार्गदर्शनात घडले व घडत आहे.

      समाजात काय घडतंय, लोकांना काय हवं, राजकीय बदलांचा कोणावर कसा परिणाम होतो. याची उत्तम जाण कालू भाऊंच्या बोलण्यातून सतत जाणवते.
त्यांची विचारसरणी स्पष्ट आहे आणि निर्णयक्षमता मजबूत.

    माझ्यासाठी कालू भाऊ म्हणजे केवळ मोठे भाऊ नव्हेत, ते मार्गदर्शक, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि सातत्याने साथ देणारा आधार आहेत.
त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि माणूसकीमुळे ते माझ्याच नाही, तर अनेकांच्या जीवनात एका खास जागेवर आहेत.

         कालू भाऊ वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
        आपण असाच प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव करत राहा!

सुधाकर मराठे 
    तळोदा..

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

• सामाजिक कार्य आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडणारे : चेतन पाटील

(सुधाकर मराठे)
        चेतन पाटील हे एक शांत, संयमी, निगवी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची प्रामाणिकता आणि साधेपणा त्यांच्या जीवनात ठळकपणे दिसून येतात. चेतन यांचा जन्म एक शिक्षक कुटुंबात झाला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त आणि शिक्षणाचे संस्कार पक्के आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बरी राहत नसल्यामुळे तिला वेळोवेळी दवाखान्यात नेणे, तिची काळजी घेणे यामध्ये चेतनची भूमिका अतिशय मोलाची ठरते. कुटुंबातील या जबाबदारीमुळे चेतनची त्यांच्याविषयीची निष्ठा आणि सेवाभाव अधिक दृढ झाला आहे.

चेतनचे मोठे भाऊ वैभव पाटील हे व्यवसायिक आहेत. आणि चेतन त्यांना त्यांच्या कामात सहकार्य करतात. ते केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित न राहता, को-ऑपरेटिव्ह बँकेत कर्मचारी म्हणून आपली नोकरीही प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. बँकेतील कामातही त्यांची प्रामाणिकता आणि जबाबदारीची भावना स्पष्टपणे जाणवते.

क्रीडा क्षेत्रातही चेतनचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांचा 'रायझिंग स्टार" क्रिकेट संघात समावेश असून, त्यांची अष्टपैलू कामगार संघासाठी उपयोगात पडली आहे. त्यांनी या संघात खेळताना आपल्या क्रीडाप्रेमाची चुणूक दाखवली आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांची आवड आणि त्यांचा सहभाग त्यांच्या व्यक्तिमत्वात एक उत्साही बाजू जोडतो.

लग्न उशिरा झाले असले तरी, त्यांना साधी आणि सरळ स्वभावाची शहादा येथील पायल सहजीवनी म्हणून लाभली आहे, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत आणि समजूतदारपणात सुरू आहे. सहजीवनीही कुटुंबात सर्वांना सामावून घेणारी, साधी, सरळ आणि समजूतदार असल्याने दोघेही एकमेकांना चांगले पूरक ठरतात.

चेतनच्या जीवनात मित्रांचा आणि मैत्रीचा मोठा भाग आहे. त्यांच्या मित्रांच्या कोणत्याही मदतीला तो नेहमी धावून येतो. मित्रांचे विवाह समारंभ असो, किंवा कुटुंबातील इतर कार्य चेतन त्या प्रत्येक कार्याल मनापासून सहकार्य करतो. मित्रांशी असलेले त्याचे स्नेहसंबंध आणि त्याच्या प्रामाणिकतेमुळे, त्याला सर्वत्र आदराने पाहिले जाते.

विष दगडाच्या माध्यमातून वैद्रद्यकीय सेवा

त्यांच्या साधेपणामुळे आणि निस्वार्थी सेवाभावामुळे चेतनचे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून स्थान आहे. जे त्यांच्या नैसर्गिक गुणांसह सामाजिक कार्यात देखील सक्रिय आहेत. त्यांनी वारसााने लाभलेला एक नैसर्गिक दगडाच्या माध्यमातून सर्फ दंश किंवा अन्य विषारी जनावरांच्या दंशाचे विष उतरविण्याचे कार्य अनेक वर्षांपासून करत आहेत. या दगडाला स्थानिक भाषेत "विष दगड" म्हणून ओळखले जाते आणि याची परंपरागत उपयोगिता दंश स्थानिक विषयांच्या उपचारासाठी वीर. चेतन आहे या दगडाच्या विशेष गुणाचा अभ्यास करून, त्याचा वापर करतात, अनेक लोकांना दंशाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मदत...

शुक्रवार, ६ जून, २०२५

दिलखुलास, दोस्ती दुनियेतील राजा माणूस : ज्ञानेश्वर राठोड

सुधाकर मराठे                     
                      आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, काहींचा सहवास जास्त काळ लाभतो, तर काही चुटपुटत्या सहवासातही आपल्या मनावर कायमच्या कोरल्या जातात. काही चित्रपटाच्या माध्यमातून भेटतात, तर काही पुस्तकातून, चित्रातून, गाण्यातून. प्रवासातून आपल्याला आकर्षित करून जातात. अशा भेटलेल्या, आठवणीतल्या, सहवासातल्या, स्मरणात कोरल्या गेलेल्या काही व्यक्तींचे मनावर उमटलेले ठसे म्हणजे मित्र सखा ज्ञानेश्वर राठोड ...       
          आपण चांगलं काम केलं की मित्रच नव्हे तर समाज ही आपल्या मागे उभा राहतो. याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानेश्वर यास आम्ही प्रेमाने ज्ञानु असे म्हणतो, चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव या छोट्याश्या बंजाऱ्यांच्या तांड्यातून आलेले ग्रामीण भागातील हरहुन्नरी नेतृत्व, राजकारण समाजकारण आणि ग्रामीण पर्यटनशाखाचा अभ्यासक अशी एक त्यांची वेगळी ओळख, सहज, सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे. निगर्वी, प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे. कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा, आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभाव गुणामुळे तळोदा शहरातील प्रत्येक तरुणासोबत त्याचे मैत्रिपूर्वक संबंध प्रस्थापित झाले होते.  मनात कुणाबद्दलही आकस, राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे. 

वडिलोपार्जितच शेती व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय, वडील दगडू राठोड हे घोडेगावात सर्वांना परिचित धार्मिक वृत्तीचे, त्यांच्या पत्नी घोडेगावातील माजी सरपंच राहून चुकलेल्या महिला, त्यांचे दोघे भाऊ उच्चशिक्षित, एक जण दुबई येथे स्थित होते तर दुसरे मुंबई येथे बेस्ट मध्ये वाहन चालक होते. अत्यंत हालाखीचा परिस्थितीवर मात करत तीन मुली व दोन मुलांचा प्रपंच हाकत मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करणारे हे दोघी दाम्पत्यांनी आपल्या मुलांना संस्काराचे चांगले धडे दिले आणि त्यामुळेच 'मुहँ मे राम बगल में छुरी! अशी कपटनिती ज्ञानु यांच्या जवळपासही नाही. समाजपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी, त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते.         
                २००६ या वर्षी तो शिक्षणासाठी आपल्या मोठ्या बहिणीकडे तळोदा येथे आला. बारावीचे वर्ष असल्याने अभ्यासाची एक वेगळी स्पर्धा स्वतःशीच त्याची होती. या निमित्ताने कधी रोकडमन हनुमान, कनकेश्वर महादेव मंदिर तर कधी शाळा कोलेजचे पटांगण, ओट्टे, मोकळे मैदान हे त्याचे अभ्यासासाठी आवडते ठिकाण, त्याची व माझी एक वेगळीच गट्टी झाली, दिवसभरात सोबत असणे अभ्यासा सोबतच खेळांवर विशेष लक्ष देत तळोदा शहरात एक वेगळे स्थान आम्ही प्रस्थापित केले, ही मैत्री जपत असताना कुठेही काही संकट आले तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची आमची तयारी असायची.
   
 ज्ञानूने बहुतांश शिक्षण हे घरापासून लांब राहूनच पूर्ण केले, त्यामुळे विविध गावात राहून आलेला वेगवेगळ्या शहरांची माहिती त्याला होती. सर्वात प्रथम स्वप्नाचे शहर असे संबोधले जाणाऱ्या मुंबईला तो आम्हाला घेऊन गेला, मुंबईला त्याचे काका राहत असल्यामुळे बऱ्यापैकी मुंबई त्याने पायीच रोंदली होती, याचा फायदा आम्हालाही झाला. त्याने मुंबईचे बहुतांश परिसर आम्हाला पाईचं फिरवल्यामुळे पहिल्या फेरीतच मुंबई माझ्याही चांगलीच डोक्यात बसली. त्या दिवसापासून ते सलग आजवर विविध कडू गोड अनुभवांसह त्याचे आणि माझे नाते एक भावाप्रमाणे आहे. त्याचे कुटुंब व माझ्या कुटुंबातील असलेले हितसंबंध हे रक्ताच्या नात्यासारखे आहेत. एकमेकांच्या सुख दुखात धावून येत, नाते संबंध जोपासण्यासाठी सुरू असलेले आमचे प्रयत्न यामुळे आम्ही आजही शारीरिक दृष्टिकोनातून लांब असलो तरी मानसिक दृष्ट्या सदैव सोबत असतो. 
 
                                शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात बहुतांश कालावधी गेला कमी वयातच मेहनत करण्याची तयारी असल्याकारणाने कुठलेही काम हाती आले तरी ते करून आपले जीवन सार्थक होईल हे ठाऊक असले तरी प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जात संसाराचा गाडा ओढावा लागतो.
तळोदा सारख्या शहरात शिक्षण घेऊन आज तो समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून  समाजकार्यात अग्रेसर असलेल्या प्रथम फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहे. या माध्यमातून तळागाळातील लोकांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे कार्य त्याचे आजही सुरू आहे, असे करत असताना त्याची आवड देखील जोपासली जात आहे याचा आनंद वेगळाच आहे, वर्ष लोटत चालली वेळ निघत आहे अनेक जबाबदाऱ्या आपल्या अंगी येत असल्या तरी या सहजरीत्या पार करत आयुष्याचे कडू गोड आठवणी घेऊन जीवनप्रवास हा सुरू आहे. ज्ञानेश्वर यास मिळालेली अर्धांगिनी देखील हुशार मितभाषी सी देखणी मनमिळावू व समंजस असल्यामुळे आयुष्याचा जीवन प्रवास हा सुखाचा सुरू आहे या सुखात एक मुलगा व एक मुलगी अशी भर पडली आहे.  
           या जीवन प्रवासात अगदी किशोरवयापासून असलेला मित्र सोबत असल्याचा आनंदच वेगळा आहे या माध्यमातून केवळ आम्ही दोघेच नव्हे तर बहुतांश मित्रांना सोबत ठेवून वार्षिक सहल काढून एक मित्रत्वाचे नाते रक्ताच्या नात्या सारखे घट्ट करण्याचा आमचा प्रयास आहे. आपण सामाजिक ऋण फेडण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत या उक्तीचा साजेसे वागण्याचा त्याचा प्रयत्न आयुष्याची एक शिकवण देणारा आहे....

गुरुवार, १ मे, २०२५

कष्ट, प्रेम आणि एकता यांचे प्रतीक ; शांताराम मराठे (आप्पा) संघर्ष, कष्ट आणि यशाचा गाथा

काही व्यक्तींचे जीवन संघर्ष आणि कठोर परिश्रमांनी भरलेले असते, परंतु त्यातूनच ते आपले व्यक्तिमत्त्व घडवतात आणि एक मजबूत पाया उभारतात. अशाच व्यक्तींमध्ये आमचे वडील शांताराम मराठे (आप्पा) यांचा समावेश होतो. आप्पांचे जीवन हे परिश्रम आणि साधेपणाचे प्रतीक आहे. बाहेरून कडक स्वभाव असला तरी, त्यांच्या अंतरंगात मृदुता, प्रेम, आणि मुलांवर उत्तम संस्कार करण्याची अपार क्षमता आहे. त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासातून प्रेरणा घेत, मुलांनीही मेहनतीने मार्गक्रमण करावे, असे संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांना दिले. त्यांच्या जीवनाचे हे दर्शन म्हणजेच 'नारळ'सारखे व्यक्तिमत्त्व – बाहेरून कठोर, पण आतून प्रेमळ आणि मृदू आभाळ भर माया देणारे विशाल हृदयी आमचे आप्पा..
                                                                    *जन्म आणि प्रारंभ*

               पारोळा तालुक्यातील देवगाव येथे शांताराम मराठे यांचा वेडू सखाराम मराठे यांचा कुटुंबात जन्म झाला. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील पहिला धक्का बसला. त्यांच्या आई, पार्वता हिने कष्ट करून संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण केले. तिच्या कठोर परिश्रमामुळे शांताराम यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली, आणि त्यांनी १२ वी पावेतो शिक्षण पूर्ण केले.                                             *कुटुंबाची जबाबदारी*    


        आप्पाचे मोठे बंधूं स्व.गोविंद मराठे नोकरीसाठी बाहेर गेले आणि लहान बंधू स्व.दिगंबर मराठे हे राजकारणात बळी गेले. यामुळे कुटुंबाची जबाबदारी आप्पांवर आली. या परिस्थितीत त्यांनी धाडसाने पुढे येऊन आपल्या कुटुंबासाठी काम करणे सुरू केले.                  

 *करियरची सुरुवात*

           आप्पांनी आपल्या करियरची सुरुवात पोस्टमन म्हणून केली. त्यानंतर त्यांनी टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला, ज्या अंतर्गत त्यांनी लेडीज टेलर म्हणून काम केले. त्यांची हातकला आणि कष्ट यामुळे त्यांना शेतीसाठी देखील वेळ मिळाला, ज्यामुळे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय बनला.      

                   संघर्ष*                                                 सुरुवातीच्या काळात, आप्पांनी हाताला मिळेल ते काम केले. त्यांच्यासोबत आमच्या आई आशाबाईने देखील त्यांच्या व्यवसायात साथ दिली. बाजारात मठ पापड विक्री करताना त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर केला. तसेच, भाजीपाला विक्री, बर्फाचा गोला, कुल्फी विक्री आणि भाजलेल्या शेंगांची विक्री करून त्यांनी उदरनिर्वाह चालवला.  

*पत्नीची लाभली साथ:*

       आप्पांच्या विवाह आशाबाई मराठे यांच्याशी झाला, जे नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नबाबाई आणि संपत बढे यांची एकुलती एक मुलगी होती. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर १५ दिवसांनी, त्यांची आई नबाबाईने तळोदा येथे घर जवाई म्हणून राहण्यास आमंत्रित केले. या समर्थनामुळे शांताराम यांना स्थिरता मिळाली. आप्पांच्या जीवनात पत्नी आशाबाई यांची साथ ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या सहकार्यामुळे आणि समर्पणामुळे शांताराम यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार मिळाला आणि अनेक आव्हानांचा सामना करण्याची शक्ती प्राप्त झाली. आप्पांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक कठीण काळांचा सामना करावा लागला. आईने या सर्व कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन दिले. घरच्या कामातून ते बाहेर कसे पडतील याची काळजी घेत, त्यांनी आपले सर्वस्व कुटुंबासाठी समर्पित केले. दोघांनी मिळून व्यवसायात काम केले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य मजबूत झाले. त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आणि योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मुलांचे यश हे आप्पा आणि आई यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. आईने आप्पावर नेहमी विश्वास ठेवला. त्यांनी एकमेकांना प्रेरित केले आणि संकटांच्या काळात एकमेकांना आधार दिला. या विश्वासामुळे त्यांच्यातील प्रेम आणि एकजुटीला एक विशेष बळ मिळाल

संतती आणि संस्कार

             आप्पांचे ४ मुलांचे विवाह झाले. त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. मोठा मुलगा योगेश मराठे राजकारणात सक्रिय आहे, तर लहान मुलगा सुधाकर मराठे नोकरी, पत्रकारिता व व्यवसायात सक्रिय आहे. दिपीका शिंदे ही नंदूरबार येथे तर रुपाली पाटील हिचा विवाह भाच्याशी करून नात्यात दृढता निर्माण केली आहे. ते स्पर्धा परीक्षेचा माध्यमातून मुंबई येथे वर्ग दोन अधिकारी आहेत.  त्यांच्यातील हिम्मत आणि कष्टामुळेच त्यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

                                                                             *पुतण्याना सांभाळण्याची जबाबदारी* त्यांचे मोठे बंधू स्व.दिगंबर मराठे हे अभद्र राजकारणाचा शिकार झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पुतण्याचा देखील सांभाळ केला, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची एकता आणि एकमेकांसाठी प्रेम वाढले. यामुळे त्यांच्या कुटुंबात एक विशेष बंध तयार झाला, जो नेहमीच एकत्र राहण्यासाठी प्रेरित करतो.

         *अवास्तव पैसा खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकीवर भर

              आप्पाचे आर्थिक नियोजन नेहमीच उत्तम होते. त्यांनी आपल्या जीवनात आर्थिक व्यवस्थापनाचे महत्व लक्षात घेतले आणि कधीही अनावश्यक खर्च करण्यापेक्षा वाचवण्यात आणि गुंतवणुकीत विशेष लक्ष दिले पाहिजे असे ते नेहमी म्हणत. त्यांना अनावश्यक खर्च टाळण्याची खूप आवड होती. त्यांनी नेहमीच आवश्यकतेनुसार खर्च करण्याचा विचार केला. या मानसिकतेमुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता दिली. त्यांचे आर्थिक नियोजन त्यांच्या जीवनाच्या अनेक आव्हानांमध्ये मदतगार ठरले.

*जळला अर्धगवायूच्या आजार*

           2022 साली आप्पांना अर्धगवायूचा झटका आला, ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक मोठा धक्का बसला. यामुळे त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता भासली आणि त्यांना सुरत येथील नामांकित INS रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गंभीर परिस्थितीत, त्यांना त्यांच्या पत्नी आणि लहान मुलगा सुधाकर यांचा खूप मोठा आधार मिळाला. कुटुंबाने या कठीण काळात आपल्या पतीला प्रोत्साहन दिले. तसेच, सुधाकरने आपल्या वडिलांची काळजी घेतली आणि त्यांना बरे होण्यासाठी प्रोत्साहित केले. अर्धगवायूच्या उपचारानंतर, त्यांचे आरोग्य सुधारले, आणि यानंतर सुधाकरने आपल्या वडिलांच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. 

त्यांनी नबाई वास्तू साकारली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला एक स्थिरता मिळाली. वडिलांचा मनात एक चिंता होती, ती म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीची आर्थिक परिस्थिती बाबत. तिच्या भविष्यातील चिंता लक्षात घेऊन, सुधाकरने तिला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. या कृतीने मुलीला सुरक्षिततेची भावना दिली आणि तिला एक स्थायीत्व मिळवून दिले. 

*नातेवाइकांशी भेटीगाठी*  आजारपणानंतर, सुधाकरने सर्व नातेवाइकांना भेटीगाठी घेण्याची संधी साधली. त्यांच्या कुटुंबात एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण झाली आणि सर्वांनी एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी होण्याचे महत्त्व जाणले.

                      त्यांचे जीवन हे प्रेरणादायी असून संघर्षातही धैर्याने टिकून राहण्याची शिकवण देते. त्यांच्या यशाची कथा ही सुर्यवंशी कुटुंबातील प्रत्येकासाठी प्रेरणा आहे, ज्यांनी आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी कठोर परिश्रम घेतले त्यांच्या जीवनातील मूल्ये, आदर्श आणि कष्ट यामुळे ते त्यांच्या कुटुंबासाठी एक महान नायक बनले आहेत....   


9595008844

संघर्षातून उभारलेले सामर्थ्यः राहुल पाटील यांचा आदर्श प्रवास

सुधाकर मराठे
        राहुल पाटील यांचे जीवन संघर्ष, धैर्य आणि यशाचे उदाहरण आहे. तळोदा येथे राहणाऱ्या राहुलने आपल्या कठीण प्रवासातून खूप काही शिकले, संकटांवर मात करून स्वतःची यशस्वी ओळख निर्माण केली आहे. त्याचे बालपण साध्या कुटुंबात गेले. परिस्थितीने अनेकदा त्याला धक्का दिला, पण त्याने प्रत्येकवेळी नव्या जिद्दीने उभं राहून त्यातून नवी दिशा शोधली. एका साध्या कुटुंबातून आलेल्या राहुलने आपल्या जीवनात अनेक संकटांचा सामना केला. त्याच्या या प्रवासात त्याने अनेक दुःख, तणाव आणि खूप धैर्याची कसोटी घेतली, पण शेवटी आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सर्व संकटे पार करत यशस्वी जीवनाची गाथा लिहिली.
वडिलांचे छत्र हरपलेः एक दुःखद फटका
         कोरोना महामारीने अनेकांना स्वतःच्या माणसांपासून दूर केले. याच काळात राहुलने त्याच्या वडिलांना गमावले. वडिलांचे छत्र हरपणे हे त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत दुःखदायक ठरले. वडिलांचे छत्र हरपणे ही राहुलसाठी मानसिक, भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या खूप मोठी धक्का होता. कुटुंबाची जबाबदारी अचानक त्याच्यावर आली, आणि त्याच्या समोर उभ्या राहिलेल्या या संकटाने त्याला अधिकच मजबूत बनवले. वडिलांच्या जाण्यानंतर त्याला कुटुंबासाठी आधार बनण्याची आवश्यकता होती, राहुलच्या जीवनातील हा एक निर्णायक क्षण होता, ज्याने त्याला अधिक जबाबदार बनवले. वडिलांच्या जाण्यानंतर त्याला आपल्या आईला आधार देण्यासाठी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी स्वतःला मजबूत बनवावे लागले.         
  वडिलांच्या जाण्यानंतर राहुलने आपले शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षक म्हणून करिअर सुरु केले. शिक्षण हा त्याचा पहिला व्यवसाय होता, पण त्यातही अडचणी आल्या. संस्था चालकाचे आपापसातील वादामुळे त्याची नोकरी गेली. शिक्षकाच्या भूमिकेत असताना तो मुलांना जान देण्यासाठी उत्सुक होता, परंतु अचानक नोकरी जाण्याने तो निराश झाला. मात्र, त्याने हार मानली नाही. नोकरी गेल्यानंतर, राहुलने गुजरात राज्यात विविध कंपन्यांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. तिथे त्याने अनेक कंपन्यांमध्ये कामकाज पाहिले, अनुभव घेतले, आणि नोकरीतील कौशल्ये आत्मसात केली. पण त्याला हा पर्याय फार काळ टिकावू नाही वाटला. आपल्या कामात असलेल्या समाधानाच्या अभावामुळे त्याने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा विचार केला.

शेतीतील नव्या प्रयोगांची सुरुवात
           राहुलला नेहमीच वाटायचं की त्याने आपले काम असे करावे ज्यात त्याला समाधान आणि स्वतंत्रता मिळेल. त्यासाठी त्याने शेती या क्षेत्रात उडी घेतली. हा निर्णय घेताना त्याला अनेक आव्हाने होती, पण त्याच्या आत्मविश्वासाने त्याला यशाच्या मार्गावर नेले. त्याने जैविक शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगांचा वापर करत प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली. त्याच्या नाविन्यपूर्ण विचारसरणीमुळे त्याने शेतीत अनेक सकारात्मक बदल घडवले.
वैयक्तिक जीवनातील संघर्ष आणि आनंद
            राहुलच्या वैयक्तिक जीवनातही अनेक आव्हाने होती. त्याचे लग्न चिनोदा येथील दिक्षा सोबत झाले, परंतु बाळाच्या आगमनासाठी त्यांना आठ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर, त्याच्या जीवनात नक्ष या बाळाच्या रूपाने आनंदाचा किरण आला. या आठ वर्षांच्या प्रतीक्षेत त्याने अनेकवेळा त्यांनी धैर्य गमावले, पण त्याच्या पत्नीच्या आणि कुटुंबाच्या प्रेमामुळे तो या संघर्षातही खंबीर राहिला.
"एकत्रीत जीवनाची गोडीः राहुल व दीक्षा यांची जोडी"
             राहुल यास दीक्षाच्या रुपाने एक सुंदर, सुशील, मनमिळाऊ, मितभाषी आणि सुशिक्षित पत्नी मिळाली आहे. दीक्षा ही सर्वाना सहानुभूतीने समजून घेणारी आणि त्यांच्या भावना जाणणारी आहे. ती राहुलच्या जीवनात एक सकारात्मक वळण आणण्यास मदत करते. दीक्षा च्या सहवासात राहुलने अनेक गोष्टी शिकल्या आहेत. तिचा शालीनता आणि समजूतदारपणा त्यांच्या नात्याला अधिक मजबूत बनवतो. दीक्षा आपल्या सहलीत सर्वांना सामावून घेताना, मैत्री, प्रेम आणि एकतेचा संदेश देत असते. त्यांची जोडी एक आदर्श उदाहरण आहे, जिथे प्रेम, समर्पण आणि आपुलकीने भरलेले जीवन एकत्रीत चालते. राहुल आणि दीक्षा यांचे जीवन हे एकमेकांच्या सख्याने भरलेले आहे, जे त्यांच्या प्रेमात अधिक गहराई आणते.
एक समंजस मनमिळावू मित्र

           राहुल एक हुशार आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे. मित्रांना वेळ देणं, त्यांच्या अडचर्णीना समजून घेणं याची त्याला विशेष आवड आहे. त्याच्या मित्रांना त्याच्याकडून नेहमीच आधार मिळतो, आणि त्याच्या सहवासात ते आनंदी असतात.

              राहुलच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी आणि त्याचा मुलगा नक्ष आहेत. बहीण लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाली आहे. तर तळोदा येथे राहुल हा निवासी आहे. या नवीन जीवनशैलीत तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो, नवीन ठिकाणी फिरण्यासाठी जातो आणि नवनवीन प्रयोग करतो.
क्रिकेटची आवड आणि नव नवीन प्रवासाची धडपड
          राहुलला क्रिकेटवर विशेष प्रेम आहे. त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला मिळालं की, त्याला पुन्हा लहानपणीचा आनंद मिळतो. त्याचबरोबर त्याला नवीन गोष्टी शिकण्याची, नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे. या आवडीतूनच तो स्वतःच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत राहतो. रायझिंग स्टार संघात त्याचे एक वेगळे स्थान होते आज त्याने क्रिकेट खेळणे बंद केले आले तरी आजही तो संघ सदस्यांचा संपर्कात आहे.
        राहुलच्या जीवनाची कहाणी संघर्षातून यशाकडे जाणारी आहे. त्याच्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने त्याने कधीच हार मानली नाही. वडिलांचे छत्र हरवूनही, नोकरी गमावूनही, त्याने नवीन दिशा शोधली आणि आज तो एक यशस्वी शेतकरी म्हणून ओळखला जातो. त्याचा प्रवास केवळ यशाचा नाही, तर संघर्ष आणि धैर्याचा आहे, ज्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळू शकते. राहुलचे जीवन शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली, तरी सकारात्मकता, धैर्य, आणि प्रयत्नांना पर्याय नाही. त्याची ही जीवनगाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, कारण त्याने सर्व संकटांना तोंड देत आपल्या स्वप्नांना साकार केले आहे.

रविवार, २७ एप्रिल, २०२५

जनतेचा खरा सेवक - हितेंद्र श्रवणसिंह क्षत्रिय

   "कुछ लोग ऐसे होते हैं जो अपने लिए नहीं, दूसरों के लिए जीते हैं!" या चित्रपटातील ओळीसारखे काही माणसं असतात, जी स्वतःच्या यशापेक्षा जनतेच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी झटतात.
              तळोद्याच्या मातीतून असेच एक झुंजार, प्रामाणिक आणि संवेदनशील नेतृत्व घडले ते म्हणजे *हितेंद्र श्रवणसिंह क्षत्रिय!*
        साध्या परिस्थितीतून प्रामाणिक मेहनतीने जीवनाचा प्रवास सुरू करून, आज ते जनतेच्या मनातील "हीरो" झाले आहेत. संकटसमयी मित्रांसाठी धावून जाणारे, समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवणारे, आणि कार्यकर्त्यांसाठी आधारस्तंभ असलेले हितेंद्र क्षत्रिय यांचा आज वाढदिवस ...

*"हीरो जन्मत नाही, तो घडतो — संघर्षातून, प्रेमातून, आणि सेवेतून!"*

        तळोद्याचा मातीत श्रवणसिंह क्षत्रिय यांच्या कुटुंबात जन्मलेले हितेंद्र क्षत्रिय यांनी आपल्या जीवनाची सुरुवात अत्यंत साध्या आणि गरिबीच्या परिस्थितीतून केली. त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करत त्यांनी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि धैर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या जीवनाला एक नवा आकार दिला.
 
हितेंद्र क्षत्रिय हे स्वतःपेक्षा दुसऱ्यांची काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व आहे. संकटसमयी मित्रांच्या मदतीला धावून जाणारे, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे, आणि जनतेच्या हितासाठी झटणारे असे ते नेहमीच ओळखले जातात.
 
ते माजी बांधकाम सभापती आणि माजी उपसभापती (तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती) म्हणून जबाबदारी सांभाळून कार्यरत राहिले. तसेच श्री. गणेश सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबवले. ते प्रभाग क्रमांक २ मधून, मुस्लिम बहुल वॉर्डातून निवडून आलेले सक्रिय नगरसेवक आहेत.
 
         हितेंद्र क्षत्रिय यांची राजकीय वाटचालही अत्यंत प्रेरणादायी आहे. शहरातील राजकारणाचे केंद्रबिंदू भरत माळी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. सलग चार वेळा निवडून आलेले नगरसेवक संजय माळी, जिवा भावाचे मित्र योगेश मराठे व संदीप परदेशी व मित्र परिवार यांच्या सहकार्याने श्री. गणेश सोशल ग्रुप स्थापन करून समाजकारणाला गती दिली.
 
              गरिबांच्या मदतीसाठी तत्पर राहणारे हे युवा नेतृत्व म्हणजे खऱ्या अर्थाने "गौर गरिबांचा आधारस्तंभ" आहे. राजकीय प्रवासात त्यांनी काही कारणास्तव काँग्रेस पक्षातून बाहेर पडून माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
 
           2025 साली, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली नवे राजकीय पर्व सुरू केले.
 
       हितेंद्र क्षत्रिय यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर जनतेच्या मनातही अढळ स्थान निर्माण केले आहे. *"किसका आदमी है? हीतू दादा का!"* असे सहज आणि अभिमानाने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. त्यांच्या प्रेमापोटी, प्रकाश पाडवी या जिवाभावाच्या कार्यकर्त्याने तर हनुमानासारख्या भक्तीभावाने हितेंद्र क्षत्रिय यांचे छायाचित्र थेट आपल्या छातीवर रेखाटले आहे!  हा प्रसंग हितेंद्र क्षत्रिय यांच्यावरील प्रेम, निष्ठा आणि श्रद्धेचा सर्वोच्च नमुना आहे...
 
**हितेंद्र क्षत्रिय** म्हणजे
 
- लोकसेवेची ओढ असलेला नेता,
 
- गरिबांसाठी धावून जाणारा मित्र,
 
- आणि "नगरसेवक कसा असावा" याचे जिवंत उदाहरण!
 
गरिबाच्या घामाला किंमत देणारा, मित्राच्या दुःखात मिठी घालणारा, आणि तळोद्याचा खरा शिलेदार त्यांच्या या कार्यशील, प्रामाणिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 
*"दीर्घायुष्य लाभो, आरोग्य उत्तम राहो आणि जनसेवेत नवनवीन यश मिळो."*

सुधाकर मराठे 
...तळोदा....