Breking News

गणपती बाप्पा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गणपती बाप्पा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

संत गोरा कुभार देखावा ठरला आकर्षण

तळोद्यातील बडादादा गणेश मंडळाची ६० वर्षाची परंपरा चिखल मळताना विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले गोरा कुंभार आपल्या बालकाला चिखलात तुडवतात, मात्र त्यावेळी विठ्ठल धावून येत बालकाला कसे वाचवितात हा अविस्मरणीय भक्तीमय प्रसंग तळोदा शहरातील बडादादा गणेश मंडळाने साकारला आहे. सदर जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. . तळोदा शहरातील शनिगल्लीतील बडादादा गणेश मंडळाची स्थापना ६० वर्षा पासून करण्यात येत आहे. मंडळाकडून दरवर्षी प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात. यापूर्वी शिवाजी महाराज दरबार, फिरते कमळाचे फुल, गाढवाचे लग्न, जमिनीवर चालणारे विमान, फिरते मंदिर, कडक लक्ष्मी, असे अनेकाधिक जनप्रभोधनात्मक देखावे मंडळाने सादर केले आहेत. यावर्षी जनप्रबोधन देखाव्याची परंपरा कायम ठेवत १९६७ साली राजू ठाकूर यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘संत गोरा कुंभार’ या चित्रपटातील देखावा सादर केला आहे. यात गोऱ्या कुंभराची पांडुरंगावरील असलेल्या अतूट भक्तीचे दर्शन घडविले आहे. भक्त्तीत तल्लीन झालेला गोरा कुंभार हा प्रत्येक घटकात पांडुरंगाचे नाम स्मरण करतो..
एकेदिवशी त्याची पत्नी तानुल्या बाळाची जबाबदारी सोपवून नदीवर पाणी भरण्यास जाते. पांडुरंग नामस्मरनात तल्लीन होऊन कुंभार हा मटकी घडण्याकरिता माती मळनेचे काम करत असतो. दरम्यान चिमुकले बालक किंकाड्या करून जोराजोराने रडू लागते. मात्र भक्त्तीत तल्लीन झालेल्या गोरा कुंभाराला त्याचे भान नसते. बाळ रेंगाळत रेंगाळत पायीखाली येते. भक्त्तीत वेळा झालेला गोरा कुंभार अक्षरशः पाया खाली आपले चिमुरडे बाळ तुडवुन काढतो. त्याची पत्नी पाणी भरून परतल्यावर घडलेला सर्व प्रकार पाहते. पायाखाली रक्तभभाळ अवस्थेत पडलेल्या बाळाला पाहून माझे बाळअअअअअअ अशी जोराची किंचाळी देते. कसे वडील आहेत तुम्ही, स्वतःच्या पोटाचा पोराला पायाखाली चिरडून मारून टाकले. तरी सुद्धा तुला विठलाची पडलीय,
त्यावेळी भानेवर आलेल्या कुंभार सर्व प्रकार पाहून अचंबित होतो. हे कसे घडले त्यावर त्याला विश्वास बसत नाही. तो हमरडा फोडून रडतो. विठला कुठल्या पापाची शिक्षा दिली असा प्रश्न करतो. हे ऐकून त्याची पत्नी विठलाचा अंध भक्त्तीत तुला तुझा स्वतःचा मुलगा दिसला नाही. तू त्याला पाया खाली रोंदले, हत्यारा आहेस तू, पापी आहे. एवढे होऊनही त्या काळ्या विठलाचे नाव काढतोय. ज्याचे तुझ्या पूजा अर्चनाने पोट भरले नाही. तुझा एकुलता एक मुलाचा बळी तुझ्याकडून मागितला. अश्या कठोर हृदयाचा काळ्या देवासाठी माझ्या घरात जागा नाही. या दगडाला बाहेर काढ जर मी हे पहिले केले असते तर आज हा दिवस आला नसता. अश्यावनिक शब्दात राग व्यक्त करून विठलाची मूर्ती घरा बाहेर नेते. तेवढ्यात गोरा कुंभार तिच्या हातातून मूर्ती घेतो. व असा अनर्थ करू नकोस म्हणतो. यानंतर विठलाचे दर्शन होते. अश्या परिस्थितीत सुद्धा तू माझी साथ सोडली नाहीस,
माते तुझ्या मुलांसाठी देवासोबत सुद्धा भाडण्यास तू तयार झाली. जसा आईसाठी तिचा पुत्र तसाच माझ्यासाठी माझा भक्त असे म्हणत विठ्ठल त्या बाळाला जीवदान देतो. या देखाव्यात गोरा कुंभाराची भूमिका पवन गुरव यांनी साकारली तर त्याची पत्नीची भूमिका गौरव गुरव याने साकारली आहे. अत्यंत सात्त्विक असा चेहरा आणि भावना ओतून साकारलेल्या ही भूमिका पाहण्यासाठी आलेल्या भक्ताचा अंगावर शहारे उभे करत आहे. सदर देखावा पाहताना अनेकांचे डोळे पाणावत आहे. देखावा सादरीकरनासाठी निंबा गुरव , भिला गुरव, तुषार गुरव, दिनेश लोहार,नितीन दातीर, रितेश देडगे, महेंद्र गुरव, सनी पाटील, हरीश साळुंखे, सुयोग पाटील, गोकुळ मिस्तरी, राकेश गुरव,सूरज शिंपी, नंदू पाटील, शिरीष भावसार आदींसह सदस्यांनी संयोजन केले...

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

फुलांची उधळण करत पत्रकार संघाचा दीड दिवशीय गणरायाचे थाटात निरोप

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवशीय गणरायाचे आज थाटात विसर्जन करण्यात आले. गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरणपूरक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.. पत्रकार संघातर्फे सालाबादप्रमाणे दीड दिवशीय गणरायाची विधिवत पद्धतीने स्थापना करण्यात आली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्री.ची स्थापना पत्रकार संघाने केली होती. आज सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सकाळी १० वाजता स्मारक चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. स्मारक चौक मार्गे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गो.हू. महाजन शाळेतील संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या लेझीम पथकाने आकर्षक नृत्य सादर केले. तर नेमसुशील विद्यामंदिर मधील प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी नंदुरबार वाजंत्रीवर शिस्तबद्ध पद्धतीने लेघीम नृत्य सादर केले. मारुती मंदिराजवळ आमदार उदेसिंग पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी . मुख्याध्यापक अजित टवाळे, अतुल सूर्यवंशी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, भास्कर मराठे, योगेश पाडवी, सुभाष चौधरी, सतिवान पाडवी, नितीन पाडवी, निखिल तुरखिया, भाजपा तालुका अध्यक्ष शाम राजपूत, मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, पृथ्वीराज राजपूत, प्रा.विलास डामरे, विपुल कुलकर्णी, अनुप उदासी, हेमलाल मगरे, माजी उपसभापती आकाश वळवी, शहादा-तळोदा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे समन्वयक योगेश मराठे, संदीप परदेशी, बबलू माळी, आनंद सोनार, नंदु जोहरी, कल्पेश सूर्यवंशी, संतोष वानखेडे, जयेश सूर्यवंशी, भिका ठाकरे, रसिक वाणी आदींसह सर्व राजकीय पक्षाचे पुढारी, जेष्ठ नागरिक व गणेश भक्त उपस्थित होते. विसर्जन मिरवणुक यशस्वी पार पाडण्यासाठी संघाचे अध्यक्ष प्रा.अशोक वाघ, उपाध्यक्ष ईश्वर मराठे, सचिव सुधाकर मराठे, कोषाध्यक्ष सम्राट महाजन आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले..















   
 










मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

सार्वजनिक दादा गणपती मंडळाचा देखावा घेतोय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव 'कचरों के खिलाडी' आरास मधून नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न

तळोद्यात ७२ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक दादा गणपती मंडळ नाटीकेच्या स्वरूपात सादर करीत असलेल्या 'कचरों के खिलाडी' ही आरास लक्षवेधी ठरत असून या ठिकाणी नाटीका बघण्यासासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. या देखाव्यात अस्वच्छता रूपी कचरासुरला मारण्यासाठी विविध सिने अभिनेते येतात व आपल्या शक्तीचा, बॉम्ब व बंदुकीने कचरासुरला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र कचरासुर अशा नायकांच्या शक्तीने नष्ट होत नाही. तर हातात झाड़ू, नैतिक जबाबदारी व योग्य समजदारीनेच अस्वच्छता रूपी कचरासुर नष्ट होईल. हे स्वच्छतेचे व्रत जो स्विकारेल तोच खरा नायक व तोच खरा बाहुबली होय, असा संदेश या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक दादा गणपती मंडळाने केला आहे.. सार्वजनिक दादा गणपती हा तळोदा शहराचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या व मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री दादा गणपतीवर असलेली श्रद्धा व प्रेम अवर्णनीय आहे. श्रद्धा व समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून मंडळाची ओळख आहे. ७२ वर्षापासुन दरवर्षी विविध आकर्षक व समाजप्रबोधनावर आधारित देखावा सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी प्रबोधनात्मक व राष्ट्रीय मोहिम स्वच्छ भारत अभियानावर आधारातीत जीवंत देखावा 'कचरों के खिलाडी' या देखाव्याने तळोदा शहरातील व तालुक्यातील इतर खेड्यातील गणेशभक्तांची मने जिंकत आहे. यात सीनेअभिनेत्यांचा माध्यमातून स्वछतेचा संदेश दिला जात आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान व या महानायक अमिताभ बच्चन यांना जनजागृती करण्याची वेळ येते, ही शोकांतिका आहे.या देखाव्यात अस्वच्छतारूपी कचरासुरला मारण्यासाठी केलेले विविध प्रयत्न फोल ठरत असल्याने शेवटी नागरिकांनी हातात झाड़ू घेऊन स्वत:ची नैतिक जबाबदारीची योग्यता समजूनच अस्वच्छतारूपी कचरासुर नष्ट होईल असा संदेश या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक दादा गणपती मंडळाने केला आहे. या नाटीकेची संकल्पना शिक्षक अरुण गुरव यांची असून सादरीकरण मराठा चौकातील बालक व तरुण करीत आहेत. यासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल धनगर, उपाध्यक्ष मयूर पाटील, खजिनदार विक्की गुरव, सचिव चेतन मराठे, सदस्य सुभाष शिंदे, रविंद्र गाढे, चंद्रकांत पाटील, चेतन गुरव, प्रशांत गवळे, योगेश पाटील, योगेश परदेशी, संदीप गुरव, गणेश कलाल, राजेंद्र जाधव व सहकारी परिश्रम घेत आहेत. त्यांना नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, न.पा. बांधकाम सभापती भास्कर मराठे, शिवसैनिक संजय पटेल, माजी नगरसेवक प्रल्हाद फोके, नवनीत शिंदे, वसंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे..





आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम

आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम तळोदा येथील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळातर्फे स्थलांतराची व्यथा या ज्वलंत विषयावर सजीव देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

 तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २3 वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदांना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, स्त्रीभ्रूण हत्या, बाल कामगार रोखणे, भूत महल, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्य संग्रामातील यशोगाथा, बेटी बचावाचा संदेशसह, धार्मिक, पौराणिक, देशभक्तीपर, देखावे सादर केले आहेत.. या वर्षी *स्थलांतराची व्यथा* या ज्वलंत विषयावर आरास तयार केली आहे. गावाकडे रोजगाराचे साधन नाहीत, शासनाचे सतत बदलणारे धोरण, आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीत होणारे आर्थिक नुकसान आदींवर मार्ग काढणे कठीण होते. शासनाच्या भरवश्यावर न राहता स्वत:च रोजगार कसा मिळेल यासाठी अनेक कुटुंबे गावोगावी भटकतात. वीटभट्टी, इमारत बांधकाम, रेती काढणे यासारखे मिळेल ते काम करून जगण्यापुरतीच मजूरी पदरात पडली तरी ते समाधानी राहतात. परंतु रोजगाराच्या या भटकंंती मुळेच आरोग्याचे गंभीर प्रश्न, तसेच वर्षातील ७ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागल्याने मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, गरोदर माताचे व कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमानात वाढ झालेली पहावयास मिळते. या ज्वलंत विषयावर सर्वोदय गणेश मंडळातर्फे आरास स साकारण्यात आली आहे. यात एक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असल्याचे दाखवले आहे. कुटुंब प्रमुख असलेला श्यामने
कामासाठी अटीतटीचे प्रयत्न करून ही त्याच्या नशिबी निराशाच येते. कुटुंबाच्या दै. गरजा पूर्ण होत नाहीत. मुला बाळाच्या शिक्षणापेक्षा त्यांचे पोट भरणे अवघड होते. या करिता रोजगाराच्या शोधात श्याम कुटुंब घेऊन शहराकडे उदरनिर्वाहासाठी जातो. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. मात्र शहरात आल्याने त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम झाल्याने मुलगा अपयशी झाल्यावर नैराश्यातून आजारी पडतो. मात्र श्यामकडे पैसे नसल्याने तो मुलाचे उपचार करु न शकल्याने मुलगा दगावतो. तर यातून श्याम पूर्णपणे खचून दारुच्या आहारी जाऊन त्याचाही व्यसनामुळे मृत्यू होतो, असे देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे स्थलांतरीय कुटुंबाची व्यथा सजीव देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न सर्वोदय गणेश मित्र मंडळाने केला आहे. यात पप्पू साळवे, कल्पेश चौधरी, जितेंद्र चित्ते, कुशल चौधरी, गुंजन चौधरी, शुभम ठाकरे, हर्ष किनगावकर, संदेश देवरे, जयेश चित्ते, उमेश पाटील, रोहित कलाल, समीर ठाकरे आदींनी अभिनय केला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, उपाध्यक्ष किरण ठाकरे, सचिव राकेश साळवे, खजिनदार दीपक पवार सदस्य दीपक चौधरी, उमेश ठाकरे, नरेश चौधरी, दीपक सूर्यवंशी, कुणाल ठाकरे आदींसह सदस्यांनी देखावा सादरीकरणासाठी परिश्रम घेतले..

शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

बडादादा गणेश मंडळातर्फे प्रतिज्ञेतून देशभक्तीचा जागर!

तळोदा येथील बडादादा गणपती नवयुवक मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात 'भारत माझा देश आहे' या प्रतिज्ञेवर आधारित सजीव आरास सादर करुन लोप पावलेल्या लोकनृत्य व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येत आहे. तसेच आई-वडीलांना वृद्धाश्रमात न पाठविता त्यांना चांगली वागणूक द्या, विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे प्रबोधन देखाव्यातून केले जात आहे..

 तळोदा येथील शनिगल्लीतील बदादादा नवयुवक गणेश मंडळ मागील 57 वर्षा पासून विविध सामाजिक, धार्मिक, आदी विविध विषयांवर प्रबोदनात्मक आरास सादर करून जनजागृती करीत आहे. त्यात भक्त पुडलीक, श्रवणबाळ, मदारी खेळ , गाढवाचे लग्न, फिरते मंदिर, अधांतरीत गणराय, असे विविध सामाजिक प्रबोधनात्मक देखावे या मंडळाने सादर केले आहेत.. यावर्षी भारत माझा देश आहे. या प्रतिज्ञेवरून आताचा भारत व पूर्वीचा भारत यांच्यातले काही पैलू सजीव देखाव्यातुन समाजापुढे मांडण्याच्या प्रयत्न बाल कलाकारांनी केला आहे.. भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात महान संस्कृती आहे. देशाची संस्कृती जपन्यासाठी भारत सरकार विविध प्रकारचे अभियान राबवते, सच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून लहान बालके देखील आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. तर तरुण पिढीला आशास्थानी मानत असताना गुटखा सिगारेट दारू आदींच्या आहारी जाऊन देशाचे सुंदर वातावरण कसे दूषित करत आहे. भारत देशात वेगवेळ्या कारणांनी व व्यसनामुळे तरुण मरण पावत आहे. अनेकवेळा अतिगंभीर
रुग्णाना वाचवण्यासाठी डॉक्टर आटोकाट प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्टा करूनही रुग्ण दगावला तर मयताचे कुटुंबीय व जमाव डॉक्टरांवर प्राण घातक हल्ले करत आहेत, डॉ. परमेश्वर नसून माणूसच आहे, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्यात वाढ झाली आहे. हे करणे अतिशय वाईट आहे. आपण आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो*माझा देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन*, मात्र आताची तरुण पिढी लोककला, लोकसंगीत हे सर्व बाजूला सारत झिंगाट गाण्यावर वस्त्राचे भान न ठेवता बेभान होऊन नाचताना दिसत आहे. आपली खरी खुरी परंपरा ही लोककला, लोकसंस्कृती, लोकनृत्य गरबा, भांगडा, आदिवासी नृत्य, भरत नाट्यम, कथक, कुचिपुडी, या सारखे लोकप्रकार येतात.
बाल कलाकारांनी विविध लोकनृत्य सादर करून संस्कृतीचे जतन करावे असा सल्ला दिला आहे. तर *मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेल* मात्र आपण म्हणत असलेल्या प्रतिज्ञाच्या पंक्ती प्रमाणे आपण कधीच वागत नाही, आज भारतात वृद्धाश्रमाची संख्या मोठ्या प्रमानात वाढली आहे. या वृद्धाश्रमात बहुतेक वृद्धांची मुले हे उचशिक्षित आहे. त्याउलट शेतकरी, कामगार, मजूर व सामान्य परिस्थितीत असणारऱ्या व्यक्तीचे आई वडील कधीही वृद्धाश्रमात जात नाही. ते आपल्या आई वडिलांसोबतच राहतात, *गुरुरब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात पर ब्रह्म तसमय श्री गुरुवेंन महा* असा जप करत असताना त्याचवेळेला गुरूजणांना मारहानीच्या दुर्दैवी घटनेत वाढ झाली आहे. वडील धाऱ्या मांणसाचे मान ठेवण्या ऐवजी रस्त्यावर त्यांच्याशी वादविवाद करण्याचे त्यांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण म्हणतो की *माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे, त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे.* मात्र याच्या विरोधी वागून आपण आपण स्वदेशी वस्तू टाळून विदेशी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून परराष्ट्राला आर्थिक मजबूत करीत आहात याच जोरावर अनेक देश भारतावर आंतकवादी व दहशतवादी हल्ले करीत आहे. यावर नम्र आव्हान करीत स्वदेशीचा वापरा करा विदेशी वस्तू खरेदी करणे टाळा, देशाचे सैनिकांचे व पोलिसांचे
संरक्षण करन्यासाठी मदत करा. असे आव्हान या सजीव देखाव्यातून करण्यात आले आहे. आरास यशस्वी करण्यासाठी किसनदादा कलाल, यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष महेंद्र गुरव, उपध्यक्ष सन्नी पाटील , सचिव हरिष मराठे, खजिनदार सूरज शिंपी, सदस्य अजय पाटील, भटू बूनकर, नितीन दातीर, सोनू धेडगे, जयेश देडगे, सचिन पाटील, सन्नी वंजारी, भूषण लोहार, नंदू पाटील, विपुल कुलकर्णी, सुयोग पाटील, गौरव गुरव आदीनी परिश्रम घेतले आहेत...


शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

सर्वोदय गणेश मंडळ देतय 'बेटी बचाव' चा संदेश!

आरास साकारुन जनजागृती : तळोद्यातील सामाजिक उपक्रमाचे कौतुक
स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक कलंक, लेख वाचवा- बेटी बचाव अशा ज्वलंत विषयावर मागील दोन वर्षापासून तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळ आरास तयार करुन समाजात जनजागृतीचे काम करीत आहे. सदर आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दर्ी हात आहे. . तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २२ वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदांना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, स्त्रीभ्रूण हत्या, बाल कामगार रोखणे, भूत महल, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्यसंग्रामातील यशोगाथा, धार्मिक, पौराणिक, देशभक्तीपर, स्वंयमचलित देखावे सादरकेले आहेत.. भारत भूमीत स्त्री शक्तीच्या रुपात आदिशक्ती जगदंबेचे पूजन केले जाते. पण त्याच भूमीत भ्रूण हत्येचे महापाप केले जाते. त्यामुळे मंडळाने समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने यावर्षी स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक कलंक हा ज्वलंत विषय घेवून सजीव आरास सादर केली आहे. आरासची सुरुवात मुलीच्या बालपणापासून सुरु होवून तीच्या बालपणातील विविध क्षण टिपण्यात आले आहेत. बालपणात आपल्या भावंडासोबतचे आनंदी क्षण त्यानंतर तिचे लग्न होऊन सासरी जाते, संसारात रमते. दरम्यान संसाराच्या उत्तरार्धात मुलाची किडनी खराब होते. किडनीसाठी नातलगांनी विनवण्या करूनही कोणीच पुढे येत नाही, शेवटी पत्नीही नकार देते. अशावेळी हीच आई मुलाचा जीव वाचविण्यासाठी पुढे सरसावते आणि किडनी दान करते. मात्र म्हातारपणात किडनी दानानंतर तिची तबेत खालावते व ती मरण पावते. मुलगा ढसाढसा रडतो, शेवटच्या क्षणीही ती स्वत:चा विचार न करता आपल्या मुलाचाच विचार करते, स्वत:ची किडनी अर्पण करून आपल्या मुलाला जन्म देणारी आई ही देखील स्त्रीच आहे, असे या आरासीत दाखविण्यात आले आहे. मात्र, आज आईसारख्या पवित्र नात्याला गर्भपात करून संपविले जाते, असे एका दृश्यात चित्रीत करण्यात आले आहे. तर विवाहीता गर्भवती असतांना डॉक्टरकडे जातात. तीच्या कुटुंबियांना मुलगा हवा असतो, म्हणून लींग तपासणी केली जाते. गर्भात मुलगी असल्याचे समजल्यावर गर्भातील मुलीची जन्मापूर्वीच हत्या केली जाते. यावेळी गर्भातील बालिकेची माँ, पिताजी... मुझे इस दुनियामे आने से पाहिले ही मेरी हत्या कर रहे हो, मै भी जिना चाहती हु, डॉ. अंकल आपको तो भगवान के रूप माना जाता है! आपका काम जीवनदान देेना है पर आप तो मेरी. जान ही ले रहे हो! ओ भी पैसो के लिये. मुझे भी जिना है, इस दुनिया को देखना है! इस दुनिया मे आना है! मा... मुझे मत मारो, मुझे मत मरो मा...अशी भावनिक आर्त हाक मारते, अशी आरास साकारण्यात आली असून ती पाहतांना नक्कीच डोळ्यातून पाणी आल्याशिचवाय राहत नाही. तर दुसरीकडे एक प्रतिकात्मक वृक्ष कापतांनाची आरास आहे. त्या वृक्षातून देखील भावनिक आवाजात विनवणी करत. माझे मूळ कापू नका, माझे मूळ कापली तर मी फळे फुले कसे देणार, तुम्ही स्वत:चीच मूळ कापत आहात, असे म्हणत मुलगा-मुलगी भेद करू नका, मुलीला जन्म घेऊ द्या, मुलगी भविष्य आहे. अशी भावनिक हाक घालत बेटी बचावचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. सर्वोदय गणेश मित्र मंडळाचे नरेश चौधरी, पप्पू साळवे, रोहित कलाल, उमेश पाटील, शुभम ठाकरे, शरद सावळे, छोटू चित्ते, ओम चौधरी, स्नेहल चौधरी, पप्पु ठाकरे, मयूर चौधरी आदींनी या जीवंत आराससाठी मेहनत घेतली आहे. मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष राज चौधरी, सचिव प्रवीण चौधरी, नितिन ठाकरे, दीपक माळी आदींसह सदस्यांनी देखावा सादरीकरणासाठी परिश्रम घेतले..





तळोद्यातील दादा गणपतीची प्रबोधनकार आरास ठरतेय आकर्षण!


तळोदा येथील दादा गणेश मंडळाकडून अचानक उद्भवलेल्या आपत्तीला कशा पद्धतीने सामोरे जावे, असे प्रसंग आल्यास प्रथमोपचार पद्धती कोणत्या वापराव्यात, प्रशासकीय स्तरावरील उपाययोजना याबाबत जनजागृतीपर सजीव देखावा सादर केला आहे. आरासच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी देखील आपत्ती व्यवस्थापना बाबत जनजागृती केली आहे. सदर देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. . तळोदा येथील सार्वजनिक दादा गणेश मंडळ मागील ७० वर्षांपासून विविध सामाजिक विषयांवर प्रभोधनात्मक आरास सादर करीत आहे. तळोदा शहरात सजीव देखाव्यांचे सुरुवात दादा गणेश मंडळाकडून झाली असून आतापर्यत शहीद जवानांना श्रद्धांजली, पशुधन वाचावा देश वाचावा, डॉ कलामांचा स्वप्नातील युवक, मोबाईल एक व्यसन(दुष्परिणाम) आदी विषयांवर त्यांनी सजीव देखावे सादर करून अनेकदा प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. यंदा रविंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष योगेश गुरव, सचिव प्रशांत गवळे, खजिनदार पंकज गुरव, सदस्य रविंद्र गाढे, गणेश पाटील, योगेश पाटील, राकेश गुरव, दत्तात्रय चित्ते, राहुल पाटील, सुभाष शिंदे, नवनीत लोहार, चेतन गुरव, किरण गुरव आदीं सदस्यांनी या वर्षीही सजीव देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. अचानक आलेला भूकंप, महापूर, ढगफुटी, चक्रीवादळ, अग्नीउपद्रव, आतंकवादी हल्ले, सर्प दंश, विजेचा शॉक, हृदय विकाराचा झटका, अपघात, गॅस सिलेंडरला लागलेली आग, रस्त्यावरील अपघात आदींना घाबरून न जाता कशा पद्धतीने सामोरे जावे, अशाावेळी कुठले प्रथमोपचार सेवा पुरविणे याबाबत सजीव देखावाद्वारे प्रभोधन करण्यात आले आहे. या आरासीचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, तळोदा नगरपालिका मुख्याधिकारी जनार्धन पवार, पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे आदींच्या मार्गदर्शनात्मक प्रतिक्रियेचा समाविष्ट करण्यात आल्याने सदर देखावाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. ही आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे..