Breking News

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

वैभवशाली तळोदे

          
                * वैभवशाली, समृध्द तळोदे शहर! *


 उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतीक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणार्‍या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सुरतेची लूट केल्यानंतर शिवछत्रपतींनी तापी नदी किनारी मुक्काम केला होता. ज्या ठिकाणी त्यांचा तळ होता त्या ठिकाणाला तळोदे असे म्हणतात. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात बारगळांची गढी विशेष प्रसिध्द आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहुन माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरु होते. सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. आज ही गढी शेकडो वर्षानंतर ताठ मानेने उभी आहे. 


         
श्री कालिका मातेचा प्रसिध्द यात्रोत्सव 
 तळोदे शहराच्या पश्‍चिमेस खर्डी नदिच्या किनार्‍यावर  कालिका मातेचे मंदिर आहे. मनोकामना व नवस पुर्ण करणारी मातेचे मंदिर म्हणून ओळखले जाते. अक्षय तृतियेला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत हजारो भाविक येतात. 
यात्रेत बैल गाडी, संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात. 

                                                     दशावताराची समृध्द परंपरा

सुमारे दिडशे वर्षांपासून भवानी मातेच्या दशावताराची समृध्द परंपरा शहराला लाभली आहे. या उत्सवाची सुरुवात कार्तिकी एकादशी पासून सुरु होते. यात राम, हनुमान, श्रीगणेश, देवी, देवतांचे मुखवटे घालून उत्सव केला जातो. या उत्सवाला पाहण्यासाठी दुरदुरहून भाविक येतात. 


अस्तंबा ऋषिची प्रसिध्द यात्रा
  सातपुड्याचा निसर्गरम्य दर्‍याखोर्‍यातून अस्तंबा ऋषिच्या यात्रेला प्रारंभ होतो. ही यात्रा तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या यात्रेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतात. महाभारतकालीन अश्‍वस्थामा याचे संदर्भ या यात्रेशी असल्याने मोठी पवित्र यात्रा मानली जाते. दिपावलीच्या अगोदर यात्रेला सुरुवात होते. मोठा रोमांचक अनुभव लोकांचा आहे. तळोद्याहून सलग चार दिवसाचा प्रवास आहे. अस्तंबा शिखर हे मोठे पवित्रस्थान मानले जाते. आदिवासी बांधव या यात्रेनिमित्त उपवास ठेवतात.





खान्देशातील सर्वात जुनी नगरपालिका 

खान्देशातील सर्वात जुनी नगरपालिका तळोदा न.पा.ला मानले जाते.
या पालिकेची स्थापना सन १८६७ साली झाली. त्यावेळी पालिकेचा कारभार एकाच खोलित चालत होता. आता मोठा विस्तार झाला आहे. तळोदा पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष गोविंद दिनूराम राठोड हे होते. आतापर्यंत २३ नगराध्यक्ष झालेले आहेत. भरत बबनराव माळी ५ वेळा, धजा चुनिलाल माळी व गुलाल बुलाखी माळी यांनी २ वेळा नगराध्यक्ष पद भुषविले आहे. विद्यमान नगराध्यक्षा सौ. योजनाताई भरत माळी या आहेत.

रावलापाणीचा प्रेरणादायी स्वातंत्र्य संग्राम 

 संतश्री गुलाम महाराज यांच्या नेतृत्वाखाली सातपुड्यातील आदिवासी बांधव स्वातंत्र्यपुर्व काळात मोठ्याप्रमाणात जागृत झाला होता. १९४२ चा चलेजाव आंदोलनापुर्वी संत गुलाम महाराजांनी या परिसरात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली होती. त्यातुनच आदिवासी बांधव स्वातंत्र्यासाठी संघटीत होवू लागला. २ मार्च १९४३ रोजी तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरातील निझरा नाल्यात इंग्रजानी आदिवासी बांधवांवर बेछूट गोळीबार केला. त्यात १५ आदिवासी बांधव शहिद झाले. यात ५ बालकांचा समावेश होता. तर २८ जण जखमी झाले होते. इंग्रजानी केलेल्या गोळीबाराच्या खुणा आजही त्या जंगलात आढळतात. आदिवासी स्वातंत्र्यविरांनी केलेले हे बलिदान प्रेरणादायी आहे. 


आदिवासी बांधवांचा होलिकोत्सव 

 आदिवासी बांधवांचा होलिकोत्सव विशेष प्रसिध्द आहे. या उत्सवात आदिवासी बांधवांकडून केले जाणारे दिंडल नृत्य सर्वांना परिचीत आहे. होळी हा सण आदिवासी बांधवांसाठी महत्वाचा आहे. यानिमित्त विविध वेषभुशा करणे, उपवास, पुजा-अर्चा केले जातात.
                                                                               
                                                                                                शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे
                                                                           उपशिक्षक
                                                                               न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा                                                      

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

साहेब अजून किती बळी हवेत??


(नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या सातपुड्याच्या डोंगर दऱ्यावरील झाडांची संख्या लाकूडतोडीच्या वाढत्या प्रमानामुळे कमी होऊ लागली आहे. सातपुडा बोडका होत असतानाच उपलब्ध अवस्थेत नसलेले पाणवठे यामुळे जंगलातील हिंस्त्र प्राणी गाववसत्यांकडे येऊ लागले आहेत. दिवसाआड नागरिकांना बिबट्या, अस्वल,तरस अश्या हिंसक प्राण्यांचे दर्शन घडत असल्याने त्यांच्यात प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीने अनेकांनी रोजगारावर पाणी सोडून पोटाची खडगी भरण्यासाठी गुजरात राज्यात स्थलांतर केले आहे. हिंस्त्र प्राण्यांचा हल्ल्यात हल्ल्याचा बळींची संख्या दिवसेगणित वाढत असताना मात्र वनविभाग अगदी आरामात झोपलेल्या अवस्थेत आहे. घटनेनंतर कार्यवाही करण्यापेक्षा हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नये, त्यांना जंगलातच सुरक्षितता वाटावी, अशा उपाययोजनाकडे वांविभागाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे उपाययोजनांसाठी वनविभाग अजून किती बळींची वाट पाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे....)

नंदुरबार तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसला आहे. जिल्ह्यात तोरणमाळ, डाब यासारखी पर्यटनस्थळे याच सातपुडाच्या डोंगर दऱ्यात आहेत. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या सातपुडा आजही मोठ्या प्रमाणात वनौषधीसह वनप्राण्यांचे अस्तित्व आढळुन येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वनविभागाच्या आशीर्वादाने म्हणा किंवा दुर्लकक्षाने मोठ्या प्रमाणात होणारी लाकुडतोड यामुळे सातपुडा बोडका होऊ लागला आहे. याचाच परिणाम म्हणून सातपुडायाच्या जंगलात वास्तव्यास असलेले हिंस्त्र प्राणी बिबट्या, अस्वल, तरस हे गावाकडे सरकतानाच्या घटना घडू लागल्या आहेत. वनप्राण्यांचा सुरक्षतेसाठी आवश्यक त्या प्रमाणात जंगल व याचबरोबर त्या जंगलात ठिकठिकाणी पाणवठे असणे गरजेचे आहे. मात्र काही वर्षांपासून होणारे कमी पर्जन्यमान यामुळे पाणवठे कोरडे पडले आहेत. तर जंगलही कमी झाल्याने हिंसक प्राण्यांना भक्ष शोधण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत आहे. दिवसाआड तळोदा व शहादा तालुक्यात शेतकरी, शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने त्यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
                          सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा, अक्कलकुवा, व शहादा तालुक्यात वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. सुमारे दोन वर्षापूर्वी तळोदा तालुक्यातील रांझणी शिवारात स्वयंपाकासाठी सरपण घेण्यासाठी गेलेल्या पढरकीबाई पाडवी (वय 45)या महिलेवर अस्वलाने हल्ला चढविल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने नंदुरबार जिल्ह्या रुग्नालयात दाखलही केले. मात्र उपचार घेतानाच त्यांच्या मृत्यु झाला. तर 24 जुन 2015 रोजी आमलाड शिवारात वडिलांसोबत गाई चारण्यासाठी गेलेल्या गोपाळ राजू भरवाड (वय 14) या बालकाला बिबट्याने उचलून त्याला सायंकाळी त्याचा मृत्यूदेह खेळाच्या शेतात आढळला. दरम्यानच्या काळात तळोदा तालुक्यातील मेंढपाळसह मजुरांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले बिबट्याने चढवले आहेत. यात गाई, बकऱ्या व घोडे, बिबट्याने फस्ट केल्याच्या घटना ताज्या आहेत. तळोदा तालुक्यातील खरवड, मोड, न्यूबन, जुवानी, छोटा धनपुर, लाखापुर, रांझणी, प्रतापपुर, कोठार आदी परिसरात वेळोवेळी बिबट्या दर्शन देत आहे. नागरिकांकडून प्रत्येकवेळी तक्रार केली जाते. मात्र वनविभाग पाहिजे त्या प्रमाणात मनावर घेत नाही. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड अशी भीती कायम आहे.              
नोव्हेंबर 2015 च्या पहिल्या आठवड्यात धडगाव तालुक्यात बिबट्याने दोन बालकांचा बळी घेतला होता. यात शेलदा गावात एका 11 वर्षीय बालीकेच्या बळी गेला. या बालिकेच्या हाडांचा सांगाडा आढळून आला. याबाबत वनविभाग मात्र अभिनज्ञ होता. ही घटना १४ नोव्हेंबर रोजीची होती. तर १७ नोव्हेंबर रोजी तिनसमाळ येथे नातलगांकडे आलेल्या एक नऊ वर्षीय बालक आपल्या बहिणीसह पाणी घेण्यासाठी गेला असता त्या दोघावर बिबट्याने हल्ला केला. यात बहीण पळ काढण्यात यशस्वी झाला. मात्र या बिबट्याच्या हल्ल्यात त्या बालकाला आपला जीव गमवावा लागला. याबाबत लोकप्रतिनिधीनी जिल्हाधिकारीकडे तक्रार केल्याने जिल्हाधिकाऱ्यानी वनविभागाच्या अधिकाऱ्याची कानउघडणी केल्याने अधिकाऱ्यानी घटनास्थळाकडे धाव घेतली. दोघा मयत बालकांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. तर जखमी बलिकेवर धडगाव येथे उपचार करण्यात आले होते. तत्पूर्वी सुमारे दोन वर्षापूर्वी शहादा तालुक्यातील म्हसावद- पिप्री रस्त्यावरील कोकणवाडा शिवारात एका विहिरीत बिबट्या पडला होता. विहिरीत तीन दिवस मुक्कामानंतर वनविभागाने धुळे येथुन तज्ञ मागवून बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देत सहीसलामत बाहेर काढले होते. तर काही महिन्यापूर्वी परिवर्धे शिवारात उसाच्या शेतात बिबट्याची चार पिल्ले आढळून आली होती. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर मादीचा शोधासाठी त्या लहान-लहान पिलांना शेतातच ठेवण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतर या पिलांची प्रकृती खराब होऊ लागल्याने वनविभागाने
घाबरून या पिल्लाना बोरीवली येथील वन्यजीव संरक्षण पार्क येथे हलविले होते. मात्र या ठिकाणी एक-एक करीत चारही पिलांचा मृत्यु झाला असल्याची माहिती मिळाली आहे. शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे बिबट्याने दर्शन दिल्याने वनविभागाने ह्याठिकानी पिंजरा लावला होता. मात्र विशेष अशी खबरदारी घेतल्याने नदीत लपून बसलेल्या बिबट्याने वनविभागाच्याच कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्याने यात दोन जण जखमी झाले होते. तसेच वर्षभरापुर्वी नवापूर तालुक्यातुन दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर चरणमाळ घाटात बिबट्याने हल्ला चढविला होता. मात्र यावेळी मोठ्या आत्मविश्वासाने महिलेने बिबट्याचे जबडे घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने पळ काढला होता. या महिलेच्या हिमतीमुळे दाम्पत्यास प्राण वाचले होते. जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांच्या घटनेत अनेकदा मनुष्यहानी व पाळीव प्राण्यांची हानी झाली आहे. मात्र वनविभाग आवश्यक त्या प्रमाणात उपाययोजना आखत नसल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जंगलातून हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नयेत. यासाठी वनविभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र वनविभा आवश्यक ती खबरदारी घेत नसल्याने अजून किती बळींची वाट पाहणार? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पत्रकार संघ सलग्नित तलोदा मराठी पत्रकार संघ

     तलोदा तालुका मराठी पत्रकार संघ

सन-2015 तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे श्री.गणेश आरएस स्पर्धा 

सन-2015 तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे श्री.गणेश आरएस स्पर्धा (ग्रामीण)

आपल्या परिसरातील एखादी घटना आमच्यासाठी बातमी होऊ शकते.


                      तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा लोगो


तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाची यादी खालील प्रमाणे..
 कृपया संपर्क करा




तलोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा

https://www.youtube.com/watch?v=7eHRFUvEMLs

तलोदा पासून 13 km अंतरावर सातपुड्याचा पायथ्याशी असलेले
 वाल्हेरी हे छोटेसे गाँव जेथे आल्यावर आठवतात बालकवी 
बालकविंचा सुन्दरश्या कविता त्यात त्यानी म्हटले

 हिरवे हिरवे गार गालीचे
 हरीत त्रुनांचा मख्मालिचे
 त्या सुन्दर मखामालिवारती
 फुलराणी टी खेडत होंती. 


त्या कविता प्रमाणेच निसर्गाने जणू हिरवा शालूच ह्या सुन्दर पहाडाना नेसवला आहे. 
सभोतली उंच उंच डोंगर त्यावर हिरवा शालुंची पांघर आणि सुंदरसी नागमोडी वाहणारी नदी 
जणू ती वाल्हेरिला नत्मस्तक होंन्यासाठी आली आहे.
 त्यावर हा पांढरा शुभ्र धबधबा जणू पर्यटकांचे मन मोहित करण्यासाठीच धो धो कोसडतोय.
 तर तुम्ही देखिल नक्की भेट दया ह्या मनमोह्क निसर्ग रम्य परिसराला



जेथे आजकल शेकडो पर्यटक भेट देताहेत . . 
.तर तुम्हीही या हया तलोदा तालुक्यातील वाल्हेरी येथे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद उपभोग्ण्यासाठी ...........................
मग येणार ना ? 
फ्रॉम :- सुधाकर मराठे

गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

गुढीपाडवा

                                                                           
                                                                           ....गुढीपाडवा ....
                                                                                                 
             
                                                                  चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा.
 तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.

 तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो.



 चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली (सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.)

 त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.

 वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल?कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे.


 मुलांनाही इळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.

 संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात (पुन्हा धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे) व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात (होळी पासूनच हार-कडे देवाणघेवाण सुरू होते)

 या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते (आता कूलर मुळे हवा तेव्हा गारवा निर्माण होतो) त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात जसे, संक्रांतीला थंडी म्हणून गूळ-पोळी शीतल-शिमग्याला तान्हा मुलांना मुलींना पातळ पाढर्‍या रंगाची झबली केशराच्या रंगाच्या (किंवा कुंकवाच्या पाण्यांचे शिंतोडे) शिंतोंड्यांनी भिजवून देतात हार-कडे देतात मुलांनी द्राक्षाचे दागिने घालतात (तसे संक्रांतीला हलव्याचे करतात) कारण याच काळात द्राक्षे येण्यास सुरवात होते.

 चैत्रात कैरीचे पन्हे (कैर्‍या तेव्हाच होतात) श्रावणात फुलांची आरासींनी मंगळागौर सजवतात. या अन् अशा अनेक सणात मोसमी फळे, फुले येतातच. दिवाळीत झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते तर गुढीपाडव्याला आंब्याला कोवळी पालवी फुटते, त्यामुळे घरादारावर आंब्याच्या पोपटी पानांचे तोरण खुलते.चैत्रातही झेंडू फुलतो. त्याचाही उपयोग घराच्या सुशोभनासाठी केला जातो. आपण जसे 15 ऑगस्टला आपला स्वांतत्र्यादिवस उत्साहात साजरा करतो तसाच हा नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करते.



 1 जानेवारी आळसात उजाडतो (31 डिसेंबरचा अमल असतो ना !)
नवीन वर्षाचे अत्रुप असतं. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा!
प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशो‍भित होऊन गुढ्या उभारायचा दिवस,
गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस,
अन् सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया.



 आकाशात गुढ्यांची, विजयपताकांची रांगच रांग दिसू द्या. दूर दूर नजर जाईतो आपल्या अस्मितेच्या, स्वाभिमानाच्या अन् शिवरायांच्या भगव्या झेंड्याच्या पताकांनी निळं आकाश भगवं होऊ द्यात. चैत्रागौर व हळदीकुंकू, गुढीपाडवा, गुढी, महाराष्ट्र, नवे वर्ष....................................




बुधवार, १६ जानेवारी, २०१३

आई.......

आई.......


आई....... माउली तुला कोटी कोटी प्रणाम
 करुणे ची मूर्त तू मायची ठेव आहे
      वात्सल्य स्वरूपास तुझ्या कोटी कोटी प्रणाम
     माझी पहिली गुरु माझी मैत्रीण आई


                                     
                                                         माझ्या जीवनाच्या ज्योतीला कोटी कोटी प्रणाम
                                                        मी जळताना तप्त उन्हात माझी शीतल छाया
                                                        त्या वृक्ष स्वरूप आईला कोटी कोटी प्रणाम


  तुळस जशी असते दारी तशीच आईची महती घरी
    घराला घरपण देणाऱ्या आईला कोटी कोटी प्रणाम
पहाटेचा गजर तू सगळ्यांची फिकीर तू
        प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या आईला कोटी कोटी प्रणाम

                                 

कितीही दुख कितीही वेदना
   तरी झळकल्या नाही तुझ्या मुखावर यातना
               त्या सहनशील आई ला कोटी कोटी प्रणाम
वर्णाव किती तुझ्या प्रतिमेला 
  अस्तित्व माझा तुझ्या मुळे आला ऋणी 
 मी जन्म जन्माची हे ईश्वर मूर्त
  आई तुला कोटी कोटी प्रणाम.....

                                                                  
                                                            आई तुझ्या वाचू कसे जगेन मी
                                                           श्वासांत श्वास नाही कसे उरेल मी
                                                           आई तुझ्या मायेच्या पदरात माझ्या अश्रूंचा विसावा
                                                           दुखांच्या खाचा किती हि तुझ्या कुशीचा होता ठेवा
                                                           आधार माझा तू आता निराधार मी आई
                                                           तुझ्या वाचू कसे जगेन मी

                                           
                                                  ओसाड जीवनाला प्रेमाचा झरा होता
                                                  निष्प्राण देहात या तू प्राण ओतला
                                         तू जन्म दाती नाही पण जीवन तुझ्या मुळे हा ऋणी आहे
                                                 तुझा मी आई तुझ्या वाचून कसे जगेन
                                       मी ती निश्वास पडला देह अजून दृषित घुमत आहे
                                                   वेदना मनाची तू साद देत आहे

   एक न परत आई कुशीत निजायचे मला 
तुझ्या हाताने परत कवड भाराचे मला
 दुखानाचा मना वर ओझा फार झाला 
तुझ्या पदरात अश्रूचा सडा घालायचं मला 
का देवाने प्राण माझा हिरावून नेला नाही 
जगू शकत मी आई श्वासांत श्वास न उरला..
ब्रह्मांड शोधले तरी कुणी गवसले नाही
  आई मूर्त स्वरूप दुजा कोणी नाही
      ममता वात्सल्य प्रेमाची सरिता 
                माय तू माझ्या जीवनाची गाथा......... 
                 आई तुझ्या वाचून मी जीवन जगेन का 
             श्वासांत श्वास माझ्या उरेल का ...




आई


एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते.. उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन.. मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो.. माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय.. आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला.. गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या.. हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला.. आई लवकर कर न उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले, आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली.. आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले.. मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले..?? मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या, मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे की केलेस काही खाल्लेस कि नाही..?? त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले.. आई धन्य झाली... आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली.. -Author/लेखक - ग्रेट नितीन बानगुडे -पाटील ("शिवचरित्र"! ) "दोस्तानो, आई च्या पायाशी स्वर्ग आहे.. कधी हि तिला दुखवू नका.... डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही...