Breking News

रविवार, २९ मार्च, २०१५

स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांच्या BDO ला घेराव

थकीत मानधनासाठी स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांच्या 
तळोदा गटविकास अधिकाऱ्याला घेराव

शुक्रवार, २७ मार्च, २०१५

तळोदा प्रशासकीय इमारतीचे विजबिल थकले

तळोदा प्रशासकीय इमारतीचे चार लाख विजबिल थकले 
 विज वितरणने केला पाणी व स्ट्रीट लाईटच्या विज पुरवठा खंडीत


गुरुवार, २६ मार्च, २०१५

तळोद्यात क्षयरोगाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन


तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ व उपजिल्हा रुग्णालय ह्यांच्या सयुंक्त विद्यमानाने क्षयरोगदिनाच्या पुर्व संध्याकाळी क्षयरोगाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले..

गुरुवार, १९ मार्च, २०१५

तळोदा नगरपालीका अतिक्रमण निर्मूलन मोहीम काल थांबली

तळोदा नगरपालीका हद्दीतील अतिक्रमण निर्मूलन मोहीम काल थांबली असून येत्या काळात टप्पाटप्पाने ही मोहिम राबविण्यात येईल, तसेच नागरपालीकेचा मालकीचा जागेवर बस स्थानक भागातील व्यवसायिकाना
लवकरच पुनर्वसन करून त्यांचा रोजगारचा प्रश्न मिटवुन पालिका आर्थिक उत्पन्न वाढविन्यासाठी नियोजनही करणार असल्याचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार यांची भेट घेतली असता प्रस्तुत प्रतिनिधिशी बोलतांना सांगितले. तळोदा नगर पालीकेने गेल्या तिन दिवस सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम शहरातील कॉलेज रोड. हुतात्मा चौक .तहसील कचेरी रोड.स्मारक चौक. नगरपालीका परिसर.सोनारवाडा. हातोड़ा रोड.ख्वाजा नाईक चौक . देशपांडे फोटो स्टूडियो ते बस स्थानक परिसर. शहादा रोड चीनोदा रोड बदरी कॉलनी रोड अश्या शहरातील महत्वाचा भागातील रस्त्यावर मोहीम जोरदार राबविण्यात आली तिनदिवस केलेल्या कार्यवाहित
एकूण ५७९ किरकोळ व् पक्के अतिक्रमण धारकावर पालिकेकडून कार्यवाही करण्यात आली दरम्यान पालीकेचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार यांनी घेतलेल्या ठोस भूमिका ही सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. तळोदा पालीकेच्या इतिहासात प्रथमच एवढी ठोस कार्यवाही पवार यांनी केल्यान त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही ही फार मोठी जबाबदारी मुक्याधिकारी आणि पालिकेची राहणार आहे.
कारण या मोहिमेनंतर पुन्हा शहरात जैसे थे परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . मुख्याधिकारी .प्रांतअधिकारी व् तहसीलदार आदींची अतिक्रमण धारकानी घेतली भेट तलोदा बस स्थानक भागातील छोटे व्यसायीक बस स्थानकचा असलेल्या भिंतीलगत होते. मात्र शेवटचा टप्प्यात हे सुद्धा अतिक्रमण हटविन्यात आले याबाबत श्री जालंधर भोई यांनी इतर हाथगाड़ी धारकासह प्रांत अधिकारी श्री देवदत्त केकाण व तहसीलदार श्रीमती उषारानी देवगुणे यांची भेट घेवून व्यथा मांडली व् पुनर्वसन करताना आम्हाला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली याबाबत मुख्याधिकारी व् प्रांतअधिकारी व तहसीलदार यानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याच् अतिक्रमण धरकाकडून सांगण्यात आले.
 * जनार्दन पवार यांची भूमिका अतिशय महत्ववाची = तलोदा नगरपालीकेच्या इतिहासात अनेक अनुभवी व नावजलेले मुक्याधिकारी येवून गेले मात्र येथे रुजू होण्यागोदार इरिगेशन खात्यात कामाचा अनुभव असलेले श्री जनार्धन पवार हे मुख्याधिकारी या पदावर प्रथमच सुरुवातीला तलोदा नागरपालीकेत रुजू झाले मात्र रुजू झाल्यानंतर तलोदा शहरातील अत्यंत महत्वाची असणारी अतिक्रमण मोहीम हाती नुसती घेतली नाही तर नगरपालिकेच्या जागा मोकळी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न आपल्या ठोस कृतीतून दाखवुन दिले त्यामूळे ते आता तळोदेकर जनतेचा कायम लक्षात राहतील गेल्या तिन दिवस चाललेल्या या मोहीम अंतर्गत अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्भवले मात्र
मुख्याधिकारी यांनी अतिशय शांतपने व् प्रसंगी कठोर भूमिका घेवून अतिक्रमण मोहीम यशस्वी केली. त्यांची पर्त्यक्षभेट घेतली असता सर्वसामन्य नागरीकाला माझ प्रथम प्राधान्य राहणार असल्याच् सुतोवाच त्यानी केले. तसेच छोटे व्यापरी संकुल तयार करण्याचे आव्हान ह्याप्रसंगी दिले. यामुळे पालीकेच्या आर्थिक सोर्स वाढणार व अतिक्रमण मोहिमेत ज्यांचा व्यवसाईक रोजगाराचा प्रश्न लवकरच सकारात्मक पने सोडवू असा विश्चास व्यक्त केला. अतिक्रमण मोहिमेंनंतर पुन्हा ते होणार नाही ही फार मोठी जबाबदारी पालीका प्रशासनची असेल तसेच लवकरच नागरिकांची तक्रार दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांक नागरपालिकाचा माध्यमातून सुरु करीत असून पालीकेत कोणताही कर अथवा आर्थिक भरणा करण्यासाठी ऑनलाइन पद्दत लवकरच सुरु करणार असल्याच त्यांनी सांगितले.

 * अतिक्रमण बधित अन्याय निवारण समिती शहरातील या मोहिमेत अन्याय झाल्याची भावना काही नागरिकामधे असून या बाबत अतिक्रमण बाधित अन्याय निवारण समितिची मीटिंग घेण्यात आली.
















सोमवार, १६ मार्च, २०१५

तळोदा येथे पहिल्या दिवशी १20 अतिक्रमणे काढली

तळोदा येथे पहिल्या दिवशी १20 अतिक्रमणे काढली  ■ एकीकडे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना
दुसरीकडे अनेक व्यावसायिक स्वत:हून आपली अतिक्रमणे हटवित असल्याचे दृश्य सकाळनंतर दिसून आले. तसेच ज्यांनी आपल्या घरापुढे अतिक्रमणे केली होती असेही नागरिक नुकसानीच्या भीतीपोटी स्वत:हून अतिक्रमित भाग काढत असल्याचे दिसत होते. तळोदा :शहरात पालिकेमार्फत सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून कॉलेज रोड येथून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. १२ जानेवारी २०१५ रोजी ५७९ अतिक्रमण धारकाना नोटिसा बजावल्यानंतर आज १६ मार्च रोजी अतिक्रमणाला उत्साही सुरुवात
करण्यात आली. पहिल्या दिवशी शहरातील एकूण १२० अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण काढताना व्यापारी व मुख्याधिकार्‍यांमध्ये छोटे मोठे वाद देखील झाले. अतिक्रमणात असलेली घरे, दुकाने, इमारती, टपरी, ओटे, पायर्‍या इत्यादी बुलडोझर व जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढण्यात आले. शहरातील कॉलेज रस्त्यावर येणाऱ्या किरण गॅस
ऐजंसीचे मालक ह्यांच्या ३ फुट अतिक्रमण ओटा काढण्यात आला. तर त्याच परिसरात घरचा वरच्या मजल्यावर मोती बँकेचे कार्यालय तर खाली वीज वितरण कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीचा १० ते १२ फुट पुढील भाग येत असल्याने तो पालिकेने तोडला. या मोहिमेचा फौजफाटा,
अधिकारी-कर्मचार्‍यांचा लवाजमा पाहून अनेक दुकानदारांनी स्वत:हून आपल्या दुकानांचे शेड काढून घेतले. काहींनी स्वत: अतिक्रमणे काढून घेतली. हुतात्मा चौकातील हॉटेल समाधानचे अतिक्रमण काढताना हॉटेल मालक मोहन कलाल, व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यात वाद झाला. या वेळी दुकानदाराचे म्हणणे होते की, आम्हाला पालिकेने नोटीस दिलेली नाही. आमचे अतिक्रमण नाही, यावर मुख्याधिकार्‍यांनी सांगितले की, हे अतिक्रमण आहे. ह्याविषयावरुण यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावर मुख्याधिकार्‍यांनी नगर भूमापन अधिकार्‍यांकडून दुकानाची रीतसर मोजणी करून घेऊ, अतिक्रमण नसल्यास पालिकेकडून त्यांना नुकसान
 झाले असल्यास भरपाई मिळणार असल्याचा दावा केला. स्मारक चौकात जंगशहीद बाबांचा दर्गा आहे. या दग्र्याचा काही भाग अतिक्रमणात येतो, असे पालिकेचे म्हणणे आहे. येथे मुस्लीम समाज पंचाने समजूतदारपणा दाखवून जो भाग अतिक्रमणात येतो, तेवढा भाग स्वत:हून काढून घेतला. यामुळे येथील वाद टळला. या मोहिमेत पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक सतीश भामरे, फौजदार डी.बी. लोंढे, दिलीप चौधरी, युवराज साळुंखे यांच्यासह स्थानिक तसेच बाहेरील पुरुष व महिला कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे.
ही मोहीम सुरू होताच शहरातील बघ्यांची प्रचंड गर्दीजमा झाली. या गर्दीला आवरणे पोलिसांनाही अवघड झाले होते. पालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी कार्यालय, नगर भूमापन यांच्यासह इतरांचा प्रचंड ताफा हजर होता. शहरातील अनेक घरांवरून विजेच्या तारा गेल्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना कोणताही अनर्थ घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीनेही वीजपुरवठा बंद केलेला होता. ही मोहीम तीन दिवस चालणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात कॉलेज रस्ता, हुतात्मा चौक, स्मारक चौक, मेन रोड या भागातील १२० अतिक्रमणे काढण्यात आली. नगर भूमापन अधिकारी उपस्थित नसल्यामुळे याबाबत तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या.
शहरात आज सलग दुसर्‍या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. यात एकुण २५० अतिक्रमण धारकांवर हतोडा फिरवण्यात आला. हयात अनेक प्रतिष्ठीत, व्यापार्‍यांची अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली. शहरात कालपासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. अतिक्रमण काढतांना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता मोहिम राबविण्यात येत आहे. अनेक उच्चभ्रू, प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी यांची अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली.त्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सदर मोहिमेत
शहरातील ५७९ अतिक्रमण धारकांना पालिका प्रशासनातर्फे यापुर्वीच नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मोहिमेत आज मारोती मंदिरापासून मेनरोड, गणपती गल्ली, तेथून पुढे थेट हातोडा रस्त्यावरील शेठ के.डी. हायस्कूलपर्यंत, स्मारक चौकापासून पुढे देशपांडे फोटो स्टुडिओपर्यंत बसस्थानकाकडे जाणारा मार्ग, त्यापुढे जुनी सुभाष टॉकीज मार्गावरील पोलीस ठाण्यापर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहीम राबवित असताना अनेक ठिकाणी  दुकानदार व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यात दुसर्‍या दिवशीही वाद  झाले. पण
 मुख्याधिकार्‍यांनी कोणत्याही वादात न पडता, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले काम सुरू ठेवले. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसर्‍या दिवशीही बंदोबस्तासाठी प्रचंड फौजफाटा होता.  तळोदा पालिका हद्दीत तिस-या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिमेत आज 209 अतिक्रमण काढण्यात आले बस स्थानका पासून अंतरावर असलेल्या शिवराम नगर जवळ अतिक्रमण काढण्यात येत असतांना अचनक काही अतिक्रमण धारक व शहरात प्रतिष्ठित असलेल्या लेखी निवेदन घेऊन मुख्याधिकारी पवार यांना न्यायालयात याबाबत दावा सुरु आहे व स्थगिती आली असल्याचे सांगत अतिक्रमण हटाव बंद करा मात्र मुख्याधिकारी यांनी तसा आदेश द्या सांगिल्यावर वाद घातला यामुळे काही काळ तनाव निर्माण झाला होता तळोदा पालिकामार्फत गेल्या तीन
 दिवसा पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली पहिल्या दिवशी 120 दुस-या दिवसी 250 तर आज तिस-या दिवशी209अतिक्रमण काढण्यात आले तीन दिवस सुरु असलेल्या मोहिमेत एकूण 579 अतिक्रमण हतविन्यात आले. आज देशपांडे फोटो ते बस स्थानका पर्यन्त शहादा रोड शिवराम नगर हरकलाल नगर मेनरोड नंतर चिनोदा रोड, बडरी कॉलनी, मुख्य रोड, अदि पर्यन्त अतिक्रमण हट्विन्यात आले प्रांतधिकारी देवद्त्त केकांत तहसीलदार श्रीमती उषारानी देवगुणे यांनी लक्ष्य ठेवून होते. हयात पालिका प्रशासन मुख्याधिकारी जनार्दन पवार, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्रीमती. उषारानी देवगुणे तथा पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.....

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

सावरकरांच्या तळोदा भेटीला ७५ वर्ष पुर्ण

सावरकरांच्या तळोदा भेटीला ७५ वर्ष पुर्ण
 एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. देशाच्या फाळणीला व काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची सुरक्षा वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. स्वातंत्राच्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व झोकून देणारे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारतात भेटी देवून निधी गोळा करीत स्वातंत्रयसमर अधिक चेतविला. त्याच अभियानाअंतर्गत दि.१३ मार्च १९४० रोजी त्यांनी तळोदा शहराला भेट दिली. आज १३ मार्च २०१५ रोजी त्या भेटीला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. तळोदा तालुक्यासह शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.  तळोदयाला अनेक स्वातंत्रवीरानी
भेटी दिल्या आहेत. त्यात दि.१३ मार्च १९४० रोजी स्वातंत्रवीर वि.दा.सावरकरांचा तळोदा शहरातील इतिहास प्रसिद्ध् बारगळाच्या गढ़ीत दिलेल्या भेटीला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. सावरकरांच्या तळोदा गढ़ीत भव्य सत्कार करण्यात आला होता. येथील सामाजिक कार्यकर्ते अमरजीत बारगळ यांचे आजोबा
जहागीरदार शंकरराव् बारगळ यांनी सावरकरांना मानपत्र देवून त्यांचा सत्कार केला होता. १३ मार्च १९४० रोजी दुपारी दोन वाजता बारगळाच्या गढ़ीत स्वातंत्रवीर सावरकर यांचे आगमन झाले. त्यांचा सत्कार करुण त्यांचा कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले. गावकऱ्यातर्फे त्यांना देशकार्यासाठी निधीही देण्यात आला. याप्रसंगी सावरकर यांनी देशभक्तीपर भाषणही केले. त्यांची देशप्रेमाने भरलेली अमृतवाणी ऐकण्यासाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याचे धगधगते अग्निकुंड चेतविण्याचे, देशप्रेमाचे मंतरलेले ते दिवस होते. अनेकांनी त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांचे दर्शन घेतले.

तळोदा स्वतंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या तलोद्यातील इतिहासाची साक्ष् देणारी बारगढ़ गढ़ीच्या भेटीला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधुन तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने गढ़ीतच सावरकरांची प्रतिमा पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले. या निमित्ताने मराठी पत्रकार संघाने आठवणींना उजाळा देत स्मृति जागवल्यात. तळोदा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात सर्वस्व झोकूनदेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारत भेटीत तळोद्यात  दि.१३ मार्च १९४० रोजी भेट दिली होती. त्या भेटीला  १३ मार्च २०१५ रोजी 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त त्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी बारगढ़ गढ़ीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सावरकर यांच्या तळोद्याचे जहांगीरदार शंकरराव बारगढ़ यांच्या हस्ते सत्कार केलेल्या दुर्मिळ प्रतिमेंचा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास अरुणराव वडाळकर, प्रा अशोक वाघ जहागीरदार यांचे वारस असलेले प्रसन्नकुमार बारगढ़, ऋषिकेश बारगढ़, तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष फुंदीलाल माळी सचीव उल्हास मगरे, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, किरण पाटिल, चेतन इंगळे, महेंद्र लोहार आदीच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी अरुणराव वडाळकर यांनी मनोगतात सावरकर यांच्या कार्याचा स्मृती जागवल्यात...