Breking News

बातमीची दखल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बातमीची दखल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

बेटी बचावचा जागर करणाऱ्या अनिता परदेशींचे मंत्र्यांनी केले कौतूक!

बेटी बचावचा जागर करणाऱ्या अनिता परदेशींचे मंत्र्यांनी केले कौतूक! दै.'पुण्यनगरी' चे वृत्त वाचून ना.मुनगंटींवारांनी दिल्या शुभेच्छा
तळोदा येथील परदेशी दांम्पत्याने आपल्या मुलीच्या वाढदिवसाला आवाजावी खर्च न करता सामाजिक बांधिलकी जोपासत बेटी बचावचा संदेश देत सफाई कर्मचाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला होता. याबाबतचे सकारात्मक वृत्त दै.'पुण्यनगरी' ने प्रसिध्द केले होते. त्यानंतर या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक झाले. सोशल मीडियावर देखील याबाबत शुभेच्छांचा वर्षाव झाला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री (वित्त,नियोजन आणि वने) सुधीर मुनगंटीवार यांनी दै.'पुण्यनगरी' ने प्रसिध्द केलेली बातमीची वाचून एका पत्रान्वये नगरसेविका अनिता परदेशी यांच्या या समाजपयोगी उपक्रमाचे कौतूक केले आहे.. सध्या वाढदिवस साजरा करण्याचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. पुष्पगुच्छ, मिठाई, पार्टी यातून हजारो रुपये खर्च करीत नेते मंडळी अथवा नातेवाईक मंडळींचा वाढदिवस कसा जल्लोषात साजरा केला जाईल, यावरच भर दिला जातो. मात्र या सर्वाला अपवाद ठरत तळोदा पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी आपल्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला. यावेळी महिलांना साडी-चोळी व पुरूषांना बेटी बचाव बेटी पढाओ, स्वच्छ तळोदा-सुंदर तळोदा असा जनजागृती संदेश लिहलेले टी-शर्टचे वाटप केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना खाऊचे वाटप करुन एक सामाजिक बांधीलकी या वाढदिवशी त्यांनी जोपासली. परदेशी दाम्पत्याला दोन कन्या आहेत. वाढदिवसाला पैशांची उधळण करण्यापेक्षा स्वछता कर्मचारी व त्यांच्या मुलांसोबत लहान मुलगी चेतनाचा वाढदिवस साजरा केला. दिवसभर स्वत:चा आरोग्याची चिंता न करता पोटाची खळगी भरण्यासाठी कचरा संकलन करणे, गटारीत उतरून मैला काढणे या सोबतच शहरात स्वछता कशी नांदेल यासाठी स्वछता कर्मचारी आपले जीवाचे रान करत कर्तव्य बजावतात. एवढे करूनही या कर्मचाऱ्यांची दखल घेतली जात नाही. स्वच्छतेच्या कामाकडे गलिच्छ कामे म्हणून पाहिले जाते. मात्र, तळोदा येथील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी मुलीच्या वाढदिवसाला सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले होते.. पालिका आवारात विधिवत पध्दतीने शांती पठण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ५० महिला व पुरूष स्वच्छता कर्मचाऱ्यांना कपडे वाटप केले होते. याबाबतचे सकारात्मक वृत्त दै.'पुण्यनगरी' ने प्रसारित केले होते. त्यानंतर सर्वच स्तरावरून परदेशी कुटुंबियांच्या या उपक्रमाचे कौतूक झाले. सोशल मीडियावर देखील सदर वृत्त मोठ्या प्रमाणात झडकले. सदर वृत्ताची दखल महाराष्ट्र राज्याचे मंत्री (वित्त,नियोजन आणि वने) सुधीर मुनगंटीवार यांनी घेत पत्र पाठवून समाजपयोगी उपक्रमाचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ हा जनजागृती संदेश समाजातील शेवटचा माणसापर्यंत पोहचविणे ही काळाची गरज आहे. . अशातच आपण आपल्या मुलीचा वाढदिवस सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरा करून या संदेशासोबतच स्वच्छतेचा संदेश देवून देशहिताचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीची दर्शन घडविले. पत्राच्या माध्यमातून समाजपयोगी उपक्रमाबाबत अभिनंदन करत चिमुकलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..



सोमवार, २८ मे, २०१८

दै.पुण्यनगरीचे वृत्ताची दखल

तळोदा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले नसल्याचे निदर्शनास आल्याने दि. ११ मे रोजी दै.पुण्यनगरीतून बारा ग्रामपंचायतींकडून पाणी नमूने पाठविण्यात दिरंगाई, नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसूतक नाही या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते. सदर वृत्ताची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत दि.१७ रोजी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान तातडीने गटविकास अधिकारी यांनी संबधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर बाराही गावांचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी दै.पुण्यनगरीचे आभार मानले आहेत..
                                             तळोदा तालुक्यात हातपंप, विहिरी, बोअरवेल असे एकुण ६७ जलस्त्रोत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विविध माध्यमातून तालुक्यातील लाखो नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होते. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व व मान्सून सुरु झाल्यावर तालुक्यातील सर्व गावातील जलस्रोताचे नमुने संकलित करुन ते तपासणीसाठी तालुका आरोग्य प्रयोगशाळेत पाठवून पाणी नमुन्याची अनुजीव व रासायनिक तपासणी केली जाते. ही प्रक्रिया मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर करणे आवश्यक असते. मात्र तळोदा तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतीकडून पाण्याचे नमुने पाठवले नसल्याने ग्रामसेवकांचा बेजबाबदारपणा व नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत दि.११ रोजी दै. पुण्यनगरीने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने दखल घेत संबधितांवर तात्काळ कारवाई करा व याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा असे आदेश गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार तातडीने गटविकास अधिकारी यांनी संबधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या. त्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील मान्सून पश्चात रासायनिक व जैविक तपासणी करून घेण्यासाठी स्त्रोतांचे पाणी नमुने संकलन करण्याचे कामे सुरू असताना संबधित ग्रामपंचायतींकडून आजपर्यंत पाणी नमूने पाठवण्यात आले नाही. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे नमूने तात्काळ तपासणी करण्यात यावे. पाणी नमुने दूषित आल्यास तात्काळ कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता करून ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. मात्र सदर कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याने सदरचे वर्तन हे महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तवणूक) नियम १९६७ मधील ४ चे उल्लंघन करणारे व अक्षम्य कसूर करणारे असून प्रशासनास नियमबाह्य व बेजबाबदार वर्तन केल्यामुळे संबंधितांवर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ शिस्तभंग विषयक कार्यवाहीचा प्रस्ताव का सादर करण्यात येऊ नये? असा प्रश्न उपस्थित करत नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. परिणामी तातडीने संबधित ग्रामपंचायतीकडून कार्याची पूर्तता करत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे विस्तार अधिकारी के.बी.पाटील यांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी दै.पुण्यनगरीचे आभार मानले आहेत..

 ➤➤➤ या होत्या पाणी नमूने पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या ग्रामपंचायती➤➤➤
नवागांव, मोड, मोहिदा, रतनपाडा, रामपूर, मोदलपाडा, नळगव्हाण, पिंपरपाडा, शिर्वे, सोमावल बुद्रुक, सोमावल खुर्द, वाल्हेरी.. 

➤➤➤जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तात्काळ संबधित ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत जाब विचारला होता. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी तात्काळ पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यावरून संबधित ग्रामसेवकांनी कार्यपूर्तता केली असून तालुक्यातील एकूण ६७ ग्रापंचायतीकडून पाण्याचे अहवाल सादर केले आहेत. . -
के.बी.पाटील. विस्तार अधिकारी, पं.स.तळोदा. 







बारा ग्रामपंचायतीकडून पाणी नमूने पाठविण्यात दिरंगाई

नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसूतक नाही तळोदा शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणाहून पाण्याचा उपसा होतो. विहिरी, बोअरवेल व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विविध माध्यमातून तालुक्यातील लाखो नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होते. तळोदा तालुक्यात नुकत्याच सादर केलेल्या सर्व्हेक्षण अहवालानुसार हातपंप, विहिरी, बोअरवेल असे एकुण ६७ जलस्त्रोत आहेत. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व व मान्सून सुरु झाल्यावर तालुक्यातील सर्व गावातील जलस्रोताचे नमुने संकलित करुन ते तपासणीसाठी तालुका आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. तिथे विविध पाणी नमुन्याची अनुजीव व रासायनिक तपासणी केली जाते. मात्र १२ ग्रामपंचायतींनी अद्यापपर्यंत पाण्याचे नमुनेच तपासणीसाठी पाठविले नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सदर ग्रामपंचायतींचा कामातील बेजबाबदारपणा दिसून येत असून या ग्रामपंचायतींना त्यांचा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा आरोग्याची काहीच चिंता नसल्याचे दिसून होते.पेयजलासाठी वापर होणाऱ्या पाणी स्त्रोताची वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक आहे. अनुजीव तपासणी वर्षातून चार वेळा तर रासायनीक तपासणी किमान दोनवेळा होणे अपेक्षित आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष अभियानात मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर अशी दोन वेळा पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. उर्वरित काळात नाममात्र शुल्क आकारुन पाणी नमुना तपासणी प्रयोगशाळेतून केली जात असल्याची चर्चा आहे..

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

अखेर कुटुंबीयांना मिळाला त्यांच्या नावाचा धनादेश

दै.'पुण्यनगरी'कडून करण्यात आला होता पाठपुरावा.
रूग्णवाहिकेच्या अपघातात मयत अनिल गुरव यांच्या कुटूंबियांना बीव्हीजी ग्रुपतर्फे अनावधानाने दुसऱ्या नावाने देण्यात आलेला धनादेश परत घेण्यात आला होता. मात्र दै.'पुण्यनगरी' ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर काल तात्काळ गुरव कुटूंबियांना त्यांच्या नावाचा धनादेश देण्यात आला. . गेल्या महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्त करून येत असताना नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात घडल्याने यामध्ये चालक अनिल गुरव, अल्लारखा मक्रानी, भिक्कन पवार, या तिघांच्या मृत्यू झाला होता. वेळोवेळी याबाबत दै.पुण्यनगरीने पाठपुरावा करून सदर विषयाला वाचा फोडल्यामुळे मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तातडीने उपलब्ध झाली. आर्थिक मदतीचा धनादेश पुणे व नाशिक पथकाने मयताच्या कुटुंबियांना स्वाधीन केले. काही दिवसांपूर्वी अनावधानाने कंपनीच्या सदस्यांकडून गुरव यांच्या धनादेश देण्याऐवजी भिक्कन पवार यांच्या धनादेश गुरव यांना देण्यात आला होता. सदर बाब दुसऱ्या दिवशी कुटूंबियांना दूरध्वनीद्वारे कळविल्यानंतर तातडीने कंपनीच्या सदस्यांनी तो परत घेतला. याबाबत लेखी मागितली असता ती देण्यात टाळाटाळ केल्याने कंपनीने सोबत नेलेला धनादेश कधी परत मिळतो याबाबत कुटुंबीय प्रतीक्षेत होते. मात्र दै. पुण्यनगरीच्या वृत्तानंतर तातडीने डॉ.यु.आर.साने जिल्हा व्यवस्थापक, राकेश पाटील, राजेश परदेशी आदीनी येऊन पंडित गुरव यांना धनादेश स्वाधीन केला. गुरव कुटुंबीयांनी दै.'पुण्यनगरी' चे आभार मानले.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

पुढाऱ्याने बिव्हिजीच्या व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावताच दिले ३० हजार...

मयत कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश देताना 
नंदुरबार - दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर मयताच्या कुटुंबियांना भारत विकास ग्रुपतर्फे आठ हजाराची मदत देऊन थट्टा करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त दै.पुण्यनगरीने प्रकाशित केल्यानंतर मयताच्या कुटुंबियांना मदतीसाठीच्या हालचाली गतिमान होऊन एक लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. असे असले तरी अनावधानाने धनादेश बदली झाल्याने सदर धनादेश कंपनीने परत घेतला असून आता पुन्हा धनादेश कधी मिळतो याची प्रतीक्षा आहे.         यादरम्यान कंपनीच्या व्यवस्थापकाने मयताच्या कुटुंबियांना मिळालेल्या रक्कमेच्या अपहार केल्याच्या प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्त करून येत असताना नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात घडल्याने यामध्ये चालक अनिल गुरव, अल्लारखा मक्रानी, भिक्कन पवार, या तिघांच्या मृत्यू झाला होता. नेहमी रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी आटापिटा करणाऱ्या तिघे मयत तरुणांची आर्थिक परिस्थिती बेताची असून भारत विकास गृपतर्फे अवघ्या आठ हजाराची मदत करून गुरव कुटुंबियांची थट्टा केल्याचे वृत्त दै.पुण्यनगरीने 2 एप्रिल रोजी प्रकाशित केले. यानंतर मदतीसाठी हालचाली गतिमान झाल्या. दि. २१ एप्रिल रोजी नाशिक येथील विभागीय प्रमुख बाळासाहेब कंकराळे, पुण्याचे डॉ.ज्योत्सना माने, विभागीय अधिकारी डॉ.किशोर देव, रोहित शिंदे या पथकाने तळोदा गाठून गुरव कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश दिला. मात्र अनावधानाने गुरव कुटुंबियांना दुसऱ्याच नावाने धनादेश देण्यात आल्याने सदरचा धनादेश कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परत घेतला आहे. यामुळे आता परत धनादेश कधी मिळतो, याकडे लक्ष लागून आहे. यावेळी उपस्थितीतांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अंत्यसंस्काराप्रसंगी मदतीची अपेक्षा होती. केवळ आठ हजार आर्थिक मदत देऊन कंपनीकडून थट्टा करण्यात आल्याचे रहवाश्यांनी सांगितले. यावर संबंधीत कंपनीकडून घटनेनंतर तातडीने 50 हजार रु नंदुरबार व्यवस्थांकाच्या खात्यात व 50 हजार रु धुळे येथील डॉ.चव्हाणच्या खात्यावर टाकून मदत करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी संबधित व्यवस्थापकाने सदर रक्कमेच्या अपहाराचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

*आणि व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली*
मयताच्या कुटुंबियांना मदतीसाठी प्रत्येकी 33 हजार रुपये याप्रसंगी कंपनीने मदत पाठविलेली असताना व्यवस्थापकाने प्रत्येक्षात मात्र केवळ आठ हजार रुपये याप्रमाणे मयताच्या कुटुंबियांना मदत केल्याने स्थानिक नेते संतापले. नेत्यांमध्ये व कंपनीच्या व्यवस्थापकात बाचाबाची झाली. शाब्दिक चकमक वाढल्याने स्थानिक राजकीय पुढाऱ्याने व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली. यावेळी वातावरण सुन्न झाले आणि तात्काळ एक लाखाचा धनादेश पंडित गुरव यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच उर्वरित 30 हजार रुपये देखील गुरव कुटुंबियांना देण्यात आले. त्याचप्रमाणे पी.एफ, पेंशन इन्शुरन्स, एलआयसीच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचे सांगितले.

  *कारवाईकडे लक्ष*
भारत विकास ग्रुप राज्यासह परराज्यात देखील आपल्या सेवेमुळे नावलौकिक आहे, मात्र व्यवस्थापकाने केलेल्या चुकांमुळें कंपनी बाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. कंपनी संबंधित व्यवस्थापकवार काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.... *रुग्णकाहिका कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र विमा काढणे गरजेचे* स्वतःच्या जीव धोक्यात घालून रुग्णाना तातडीने सेवा मिळावी म्हणून रुग्णवाहिकेत असलेले कर्मचारी प्रयत्न करतात. बऱ्याचदा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागतो. याकरिता रूग्णासोबत असणाऱ्या नर्स, वाहन चालकांचे कंपनीकडून स्वतंत्र विमा काढणे आवश्यक आहे. तसेच अपघात घडल्यास भरीव आर्थिक मदत करणेही गरजेचे आहे.

 *108 रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांचे मागण्यांबाबत बीव्हीजीला निवेदन* 
 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागनीबाबत बिव्हीजीचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या निवेदना म्हटले आहे की, रुग्णवाहिकेचा अपघातात जिल्ह्यातील अनिल गुरव, भिक्कन पवार, अल्लरखा मक्रानी या तिघांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विविध मागण्यामध्ये ओंनड्युटी मृत्युमुखी झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. कुटुंबियामधील एखादया व्यक्तीस नौकरीत सामावून घेण्यात यावे. तिघांचे प्रॉव्हिडंट फंडातील पैसे तात्काळ मिळवण्याची व्यवस्था करण्यात यावी, सदरच्या मागण्या येत्या चार दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा 108 कर्मचारी संघटनेने निवेदनातून दिला आहे.

 *प्रतिक्रिया* 
 कँपनीकडून 1 लाख रु देण्यात आले होते.मात्र व्यवस्थापकांकडून 8 हजार रु मयताच्या कुटुंबियांना देण्यात आले. यातून गैरसमज निर्मान झाला असून घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठाना कडविले आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून योग्य तो निर्णय घेतील..
 *डॉ.ज्योत्स्ना माने*

 *प्रतिक्रिया* 
कँपनीकडून मयताच्या कुटुंबियासाठी नंदुरबार करीत 50000 रु देण्यात आले होते तर 50000 रु धुळे येथील डॉ. निलेश चव्हाण यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र सदर रक्कम एकत्रितरित्या धनादेश स्वरूपात अथवा रोख न देता 3 दिवसाचा दुखवटा पाळण्यासाठी लागणारा खर्च घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांचा हातात द्यावा, असा आदेश वरिष्ठांकडून देण्यात आला होता. या आदेशांचे पालन केले. सदर 8 हजार एवढी रक्कम कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी नाकारली.
 व्यवस्थापक बिव्हीजी ग्रुप नंदुरबार

 *प्रतिक्रिया*
अपघातात कमवता मुलगा गेला आहे. वाहन दुरुस्तीचे नाव करून वयक्तिक कामाकरिता सदर वाहन नेले असल्याचे आम्हास कळत आहे. याबाबत अर्ज फाटे करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आर्थिक मदत म्हणून देण्यात आलेला धनादेश हा आमच्या नसून भिक्कन पवार यांचा आहे. तो आम्ही परत केला असून अद्याप पावेतो आमच्या नावाचा धनादेश प्राप्त झालेला नाही.
 पंडित गुरव मयत अनिलचे वडील




सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

दै.'पुण्यनगरी' च्या वृत्ताने बांधकाम विभागाला आली जाग

हातोडा पुलावरील खड्ड्यांसह भगदाड बुजण्यास सुरुवात
हातोडा पुलावरील जोड रस्त्यालगत भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदर पुलाचे सहा महिन्यापुर्वी लोकार्पण होवून वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. नित्कृष्ट कामामुळे वारंवार पुलावर खड्डे, भगदाड पडत आहेत. पुलाच्या गुणवत्तेबाबत नागरीकांसह वाहनधारकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर नुकत्याच पडलेल्या भगदाडबाबत दै.'पुण्यनगरी' शनीवारच्या अंकात सचित्र बातमी प्रकाशित केली होती. या बातमीनंतर बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे व भगदाड बुजण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. . तापी नदीवरील हातोडा पुलाच्या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा पूल बांधकाम ते उद्घाटन असा सतत चर्चेंत राहिला आहे. अवघ्या सहा महिन्यात पुलाला जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान एक मोठ भगदाड पडून जोड रस्त्यादरम्यान भराव खचल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत दै.'पुण्यनगरी' सचित्र वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच बांधकाम विभाग खडबडून जागे झाले शनीवारी सकाळी जोड रस्त्यादरम्यान पडलेले भगदाड बुजण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, खचलेला भराव तसाच असून यामुळे अपघाताची शक्यता वाहनधारकांनी बोलून दाखविली आहे. .

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

हातोडा पुलाला पुन्हा पडले भगदाड

 तापी नदीवरील हातोडा पूल रहदारीसाठी सुरु होऊन अवघे सहा महिने झाले आहेत,
मात्र, पुलावरील जोड रस्त्याचा लगत एक भगदाड पडले असून ठिकठिकाणी भराव खचला आहे. यामुळे पुलाचा कामांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर अवजड वाहने यात अडकून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. . तापी नदीवरील हातोडा पुलाचे कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मागीलवर्षी काम पूर्ण झाल्यानंतर १५ आगस्ट रोजी हातोडा पुलाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली खा.डॉ.हीना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.उदेसिंग पाडवी, आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, भरत माळी, डॉ.शशिकांत वाणी यांच्या उपस्थितीत पार पडला. हातोडा पूल बांधकाम ते उद्घाटन असा सतत चर्चेंत होता. लोकर्पणानंतरही हातोडा पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान एक मोठ भगदाड पडले असून भराव खचला आहे. यामुळे वाहन त्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला या पुलावरून लहान वाहनांना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर नागरीक व विविध संघटनांच्या मागणीवरून पुलावरुन मिनीबस व स्कुल बसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली. या पुलामुळे नंदुरबारचे अंतर तळोदा, धडगाव येथून २० किमी. ने कमी झाले आहे. दरम्यान, कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या पुलावर भगदाड पडले असून भराव खचला आहे. यावरुन अवजड वाहने, रेती वाहतूकीची वाहने धावतात. जोडरस्त्या दरम्यान पडलेले भगदाड तातडीने बुजले नाही तर यात वाहने रुतून अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे..



गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

सूचना फलकाच्या वरती फलक लावून पालिकेला आव्हान !


तळोदयात विविध चौकात अवैध होर्डिंगस व फ्लेक्सचे साम्राज्य वाढल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र सर्वांसमोर आले आहे. पालिकेचा कर चुकवून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पालिका मेहरभान का असा सवाल आमजनेतून उपस्थित होत आहे. शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना दुसऱ्या बाजूला अशा अवैध होर्डिंगसमूळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची समस्या शहराला भेडसावत आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसासह, विविध कार्यक्रमांचे, प्लॉट विक्री, क्लासेस, आदींसह विविध जाहिराती तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या प्रसिद्धीसाठी चौक चौकांमध्ये आणि रस्त्यावरील पथ दिव्याच्या खांबांना होर्डिंग लावले जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे.. एकाचा फलक काढला, की लगेच दुसऱ्याचा फलक झळकन्याच्या प्रकार सुरू असून एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे फलक लावण्याऱ्यांसमोर पालिका कर्मचारी हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनधिकृत फलक लावू नये व शहर विद्रूप करू नये, असे न्यायालयाचे आदेश असताना फलक लावले जात आहेत. तळोदा येथील मुख्य स्मारक चौकांसह ठिकठिकाणी फलकबाजी सुरू आहे. निवड, वाढदिवस, स्वागत, पुण्यतिथी, जयंती अशा वेगवेगळय़ा कारणास्तव जाहिरातीचे फलक लावले जात आहेत. मुदत संपल्यानंतर ते काढण्याचे सौजन्य दाखविले जात नसल्याने त्यामुळे जागोजागी फलकांचा सुळसुळाट झाला असून शहर विद्रूप होत आहे. फलकबाजी करणारे पालिकेच्या कारवाईला बिलकूल भीक घालीत नाहीत, उलट फलक काढल्यास दमबाजीची भाषा केली जाते. त्यामुळे वाद विवादाला कंटाळून डोळेझाक करण्याची सोयीस्कर भूमिका पालिकेने आतापर्यंत घेतली आहे. मात्र, लाजेखातर कागदपत्री कारवाई सुरू आहे असे दाखविले जात आहे. यापूर्वी, मुख्याधिकारी जनार्धन पवार यांनी कारवाईचे इशारे दिले आहेत, शहादा रस्त्याकडील पथदिव्याच्या ईलेक्ट्रिक खांबावर फलक लावल्यास म.अधिनियम 1995 म प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी 1995 चे कलम 5 अन्वये इलेक्ट्रिक पोलवर अथवा सार्वजनिक ठिकाणी झेंडे,फलक बॅनर, अन्य कोणत्याही प्रकारच्या वस्तू लावूंन विद्रुपीकरण करू नये अन्यथा आपल्यावर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल या आशयाची चेतावणी वजा सूचना करून, इशारा दिला असताना अगदी त्या चेतावनी वरच जाहिरातीचे होर्डिंग लावुन पालिकेला आव्हान केले असल्याने सदर प्लॉट जाहिरातीचे होर्डिंगस चर्चेचा विषय बनले आहे. याच रस्त्याने पालिकेचे मुख्याधिकारी दररोज वावरत असताना त्यांनी सदर जाहिरातीकडे कानाडोळा केला असल्याने सर्वसामान्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे. पालिकेने लावलेल्या सूचना फलकांला केराची टोपली दाखवत फलक बहादरांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. कायदेशीर कारवाईचे सूचना फलक लावले असताना काही फलक बहाद्दर यांना न जुमानता कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सरास फलक लावून पालिकेच्या नियमाना केराची टोपली दाखवन्याच्या प्रकार सुरू आहे. विनापरवानगी फलक पालिकेला डोकेदुखे ठरली असुन पालिकेचा कर बुडवत हे नियम धाब्यावर ठेवले जात आहेत.. फ्लेक्स आणि होर्डींग्स यामधून पालिकेला प्रचंड उत्पन्न मिळू शकते. मात्र पालिकेचे कर्मचारी कुठे तरी कमी पडत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 🔴 पर सेकवर फूट 10 रु प्रमाणे जाहिरातीचे दर आहेत. तसेच छोट्या मोठ्या जाहिरातीसाठी 100 रु दररोज प्रमाणे पालिकेची जाहिरात कर पावती घ्यावी लागते. पावतीन घेता संबंधित जाहिरात फलक जप्त करून कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. याबाबत मुख्याधिकारी यांनी निर्देश देखील दिले आहेत. मात्र तळोद्यात ठिकठिकाणी सरास नियमांचे उलन्घन होत असताना देखील एकही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे...

रविवार, २ एप्रिल, २०१७

माझ्या बातम्या नंतर सलग चौथ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल.

तळोद्यात चौथ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल....

 पथकाची कारवाई सुरुच : अनेकांनी गुंडाळला गाशा!

 शासनातर्फे राबविण्यात येत असलेली बोगस डॉक्टर शोध मोहीमेने तालुक्यात चांगलाच जोर धरल्याने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. एकट्या तळोदा तालुक्यात डॉ.रेखा शिंदे व यांच्या पथकाने राबविलेल्या कारवाईत आतापर्यंत चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी पथकाने तळोदा शहरातील एका रुग्णालयात तपासणी करुन सदर डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शासनाच्या आदेशान्वये जिल्हाभरात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नियुक्त पथक शहरांसह दुर्गम भागात धाड टाकून तपासणी करीत आहेत. दरम्यान, कारवाईच्या भितीने अनेक बोगस डॉक्टरांनी आपला गाशा गुंडाळत पलायन केले आहे. मोहीम सुरु झाल्यापासून आतापर्यंत तळोदा तालुक्यात चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. काल शुक्रवारी पथक प्रमुख डॉ.रेखा शिंदे यांच्या पथकाने तळोदा शहरातील सिटी मार्केट समोरील डॉ. प्रितेश डी.चौधरी यांच्या कुबेर बालरोग व जनरल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी पथकाने डॉ.चौधरी यांच्याकडे पदवी प्रमाणपत्राची मागणी केली. डॉ.चौधरी यांच्याकडील कागदपत्रांची व औषधांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत डॉ.चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमीओपॅथी या पदवीचे प्रमाणपत्र आढळून आले. तसेच अँलोपॅथी औषधी वापरण्याची परवानगी नसतानाही रुगालयात अँलोपॅथी औषधी, प्रिस्क्रिप्शन व लॅब लेटर आढळून आले. तसेच संबंधित डॉक्टराची पदवी बीएचएमएस असताना अँलोपॅथीचे औषधी बाळगण्याबाबत व रुग्णांना देत असल्याचे आढळून आले. तसेच क्लिनिक चालवण्यासाठी तळोदा नगर पालिकेच्या नाहरकत दाखला, इंडियन मेडिकल कोन्सिलचा परवाना, महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशनर अँक्ट १९६१ नुसारचा परवाना मिळून न आल्याने त्यांच्यावर पथक प्रमुख रेखा शिंदे यांच्या फिर्यादीवरुन इंडीयन मेडीकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे कलम १५/२, इंडियन मेडीकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे १५ (२) तसेच महाराष्ट्र मेडीकल पॅ्रक्टिशनर अँक्ट १९६१ चे कलम ३३ (२) भादंवि कलम ४१९, ४२0, १७५, १७९ नुसार तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. डॉ.प्रितेश चौधरी यांच्याकडे भरारी पथकाने धाड टाकल्याची माहिती गावात पसरताच इतर बोगस डॉक्टरांनी आपला गाशा गुंडाळत दवाखाने बंद करुन पलायन केले. बोगस डॉक्टर शोध मोहीमेतंर्गत तळोदा पथकातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रेखा शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय पटेल, नायब तहसिलदार मंगला पावरा, पो.कॉ.प्रवीण अहिरे, औषध निर्माता गौतम वळवी यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाई सत्राने तळोदा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे...


शनिवार, १ एप्रिल, २०१७

बातमी नंतर त्या डॉक्टरावर गुन्हा दखल.....

अखेर 'त्या' डॉक्टरवर तळोद्यात गुन्हा दाखल

बोगस डॉक्टर शोध मोहीमेंतर्गत आलेल्या पथकासोबत हुज्जत घालुन एका मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन संवाद साधुन पथकासोबत दबंगगीरी करणार्‍या 'त्या' डॉक्टर विरोधात अखेर तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी चक्क पथकाला आव्हान दिल्याने या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत न झाल्याने पथकाला खाली हात परतावे लागले होते. याबाबत दै.'पुण्यनगरी' ने घटलेल्या प्रकाराबाबत वृतांकन करुन सदर प्रकार जनतेसमोर उजेडात आणला होता. दरम्यान काल गुरुवारी वरिष्ठांच्या आदेशावरुन पथकप्रमुख डॉ.रेखा शिंदे यांच्या फिर्यादीवरून संबंधित डॉक्टरावर तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत ठिकठिकाणाहून बोगस डॉक्टर आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी तालुक्यातील बोरद गावात पथकाने भेट देवून तपासणी मोहीम राबविली. गावातील एका खाजगी दवाखान्यास पथकाने भेट देऊन संबंधित डॉक्टराकडून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राची मागणी केली होती. यावेळी डॉक्टराकडे बीईएमएसची एलक्ट्रोपॅथीची पदवी प्रमाणपत्र असताना संबंधित डॉक्टर अलोपॅथिक व्यवसाय करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. तसेच दवाखान्यात प्रतिजैविक सलाईन, इंजेक्शन आदींसह अलोपॅथीची औषधी आढळून आल्याने सदर औषधी बाळगणो व रुग्णांवर उपचार करणो कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगत याबाबत विचारणा करून संबधित डॉक्टरला तंबी दिली होती. मात्र, संबंधित डॉक्टरने यावेळी आलेल्या पथकासोबत चांगलीच हुज्जत घातली होती. माझ्यावर गुन्हे दाखल करुन दाखवावेत, संबंधीताच्या सर्व कुंडल्या मी उघडून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही! असे आव्हान पथकाला गावकर्‍यांसमोर दिले होते. अनेकवेळा बोरद रुग्णालयात रात्री-बेरात्री गरोदर मातेचे बाळंतपण करण्यास मला या पथकातीलच एका अधिकार्‍याने बोलविले आहे, त्यावेळी माझी पदवी नाही पाहीली का? असा प्रती सवाल देखील आलेल्या पथकाला विचारत वाद घातला तसेच बोरद गावातील रुगणालाय निष्क्रिय असल्याचा आरोपासह विविध आरोप यावेळी डॉक्टरने केले होते. एवढय़ावर न थांबता या महाशयाने एका केंद्रीय मंत्र्यांना फोन करुन संबंधीत पथक हे मला त्रास देत असल्याची माहिती दिल्याचे पथकाने काढता पाय घेतला होता. मात्र घडलेल्या प्रकाराबाबत दै.'पुण्यनगरी' गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकाशीत करण्यात आल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या. तर पथकाबाबतही सांशक वातावरण निर्माण झाले होते. पथकातील अधिकार्‍यांनी घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी यांना माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोये आदींच्या आदेशांव्ये काल पथक प्रमुख डॉ.रेखा विठ्ठल शिंदे यांच्या फिर्यादीवरून डॉ.अनिल धनगर यांच्यावर तळोदा पोलीस ठाण्यात गुरन ६१/ २0१७ भादवी कलम ३५३, ४१९, ४२0, १७५, १७९ इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे कलम १५ (२) महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशन अँक्ट १९६१ चे कलम ९३ (२) प्रमाणो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई डॉ.रेखा शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पटले, नायब तहसीलदार मंगला पावरा, असई जेरमा पावरा, औषध निर्माता गौतम वळवी यांच्या पथकाने केली. मोड येथील डॉक्टरवर कारवाई..

                           मोड येथील डॉक्टरावर ही गुन्हा दाखल.... 

तळोदा तालुक्यातील मोड येथील बसस्थानक जवळील मातोश्री क्लिनिकचे डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्याकडे वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र न आढळ्याने तसेच अलोपेथची परवानगी नसतांना त्यांचाकडे सदर ओषधी आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील मोड येथे गुरुवारी बोगस डॉक्टर शोध मोहीम पथकाने भेट देवून तपासणी केली. यावेळी पथकाने डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्या मातोश्री क्लिनिक यांच्या दवाखान्याला भेट देवून तपासणी केली. डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे बीएचएमएस ही पदवी आढळून आली. सदर पदवी ही महाराष्र्ट् प्रॅक्टिशन अँक्ट १९६१ आणि इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ शेड्यूल मध्ये नमूद नसतांना त्यांच्याकडे अँलोपॅथी औषधी आढळून आली. याबाबत पथक प्रमुख तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रेखा शिंदे, नायब तहसीलदार मंगला पावरा, वैद्यकीय अधिकारी संजय पटले यांच्या पथकाने कारवाई करीत त्यांच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

एकतेचे दर्शन घडविणारा दानिश याचा नागरी सत्कार

दानिशला स्कुल बँग देताना जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी साहेबव अधिकारी 
गणेशतोत्सवात तळोदा येथील 11 वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी याने श्री ची स्थापना करून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले. शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या बालकाचा दखल घेत पत्रकार संघातर्फे नंदुरबार जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ क्लशेट्टी यांचा हस्ते नागरी सत्कार व भेट वस्तू देऊन त्याच्या गौरव करण्यात आला...  पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या आरास स्पर्धेच्या कार्यक्रमात तळोदा शहराची शांतता टिकून राहावी हिंदू मुस्लिम मध्ये बंधू भाव निर्माण व्हावा ह्या हेतूने 11 वर्षीय दानिशने श्रीची स्थापना करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला. सदर कार्याचे दखल घेत कार्याची पावती म्हणून त्याच्या नागरी सत्कार तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला. दानिशची आर्थिक परिस्थिती पाहता त्याच्या शिक्षणात अडथडा निर्माण होऊ नये. त्याने शिक्षण
दै.पुण्यनगरीत प्रसारित झालेली बातमीची प्रतिमा देताना 
 घेऊन पुढे जावे तळोदयाचे नाव लौकिक करावे. हा हेतू मनात ठेवून पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भरत भामरे यांनी दानिशला 10 वह्यांचा संच भेट दिला तर सचिव उल्हास मगरे यांनी त्याला स्कुल बॅग भेट दिली. संघाचे कोशाध्यक्ष यांनी ड्रेस आदीवस्तूंची भेट देऊन दानिशच्या नागरी सत्कार जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दहाडे यांच्या हस्ते करण्यात आला......

दै.खान्देश गौरव वृत
 प्रथम मूर्तिकार शिवा बोरळे यांची दै.पुण्यनगरीत चापून आलेल्या बातमीची प्रतिमा देतांना  
जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना 
प्रांताधिकारी अभिजित राऊत दानिश याला ड्रेस देताना 
दै.पुण्यनगरीचे पत्रकार सुधाकर मराठे यांचा प्रांताधिकारी कडून सत्कार  
दै.पुण्यनगरीचे पत्रकार उल्हास मगरे यांचा लोकसंघर्ष मोर्च्याच्या वतीने सत्कार करताना प्रा.जे.एन.शिंदे
दै.पुण्यनगरीचे पत्रकार सुधाकर मराठे  यांचा तळोदा पोलीस स्टेशनच्या  वतीने सत्कार करताना पो.नि.संजय भामरे
*दै. पुण्यनगरी प्रतिनिधिंचा विशेष गौरव*
दै पुण्यनगरी तळोदा प्रतिनिधि उल्हास मगरे यांनी दिलेल्या वृत्ताची दखल घेत तालुक्यातील हलालपुर गावातील रहिवास शासन दरबारी नोंद होऊन प्रशासनाने नमूना नं ८ वाटप केले त्याबद्दल त्यांचे लोक संघर्ष मोर्चा तर्फे गौरव केला त्यांचा सत्कार प्रा जे एन शिंदे यांच्या हस्ते झाला व दै पुण्यनगरी बोरद प्रतिनिधि सुधाकर मराठे यांनी सामाजिक सलोखा एकात्मता दर्शन व हिन्दू मुस्लिम एकता संदेश देणाऱ्या दानिश पिंजारी या बालकाचे वृत प्रकाशित केले त्यामुळे पोलिस ठाण्या तर्फे पोलिस निरीक्षक संजय भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दोन्ही पत्रकारांचा गौरव तलोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे गणेश आरास स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात करण्यात आला

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

माझ्या बातमी नंतर गंगानगरच्या पाण्यासाठी 30 लाखांचा निधी

गंगानगरच्या पाण्यासाठी 30 लाखांचा निधी
दै. पुण्यनगरी च्या वृताने प्रशासन कामाला: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
 तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत तऱ्हावद गंगानगर येथील पाणी समस्या व इतर कामासाठी जिल्हापरिषदेच्या आदिवासी उपाययोजने अंतर्गत 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतुन गावात पाण्याची सोय केली जाणार आहे. सदर निधीमुळे विस्थापितांच्या पाण्याच्या प्रश्न कायमच्या मार्गी लागणार आहे. याबाबत नुकतेच दै. पुण्यनगरीने येथील समस्याबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केले. या वृत्तांच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे विस्थापितांनी समाधान व्यक्त केले आहे.
 तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद (गंगानगर) गावातील पाण्याची समस्यांने उग्ररूप धारण केले आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात होता. आश्वासन देऊन हि समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरीने गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी या शिर्षका खाली सचित्र बातमी प्रसिद्ध केली होती... सन 2002 मध्ये तऱ्हावद पुनर्वसन येथे तेरा गावठानाचे पुनर्वसन करण्यात आले होते. या गावाची लोकसंख्या दोन हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः आठशे 86 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासना कडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन गाव विस्तथापित करण्यात आले..मात्र विस्थापितानंतर येथील रहवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन 2002 मध्ये गावाला आमदार निधी व नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75 हजार लिटरची एक पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून
गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थानी केली आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे गंगानागरकरानी आपल्या विविध मागण्याबाबत 27 जानेवारी 2016 रोजी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 8 महिने उलटूनही समस्या न सुटल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र या समस्यांबाबत दि 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरी मधून सचित्र वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृताची जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी यांनी तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत आदिवासी उपाययोजने अंतर्गत विस्थापित झालेल्या तऱ्हावद पुनर्वसन गंगानगर गावातील पाणी समस्या व उपाययोजनेसाठी 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीमुळे पाण्याची समस्यां सुटण्यास मदत होणार आहे. या निधीतून 22 लाखाची रु खर्चून साडे सात कि.मी. पाण्याची पाईप लाईन केली जाणार आहे. दीड लाख रु रकमेचा स्विच रूम उभारला जाणार आहे. तसेच सोयीनुसार 5×2 प्रमाणे 3 लाख खर्चून 2 सार्वजनिक हौद, 80 हजार रकमेचे यंत्र सामुग्री बसविण्यात येणार आहे...

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी ?

तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेले तऱ्हावद गंगानगर गावातील पाण्याची पाण्याची उग्ररूप धारण करीत आहे. 9 हातपंपापैकी 7 हातपंप नादुरुस्त असून मागील दोन वर्षापासून गावातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आश्वासन देऊनही समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पुनर्वसन करून आमची फसवणूक केल्याचा आरोप पुनर्वसितानी केला आहे...
 तळोदा तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद गंगानगर या विस्थापित गावाची पाण्याची समस्या गँभिर बनली आहे. सन 2002 मध्ये 13 गावठानाचे पुनर्वसन गंगानगर येथे करण्यात आले. या गावाची लोकसंख्या 2000 हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः 886 कुटुंबे येथे राहतात. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासनाकडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन येथे बाधितांचे गाव विस्तथापन करण्यात आले.. मात्र विस्थापनानंतर येथील रहिवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसनानंतर सन 2002 मध्ये या गावाला आमदार निधी व
नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75000 लिटरची एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. परंतु लोकसंख्येनुसार सदर पाण्याची टाकी गावकऱ्यांना पुरेशी नाही. या टाकीतून अर्ध्याच गावाला पाणी मिळते. त्यात ही सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पाईप लाईनमधून दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात साथीच्या आजारासह त्वचा विकाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणत आहेत. भर पावसाळ्यात गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत तसेच इतर मागण्याबाबत 27 -01-2016 रोजी गावकऱ्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या
नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठ महिने उलटूनही समस्या न सुटल्याने आजही गावातील महिला व मुलांना रोजगार, शिक्षण सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या आरोप ग्रामस्थानी केला आहे... संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन समस्यां सोडवण्याची मागणी केली आहे.

 नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात आठ महिन्यांपूर्वी पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा यासह काही प्रमुख मागण्यांसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी व नर्मदा विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याभरात कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप समस्या न सुटल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकांती करावी लागत आहे. 
 शामसिंग पाडवी ग्रामस्थ गंगानगर