Breking News

मराठी कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

आई


एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते.. उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन.. मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो.. माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय.. आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला.. गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या.. हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला.. आई लवकर कर न उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले, आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली.. आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले.. मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले..?? मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या, मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे की केलेस काही खाल्लेस कि नाही..?? त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले.. आई धन्य झाली... आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली.. -Author/लेखक - ग्रेट नितीन बानगुडे -पाटील ("शिवचरित्र"! ) "दोस्तानो, आई च्या पायाशी स्वर्ग आहे.. कधी हि तिला दुखवू नका.... डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही...

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१२

एक ग्लास पाणी

एक ग्लास पाणी एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती.
मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते.
 मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव.
आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती.
मुलगाही आईला कामात मदत करत असे.
 काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती.
 तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला.
बरेच दिवस झाले तरी आईच...ा ताप उतरेना. खांण बंद झालं.
ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत.
आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे.
तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.
एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली.
'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला.
पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली.
गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली.
गार वार्याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली.
तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता.
आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ?
वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला,
'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.! ...................................

गुरुवार, २४ मे, २०१२

मराठी लव्ह स्टोरीज . . .

प्रेयसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ...........
तू ऐकत का नाहीस ?
प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय,
पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचे tension देत आहेत ....
लग्नाला नाही म्हणत आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पण आहे ............
पण म्हणून मी पिते का सिगारेट ?
प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना ......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू, चीडचीडपणा ......
हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ......
त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार कर !!
प्रेयसी :- घरच्यांच्या आधी तुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ..................
प्रियकर :- म्हणजे ?
प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..
प्रियकर :- कुठे ? (तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते ................
मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून द्यावी लागते,
तो नाराजीने हाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो) प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपती बाप्प्पा ला म्हणते :-
हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक दिवस ..........
ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर ......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!! ♥♥

चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो

चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो



♥ एका तलावाच्या काठावर ...
♥ प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ ...............
त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,
किती छान बदके आहेत बघ,
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच
आत मधले प्रेम लवकर कळून येत नाही ...
वास्तविक मी तुझ्यावर, "
त्या पांढर्‍या शुभ्र सुंदर बदकांसारखे नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ?
प्रियकर:- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते..."

प्रेम करतोस तुझ्यावर

प्रेम करतोस तुझ्यावर

 "प्रेयसी :- दादर स्थानकावर मुलीच्या चेहर्यावर असिड टाकण्याची बातमी वाचलीस का ?
किती भयानक ना ?
प्रियकर :- होना ...
खूप दुखदायक घटना,
म्हणून तू सांभाळून व हुशारीने रहात जा.
प्रेयसी :- हो रे, कित्ती प्रेम करतोस माझ्यावर ♥ ......
बर मला सांग,
असे असिड जर माझ्या चेहर्यावर कोणी टाकले
आणि जर मी त्यात मरण पावले
 तर आयुष्यभर काय करशील ?
प्रियकर :- मी आयुष्यभर तुरुंगात असेन.
प्रेयसी :- म्हणजे ???
प्रियकर :- तुला दुखावणार्या माणसाला मी जिवंत सोडेन का ?"

बुधवार, २३ मे, २०१२

जबाबदार माणूस जरुर व्हायच.................

जबाबदार माणूस जरुर व्हायच.................
मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपाय
धूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात
तिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली.
डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला
टाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे
कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनं
काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी
लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.......

नुस्तच कालावाण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय.
तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली.
मी विचार करीयला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर?
इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया?
तुम्हाला मुलबाळ नाही का?

त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाय काय, पोरगा मोठा, सायब हाय,
परदेशाला इंजनेर हाय पण त्याला येळच न्हाय!
कानाखाली कोणतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल.
माणूस
इतका बदलतो का? आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला
क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. माझी चेहरा खाली घालूत
मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी
वरती पाहील तर तिच बाई मला म्हणाली.
इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल...........


मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एका
क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच
थोडस दु:खसुद्धा कधीच जाणता येत नाही.
जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.

सेटलमेंट,
न्यूजाँब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन
बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लागलो.
शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो?
मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरुर व्हायच.................

मंगळवार, २२ मे, २०१२

ऐक सुंदर प्रेम कथा

ऐक सुंदर प्रेम कथा

ऐके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी ऐक खुर्ची पाठवतो .
ती खुर्ची खूप खास असते . कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर ...
त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो
आणि जर त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणारअसतो
मुलगा त्या खुर्ची वर बसतो मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच लाल दिवा पेटतो )
मुलगा घाबरतो मुलगी : घाबरू नकोस .
देवाची काहीतरी चूक झाली असेल हि खुर्ची बनवताना आपण परत एकदा प्रयत्न करून बघू
मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जावून बसतो .
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच हिरवा दिवा पेटतो ) काही कळल का तुम्हाला ?
जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्याखुर्चीवर बसला तोपर्यंत तरी त्या मुलाच त्या मुलीवर खर प्रेम नव्हत .
पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असेलला विश्वास पाहिला आणि
तो तिच्यावर खर खुर प्रेम करू लागला यालाच म्हणतात प्रेम ............... ..
म्हणून लक्ष्यात ठेवा मित्रानो ऐक तर्फी प्रेम सुद्धा यशस्वी होऊ शकत
फक्त तुमचा तिच्यावर / त्याच्यावर असेलला विश्वास कुठेही कमी झाला नाही पाहिज...

शुक्रवार, २ मार्च, २०१२

(Romantic Propose - Marathi Love Story .

हो ..... मलाही !

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

प्रेम हे असेच असते..



एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. एके
दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू
... मला सोडून,,उडून तर जाणार नाही ना? ...
...तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर
तू मला पकडून घेशील... चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर
शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन
चिमण्याचे डोळे भरून आले.. त्याने आपले पंख छाटून
टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर
ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू... ... ... एके दिवशी जोराचे वादळ
सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत
नव्हता.. चिमणी मात्र..
तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे
सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मरून
पडला होता.. बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये..
फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर
कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू
शकले नसते...
प्रेम हे असेच असते.....♥

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

प्रेम आणि वेडेपणा

खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि

मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि
दुर्गुण इकडे तिकडे फिरत होते. काय करावे हे न कळल्याने कंटाळले होते.
एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना
खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते' ला एक कल्पना सुचली. ती
म्हणाली, "आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली.
लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्या मागे
लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता
दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला,........
एक, दोन, तीन..............
वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण
लपायला गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह'
कचऱ्याच्या ढिगात लपला. 'आपुलकी' नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल.
'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं.
प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला. 'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी
लपली. 'लोभ' एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला.
वेडेपणा आकडे मोजतच होता...... ७९, ८०, ८१, ८२......
बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून
'प्रेम' मात्र कुठे लपाव याचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं.
अर्थात आपल्याला याचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि,
'प्रेम' लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच... ९५, ९६, ९७....
शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा' ने
एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला. "मी येतोय!
मी येतोय!"
'वेडेपणा' न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या
पायाशीच त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्या एवढा उत्साह आणि
शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली.
तळ्याच्या तळातून त्याने 'खोटेपणा' ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून
'वासना' शोधून काढली. एकापाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध
लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात
'मत्सरा' ने, त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या
'वेडेपणा' ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या
गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय".
'वेडेपणा' ने एक लाकडाचा धारदार ढलपा
घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा.
शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्या फटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा' ने
त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वर केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू? प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता
दाखव." तेव्हापासून प्रेम आंधळ झालं आणि वेडेपणा त्याचा नेहमीचा सोबती झाला.

लाडकी मैत्रिण होती.

तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती.

तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...थोडा जरी शोधायला उशीर झाला की मात्र लगेच रुसायची...ती होती गाण्यांची दिवानी..तिला आवडायची...सगळी सुंदर गाणी....मी देखील मग फक्त तिच्या साठी सगळी शोधाशोध करायचो....मला नव्हती गाण्यांची आवड....तरी तिच्या साठी फक्त ऐंकायचो...कधी मित्रा कडून मिळव..तरी कधी दुकानात जावून तिच्यासाठी सिडिस घ्यायचो...मग ती जेव्हा गोड हसुन "थॅक्स" म्हणायची, तेव्हा ती खुपच छान वाटायची....कारण ती माझी.....लाडकी मैत्रिण होती.....

तसा मी खुप समजुतदार,पण तिच्यासमोर वेंधळ्यासारखा वागायचो..सांगायचे काही वेगळेच असायचे,पण काही वेगळेच बोलायचो....मग मात्र ती खुप खुप चिडायची..तू काय मुर्ख आहेस का?असे सुद्धा म्हणायची.तिच्या नाकावर कधी कधी खुप राग असायचा,कधी शब्दातून नाही दिसला तरी,तो तिच्या अबोल्यातून कळायचा.अश्या वेळी ती खुप खुप गप्प असायची,मी एकटाच "हाय" करायचो तरीही नाही बोलायची.मी मात्र सगळ काही हसण्या वरती न्यायचो...तिच्या समोर जरी वेधळा असलो तरी, तेव्हा मात्र समजुतदार व्हायचो.तिलाच माझी नंतर थोडी थोडी दया यायची,मग ती हळूच हसायची....तिची कळी खुललेली पाहून,माझी मुद्रा ही खुलायची...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

एक दिवस का कुणास ठाऊक कसे आक्रीत घडले...नियतिच्या मनात काही वेगळेच असते, हे त्या दिवशी कळले.सांगायचे होते काय? आणि प्रकरण भलतीकडे वळले.....माझ्या ही डोक्यात त्या दिवशी भरपुर राग गेला...शस्त्रांनी जितक्या जखमा केल्या नसतील..तितक्या दोघानाही शब्दानी झाल्या.देवाला ठाऊक असेल फक्त,कोणी कोणाला हर्ट केले,पण एक मात्र नक्की, तिचेमाझे भांडण झाले.मैत्री पेक्षा तिचे माझे इगो मोठे झाले,शेवटी एकमेकाशी न बोलायचे ठरले अन दोघांचे जीव शांत झाले.मी मात्र आज ही तिला खुप मिस करतो,आता ती कशी असेल,याचा सुद्धा विचार करतो. तिच्या काळजीने आज ही जीव तितकाच जळतो.कधी कधी तिच्याशी खुप बोलावेसे वाटते,आज काय घडले ते सगळे सांगावेसे वाटते.विचार येतो मनात,"ती तुला विसरली सुद्धा असेल,तू कोण हे देखील तिला आठवत नसेल."......फोन पर्यन्त हात जातो,पण मी रिसिव्हर खाली ठेवतो...आज नाही पण उद्या नक्किच बोलू असे मनात म्हणतो...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

आजकाल कोणाशी मैत्री करायची देखील भिती वाटते.कारण ज्याना आपण आपले मानतो,तिच व्यक्ती शेवटी तोडून जाते...तोडने किती सोप्पे असते,पण जाणाऱ्यांना त्याची काही किंमत नसते.ते हरवून जातात या विश्वाच्या पसाऱ्यात....ठेवून जातात मना मध्ये आठवणींचे मोरपंख,दुखऱ्या जागाना ह्ळुवारपणे स्पर्श होवून,जखमा अधिक सुगंधी करण्यासाठी.....मी आजही वाट पाहतोय तिच्या परत येण्याची,ती अशीच विश्वाच्या पसाऱ्यात हरवली आहे,की तिच्या कोशात ते तिला माहित...पण खात्री आहे एक ना एक दिवस ती नक्की परत येईल...पुन्हा भांडण करण्यासाठी.मीही तिची आतुततेने वाट पाहतो आहे,तिला पुन्हा पिडण्यासाठी......कारण ती माझी........

आई अजिबात आवडत नाही.

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,



""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??

मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण


आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !!

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

प्रेम कथा

Wo meri best thi. Main use poore dil se love karta tha aur wo bhi mujhse pyar karti thi.Meri anu Aaliya li Love story 3 saal se chal rahi thi. Inter passout hone k bad main Dehradun aa gaya aur wo Kanpur reh gai but hum dono ek doosre se contact me the using phone and facebook. Humari batein daily hoti thi. Dil bekarar rehte the milne k liye but doori kafi thi hum dono k cities k beech. Main Engineering kar raha tha aur chahta tha ki Aaliya ko bhi apne pas bulau. Wo mujhse ek class peechhe thi so maine use dehradun banana ka man bana liya tha.Aaliya mere liye sabkuchh thi, humari Love Story me Koi rukawat nahi thi. Beintaha muhabbat thi aur dheere dheere        hamari love story marriage tak pahuch gai.


But Kuchh baton ne mere liye “Love” ki definition hi badal di. Hua u ki engineering me admission k bad mera dil padhai se hatne laga,mujhe ehsas hone laga ki mera interest business hai. Isliye main ab utne dil se padhai bhi nahi karta tha isliye marks aur performance bhi low ho gaye.but main business ko le kar serious tha.

Doosre sal ka result bahut bura raha aur main do subjects me pass nahi ho paya.college walo ne ghar pe report bhej di ki main absent rehta hu class me. Aaliya ne mujhse poocha to maine kaha ki mera dil nahi lagta padhai me. Usne bahut samjhaya but next year me phir se wohi condition thi. Idhar maine business marketing k about knowledge lena shuru kar diya but kisi ko bhi btaya nahi iske about.

3 saal khatm hone pe jab holidays me main ghar gaya to aaliya ajeeb tarike se behave kar rahi thi mere sath. Mujhe laga ki mjhse gussa hai to maine use manane ki koshish ki but ab wo pehle jaise mere pas nahi rehti thi. Door door si raha karti thi.main apne love relationship ko le kar kafi pareshan rehne laga.

Phir maine aaliya se ek din movie dekhne chalne ko kaha but usne inkar kar diya. Mujhe kafi dukh hua. But main apne business project me laga raha aur maine socha ki ek bar business chal jae,phie aaliya aur gharwale dono maan jaenge. Main apne kam me laga raha.



Do din bad maine aaliya ko phone kiya to uska phone busy mil raha tha lagatar. Main uske ghar gaya aut bahar se dekha ki aaliya andar kisi se phone pe bat kar rhi thi.wo kafi khush thi. Maine darwaza knock kiya to andar se ek bachha nikal kar aaya aur bola ki aaliya didi ghar pe nahi hain.

Mujhe kafi hairat hui,maine next din aaliya se pochha to usne koi jawab nahi dia. Do din bad mere phone pe message aaya ki “aaliya ka peechha chhor do”. Maine phone karke poochha to udhar se mujhe warning mili k aaliya use chahti hai isliye main aaliya ko chhor du.



Mujhe laga ki koi majak kar raha hai. Main aaliya k pass gaya aur usse kaha ki koi majak kar raha hai mere sath phone pe. But wo kuchh nahi boli, main jab kareeb gaya aur poochha ki kya bat hai then usne mujhe dhakka diya aur mujh pe chillane lagi aur kaha “tum meri life se chale jao Rajeev,main kisi aur se pyar karti hu,mujhe tum jaise aawara aur nakaam ladke ki jaroorat nahi”



Mujhe yakin nahi ho raha tha.mere dil jor jor se dhadakne laga maine usse poocha ki mera qusoor kya hai aaliya,but usne mujhe bahar nikal kar darwaza band kar diya. Main ro raha tha. Toot gaya tha main. Sadness k teer dil ko cheer rahe the.Main chup chap ghar chala aaya.
Udhar aaliya rahul nam k ladke k sath love relationship me bandh gayi. Main dehradun me tha,ek din mummy ka phone aaya aur wo bata rahi thi ki aaliya bhi dehradun aa rahi hai. Kisi bade businessman k seminar ko attend karne aa rahi hai wo.




Do din bad main Hotel Grand me ek apni car se utar raha tha tabhi meri nazar ek couple pe pari jise guards hotel k andar aane se mana kar rahe the kyuki unke pas invitation card nahi tha. Main najdeek gaya aur poochha ki kya problem hai to mujhe ek aawaz sunai di “sir,hamne invitation card kho diya hai but hum kafi door se aaye hain is seminar ko attend karne,please humein andar aane dijiye”. Maine sar utha k dekha to meri aankhein aur badi ho gayi. Wo ladki koi aur nahi balki meri Aaliya thi.Main kuchh sochh hi raha tha ki uski aawaz aai “sir,apka chehra mere ek bachpan k friend se kafi milta hain,uska nam Rajeev tha”

Main muskurane laga aur maine sirf itna kaha –
“aapke bachpan ka wo friend ab Mr. Rajeev khanna ban chukka hai a
ur wo aapka friend hi nahi kuchh aur bhi tha”
Ab wohi Rajeev Khanna Mr Rajeev Khanna Ban Chuka tha,jiske liye log door door se milne aate the. Maine apne dil li Suni but mere dil ne meri nahi suni but finaaly mere dil ko pachhtana hi pada..Aaliya apne kiye per o rahi thi aur main seminar attemd karne hotel me chala gaya.......

एक प्रेम कथा

!!!...एक प्रेम कथा....!!! ---- पैसा !!!



तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा होकार कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. .....

१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,

ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता................

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

letter to her


दोस्तांनो .. आपल्या आयुष्यात खूप गोष्टी घडत असतात ..
जेव्हा त्या भूतकाळात जमा होतात तेव्हा त्यांच्या आठवणी बनून जातात , अशाच काही आठवणी डोळ्यात आसू आणतात कधी ओठांवर हसू,,. अशीच आठवण एखाद्या प्रिय व्यक्तीची मनाला वेड लावून जाणारी
प्रत्येक श्वासागणिक, तुझ्या आठवणी जन्म घेत राहतात ..
आणि त्यांना मूर्तिमंत पाहताना संवेदना तरल होत जातात..
एकटीच जगत होते या अनोळखी जगात , कुठेतरी तुझी चाहूल लागली ..
अन प्रत्येक क्षण मोहरून आला.. सुंदर आहे जगणं हे जाणावू लागलं..
तुझ्यासाठीच जगावं अन तुझ्यासाठीच मरावं अस वाटू लागलं ..
पण .. या जगातल्या सगळ्याच गोष्टी क्षणभंगुर , तसाच तुझा सहवासही ..
कोणत्यातरी अजाण क्षणी , तू माझ्या आयुष्यातून निघून गेलास ..
माझ्या आनंदी आयुष्याचं, राखरखत वाळवंट बनवून ..
तुझं जाणं ठरलेलच होत जणू , म्हणूनच तुला दोषी ठरवणं नाही जमलं माझ्या मनाला..
आता तेच मन , तुझी वाट पाहतयं..आसुसून .. तहानलेल्या चातकाप्रमाणे ,
कदाचित तू येशील अन .. माझ्या तडफडणार्या मनाला चिंब सरींत भिजवशील.. तू येशील?
माझ्या आयुष्यात पुन्हा लाखो सूर्य घेऊन ?
पौर्णीमेचा चंद्र होऊन.. आमावस्येला चांदण्या आणि .. भरतीच्या लाटा होऊन ,
तू येशीलाही कदाचित .. कारण ,, अजूनही माझ वेडं मन गाणं गातं ..
स्वप्नं रंगवत, आणि तुझ्या आठवणींत स्वःताला हरवून बसतं ..
पण तू नाहीच आलास तर .. या वेड्या मनाची समजूत कशी काढू मी ?
असे विचार मनात आल्यावर , डोळे पाणावतात , स्वप्नांची असंख्य शकले होतात..
अन जीवनातले खाचखळगे खूपच जास्त वाटायला लागतात,
तू माझ्या आयुष्यात नसण, हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं ..
पण तुझं नसण आता खोल कुठेतरी जाणवायला लागलय,, म्हणूनच लवकर ये ..
 माझ्या मनाचा बांध तटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये,
जीवनाची शिवण उसवण्याआधी ये.. लवकर ये..
मी तुझी वाट पाहतोय,, क्षितिजापल्याड काहीतरी शोधतेय ,
शोधताना पडून ,ठेचकाळून .. रक्तबंबाळ होतानाही ..
माझे श्वास तुझेच असतात अन तुझे श्वास माझे..
निदान माझ्या स्वप्नांच्या अवकाशात ये ..
माझा आत्मा तुझ्याचभोवती रुंजी घालतोय , त्याच्यासाठी तरी ये ,.....
तू ये किंवा नको येऊ , पण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत ..
मी तुझी अन फक्त तुझीच वाट पाहणार आहे..
कारण .. या वेड्या मनाला .. तुझी अन फक्त तुझीच .. ओढ आहे......

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

प्रेम कथा

    एक खरी प्रेम कथा...


एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून जात होते,
मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत होता,
मुलगी घाबरली तिने त्याला हळू चालवायला सांगितले..........



मुलगा : मला आई लव यु बोल...
मुलगी : आई लव यु, आता तरी हळू चालव.
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आता तरी हळू चालव.
मुलगा तिला बोलला कि आता माझे Helmet काढ आणि ते तू घाल.
मुलीने ते Helmet घातले आणि त्याला मोटारसायकल हळू चालवायला सांगितले.





दुसरा दिवशी पेपरात बातमी आली कि
तो मुलगा अपघातात मरण पावला
पण ती मुलगी Helmet मुळे काहीहि इजा न होता वाचली..
कारण त्याला माहित होते कि मोटारसायकलचा Break fail  झाला होता................................

सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

प्रेम कथा.

नवजीवन सोसायटी मध्ये ४ थ्या माळ्यावर असलेल्या माझ्या घराच्या अगदी समोर तो राहायचा....
प्रणय नाव त्याच ...५ वर्षांनी मोठा होता
तो ज्या दिवसापासून राहायला आला
त्यादिवसापासूनच मला तो आवडायला लागला ......
Love @ First Sight म्हणतात अस काही.
आणि त्यात भर म्हणजे त्याच आकर्षक व्यक्तिमत्व
कोणाच्याही डोळ्यात भरेल अस होत.......
नवीन व्यक्तिन्शी बोलतानाही जुने मित्र असल्यासारखाच बोलायचं
त्यामुळे कुणीही त्याच्याशी पटकन मैत्री करायचे.....
त्यामुळेच प्रणय माझ्या मनात भरला पण त्याला सांगण्याची हिम्मत झाली नाही.
येता जाता त्याच्याकडे नुसती चोरट्या नजरेने बघत रहायची.
त्याच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही.
मग तोही माझ्याकडे बघायला लागला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी नकळत पडलो.



नवरात्र मध्ये गरबा खेळायला गेले तेव्हा
तर तो फक्त माझ्याशीच खेळत होता
मला थोड विचित्र वाटल पण मनात वेदनेची एक सुखद लहर उमटत होती.
त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.
हा गरबा कधी संपूच नये अस वाटत होत..........................................................




त्या दिवशी रात्री मैत्रिणीबरोबर घरी आले तोही आमच्या पाठोपाठ येत होता नवीन असल्यामुळे आम्ही कोणी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो.मैत्रीण दुसर्या विंग मध्ये रहायची त्यामुळे ती निघून गेली.
मी आमच्या विंग च्या खाली आले लिफ्ट च button प्रेस केल.
हळूच त्याची पावलं माझ्या मागे आल्याचा भास झाला.
हृदयाचे ठोके वाढले होते हत्तातल्या काठ्यांशी चाळा करत मी उभे होते लिफ्ट आली दार उघडल.
घाबरत हळूच पाय आत ठेवला.तोही आत आला.
येताना तो माझ्याकडेच बघतोय हे समोरच्या आरश्याने दाखवून दिल. त्याने 4 थ्या माळ्याच बटन प्रेस केल आणि पंखा चालू केला.
दरदरून घाम फुटलेल्या माझ्या चेहऱ्याला थंडावा वाटला.
लिफ्ट ने पहिला मजला क्रॉस केला
तेव्हा अचानक त्याने स्टॉप च बटन दाबल.मला काही कळलच नाही पंख्याच्या आवाजाशिवाय दुसरा कोणता आवाज माझ्या कानी पडत नव्हता माझ्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या तो मात्र स्मित हास्य करत माझ्यासमोर आला.




माझ्यासमोर एका गुढग्यावर बसला
आणि खिशातली कैडबरी काढत म्हणाला Will u marry me...??
मला तर काहीसुचतच नव्हते इतक्या रात्री लिफ्ट मध्ये आम्ही दोघच आणि लिफ्ट थांबलेली.
पहिल्यांदा त्याच्याशी बोलले अरे कोणी बघेल ना?
परत त्याचा तोच प्रश्न Will u marry me ...???
मलाही ते खूप आवडल चटकन मी त्याच्या हातातली कैडबरी घेतली
तेव्हा त्याच्या हातांचा झालेला स्पर्श अंगावर शहरे उमटवून गेला
तो हसला आणि उभा राहिला लिफ्ट चालू केली ४ था माळा येईपर्यंत माझी नजर झुकलेली आणि त्याची नजर माझ्यावर स्थिरावली होती.
मी घरात आले आईने जेवायलातात वाढल पण माझी भूक तर त्याच्या प्रोपोसनेच शमली होती.
अगदी जग जिंकल्यासारख वाटत होत. जे हव ते मिळाल्याचा आनंद काय असतो आज त्याची प्रचीती आली.
त्या रात्री खूप उशिरापर्यंत झोपच नाही आली. इतक्या दिवसापासून चाललेल्या चोरट्या नजरेचा खेळ अस काही करू शकेल याची कल्पना नव्हती. पहाटे अचानक केव्हातरी डोळा लागला कळलच नाही. सकाळी उठले तेव्हा हम आपके है कौन मधल गान आठवलं.......
Chocolate lime juice
ice cream toffiya
कल जैसे अब मेरे शौक है कहा
गुडिया खिलौनी मेरी साहेलिया
अब मुझे लगती ही सारी पहेलिया
ये कौनसा मोड ही उम्र का..???


खूप उत्साहात सर्व काम आटपत होते.
आईच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही तिने विचारलं काय झाल आज एवढ्या उत्साहाने काम करतेस ?
मी म्हटलं काम कराव तरी बोलणार आणि काम नाही केल तरी बोलणार मग ती गप्प बसली माझ मलाच हसू आल. खरच बालपण केव्हा सरत आणि आपण तारुण्यात केव्हा पदार्पण करतो हे कळतंच नाही.
कालपर्यंत आई वडिलांची सोनू आता अचानक त्याची प्रेयसी झाली होती.
त्या दिवशी गरबा खेळायला जाताना खूप उत्साह होता.तोही आला होता पण आज त्याच्याशी खेळताना खूप भीती पण वाटत होती मैत्रिणीला कळेल,त्याचे मित्र चिडवतील असे अनेक विचार मनात येत होते.
एखाद्याशी मैत्री असली कि काही वाटत नाही पण तेच जर एखाद्याच्या प्रेमात पडलो तर इतरांसमोर त्याच्याशी बोलायला अवघडल्या सारख वाटत .पण त्याच खेळण इतक छान होत कि मी स्वताला थांबवू नाही शकले.परत रात्री लिफ्ट मध्ये दोघेजण.मला म्हणाला खूप छान खेळतेस .गरबा मी म्हणाले माझ्यापेक्षा तुझ खेळण मला खूप आवडल.एका मैत्रिणीला त्याच्याबद्दल सांगितले ती कवयित्री होती मग काय मैडमच सुरु झाल माझ्यावर कविता करायला.खूप छान कविता केल्या तिने. त्यानेहि मला एक चारोळी पाठविली होती ती खूप आवडली मला.....


                           तुझ्या मनातल्या रंगांना
                           बघून इंद्रधनुष्यही लाजेल
                           त्या लाजण्याची एक
                           अप्रतिम छटा क्षितिजावर साजेल....



नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मनसोक्त गरबा खेळले खेळले कसले त्याच्या प्रेमाच्या रंगात रंगलेच जणू .परत त्या दिवशी लिफ्ट मध्ये गेलो तेवढ्यात आवाज आला wait wait म्हणत जोशी काका धावतच आले. .त्याने लिफ्ट च्या दारात हात टाकला हुशश्श करत जोशी काका आत आले.मग कसल बोलायला मिळत कारण ते सातव्या मजल्यावर राहतात. आम्ही दोघेही मागे उभे होतो.२ रा मजला क्रॉस झाल्यावर त्याने मागून हळूच माझ्या हातात एक letter दिल मी चटकन ते घेतलं आणि पर्समध्ये ठेवलं.घरी आले आणि जेवल्यावर रात्री ते letter वाचायला घेतलं.....


Dear सोनू

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
आणि मला तुझ्यापासुन काही लपवून ठेवायचं नाही
त्यामुळेच मी हे letter तुला देत आहे.
तुझ्या पूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती
स्वाती नाव होत तीच मी तिच्यावर खूप प्रेम करायचो
अगदी जीवापाड पण एक दिवस अचानक मला कळलं कि ती माझ्यासोबत फक्त time pass करते. माझ्यासारखाच ती इतर दोन मुलांबरोबर फिरताना माझ्या मित्रांनी तिला पाहिलं होत.
मी तिला जाब विचारला तर रडायचं नाटक करून माझ्याशी असलेले संबंध तिने तोडून टाकले.
पण मी मात्र खूप hurt झालो.
त्यांनतर ठरवलं कि प्रेमा बिमात नाही पडायचं
पण मला तुझा स्वभाव खूप आवडला खर सांगतो
आपण कधी बोलायचो नाही पण तुझ वागण बोलन या सर्व गोष्टी मी न्ह्याहाळायचो.
तू माझ्याकडे चोरून बघायची हि गोष्ट पण माझ्या माझ्या लक्षातयायला वेळ लागला नाही.
सोसायटीतल्या मित्राने पण तुझ्याविषयी सांगितलं गरबा खेळताना पण नजर तुझ्यावरच खिळलेली असायची...................



पत्र वाचून झाल्यावर मला त्याच्या x-girl friend विषयी मनात द्वेष निर्माण झाला
पण ठरवलं त्याला या विषयी काही विचारून दुखवायचं नाही.
पण त्याचा स्पष्टवक्तेपणा माझ्या मनात त्याच्याविषयी
असलेल्या प्रेमात आणखी भर घालून गेला .
दिवस खूप चान चालले होते .
क्लासवरून येताना कधी कधी त्याला भेटायचे.
मग हॉटेलात जाऊन गप्पा व्हायच्या
मला बाहेर त्याच्यासोबत फिरायला खूप भीती वाटायची म्हणून नेहमी होटेलिंगच व्हायचं .
एकदा त्याच्याबरोबर बाइक वरून खारघरला small wondermadhe movie बघायला गेले होते .
वाटत होत बाइक वर त्याच्या मागे घटट मिठी मारून बसाव पण माझ्या पोलिसीमध्ये ते बसत नव्हत.
म्हणून मग फक्त खांद्यावरच हात ठेवला .
या दोन महिन्याच्या भेटीगाठीत त्याने एकदाही मला स्पर्श केला नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही
त्यामुळे मी स्वताला खूप नशीबवान समजायचे .
त्याच्याविषयी मनात आदर वाढत होता .
तो फक्त माझाच राहावा असे वाटत होते...



25 अप्रील् माझा बर्थ डे होता त्याने मला त्याच्याबरोबर मंदिरात चालण्याची विनंती केली
मंदिरात जाऊन अभिषेक करून आम्ही सर्विस रोडने चालत येत होतो .
बाइक सेर्वीसिंग ला असल्याने त्याने आणली नव्हती .सर्विस रोडला असलेल्या कठड्यावर बरेच कपल बसतात
तिथे आम्हीही बसलो त्याने पेस्ट्रिस आणली होती
चमचाने ती कापली आणि छोटासा बर्थ डे सेलेब्रेट केला
जो माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात आनंदी बदाय होता .
बाजूला काही कपल्स बसले होते
त्यांचे अश्लील चाळे बघून दोघानाही ऑक्वर्ड फिल होत होत.
त्याने मला विचारलं तुझ वय काय ?मी काहीच बोलले नाही. मग तोच अंदाजाने म्हणाला १८ असेल नक्कीच मी फक्त मान हलवली .मग त्याने एक वेगळीच इच्छा प्रकट केली मला म्हणाला ,मला तुला १८ वेळा किस करायचं आहे as ur bday gift म्हणून .पहिले मी शॉक झाले पण मग त्याच हसन पाहून वाटल मजाक करत असेल .मी नाही म्हटलं .त्याने माझा हात हातात घेतला एक छानस छोटस बाहूल माझ्या हातात ठेवत म्हणाला हे तुझ गिफ्ट माझ्या प्रेमाची आठवण ,कधी माझी आठवण आली कि याच्याकडे बघत जा .मला ते गिफ्ट खूप आवडल नेमक त्याच दिवशी पपाना प्रमोशन मिळाली त्यामुळे तेही मंदिरात जाऊन येत होते संध्याकाळची वेळ होती अचानक पपांची बाइक समोर येऊन थांबली आईशपथ ...!!! एवढेच उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले पपांनी नजरेनेच मला मागे बसण्याची खून केली त्याचा चेहरा तर पांढराफटक पडला होता .मी गुपचूप जाऊन पपांच्या मागे बसली .त्या दिवशी पपांनी एवढ मारलं कि मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही माझ्या बर्थडे च सर्वात मोठ गिफ्ट मला मिळाल होत......................................


रात्री रडत असताना पप्पा बेडरूममध्ये आले सोबत मम्मी पण होती.
डोक्यावरून हात फिरवत म्हणाले सोनू मला माफ कर पण मी जे काही केल तुझ्या भल्यासाठी केल बाळा . आजकाल प्रेम म्हणजे बाजार होऊन बसलाय कोणीही उठल सुटल म्हणत माझ हिच्यावर किंवा याच्यावर प्रेम आहे पण ते प्रेम नसत असत तर फक्त आकर्षण तुम्ही मुल लहान आहात त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही पण आम्ही यातून गेलो आहोत त्यामुळेच आम्हाला तुमची काळजी वाटते . मी नुसतीच हुंदके देत उशीत तोंड खुपसून ऐकत होते अचानक पप्पा रडायला लागले म्हणाले सोनू आमच दोघांचही खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि म्हणून आम्हाला वाटत कि तू काही वेड वाकड पाउल टाकू नये आजपर्यंत आम्ही तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली ती तुझ्यावरच्या प्रेमाखातरच पप्पांना पहिल्यन्दा रडताना बघून मी उठले आणि सरळ पपांच्या कुशीत गेले आम्ही तिघेही खूप रडलो .
पप्पानी डोक्यावर ओठ ठेवले आणि म्हणाले चल फ्रेश हो केक कापायचा ना ..?
त्या दिवशी कळल आईवडिलांच्या रागातही प्रेमच असत .
पप्पानी ड्रेस पीस आणल होत मग रात्री केक कापला आणि झोपायला गेले .
बाहेर गार वारा सुटला होता चंद्राचा प्रकाश खोलीभर विखुरला होता .
एका बाजूला तो होता आणि एका बाजूला आईवडील काही सुचत नव्हत काय कराव
ते.मग ठरवलं त्याला भेटायचं नाही ते पण २ दिवसातच त्याची खूप आठवण यायला लागली इतकी कि.. मी वेडी होऊन जाईल अस वाटायचं .






घरात कोणी नसताना त्याला कॉल केला .त्याला त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हटलं कि मला विसरून जा मी माझ्या बंधनातून तुला मुक्त करते.आणि त्याच काहीही ऐकून न घेता मी फोन ठेवला .

त्यानंतर त्याने माझ्या मैत्रिणी कडून माझ्याशी कॉंटॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला एकदा लिफ्ट मध्ये लेटर देण्याचा प्रयत्न केला पण मी नाही घेतलं.एक दिवस अचानक कळलं कि तो कोलकाताला गेला मला खूप वाईट वाटल आपल माणूस खूप दूर गेल्यासारखं वाटू लागल.मी त्याला जितक दूर सारण्याचा प्रयत्न करत होते तितकाच तो माझ्या जवळ येत होता.एक वर्ष पूर्ण मी त्याने दिलेल्या बाहुल्याकडे बघून काढलं .



नुकतीच बारावीची एक्साम झाली होती
मी टेलिमार्केटिंग मध्ये जोब धरला
काही दिवसांनी त्याला कॉल केला
तब्बल एक वर्षाने मी त्याच्याशी बोलत होते
खूप वेळ बोलले त्याच्याशी त्याला खूप विनवण्या केल्या कि तू परत ये.
त्याला सॉरी वगेरे म्हणाले खूप रडले
त्याच्यासाठी कारण अजून मी त्याला एक क्षणही विसरले नव्हते .
तो कुठल्यातरी कोर्स साठी गेला होता कोर्स संपताच परत आला .
अचानक येऊन त्याने मला सर्प्राइज़ दिल.
त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी जीव आसुसला होता .
काही माणसांची किंमत ते जवळ असताना कधीच काळात नाही
पण दूर गेल्यानंतर कळत कि ते आपल्यासाठी काय आहेत ते.
किती महत्व आहे आपल्या आयुष्यात त्याचं ते तेव्हाच कळत .
त्याला भेटायला त्याच्या एका मित्राच्या रूमवर गेले .रड रड रडले ...........






त्याची माफी मागितली आणि नकळत त्याच्या कुशीत विसावले .
त्याने खूप समजावले तेव्हा कुठे मी शांत झाले .
माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसत त्याने माझा चेहरा ओंजळीत धरला
आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले.
माझी प्रतिकार करण्याची हिम्मतच झाली नाही.
वाटत होत हि मिठी कधी सुटूच नये.
घरी आले आरश्यात स्वताला न्याहाळल.
मला माझ्या नजरेला नजर भिडवण्याची लाज वाटत होती.
माझी मूल्य तत्व मीच संपवली होती,










त्यानंतर फोन वर बर्याचदा बोलायचो
भेटताना खूप सावधता बाळगायचो .
पण आता प्रणय खूप बदलला होता
त्याच्या बोलण्यात अश्लीलता खूप होती.
पण मी काही बोलायचे नाही काय करणार प्रेमात वेडी झाले होते ना त्याच्या .
नेहमी भेटल्यावर हातात हात घेण,
चालताना बोटांची गुंफण करण ,
ऑटोमध्ये बसल्यावर माझ्याकडे एकटक बघन हे चालू असायचं .या गोष्टीना मी कांतले होते मला ते पटायचं नाही एकदा मी त्याला स्पष्ट बोलले ; "किस करणे , स्पर्श करणे हेच प्रेम असत का? तस असेल तर मला नाही जमणार !!!." त्यालाही राग आला तोही निघून गेला



त्याच्या बर्थडे ला मी त्याला कॉल लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने रिसीव नाही केला सहा तास सतत मी कॉल करत होते शेवटी त्याने उचलला मी त्याला विश केल आणि म्हटलं 'ट्विन्स' मध्ये भेटूया तो नाही म्हणाला ,मी खूप विनवण्या केल्या आणि शेवटी म्हटलं कि मी तुझी तिथे वाट बघते जरूर ये .मी त्याची तब्बल दीड तास वाट बघितली पण तो नाही आला .तो विसरला होता मला....कायमचा .त्या नंतर त्याला एक दोनदा कॉल केला होता त्याने माझ्याकडे सरळ सरळ शरीरसुखाची मागणी केली होती हे ऐकून तर मी अवाकच झाले .त्याची माझ्या मनात असलेली प्रतिमा एका क्षणात ढासळली .तोही नावाप्रमाणेच निघाला .त्यानंतर मी त्याला परत कधीच कॉल केला नाही.सोसायटीत दिसला तरी मान खाली घालून निघून जायचे .काही दिवसांनी मला एक वेगळीच बातमी कळली त्याच्याविषयी तो ज्या ठिकाणी वाशीला राहायचा तिथे माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक राहायचे तिच्याकडून जी काही बातमी कळली तिने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली


तिथल्या एका मुलीवर त्याचे प्रेम होते २२ वर्षाची होती ती तिला याच्याकडून गर्भधारणा झाली होती.प्रकरण घर्त्ल्याना कळलं पण याच्या वडिलांचे आणि त्यंचे चांगले संबंध होते आणि समोरची मानस चांगली होती.याच्या वडिलांचा विचार करून त्यांनी ते प्रकरण संपवलं .याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख होती.एकदम सज्जन गृहस्थ होते . म्हणून प्रकरण निपटल .त्यामुळे त्यांनी ती जागा सोडून इकडे शिफ्ट झाले होते .......
.......म्हणजे याने जे सांगितलं ते सर्व खोट होत.गरब्याच्या खेळाप्रमाणे माझ्या मनाशीही खेळला होता . बरोबर म्हटलं होत मी..... खूप छान खेळतोस गरबा तू...खरच...... खूप छान खेळतोस .त्या दिवशी अजिबात रडले नाही कारण खूप मोठ्या संकटातून वाचले होते याचा आनंद वाटत होता त्याच्यासोबत घालवलेल्या "त्या " क्षणांची किळस वाटू लागली होती.त्याच्याकडे तर आता बघायची पण इच्छा नव्हती . आता मी गरबा खेळण बंद केल आहे पण एक दिवस देवीला पाया पडायला गेले त्या दिवशी तो दिसला एका दुसर्या मुलीसोबत खेळताना ...काळजी वाटली मला ...त्याची नाही... तर त्या मुलीची .
मध्ये खूप आजारी पडले होते सतत ताप यायचा ....काविळच निदान झाल .खूप काही करून बघितलं पण फरक पडत नव्हता औषध ,गोळ्या, मांत्रिक, तांत्रीक काही फायदा नाही झाला . कारण मी आतून पोखरले होते औषधांना माझ शरीरच रेस्पॉन्स देत नव्हत .कावीळ पोटात झाली होती .दिवसेंदिवस प्रकृती खंगत चालली होती मम्मी -पापा खूप काळजी घ्यायचे .पण माझ मन अजूनही त्याच्या आठवणीत हुंदळत होत.....का अस केलस रे तू? का अस फसवलस ? किती मनापासून प्रेम केल मी तुझ्यावर आणि तू ......
एकाच इच्छा आहे शेवटची कि परत अस कुणाला फसूवू नकोस ..बस !!!!
खूप प्रेम केल रे तुझ्यावर आणि करत राहीन मरेपर्यंत ...


तो तिच्या शेजारी उभा होता .त्याला वेड्याला माहीतच नव्हत कि त्याच्याच आठवणीत ती गेली .
तिची आई गप्प झाली होती पप्पांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते .
प्रणयच्या वडिलांनी अम्बुलेंस मागवली होती तिच्यासाठी नव्हे ..!
तिच्या आईसाठी कारण सोनू गेली होती खूप दूर गेली होती
कायमची जिथून ती कधीच परत येणार नव्हती .
आणि त्याच शॉक ने तिची आई गप्प झाली होती.
तिच्या डाव्या हात प्रणयने दिलेला बाहुला होता तो त्याच्या नजरेतून सुटला नाही त्याला पाहताच तो ढासळला.

वेदना हि फुलांच्या काट्यानसारखी असते
एक नाजुकशी कळ मनात उमटते
प्रणयाच्या वेळी जशी प्रेयसी
हात सोडून निसटते.......





रविवार, २५ सप्टेंबर, २०११

होती एक तिच्यावर खुप मी प्रेम करायचो.

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
स्वप्न परीचे पाहिले की तिला सांगायचो,
परीचा राजकुमार मीच अशा काही कल्पना करायचो,
स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच काही वागायाचो,



ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
मनातल्या भावना तिच्या कडे व्यक्त करायचो,
उगवत्या सूर्या पासून ते मावलत्या सूर्या पर्यंत
फक्त तिच्या गोष्टी करायचो,
रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन तिच्याच स्वप्नात डुबायचो,





ती नेहमी म्हणायची पण ऐक्नार्यातला मी कोण...?
स्वप्ने पहाता-पहाता इतका काही गुंतलो,
की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न होउन राहिले,........



मैत्री हि हरवली,
परी हि हरवली,
राहिला तर फक्त पचतावा....!
अस तुमच्या सोबत होउन देऊ नका



"होती एक
तिच्यावर खुप मी प्रेम करायचो
तिची आठवण आल्यावर कविता करत बसायचो...
" वेडा होतो अगदी वेडा"...........

प्रेम कथा..

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....




थडग्यावरचे नाव वाचले...' कविता पाटील' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे......