Breking News

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त....,
🙏🚩विनम्र अभिवादन 🚩🙏

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

आठ वर्षाचा उदय पवार वयाच्या चार वर्षापासुन चढतोय अश्वस्थामाचा खडतर शिखर..

आठ वर्षाचा उदय पवार वयाच्या चार वर्षापासुन चढतोय अश्वस्थामाचा खडतर शिखर... जिल्ह्यातील नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील सातपुडा पर्वत रांगेतील तरुणांना आवाहनात्मक असणारी अश्वस्थामा यात्रा अनेकांची दमछाक करते. मात्र तलोद्यातील एका ८ वर्षीय बालकाने आपली चौथी यात्रा पूर्ण केली आहे. उदय पवार हा वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून यात्रा करीत असून त्याचे वडील अजित पवार यांच प्रोत्साहन मिळत आहे. अजित पवार हे येथील खरेदी विक्री संघात शिपाई म्हणून कार्यरत असुन ते स्वतः मागील २५ वर्षापासून यात्रा करीत आहेत. अश्वस्थामा यात्रा म्हणजे परिसरातील तरुणांना आव्हान असते. सातपुड्याच्या पर्वत रांगेतील देरानी- जेठानी, गोऱ्यामाळ, नकटयादेव, भीमकुंड, अश्वस्थामा टेकड़ी, मामा भाँचे, माकड़ टेकड़ी, कोठार असा खडतर प्रवास पायी करावा लागतो. यात धष्ठ पुष्ट तरुणांचा कस लागतो . मात्र वर्षातून एकदा येणारी ही यात्रा सर्वासाठी मौज मस्ती, शौर्य, साहस व शारीरिक क्षमता ची कसोटी असते. आपल्या गावातील व् सातपुड्यातील संस्कृतीची जोपासना करने या मागील उद्देश् असल्याच पवार सांगतात . आता सर्वत्र रस्ते झाले असून जूना अस्तंबा पावेतो प्रमुख टेकड़ीचा पायथ्याशी गाडी जाते. त्यामुळे आता काही तरुण दुचाकी व् चार चाकी वाहने घेवून फक्त प्रमुख शिखर चढ़तात. मात्र हि यात्रा पायी करण्याची खरी जी मजा आहे. ती वाहनातून नाही. असे पायी यात्रा करणारे म्हणतात यंदा देखील हजारो भाविक तळ ठोकुन आहेत उद्या येथील मारुती मंदिराचे दर्शन घेवून भाविक घरी जातील...


पाववडा विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह

 तलोदा येथील राजकोरबाई वानखेडे हे पाववडा विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
 वानखेडे ह्यांच्या पाव वडा खाण्याकरीता लांब लांबून खव्य्ये येत असुन पाववडा खरेदीकरीता तासंतास रांगा लावून उभे राहावे लागत आहे.. पाववडा खाण्याकरीता येत आहेत. सिंधखेड़ा तालुक्यातील बेटावद मूळ गाव असलेली राजकोरबाई वानखेड़े यांच्या तलोदा येथील वानखेडे परिवारात विवाह झाला, एक मुलगा व एक मुलगी गुना गोविंदाने संसाराचे गाडे हाकत होते. मुलीच्या लग्नानंतर पाच महिन्यात सन 2001 साली पतीचे अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या एकुलता एक मुलाच्या सांभाळ कसा करायचा याची काळजी उरासी बाळगत स्वतःच उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. तलोदा शहरात मुख्य चौकात हातगाडीवर पाववडे विक्रीचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायावर जीवनाचा चरितार्थ चालेल की नाही अशी भीती असताना कठीण परिस्थितीतूनही मार्ग निघतोच ह्या विचाराने हातगाडीवर पाववडा विकन्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक समस्याचा सामना करत पहाटे लवकर उठून घरची कामे आवरून दुपारी 3 वाजता वडापावची गाडी लावत आहे. ह्या कामात त्यांचा मुलगा ललित वानखेड़ा मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. गावात आलेला पाहुना असो अथवा नौकरी वर्ग दररोज सायंकाळी ह्या पाववड्याच्या गाडीवर रांगा लावतात, वानखेडे ताईच्या पाववडा हे तलोद्यातील ओळख झाली आहे. सुरुवातीला 2 रु किमतीच्या पाववडा वाढत्या माहागाईमुळे जरी 7 रु येवून ठेपला असला तरी ग्राहकांची व खवैयाची संखेत कमी झाली नाही. गरम गरम पाववडा खाण्याकरीता लांब लांबुन खव्य्ये येत आहेत. दिवसभरातुन साधारणत 700 पेक्षा अधिक वड़े विकले जात असुन 200 पेक्षा अधिक पाववडे पार्सल जात आहेत. ह्यातून चांगला रोजगार प्राप्त होत असल्याचे राजकोर वानखेडे सांगतात. पाववडा विकुन मुलाचे लग्न केले. स्वतः काभाळ कष्ट करुण समाजात एक आगळी वेगळी ओळख निर्माण झांली आहे. पाववड्याला ठीक ठिकानाहुन मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी गरीब पासुन ते श्रीमंत नागरीक पाववडाची चव चाखल्या शिवाय राहत नाही...
बाहेर गावाहुन आलेला पाहुना असो अथवा माहेरी आलेली लेख वानखेडे ताईचा पाववडा खाल्याशिवाय राहत नाहीं, गरम गरम पाववडा मिळावा ह्याकरीता रांगा लावाव्या लागतात.
वडापावच्या गाडीमुळे समाजात मान उंचावली आहे. मनावर धरले की स्त्री शक्ती काहीही करू शकते याचे एक उदाहरण कष्टातूनही आनंद मिळतो.काभाळ कष्ट स्वत:सह कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहे. हयात माझा मुलगा ललित ह्याचे मोठे सहकार्य लाभत आहे... राजकोर वानखेडे..


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

अरविंद आप्पा मगरे एक दिलखुलास व्यक्तीमत्व

आपल्या दिलखुलास व्यक्तीमत्व आनंदी चेहरा, गोर गरीब जनतेला मदत करण्याची प्रवृत्ती आदिं गोष्टींमुळे अरविंद (आप्पा) मगरे ह्यांनी समाजात व आपल्या मित्र परिवारात एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आप्पाच्या वाढदिवस आप्पाना वाढदिवसा निमित्त ढेर साऱ्या शुभकामना... 
अरविंद रामदास मगरे हे भरतभाई माळी यांचे एकनिष्ठ म्हणुन ओळखले जातात. गरीब कुटुंबात जन्मलेले अरविंद मगरे आपल्या स्वभावातील महत्वाचे गुणवैशिष्टयामुळे त्यांच्यावर प्रेम व आस्था राखणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पक्षाबरोबरच राजकारणातील विरोधकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. घ्यासंबंधांच्या जोरावर अरविंद मगरे आप्पा यांनी तलोदा तालुक्यात विविध पदे भुषवले आहेत. सध्याही ते  संचालक  पीपल्स एज्यूकेशन सोसायटी  तलोदा संचालक  खरेदी  विक्री  संघ ता तलोदा, संचालक  तलोदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, संचालक माळी समाज पंच तलोदा आदि पदांवर आहेत. आप्पा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी असुन आपल्या
 सुसंवाद साधन्याच्या कलेमुळे आप्पानी  तालुक्यातील शेतकऱ्या सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंधाच्या जोरावर भा.ज.पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत वाणी यांना वि.वि.का.सो धुर चारली.. तसेच 192-1993 ह्याकाळी तलोदा नगरपालिकेच्या....  नगरसेवक म्हणुन बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला. त्यांच्या काळात त्याच्या वार्डतील खान्देशी गल्लीतील समस्या सोडवल्या त्यात रस्ते काम, गटारी बांधकाम, महिलांकरिता शौचालय बांधणे आदिनसह विविध कामे केलेत.  खान्देशात माळी समाज हां तलोद्यात मोठ्या प्रमाणात आहे. आप्पाच्या मनमिळावु स्वभाव समाजातील भांडण  तंटा मिटवने, गोर गरीबाना मदत करणे, आदींच्या जोरावर आप्पानी 2006 काळी समाज उपाध्यक्षांचे पद सांभाळले. ह्यावेळी ज्या ज्या ठिकाणी माळी समाज राहतो. त्या त्या गावी जावुन समाजात बैठक घेणे व चालिरिती, परंपरा यांची चर्चा करणे, त्यात सुधारणा घडवुन आणले.. सतत नवनवीन प्रयोग करीत राहणे, आपल्या सहकार्यांना, प्रोत्साहन देत राहणे, यावर आप्पाचा भर असतो. प्रचंड जनसंपर्क, अतिशय समजूतदारपणा, कनवाळू मन, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेणे, अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग शोधणे आणि तेवढीच कडक शिस्त राबविणे हा अप्पाचा स्वभाव आहे.... आप्पाआज 61 व्या वर्षात पदार्पण करीत असुन आप्पाना वाढदिवसा निमित्त ढेर साऱ्या  शुभेच्छा..
चि.सुधाकर मराठे

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

सिद्धेश्वर महादेव मंदीर

तलोदा शहरातील वांणी गल्ली परिसरातील वृंदावन वाडी शेजारी असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर हे 300 वर्षापूर्वीचे अहिल्याबाईच्या काळातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे.. सिध्देश्वर महादेव मंदिरातील महादेवतेच्या दर्शनाला आलेल्या भविकांच्या मनोकामना पूर्ण होवून कार्यसिद्धि पाप्त होते. म्हणून या मंदिराला सिध्देश्वर महादेव मंदिर असे नावलोकीक झाल्याचे जानकार सांगतात. महादेवाच्या दर्शनाने लोकांची संकट दूर होवून मनोकामना पूर्ण होत असल्याने  बाराही महीने सिध्देश्वर महादेव मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. श्रावण महिन्यात भक्तगणांचा रांगा लागत असुन परिसरातील नागरिक भंडारा सह भजन किर्तन आदि कार्यक्रमाचे आयोजन करतात. ह्याकाळात मंदिर परिसर भाविकानी फुलुन निघतो. सिध्देश्वर महादेव मंदिर हे तळोदे शहरात व आसपासच्या परिसरात  खोल (ऊँडा)महादेव म्हणून प्रसिध्द आहे.  मंदिर हे जमीन लेवल पासुन 5 फुट खाली आहे, त्यामुळे मंदिरातील सर्व मुर्त्या ही जमीनी पासुन 5 फुट खाली आहेत आणि स्थानिक भाषेत त्याला उंड म्हणतात. म्हणून शहरात व परिसरात या मंदिराचे प्रचलीत नाव उंडा किंवा खोल महादेव झाले आहे. मंदिरात पूर्वी दगडी मुर्त्या कोरलेल्या होत्या परंतु त्यांची झिज झाल्याने त्यांना तापी नदीत विसर्जित करण्यात आल्यात. सन 1999 मधे बासवाड़ा येथून गणपती, दत्त व लक्ष्मीच्या मुर्त्या आणून त्यांची प्राणप्रतीस्थापना करण्यात आली.
{ सिध्देश्वर महादेव मंदिरात दत्तमुर्ती, गणपती मुर्ती, लक्ष्मी मातेची मुर्ती व नंदीची मुर्ती आहे. मंदिरातील मुर्त्या संगमेंश्वर  पाषणात कोरलेल्या आहेत.  मंदिरात नंदी  पच्छिमेस तोड़ करुण एका चौरसावर वसलेला आहे. नंदी हा दगडयात कोरलेला आहे. मुख्य मंदिराच्या गाभार्यात मध्यभागी शिवलिंग आहे व शिवलिंगचा प्रवाह हा उत्तरेस आहे.}