Breking News

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

सातपुड्याच्या आवाज गुजतोय सातासमुद्रापार

सातपुड्याच्या आवाज गुजतोय सातासमुद्रापार जीवनात सर्वकाही करीत असताना एक छंद जरूर जोपासवा, या पु.ल. देशपांडे यांचे आवाहन उराशी बाळगुन तबलावादनाचा छंद जोपासणार्‍या तळोदा येथील समीर सूर्यवंशी याने सातासमुद्रापार आपल्या तबल्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अमेरिकेतील लॉस एंजिल्ससह विविध शहरांमध्ये पुणे येथील संतुरवादक डॉ.धनंजय वेठनकर यांच्यासोबत त्याची जुगलबंदी चांगलीच रंगली. आपल्यात असलेली कला ओळखून त्याचा छंद जोपासल्यास डोळे दीपवणारे यश प्राप्त होते हे सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्‍या तळोदा गावातील समीर सूर्यवंशी याने सिद्ध करुन दाखवले. मुळचा तळोद्यातील समीर सूर्यवंशी याने नुकतेच अमिरिकेतील लॉस एंजिलिस, सॅनफ्रांसिस्को, सनदियोगो सारख्या विविध शहरात कार्यक्रम सादर करुन रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळविली. समीर सूर्यवंशी यांना इंडियन क्लासिकल आर्ट फाऊंन्डेशन (आय.सी.एम.ए) यांच्याकडून आमंत्रित करण्यात आले होते. ही संघटना दरवर्षी अमेरिकेत भारतातील संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांना
आमंत्रण देत असते. यंदा पुणे येथून तबलावादक समीर सूर्यवंशी व संतूरवादक डॉ.धनंजय वेठनकर यांच्या जुगलबंदीचे कार्यक्रम दि.२८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत अमेरिकेतील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात सूर्यवंशी यांनी आपल्या कलेचे सादरीकरण करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. याबाबत समीर सूर्यवंशी यांची भेट घेतली असता ते म्हणाले, अमेरीकेत भारतीय संगीतबद्दल कमालीची आवड व आदर दिसून येतो. यावेळी काही स्थानिक कलाकार लोकांशी परिचय झाला. ही अमेरिका वारी माझे संगीत व तबला वादकास निश्‍चित समृद्ध करणारा ठरणार असल्याचे त्याने सांगितले. असा घडला समीर तळोदा येथील गो.हू.महाजन शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेणारा समीर हा शाळेत फावल्या वेळेत लाकडी बाक वाजवत असे. अगदी लहानपणापासून ज्या वस्तुमधून आवाज बाहेर निघेल अश्या ठिकाणी नेहमी त्याची बोट थिरकत असत. त्याचे आजोबा रणछोड गुरूजी यांच्या ते लक्षात आले व त्यास स्थानिक तबला वादक गुरु गुरव गुरूजींकडे तालीम सुरु केली.वयाच्या ८ व्या वर्षी गावात पहिला कायर्क्रम सादर केला. नंतर विविध छोट्या-मोठ्या
कार्यक्रमात तबला गुंजु लागला. येथील कनिष्ठ महविद्यालयात १२ वी शिक्षण झाल्यानंतर समीरने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र तबला विषयात १९९२ साली बी.ए.(विशारद) करुन तबला विषयात पदवी घेतली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची तबला अलंकार म्हणजेच एम.ए. ही पदवी त्यांनी संपादित केली. सध्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या संगीत ऍकॅडमीत संगीत विभागप्रमुख म्हणून तो कार्यरत आहे.उल्लेखनिय म्हणजे खान्देशात पहिला संगीत क्षेत्रातील कलाकार म्हणून त्यांची ओळख असून याअगोदर त्यांनी आपल्या तबल्याची साथ भजन सम्राट अनूप जलोटा, उस्ताद दिलशाब खान, पंडित आंतरराष्ट्रीय किर्तीचे मिलेसुर मेरा तुम्हारा फेम लुइस बैंक अश्या दिग्गज
कलाकारांसोबत तबलाची साथ दिली आहे.समीर सूर्यवंशी यांना अखिल भारतीय नाट्य परिषद, कला गौरव पुस्कार, स्वर सागर पुरस्कार, जानता राजा प्रतिष्ठान पुरस्कार, प्रभात फाऊंडेशन पुरस्कार, वसंतराव देशपांडे फाऊंडेशन पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. समीरपूणे तळोद्याचे नावही सातासमुद्रापार गेले आहे.......
















बुधवार, २ डिसेंबर, २०१५

एक आठवण बंडू ची !

एक आठवण बंडू ची !
 तळोदे शहरातील मुख्य बाजारपेठे तील स्मारक चौकात असणारी पानदुकान, " राजेश पान सेंटर " आजही , अनेक तळोदेकरांचा मनात घर करून आहे...ते फक्त बंडूमुळेच.. शाळकरी वयातच बंडू ने पानटपरी चालवणे सुरू केले .आणि थोड्या च कालावधीत , आपली मेहनत, जिद्द, चिकाटीने टपरी चा विस्तार केला..... हातमजूर ते ठेकेदार, काँट्रॅक्टर, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांची ती एक हक्काची पान टपरी होती . अनेकांना रात्री बंडूच्या हातून पान, घुटका खाल्ल्या शिवाय झोप लागत नसे. बंडू च्या टपरी वरील कलकत्ता मिठा पान खाने म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होत... बंडू ची स्मरणशक्ती जबर होती ..गिर्हाइकाची पंसद माहित असे, नुसती सावली बघून मनासारखे पान, घुटका समोर मांडत असे . नंदुरबार ते सुरत पट्ट्यातील अनेक पान गादी वाले बंडू चे मित्र होते त्यांच्या कडून टपरीवर लागणाररी उच्च दर्जाची पाने मागवित असत. मधल्या काळात . बंडूने पान टपरी सांभाळतच आँडीयो कँसेट, अगरबत्ती विक्री चा जोडधंदा सुरू केला .सकाळी व सायंकाळी 7 च्या सुमारास सुगंधित अगरबत्ती लावून दुकाना चा परिसर पवित्र करुन मंद सुरात भक्तीगीते, भावगीते लावण्या चा बंडूस छंद होता... सिनेमा गीत, सुफी संताची कव्वाली, येणारे सण- उत्सव, ..होळी , नवरात्र, गणेशोत्सव यांची गीते आधी वाजवून वातावरण निर्माण करी. लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची ... ..".या रावजी बसा भावजी ..." ही लावणी ऐकावी तर बंडूकडेच ! रात्री आपल्या अनेक प्रेमात पडलेल्या मित्रांना' ' मुकेश के दर्द भरे गीत ' ऐकवीत असे. बंडू ला व्यायामाची आवड होती.. कसदार शरीर लाभलेला बंडू इतरांना व्यायामाचे महत्व पटवून देत असे..तसेच.शहरातील अनेक क्रिडा स्पर्धां ना बक्षिसे देत असे... अनेक लोकांना ,रस्त्यावर पायी चालत येणारा बंडू ओळखला जात नसे ; इतकी सवय लाकडाच्या कोनाड्यात पाय टाकून बसलेला बंडू पाहण्याची झाली होती ... आपल्या पाना ने लोकांची तोंडे लाल करणारा बंडू प्रत्यक्षात हळव्या मना चा होता , कधी ही कोणाला वाइट उद्देशून बोलत नसे..दोन दोन वर्षे उधारी थकवणारे, बुडवणारे किंवा पान खाऊन पहिली पिचकारी त्याचाच दुकाना समोर मारणारे याचांशी साधी हुज्जत ही घालत नसे....
तळोदेकरांचा बंडू ला अखेरचा प्रणाम.....
साभार- मूळ लेखक श्री.पदमेश माळी  

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त....,
🙏🚩विनम्र अभिवादन 🚩🙏

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

आठ वर्षाचा उदय पवार वयाच्या चार वर्षापासुन चढतोय अश्वस्थामाचा खडतर शिखर..

आठ वर्षाचा उदय पवार वयाच्या चार वर्षापासुन चढतोय अश्वस्थामाचा खडतर शिखर... जिल्ह्यातील नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील सातपुडा पर्वत रांगेतील तरुणांना आवाहनात्मक असणारी अश्वस्थामा यात्रा अनेकांची दमछाक करते. मात्र तलोद्यातील एका ८ वर्षीय बालकाने आपली चौथी यात्रा पूर्ण केली आहे. उदय पवार हा वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून यात्रा करीत असून त्याचे वडील अजित पवार यांच प्रोत्साहन मिळत आहे. अजित पवार हे येथील खरेदी विक्री संघात शिपाई म्हणून कार्यरत असुन ते स्वतः मागील २५ वर्षापासून यात्रा करीत आहेत. अश्वस्थामा यात्रा म्हणजे परिसरातील तरुणांना आव्हान असते. सातपुड्याच्या पर्वत रांगेतील देरानी- जेठानी, गोऱ्यामाळ, नकटयादेव, भीमकुंड, अश्वस्थामा टेकड़ी, मामा भाँचे, माकड़ टेकड़ी, कोठार असा खडतर प्रवास पायी करावा लागतो. यात धष्ठ पुष्ट तरुणांचा कस लागतो . मात्र वर्षातून एकदा येणारी ही यात्रा सर्वासाठी मौज मस्ती, शौर्य, साहस व शारीरिक क्षमता ची कसोटी असते. आपल्या गावातील व् सातपुड्यातील संस्कृतीची जोपासना करने या मागील उद्देश् असल्याच पवार सांगतात . आता सर्वत्र रस्ते झाले असून जूना अस्तंबा पावेतो प्रमुख टेकड़ीचा पायथ्याशी गाडी जाते. त्यामुळे आता काही तरुण दुचाकी व् चार चाकी वाहने घेवून फक्त प्रमुख शिखर चढ़तात. मात्र हि यात्रा पायी करण्याची खरी जी मजा आहे. ती वाहनातून नाही. असे पायी यात्रा करणारे म्हणतात यंदा देखील हजारो भाविक तळ ठोकुन आहेत उद्या येथील मारुती मंदिराचे दर्शन घेवून भाविक घरी जातील...


पाववडा विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह

 तलोदा येथील राजकोरबाई वानखेडे हे पाववडा विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
 वानखेडे ह्यांच्या पाव वडा खाण्याकरीता लांब लांबून खव्य्ये येत असुन पाववडा खरेदीकरीता तासंतास रांगा लावून उभे राहावे लागत आहे.. पाववडा खाण्याकरीता येत आहेत. सिंधखेड़ा तालुक्यातील बेटावद मूळ गाव असलेली राजकोरबाई वानखेड़े यांच्या तलोदा येथील वानखेडे परिवारात विवाह झाला, एक मुलगा व एक मुलगी गुना गोविंदाने संसाराचे गाडे हाकत होते. मुलीच्या लग्नानंतर पाच महिन्यात सन 2001 साली पतीचे अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या एकुलता एक मुलाच्या सांभाळ कसा करायचा याची काळजी उरासी बाळगत स्वतःच उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. तलोदा शहरात मुख्य चौकात हातगाडीवर पाववडे विक्रीचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायावर जीवनाचा चरितार्थ चालेल की नाही अशी भीती असताना कठीण परिस्थितीतूनही मार्ग निघतोच ह्या विचाराने हातगाडीवर पाववडा विकन्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक समस्याचा सामना करत पहाटे लवकर उठून घरची कामे आवरून दुपारी 3 वाजता वडापावची गाडी लावत आहे. ह्या कामात त्यांचा मुलगा ललित वानखेड़ा मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. गावात आलेला पाहुना असो अथवा नौकरी वर्ग दररोज सायंकाळी ह्या पाववड्याच्या गाडीवर रांगा लावतात, वानखेडे ताईच्या पाववडा हे तलोद्यातील ओळख झाली आहे. सुरुवातीला 2 रु किमतीच्या पाववडा वाढत्या माहागाईमुळे जरी 7 रु येवून ठेपला असला तरी ग्राहकांची व खवैयाची संखेत कमी झाली नाही. गरम गरम पाववडा खाण्याकरीता लांब लांबुन खव्य्ये येत आहेत. दिवसभरातुन साधारणत 700 पेक्षा अधिक वड़े विकले जात असुन 200 पेक्षा अधिक पाववडे पार्सल जात आहेत. ह्यातून चांगला रोजगार प्राप्त होत असल्याचे राजकोर वानखेडे सांगतात. पाववडा विकुन मुलाचे लग्न केले. स्वतः काभाळ कष्ट करुण समाजात एक आगळी वेगळी ओळख निर्माण झांली आहे. पाववड्याला ठीक ठिकानाहुन मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी गरीब पासुन ते श्रीमंत नागरीक पाववडाची चव चाखल्या शिवाय राहत नाही...
बाहेर गावाहुन आलेला पाहुना असो अथवा माहेरी आलेली लेख वानखेडे ताईचा पाववडा खाल्याशिवाय राहत नाहीं, गरम गरम पाववडा मिळावा ह्याकरीता रांगा लावाव्या लागतात.
वडापावच्या गाडीमुळे समाजात मान उंचावली आहे. मनावर धरले की स्त्री शक्ती काहीही करू शकते याचे एक उदाहरण कष्टातूनही आनंद मिळतो.काभाळ कष्ट स्वत:सह कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहे. हयात माझा मुलगा ललित ह्याचे मोठे सहकार्य लाभत आहे... राजकोर वानखेडे..


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

अरविंद आप्पा मगरे एक दिलखुलास व्यक्तीमत्व

आपल्या दिलखुलास व्यक्तीमत्व आनंदी चेहरा, गोर गरीब जनतेला मदत करण्याची प्रवृत्ती आदिं गोष्टींमुळे अरविंद (आप्पा) मगरे ह्यांनी समाजात व आपल्या मित्र परिवारात एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आप्पाच्या वाढदिवस आप्पाना वाढदिवसा निमित्त ढेर साऱ्या शुभकामना... 
अरविंद रामदास मगरे हे भरतभाई माळी यांचे एकनिष्ठ म्हणुन ओळखले जातात. गरीब कुटुंबात जन्मलेले अरविंद मगरे आपल्या स्वभावातील महत्वाचे गुणवैशिष्टयामुळे त्यांच्यावर प्रेम व आस्था राखणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पक्षाबरोबरच राजकारणातील विरोधकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. घ्यासंबंधांच्या जोरावर अरविंद मगरे आप्पा यांनी तलोदा तालुक्यात विविध पदे भुषवले आहेत. सध्याही ते  संचालक  पीपल्स एज्यूकेशन सोसायटी  तलोदा संचालक  खरेदी  विक्री  संघ ता तलोदा, संचालक  तलोदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, संचालक माळी समाज पंच तलोदा आदि पदांवर आहेत. आप्पा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी असुन आपल्या
 सुसंवाद साधन्याच्या कलेमुळे आप्पानी  तालुक्यातील शेतकऱ्या सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंधाच्या जोरावर भा.ज.पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत वाणी यांना वि.वि.का.सो धुर चारली.. तसेच 192-1993 ह्याकाळी तलोदा नगरपालिकेच्या....  नगरसेवक म्हणुन बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला. त्यांच्या काळात त्याच्या वार्डतील खान्देशी गल्लीतील समस्या सोडवल्या त्यात रस्ते काम, गटारी बांधकाम, महिलांकरिता शौचालय बांधणे आदिनसह विविध कामे केलेत.  खान्देशात माळी समाज हां तलोद्यात मोठ्या प्रमाणात आहे. आप्पाच्या मनमिळावु स्वभाव समाजातील भांडण  तंटा मिटवने, गोर गरीबाना मदत करणे, आदींच्या जोरावर आप्पानी 2006 काळी समाज उपाध्यक्षांचे पद सांभाळले. ह्यावेळी ज्या ज्या ठिकाणी माळी समाज राहतो. त्या त्या गावी जावुन समाजात बैठक घेणे व चालिरिती, परंपरा यांची चर्चा करणे, त्यात सुधारणा घडवुन आणले.. सतत नवनवीन प्रयोग करीत राहणे, आपल्या सहकार्यांना, प्रोत्साहन देत राहणे, यावर आप्पाचा भर असतो. प्रचंड जनसंपर्क, अतिशय समजूतदारपणा, कनवाळू मन, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेणे, अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग शोधणे आणि तेवढीच कडक शिस्त राबविणे हा अप्पाचा स्वभाव आहे.... आप्पाआज 61 व्या वर्षात पदार्पण करीत असुन आप्पाना वाढदिवसा निमित्त ढेर साऱ्या  शुभेच्छा..
चि.सुधाकर मराठे

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

सिद्धेश्वर महादेव मंदीर

तलोदा शहरातील वांणी गल्ली परिसरातील वृंदावन वाडी शेजारी असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर हे 300 वर्षापूर्वीचे अहिल्याबाईच्या काळातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे.. सिध्देश्वर महादेव मंदिरातील महादेवतेच्या दर्शनाला आलेल्या भविकांच्या मनोकामना पूर्ण होवून कार्यसिद्धि पाप्त होते. म्हणून या मंदिराला सिध्देश्वर महादेव मंदिर असे नावलोकीक झाल्याचे जानकार सांगतात. महादेवाच्या दर्शनाने लोकांची संकट दूर होवून मनोकामना पूर्ण होत असल्याने  बाराही महीने सिध्देश्वर महादेव मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. श्रावण महिन्यात भक्तगणांचा रांगा लागत असुन परिसरातील नागरिक भंडारा सह भजन किर्तन आदि कार्यक्रमाचे आयोजन करतात. ह्याकाळात मंदिर परिसर भाविकानी फुलुन निघतो. सिध्देश्वर महादेव मंदिर हे तळोदे शहरात व आसपासच्या परिसरात  खोल (ऊँडा)महादेव म्हणून प्रसिध्द आहे.  मंदिर हे जमीन लेवल पासुन 5 फुट खाली आहे, त्यामुळे मंदिरातील सर्व मुर्त्या ही जमीनी पासुन 5 फुट खाली आहेत आणि स्थानिक भाषेत त्याला उंड म्हणतात. म्हणून शहरात व परिसरात या मंदिराचे प्रचलीत नाव उंडा किंवा खोल महादेव झाले आहे. मंदिरात पूर्वी दगडी मुर्त्या कोरलेल्या होत्या परंतु त्यांची झिज झाल्याने त्यांना तापी नदीत विसर्जित करण्यात आल्यात. सन 1999 मधे बासवाड़ा येथून गणपती, दत्त व लक्ष्मीच्या मुर्त्या आणून त्यांची प्राणप्रतीस्थापना करण्यात आली.
{ सिध्देश्वर महादेव मंदिरात दत्तमुर्ती, गणपती मुर्ती, लक्ष्मी मातेची मुर्ती व नंदीची मुर्ती आहे. मंदिरातील मुर्त्या संगमेंश्वर  पाषणात कोरलेल्या आहेत.  मंदिरात नंदी  पच्छिमेस तोड़ करुण एका चौरसावर वसलेला आहे. नंदी हा दगडयात कोरलेला आहे. मुख्य मंदिराच्या गाभार्यात मध्यभागी शिवलिंग आहे व शिवलिंगचा प्रवाह हा उत्तरेस आहे.}


सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा.. तळोदा शहरात कोजागरी पौर्णिमेला पार पडणार्‍या संत खंडोजी महाराजांच्या रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणार्‍या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह गुजरात राज्यातील भाविकांची गर्दी होते. १२0वर्षांची आध्यात्मिक परंपरा असलेल्या रथोत्सवामुळे तळोदा शहराची सांस्कृतिक ओळख आजही कायम आहे. गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथे संत खंडोजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्या प्रेरणेने दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला रथोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम संस्थानतर्फे होतात. येथील विठ्ठल मंदिराचे संस्थापक संत विठ्ठलस्वामी महाराज यांनी संत खंडोजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रथ तयार केला. या रथाचे कोरीव काम व कलाकुसर म्हणजे गतकालीन लाकडी शिल्पकला आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. १00 वर्षांपूर्वी तळोदा शहरात उत्कृष्ट गवंडी, मिस्तरी व लाकडी काम करणारे कुशल कारागीर होते. हा रथ तयार करण्यासाठी या कारागिरांसोबतच परराज्यातील शिल्पकार बोलावण्यात आले होते. त्यांच्या अथक परिश्रमातून लाकडी रथ तयार करण्यात आला आहे. रथ तयार करणारे संत विठ्ठलस्वामी महाराज हे मूळचे कर्नाटकचे तेथून ते पंढरपूरला आले, तेथे ते संत खंडोजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर तळोद्याला आले. विठ्ठल महाराज खंडोजी महाराजांना ते गुरू मानत असल्याने गुरुंच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला तळोदा शहरात रथोत्सव मिरवणुकीची संकल्पना त्यांनी सुरू केली. १२0 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आजही सुरू आहे. या रथाची दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला येणार्‍या संत खंडोजी महाराज पुण्यतिथीला तळोदा शहरातून मिरवणूक काढण्याची १२0 वर्षांची पंरपरा आहे. पूर्वी रथाच्या मिरवणुकीत लेझीम, तालीम, ढोल, ताशांच्या गजरात वाद्य व लेझीम पथक प्रमुख यांचे आकर्षण होते. स्मारक चौक, मेन रोडवर रथ मिरवणुकीत शहरातील विविध व्यायामशाळेतील मल्ल मल्लखांब, दांडपट्टा व इतर र्मदानी खेळांचे प्रात्यक्षिक करत. भाविकांचा या कसरतींना भरभरून प्रतिसादही मिळे. कालांतराने रथाच्या मिरवणुकीतील या कसरती बंद करण्यात आल्या. या रथोत्सवात तळोदा शहरातील आबालवृद्ध सहभागी होतात. या रथोत्सवाच्या परंपरेचे हे यंदा १२१ वे वर्ष आहे. यानिमित्त यंदा भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. रथोत्सवाचे संयोजन रथोत्सव समितीतर्फे दरवर्षी केले जाते. या समितीत तळोदा शहरासह नंदुरबार जिल्ह्यातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हे धार्मिक कार्य पार पाडतात. शहरातील ओंकारदास वाणी यांनी त्यांचे घर रथ ठेवण्यासाठी दान म्हणून दिले होते. १00 वर्षांपूर्वी दिलेले हे घर कालांतराने जीर्ण झाल्यानंतर ह.भ.प. उद्धव महाराज व दात्यांच्या अर्थसाहाय्याने घराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे.

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

नवरात्रोत्सवाला झेंडूच्या फुलाना

झेंडूच्या फुलाना वाढली मागणी तळोदयात पहिल्याच दिवशी दीड लाखांची उलाढाल नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात पहिल्या माळेपासून फुलांची मागणी वाढली आहे. फुलांच्या दरात तेजी आली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दीड लाखांची उलाढाल झाली आहे. नवरात्रोत्सवाला मंगळवार पासून प्रारंब झाला देवीला हार आणि पूजेसाठी फुलांची भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. झेंडूचा फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. बाजारात झेंडूचे फूल मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून 60 ते
70 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. यंदा पावसाअभावी झेंडूच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने फुलांचा तुटवडा भासत आहे. साधारणतः पाच किंवटल पेक्षा अधिक फुलांची आयात करावी लागत आहे. सुरत, इंदौर, अहमदनगर, बंगलौर सह नंदुरबार जिल्ह्यातील निजामपुर छडवेल आदि परिसारातून फूले मागवली जात आहे. फुलांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. 40 रु कीलो दराने वीकली जाणारी फुले सध्या 60 ते 70 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. मात्र भाविक मोठ्या प्रमाणात फुले खरीदी करीत आहे. दरवर्षी नवरात्री उत्सवात 12 ते 15 लाखांची उलाढाल होते. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाखापेक्षा अधिक उलाढाल झाली असल्याने फूल विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तलोदा शहरात महाकाली फूल भंडार सदगुरु फूल भंडार जयगुरुदेव फूल भंडार आदी फूल विक्रेत्यांच्या दुकाना आहेत. शहरात ठीक ठिकाणी किरकोळ विक्रेते फुले निर्यात करुण विकत आहेत. झेंडूची कलकत्ते झेंडू फुले, एक्वाऑरेन्ज पिवळी गिरी अश्या विविध प्रकारची झेंडू बाजारात उपलब्ध असुन शेवंती 150 रु किलो अहमदनगर गजरे 400 रु किलो बैंगलोर कुंडाकळी 200 रु किलो इंदौर गेलेंडर 40 रु कोलो तलोदा गुलाब 1रुपया पासुन ते 5 रु पर्यन्त एक नग जरबेरा 10 रु एक नग सूरत आदि विविध प्रकाराची फुले ठीक ठिकानाहुन मागवली जात आहे... झेंडूच्या २ फूटाच्या हारासाठी सुमारे पन्नास रूपये तर ४ फूटाच्या हारासाठी शंभर ते सव्वाशे रूपये मोजावे लागत आहेत.

स्वतः 3 एकरात झेंडू व गुलाबाची लागवन केली आहे. मात्र पावसाच्या अभाव व करपा रोगामुळे फुलाच्या उत्पादनात घट झाली. याकरिता गुजरात मद्यप्रदेश आदि राज्यातून फुले विक्री साठी मागवावि लागत आहे. पितृपक्षामुळे फुलांची मागणी घटली होती. यामुळे फुलांचे दर कमी झाले होते. मात्र नवरात्रोत्सवात फुलांची मागणी वाढून दरही वाढले आहेत. नवरात्रोत्सवाच्या कालावधित दररोज नऊ दिवस फुलांचे हार व फुले मिळाले पाहिजे, यासाठी अनेकांनी शहरातील फुले विक्रेत्यांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात फुलांचे भाव आणखीनच वाढणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे... बब्बु माळी फूल विक्रेता महाकाली फूल भंडार