Breking News

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

संतोष वानखेडेनी साकाराला पालेभाजीच्या गणपती

संतोष वानखेडेनी साकाराला पालेभाजीच्या गणपती बालगोपाला पासुन ते वयोवृद्द गणेश उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. सर्वत्र शहरी व ग्रामीण भागात गणेश मंडळ सज्ज होवून विविध मंडळांतर्फे 'श्रीं'ची प्रतिष्ठापना मोठय़ा उत्साहाने करण्यात आली होती. त्यातच तलोदा शहरातील संजय वानखेड़े यांनी तयार केलेल्या भाजीपालाच्या गणेश मुर्तीला पाहण्यासाठी भाविकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तलोदा येथील दत्त कॉलोनीतील गुरुकुल गणेश मित्र मंडळाचे सदस्य संतोष गोपीचंद वानखेड़े ह्यांचे गणरायावर विशेष श्रद्धा आहे. दर वर्षी विविध रुपात नाविन्यपूर्ण गणेश मूर्ती स्वतः तयार करुण श्री ची स्थापना करत आहे. मागील 3 वर्षापासुन एक आगळा वेगळा उपक्रम ते राबवित आहेत. दिवसें दिवस वाढत चाललेली महागाई, सातत्याने पालेभाजीच्या वाढता दर पाहून चक्क भाजिपालाचा गणपती साकारण्याचा निर्धार संतोष वानखेड़े ह्यांनी घेतला, महागाई कमी करण्याची मागणी गणरायाकड़े करत विविध पालेभाज्यांचा वापर करुण आकर्षक गणपती मूर्ती तयार केली. यात दुधळी, वांगी, सुरन, काकड़ी, कोबी, कारले आदि पाले भाज्यांच्या वापर करुण सुंदर व देखणी गणेश मूर्ती साकारलीआहे. तर यापूर्वी ही विविध टाकाऊ वस्तुंपासुन आकर्षक गणरायाची मूर्ती साकारल्याचे संतोष वानखेड़े सांगतात. मागील वर्षात झाड़ू, टोपली, आदि कामट्यांच्या साहाय्याने विशेष मूर्ती बनविली होती. सदर मूर्ती पाहन्याकारिता भाविकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती...

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

सातपुड्यातील रानमेवा

सातपुड्यातील रानमेवा बाजारपेठेत दाखल चवदार सिताफळाना मागणी, आदिवासी बांधवाना मिळतोय रोजगार तळोदा -
 सातपुडयातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सिताफळे तळोद्यातील बाजारात दाखल झाले आहेत. ऑक्टोंबर- नोव्हेंबर मध्ये सिताफळ विक्रीसाठी येत असतात मात्र यावर्षी लवकरच विक्रीसाठी येत आहेत.  कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धड़गांव तालुक्यात व तळोदा तालुक्याच्या हद्दीत सातपुड्याच्या पर्वत रांगा टेकड्या असून लांखो सिताफळांची झाडे आहेत. आदिवासी शेतक-यांनी घरांच्या वाङा शेतांच्या बांदावर गावरान सिताफळांची झाडे लागवड करून रासायनिक खतांचा वापर न करता संगोपन केलेले असल्याने नैसर्गिक रित्या पिकलेले सातपुड्यातील रानमेवा म्हणून ओळखल्या जाणा-या गावरान सिताफळ
 गोडवा अधिक असल्याने राज्यसह गुजरात, मध्यप्रदेश राज्यात  मोठ्या प्रमाणावर मागणी असते
 सातपुड्यात झाडावर पिकलेली ताज़ी रसाळ फळे सातपुड्यातील द-याखो-यातील आदिवासी बांधव तळोद्यातील बाजार पेठ जवळ खवैय्ये व व्यापारी खरेदीदारांची अधिक गर्दी तसेच मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते म्हणून तळोद्यातिल चिनोदा कोठार रस्त्यावर आदिवासीबांधव सिताफळ टोपल्यात बांधून पहाटे विक्रीसाठी येत असतात नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येणारा सिताफळ यावर्षी ऑगस्ट पासून विक्रीस येण्यास सुरुवात झाली आहे एका टोपलिस तिनशे ते साडेतीनशे रुपया पर्यन्त विक्री होत आहे धडगांव तालुक्यातील काकरपाटी, चंदसैली, पिपरपाटी, पाडली, चिकतार चिचकाठी अदि सह गांव पाड्यातील आदिवासी बांधव सिताफळ विक्रीसाठी दाखल होत असतात यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे यावर्षी निसर्गाचा नियमित बदल, लहरिपना अत्यल्प पावसाचे प्रमाण यामुळे सिताफळ उत्पादनावर परीणाम झाल्याचे सिताफळ विक्रिसाठी आलेल्यांकडून सांगण्यात आले

तलोदा तालुक्याला शव वाहिनीची गरज..

ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयापर्यंत
आनण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था रुग्णालये,विविध सामाजिक संघटना व पक्षांनी केली आहे. मात्र एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला गावी परत नेण्यासाठी तालुक्यात कोणाकडेही शववाहिका नसल्याने मृत परिवाराना विविध समस्याना सामोरे जावे लागत आहे. शववाहिका करीता उपजिल्हा रूग्णाल्याने पाठवलेला प्रस्ताव धूळ खात पडला आहे.  तलोद्यात शव वाहिका व्हावी ह्या करीता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना नगरपालीका आदिनी पुढे येण्याची मागणी जोर धरु लागली आहे. तलोदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यात  सर्वोत्तम सेवा देण्या करीता प्रसिद्द आहे. उपजिल्हा रुग्णाल्याकडे 102 व 108 क्रमांक असलेले 2 रूग्ण वाहिका आहेत. मात्र आरोग्य विभागाकडे शववाहिका उपलब्ध नसल्याने अनेक वेळा मृतदेह नेताना त्याची हेळसांड होत आहे. शिवाय या अडचणीचा फायदा खासगी वाहतूकदार घेतात. मृताच्या नातेवाइकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. तर बाहेर गावाचे कोणी व्यक्ती ऑक्सीडेत आदि अपघातात मयत झाले असल्यास त्यांची शव पोहचवन्याची जबाबदारी पोलीसांकडे असते मात्र पोलिसानाही वेळेवर वाहतुक उपलब्ध होत नाही.
 वाहतुक दार आपले वाहन शव नेण्याकरीता देत नसल्याने शव वाहतुक करणे जिक्रिचे ठरते. मागील काही महिन्या पुर्वी वाल्हेरी परिसरातील निसर्गरम्य धबधबे पाहण्याकरीता आलेल्या पर्यटकांच्या गाड़ीला अपघात होवून त्यात एक तरुणी मयत झाली होती. तरुणी बंगलौरची असल्या कारणाने तिच्या परिवारातील सदस्याना तलोदा गाठन्यास वेळ लागला. तलोद्यात शव ठेवण्या करीता बर्फ पेटी नसल्याने सदर शव नंदुरबार येथे रवाना करने आवश्यक होते. मात्र वेळेवर वाहन कोणीही देत नसल्याने पोलिसाना शहराच्या रस्त्यावर उघड्या अप्पे रिक्ष्यात शव न्यावे लागले. शववाहिकेचा अभाव पालिका अथवा अन्य सेवाभावी संस्थांनी शववाहिकेची व्यवस्था करावी, अशी सातत्याने मागणी होत असली तरी त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यातून तसेच गुजरात सीमाभागातून उपचारासाठी रुग्ण मोठ्या संख्येने येथे येत असतात. रुग्णांच्या वाहतुकीसाठी अनेक संघटना संस्था, रुग्णालये आणि लोकप्रतिनिधींनीकडे रुग्णवाहिकेची सुविधा आहे. मात्र, शववाहिकेचा प्रश्‍न कोणत्याही संस्था अथवा संघटनेने हाती घेतलेला नाही. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे शव घेऊन जाण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका तयार होत नाही.
नाइलाजाने जादा पैसे खर्चून मृताच्या नातेवाइकांना मृतदेह घेऊन जावा लागतो. वाहतूकदार घेतात अडचणींचा फायदा शहरातील केवळ एक-दोन वाहन धारकच अशा तऱ्हेने मृतदेह नेण्याची जबाबदारी घेत असतात; परंतु त्यांचे भाडे नातेवाइकांना परवडत नाही. एखादा गरीब कुटुंबातील रुग्ण असेल तर त्याची मोठी विचित्र अवस्था होते. जिल्हा आरोग्य विभाग,  पालिका आणि अन्य सेवाभावी संस्था- संघटनांनी या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर या केंद्रात शववाहिका उपलब्ध करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. आवश्‍यक तर वैद्यकीय  क्षेत्रासह अन्य क्षेत्रांतून निधी संकलन करून ही महत्त्वाची गरज भागविण्याचा प्रयत्न करावा. अपघातात  मृत्युमुखी पडलेल्या अनेक मृतदेहांना शववाहिकेअभावी अनेक तास रखडत ठेवावे लागत असल्याने शव घरा  पर्यन्त नेणे जिक्रिची काम बनले आहे. तालुक्यात विविध संघटना व चैरिटेबल ट्रस्ट आहेत.  मृतदेह नेण्याची जबाबदारी घेत असतात; परंतु त्यांचे भाडे नातेवाइकांना परवडत नाही. एखादा गरीब कुटुंबातील रुग्ण असेल तर त्याची मोठी विचित्र अवस्था होते. जिल्हा आरोग्य विभाग,  पालिका आणि अन्य सेवाभावी संस्था- संघटनांनी या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर या केंद्रात शववाहिका उपलब्ध करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत.
आवश्‍यक तर वैद्यकीय  क्षेत्रासह अन्य क्षेत्रांतून निधी संकलन करून ही महत्त्वाची गरज भागविण्याचा प्रयत्न करावा. अपघातात  मृत्युमुखी पडलेल्या अनेक मृतदेहांना शववाहिकेअभावी अनेक तास रखडत ठेवावे लागत असल्याने शव घरा  पर्यन्त नेणे जिक्रिची काम बनले आहे. तालुक्यात विविध संघटना व चैरिटेबल ट्रस्ट आहेत. विविध संघटने मार्फत व पक्षा मार्फत वाजा गाजा करत रुग्ण वाहीका देण्यात आल्या आहेत. मात्र तालुक्यासाठी गणेश सोशल ग्रुप व सीताबाई वाणी यांच्या स्मरणार्थ डॉ. शशिकांत वाणी यांचा कडून देण्यात आलेली रुग्नवाहिका वगळता एकही रुग्ण वाहिका सुरु नसुन धूळ खात पडल्या आहेत. शहरात राष्ट्रवादी पक्षातर्फे पवार पब्लिक ट्रस्ट मार्फत आधुनिक मोबाईल वैनची रुग्नवाहिका देण्यात आली आहे. मात्र सदर रुग्ण वाहिका धूळ खात पडली आहे. तर माजी मंत्री यांच्या सौजन्याने तलोदा शहरा करीता दोन रुग्नवाहिका देण्यात आल्या होत्या. सदर रुग्ण वाहिकेच्या आदिवासी बांधवाना मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. मात्र कालांतराने सदर रुग्ण वाहिका नादिरुस्त झाल्याने त्यांच्या मेन्टेन्स राखने अवघड होत होते. याकारनाने सदर रुग्ण वाहिका शांती धन पतपेढ़ीला विकण्यात आल्या आहेत..तर शासनामार्फत उपजिल्हा रुग्णाल्याकडे 102 व 108 क्रमांक असलेली दोन रूग्णवाहीका सुरळीत आहेत. तर शासना मार्फत एक रूग्ण वाहीका मंजूर करण्यात आली होती. मात्र सदर रूग्ण वाहिकेला ग्रैंड नसल्याने मेन्टेन्स ठेवणे कठीण होत असल्याचे सांगुन विद्या नगरी परिसरात मागील काही वर्षा पासुन रूग्ण वाहीका धूळ खात पडली आहे.
शहरात उपजिल्हा रुग्नाल्याचा 2 व सामाजिक संघटनेचा 2 रूग्ण वाहिकासुरु असुन शहरात आरोग्य विभाग, खासगी रुग्णालये किंवा कोणत्याही सेवाभावी संस्थांकडे शववाहिका नाही. शव एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेण्याकरिता शववाहिका उपलब्ध नाही. त्यामुळे शव वाहून नेण्याकरिता रुग्णांना खाजगी वाहनाचा वापर करावा लागतो. नियमानुसार ऍम्ब्युलन्स शववाहिका म्हणून वापरता येत नाही. त्यामुळे बर्‍याच रुग्णांना अनेकदा ऍम्ब्युलन्स उभी असूनही देण्यात येत नाही. असे गैरसमज निर्माण होतात. वरिष्ठ पातळीवर शव वाहिके संदर्भात अनेकवेळा पत्रव्यवहार केले आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची दाद मिळत शव वाहून नेणे डोके दुःखी बनले आहे.... डॉ.संतोष परमार वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय 
तलोदा नंदुरबार जिल्ह्यात फक्त 03 शववाहिनी आहेत. प्रत्येक तालुक्याला शव वाहून नेण्या करीता शव वाहिनीची गरज आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती, दानशुर व्यक्ती, आमदार खासदार, लोक प्रतिनिधी नगरपालिकाआदिनी पुढे येवून शव वाहीका उपलब्ध करुण देने गरजेचे आहे. शव वाहीका नसल्याने मृत्यु नंतर ही शवाची हेडसांड होत आहे. या करीता दानशुर व पुढारीनी पुढे येणे गरजेचे आहे.. डॉ.राजेश वसावे नंदुरबार वैद्यकीय अधीक्षक
 तलोदा शहराला शव वाहिनीची आवश्यक़ता आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे शव त्यांच्या गावी पोहचवने गरजेचे असते. रूग्ण वाहीकेत शव नेता येत नाहीं. खाजगी वाहन चालक सर्व सामान्य जनतेप्रमाणे पोलीसाना देखील शव वाहतुकी करीता वाहन देण्यास नकार देतात. उपजिल्हा रुग्नाल्याकडून शव वाहून नेण्याकरीता वाहन उपलब्ध नाही. सदर शव घेवुन जाण्याकरीता मयत दाखला आवशक्य असतो मात्र मयत दाखला देत नसल्याने शव घेवुन जाने जिक्रिचे ठरते. शववहिनी नसल्याने अनेक समस्याना सामोरे जावे लागते.
  तलोदा पोलीस निरीक्षक सतीश भामरे