Breking News

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

समाजकार्यासाठी धडपडणारा युवा राजकारणी

दिलखुलास व्यक्तीमत्व, चेहऱ्यावर नेहमी आनंद, गोरगरीब सामान्य माणसाच्या मदतीला धावून जात
 प्रत्येकाच्या हाकेला साद देणारे संजय बबनराव माळी यांनी समाजात व मित्र परिवारात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे़ आपल्या १४ वर्षाच्या राजकीय जीवनात तीन वेळा पालिका व तालुक्यातील विविध संस्थांवर प्रतिनिधीत्व करतांना संजू आबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले़ आज शहरातील आपत्ती, सामान्य माणसाच्या सुखदुखात सर्वात आधी आबा व त्यांची टीम आधी मदतीला पोहचते़ राजकारण करतांना आधी समाकारण हे व्रत अंगीकारलेले आबा आज तळोद्यातील समाजकार्यासाठी धडपडणारा युवा राजकारणी म्हणुन आज सर्वांना परिचीत झाले आहेत़ तळोदा शहरातील पेहलवान घराण्यात जन्मलेले संजय माळी पेहलवानीत तरबेज नसले तरी राजकारण व समाजकारणात त्यांचा हात धरणे कठीण आहे़ मनमिळावू स्वभाव, दांडगा जनसंपर्क, सदैव गरजूंना मदत करण्याची धडपड, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेण्यावर भर, आलेल्या अडचणींवर योग्य तो मार्ग काढण्याची खुबी, सहकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत त्यांच्यात समाजसेवेसाठी उर्जा निर्माण करण्याची कला हा आबांचा मूळ स्वभाव़ आपल्या स्वभावातील महत्वाचे गुण वैशिष्टयांमुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या फार मोठी झाली आहे़ संजयआबा त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहेत़ कै़बबनराव पेहलवान हे त्याकाळात राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. तर १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळी नगरसेविका होत्या. बंधू भरतभाई माळी तळोदा
 तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असून माजी नगराध्यक्ष तथा पालिकेचे गटनेते म्हणुन आजही धुरा त्यांच्या हातात आहे़ मोठे बंधू आप्पासाहेब लक्ष्मण माळी हे पी.ई.सोसायटीचे अध्यक्ष असून दुर्गम भागातील गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वता लक्ष घालतात़ वहिनी सौ.योजनाताई माळी या देखील तळोदा पालिकेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. भरतभाई, लक्ष्मणआप्पा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहराचा सर्वांगिण विकास होतो आहे, हे कोणी नाकारू शकत नाही़ आबासाहेबांनी राजकारण व समाजकारणात भरतभाईंचा आदर्श घेत तळोदा शहराचा विकासाच्या ध्यास नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असतो़ संजयआबा माळी यांनी २००२ साली राजकारणात प्रवेश केला़ भरतभाई यांच्या मार्गदर्शनातून आबांनी २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हे सुत्र नेहमी पाळले़ शहरातील कोणावरही संकट येवो, त्यास मदतीसाठी आबा व त्यांचे सहकारी नेहमीच पुढे असतात़ आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आबांनी आज दांडगा जनसंपर्क जोडला आहे़ आपल्या सामाजिक कामामुळे संजय माळी हे तळोदेकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत़ यामुळेच संजयआबा माळी हे तळोदा पालिकेत सलग तीनवेळा बहुमताने विजयी झाले आहेत़ त्यांनी समाजकारण, राजकारण यात स्वतंत्र स्थान मिळविले असून ते तालुक्यातील विविध संस्थांवर प्रतिनिधीत्व करीत आहेत़ सध्या ते पालिकेत बांधकाम सभापती, वि.वि.का.सो.चे अध्यक्ष, पीपल्स एज्यूकेशन सोसायटीचे संचालक, दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष, गणेश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गणेश सोशल ग्रुपच्या माध्यमातून व आपले एकनिष्ठ सहकारी योगेश मराठे, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, भरत चौधरी, कमलेश पाडवी व सदस्यांच्या सहकार्याने सतत नवनवीन उपक्रम राबवित आहेत़ तळोदा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले आहे़ वेळोवेळी गोरगरीब जनतेला मदतीला धावून जाणे, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मदत करण्यासाठी आबा व त्यांचे सहकारी नेहमीच धावून जात असतात़ तळोदा शहरात शांतता नांदावी, एकता निर्माण व्हावी यासाठी राम रहीम गणेश
मंडळ उत्सव साजरा केला जात आहे़ दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन, शहरातील रूढी परंपरा जपण्यासाठी रावण दहन कार्यक्रम, गणेश आरास स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदींसह विविध कार्यक्रमात अग्रेसर राहून तळोदा शहरात एक वेगळी छाप गणेश सोशल ग्रुपने निर्माण केली आहे़ सदर ग्रुप समाजकारणात अग्रेसर असून तळोदा शहरवासीयांच्या सेवेसाठी अंबुलेन्स सेवा, विकलांगासाठी सायकली वाटप, पूरग्रस्तांना अन्न वाटप, गरीब कुटुंबातील कोणी मयत झाले तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करण्यासाठी संजय आबांच्या नेतृत्वातील गणेश सोशल गृपची टीम नेहमीच अग्रेसर राहत आहे़ प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणुन घेवून आधी त्या कशा सोडविता येतील यासाठी संजय आबांचे नेहमीच प्रयत्न राहतात़ आबांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध, सामान्यांसह शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुखात हजर राहणारे आबांचे राजकारणातील विरोधक देखील मित्र आहेत़ आज आबांचा वाढदिवस... आबा करीत असलेल्या सामाजिक कामाला शहरातील पत्येकाची साथ लाभत आहे़ आबांच्या हातून नेहमी अशीच सामान्य व शहरवासियांची सेवा घडत राहो हीच त्यांना हार्दीक शुभेच्छा !

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

तळोद्यात उपनगराध्यक्षांनी मांडली वेगळी चूल!

आमदार व सत्ताधारी गटाला डावलून विकासकामांचे उद्घाटन : चर्चेला उधाण : आज आमदारांच्या हस्ते उद्घाटन
तळोदा पालिकेच्या सत्ताधारी गटातील उपनगराध्यक्षा हे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांना विश्वासात न घेता स्वत:च शहरातील विकास कामांचे उद्घाटन करीत श्रेय लाटण्याच्या करीत असलेल्या प्रयत्नाबाबत एकच चर्चा सुरू आहे. उपनगराध्यक्षांच्या या प्रकाराबाबत सत्ताधारी व स्थानिक आमदार गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर यामुळे एकेका कामाचे दोनवेळा उद्घाटन केले जात आहे. तर उपनगराध्यक्षांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मांडलेली वेगळी चूल बाबत खमंग चर्चा सुरु असून मात्र त्यांनी सत्ताधारी काँग्रेस व सध्या विरोधातील भाजपा यांची नााजी ओढवून घेतल्याचे बोलले जात आहे. . तळोदा पालिकेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली आहे. मात्र प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. शहरात सध्या विकास कामांचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र ही स्पर्धा सत्ताधाऱ्यांमध्येच रंगल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तळोदा पालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. सत्ताधारी गटातील उपनगराध्यक्षपद रुखसनाबी अब्बास अली यांना देण्यात आले आहे. नुकतेच अल्पसंख्यांक निधीतुन ३० लाखाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यात जामा मस्जिद व इमाम अहमद रजा चौक, संगम टेकडी आदी परिसरात रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम आदी कामांचा सामावेश आहे. या विकासकामांचे उद्घाटन उपनगराध्यक्षा रुकसानाबी सय्यद व त्यांचे बंधू रईस अली यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कामाचे उद्घाटन करुन घेण्यात उपनगराध्यक्षा यांचे बंधू रईस अली अब्बास अली यांना अधिक रस असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमाला माजी क्रीडामंत्री ॲड.पद्माकर वळवी, पालिकेचे गटनेते भरतभाई माळी, नगराध्यक्षा सौ.रत्ना चौधरी, बांधकाम सभापती संजय माळी, सुभाष चौधरी यांच्यासह नगरसेवक आदींना डावलून कामांचे उद्घाटन करीत असल्याची शहरात चर्चा रंगली आहे. उपनगराध्यक्षांनी विकास कामांचे उद्घाटन करतांना स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, विविध समितीचे प्रमुख, विद्यमान नगरसेवक यांना बोलाविणे अपेक्षित असताना त्यांना डावलून स्वत:च विकासकामांचे उद्घाटन करुन नेमके काय साधत आहेत याबाबत संभ्रम अवस्था असून त्यांच्या या कामामुळे उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. मागील काळापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात होत. मात्र, या उद्घाटन कार्यक्रमामुळे त्यास पुष्टी मिळाली आहे. सदर विकास कामाचा निधी हा राज्यसरकारच्या माध्यमातून प्राप्त होत असल्याने उद्घाटनला स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधीना आमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक आमदार व भाजप गटाला डावलून सदर उद्घाटन केल्याने आमदार गोटातून व भाजप पदाधिकारी नाराज झाले आहेत. तर सदर उदघाटन हे राजकीय हेतू साधून करण्यात आल्याचे भाजपाने नाराजी व्यक्त कली आहे. त्यामुळे आज रविवारी आ.उदेसिंग पाडवी व स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्ते पुन्हा या कामाचे शासकीय उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे शहरात एकच चर्चा आहे..


शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

बडादादा गणेश मंडळातर्फे प्रतिज्ञेतून देशभक्तीचा जागर!

तळोदा येथील बडादादा गणपती नवयुवक मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात 'भारत माझा देश आहे' या प्रतिज्ञेवर आधारित सजीव आरास सादर करुन लोप पावलेल्या लोकनृत्य व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येत आहे. तसेच आई-वडीलांना वृद्धाश्रमात न पाठविता त्यांना चांगली वागणूक द्या, विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे प्रबोधन देखाव्यातून केले जात आहे..

 तळोदा येथील शनिगल्लीतील बदादादा नवयुवक गणेश मंडळ मागील 57 वर्षा पासून विविध सामाजिक, धार्मिक, आदी विविध विषयांवर प्रबोदनात्मक आरास सादर करून जनजागृती करीत आहे. त्यात भक्त पुडलीक, श्रवणबाळ, मदारी खेळ , गाढवाचे लग्न, फिरते मंदिर, अधांतरीत गणराय, असे विविध सामाजिक प्रबोधनात्मक देखावे या मंडळाने सादर केले आहेत.. यावर्षी भारत माझा देश आहे. या प्रतिज्ञेवरून आताचा भारत व पूर्वीचा भारत यांच्यातले काही पैलू सजीव देखाव्यातुन समाजापुढे मांडण्याच्या प्रयत्न बाल कलाकारांनी केला आहे.. भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात महान संस्कृती आहे. देशाची संस्कृती जपन्यासाठी भारत सरकार विविध प्रकारचे अभियान राबवते, सच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून लहान बालके देखील आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. तर तरुण पिढीला आशास्थानी मानत असताना गुटखा सिगारेट दारू आदींच्या आहारी जाऊन देशाचे सुंदर वातावरण कसे दूषित करत आहे. भारत देशात वेगवेळ्या कारणांनी व व्यसनामुळे तरुण मरण पावत आहे. अनेकवेळा अतिगंभीर
रुग्णाना वाचवण्यासाठी डॉक्टर आटोकाट प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्टा करूनही रुग्ण दगावला तर मयताचे कुटुंबीय व जमाव डॉक्टरांवर प्राण घातक हल्ले करत आहेत, डॉ. परमेश्वर नसून माणूसच आहे, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्यात वाढ झाली आहे. हे करणे अतिशय वाईट आहे. आपण आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो*माझा देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन*, मात्र आताची तरुण पिढी लोककला, लोकसंगीत हे सर्व बाजूला सारत झिंगाट गाण्यावर वस्त्राचे भान न ठेवता बेभान होऊन नाचताना दिसत आहे. आपली खरी खुरी परंपरा ही लोककला, लोकसंस्कृती, लोकनृत्य गरबा, भांगडा, आदिवासी नृत्य, भरत नाट्यम, कथक, कुचिपुडी, या सारखे लोकप्रकार येतात.
बाल कलाकारांनी विविध लोकनृत्य सादर करून संस्कृतीचे जतन करावे असा सल्ला दिला आहे. तर *मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेल* मात्र आपण म्हणत असलेल्या प्रतिज्ञाच्या पंक्ती प्रमाणे आपण कधीच वागत नाही, आज भारतात वृद्धाश्रमाची संख्या मोठ्या प्रमानात वाढली आहे. या वृद्धाश्रमात बहुतेक वृद्धांची मुले हे उचशिक्षित आहे. त्याउलट शेतकरी, कामगार, मजूर व सामान्य परिस्थितीत असणारऱ्या व्यक्तीचे आई वडील कधीही वृद्धाश्रमात जात नाही. ते आपल्या आई वडिलांसोबतच राहतात, *गुरुरब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात पर ब्रह्म तसमय श्री गुरुवेंन महा* असा जप करत असताना त्याचवेळेला गुरूजणांना मारहानीच्या दुर्दैवी घटनेत वाढ झाली आहे. वडील धाऱ्या मांणसाचे मान ठेवण्या ऐवजी रस्त्यावर त्यांच्याशी वादविवाद करण्याचे त्यांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण म्हणतो की *माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे, त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे.* मात्र याच्या विरोधी वागून आपण आपण स्वदेशी वस्तू टाळून विदेशी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून परराष्ट्राला आर्थिक मजबूत करीत आहात याच जोरावर अनेक देश भारतावर आंतकवादी व दहशतवादी हल्ले करीत आहे. यावर नम्र आव्हान करीत स्वदेशीचा वापरा करा विदेशी वस्तू खरेदी करणे टाळा, देशाचे सैनिकांचे व पोलिसांचे
संरक्षण करन्यासाठी मदत करा. असे आव्हान या सजीव देखाव्यातून करण्यात आले आहे. आरास यशस्वी करण्यासाठी किसनदादा कलाल, यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष महेंद्र गुरव, उपध्यक्ष सन्नी पाटील , सचिव हरिष मराठे, खजिनदार सूरज शिंपी, सदस्य अजय पाटील, भटू बूनकर, नितीन दातीर, सोनू धेडगे, जयेश देडगे, सचिन पाटील, सन्नी वंजारी, भूषण लोहार, नंदू पाटील, विपुल कुलकर्णी, सुयोग पाटील, गौरव गुरव आदीनी परिश्रम घेतले आहेत...


शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

सर्वोदय गणेश मंडळ देतय 'बेटी बचाव' चा संदेश!

आरास साकारुन जनजागृती : तळोद्यातील सामाजिक उपक्रमाचे कौतुक
स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक कलंक, लेख वाचवा- बेटी बचाव अशा ज्वलंत विषयावर मागील दोन वर्षापासून तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळ आरास तयार करुन समाजात जनजागृतीचे काम करीत आहे. सदर आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दर्ी हात आहे. . तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २२ वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदांना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, स्त्रीभ्रूण हत्या, बाल कामगार रोखणे, भूत महल, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्यसंग्रामातील यशोगाथा, धार्मिक, पौराणिक, देशभक्तीपर, स्वंयमचलित देखावे सादरकेले आहेत.. भारत भूमीत स्त्री शक्तीच्या रुपात आदिशक्ती जगदंबेचे पूजन केले जाते. पण त्याच भूमीत भ्रूण हत्येचे महापाप केले जाते. त्यामुळे मंडळाने समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने यावर्षी स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक कलंक हा ज्वलंत विषय घेवून सजीव आरास सादर केली आहे. आरासची सुरुवात मुलीच्या बालपणापासून सुरु होवून तीच्या बालपणातील विविध क्षण टिपण्यात आले आहेत. बालपणात आपल्या भावंडासोबतचे आनंदी क्षण त्यानंतर तिचे लग्न होऊन सासरी जाते, संसारात रमते. दरम्यान संसाराच्या उत्तरार्धात मुलाची किडनी खराब होते. किडनीसाठी नातलगांनी विनवण्या करूनही कोणीच पुढे येत नाही, शेवटी पत्नीही नकार देते. अशावेळी हीच आई मुलाचा जीव वाचविण्यासाठी पुढे सरसावते आणि किडनी दान करते. मात्र म्हातारपणात किडनी दानानंतर तिची तबेत खालावते व ती मरण पावते. मुलगा ढसाढसा रडतो, शेवटच्या क्षणीही ती स्वत:चा विचार न करता आपल्या मुलाचाच विचार करते, स्वत:ची किडनी अर्पण करून आपल्या मुलाला जन्म देणारी आई ही देखील स्त्रीच आहे, असे या आरासीत दाखविण्यात आले आहे. मात्र, आज आईसारख्या पवित्र नात्याला गर्भपात करून संपविले जाते, असे एका दृश्यात चित्रीत करण्यात आले आहे. तर विवाहीता गर्भवती असतांना डॉक्टरकडे जातात. तीच्या कुटुंबियांना मुलगा हवा असतो, म्हणून लींग तपासणी केली जाते. गर्भात मुलगी असल्याचे समजल्यावर गर्भातील मुलीची जन्मापूर्वीच हत्या केली जाते. यावेळी गर्भातील बालिकेची माँ, पिताजी... मुझे इस दुनियामे आने से पाहिले ही मेरी हत्या कर रहे हो, मै भी जिना चाहती हु, डॉ. अंकल आपको तो भगवान के रूप माना जाता है! आपका काम जीवनदान देेना है पर आप तो मेरी. जान ही ले रहे हो! ओ भी पैसो के लिये. मुझे भी जिना है, इस दुनिया को देखना है! इस दुनिया मे आना है! मा... मुझे मत मारो, मुझे मत मरो मा...अशी भावनिक आर्त हाक मारते, अशी आरास साकारण्यात आली असून ती पाहतांना नक्कीच डोळ्यातून पाणी आल्याशिचवाय राहत नाही. तर दुसरीकडे एक प्रतिकात्मक वृक्ष कापतांनाची आरास आहे. त्या वृक्षातून देखील भावनिक आवाजात विनवणी करत. माझे मूळ कापू नका, माझे मूळ कापली तर मी फळे फुले कसे देणार, तुम्ही स्वत:चीच मूळ कापत आहात, असे म्हणत मुलगा-मुलगी भेद करू नका, मुलीला जन्म घेऊ द्या, मुलगी भविष्य आहे. अशी भावनिक हाक घालत बेटी बचावचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. सर्वोदय गणेश मित्र मंडळाचे नरेश चौधरी, पप्पू साळवे, रोहित कलाल, उमेश पाटील, शुभम ठाकरे, शरद सावळे, छोटू चित्ते, ओम चौधरी, स्नेहल चौधरी, पप्पु ठाकरे, मयूर चौधरी आदींनी या जीवंत आराससाठी मेहनत घेतली आहे. मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष राज चौधरी, सचिव प्रवीण चौधरी, नितिन ठाकरे, दीपक माळी आदींसह सदस्यांनी देखावा सादरीकरणासाठी परिश्रम घेतले..





आर्थिक मदत देता की थट्टा करताय!

जुलै महिन्यात तळोदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांना शासनातर्फे
प्रत्येकी कुटुंब दोन हजार रुपये याप्रमाणे १८ नुकसानग्रस्तांना ३६ हजार रुपयाची शासकीय मदत देण्यात आली आहे. या मदतीची रक्कम संबधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. हजारो, लाखोंचे नुकसान झालेले असतांना शासन दोन हजार रुपये देवून आर्थिक मदतीऐवजी थट्टा करीत असल्याची खंत नुकसानग्रस्तांनी व्यक्त केली आहे.. तळोदा तालुक्यात दि.५जुलै रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाल्याना मोठा पूर आला होता. त्यात बोरद येथील नाल्याला रात्रीच्या सुमारास अचानक मोठा पूर आल्याने नाल्याजवळील मिठी खाडी व भट्टी हट्टी परिसरात पाणी शिरल्याने घरातील धान्य व संसारपयोगी साहित्य वाहून गेले होते. यावेळी महसूल विभागातर्फे ३० घरांचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. यातील १८ नुकसानग्रस्तांना शासनाकडून प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित नुकसानग्रस्त अद्याप मदतीपासून वंचित असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुराच्या पाण्यात संपूर्ण संसार वाहून गेलेल्यांनो दोन हजार रुपये भरपाई देवून शासन गरीबांची थट्टा करीत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी सरपंचा वासंतीबाई ठाकरे व ग्रा.प.सदस्यांनी सतत पाठपुरवा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे १८ लाभार्थ्यांना भरपाई मिळाली आहे. या १८ नुकसानग्रस्तांसाठी ३६ हजाराची भरपाई रक्कम त्या त्या लाभाथ्र्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार योगेश चन्द्रे यांनी दिली. यात सुकलाल मराठे, राहुल राहसे, तुळशीदास कोळी, भिका कपूर, कलुबाई ठाकरे, उषाबाई वारुळे, दिलीप कोळी, भिका कापुरे, मोतन वारुळे, संतोष कोळी, सुभाष कोळी, शिवराम ठाकरे, विनोद पाटील, पुंडलिक पाटील, विक्रम ठाकरे, शकुंतला गुरव, रघु नाईक, लोटन न्हावी आदींच्या समावेश आहे. नुकसान ग्रस्तांना तुटुपुंजी रक्कम दिल्याने नाराजीचा सूर उमटत असून शासनाने नुकसानग्रस्तांची थट्टा केली आहे का? अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे..


तळोद्यातील दादा गणपतीची प्रबोधनकार आरास ठरतेय आकर्षण!


तळोदा येथील दादा गणेश मंडळाकडून अचानक उद्भवलेल्या आपत्तीला कशा पद्धतीने सामोरे जावे, असे प्रसंग आल्यास प्रथमोपचार पद्धती कोणत्या वापराव्यात, प्रशासकीय स्तरावरील उपाययोजना याबाबत जनजागृतीपर सजीव देखावा सादर केला आहे. आरासच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी देखील आपत्ती व्यवस्थापना बाबत जनजागृती केली आहे. सदर देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. . तळोदा येथील सार्वजनिक दादा गणेश मंडळ मागील ७० वर्षांपासून विविध सामाजिक विषयांवर प्रभोधनात्मक आरास सादर करीत आहे. तळोदा शहरात सजीव देखाव्यांचे सुरुवात दादा गणेश मंडळाकडून झाली असून आतापर्यत शहीद जवानांना श्रद्धांजली, पशुधन वाचावा देश वाचावा, डॉ कलामांचा स्वप्नातील युवक, मोबाईल एक व्यसन(दुष्परिणाम) आदी विषयांवर त्यांनी सजीव देखावे सादर करून अनेकदा प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. यंदा रविंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष योगेश गुरव, सचिव प्रशांत गवळे, खजिनदार पंकज गुरव, सदस्य रविंद्र गाढे, गणेश पाटील, योगेश पाटील, राकेश गुरव, दत्तात्रय चित्ते, राहुल पाटील, सुभाष शिंदे, नवनीत लोहार, चेतन गुरव, किरण गुरव आदीं सदस्यांनी या वर्षीही सजीव देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. अचानक आलेला भूकंप, महापूर, ढगफुटी, चक्रीवादळ, अग्नीउपद्रव, आतंकवादी हल्ले, सर्प दंश, विजेचा शॉक, हृदय विकाराचा झटका, अपघात, गॅस सिलेंडरला लागलेली आग, रस्त्यावरील अपघात आदींना घाबरून न जाता कशा पद्धतीने सामोरे जावे, अशाावेळी कुठले प्रथमोपचार सेवा पुरविणे याबाबत सजीव देखावाद्वारे प्रभोधन करण्यात आले आहे. या आरासीचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, तळोदा नगरपालिका मुख्याधिकारी जनार्धन पवार, पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे आदींच्या मार्गदर्शनात्मक प्रतिक्रियेचा समाविष्ट करण्यात आल्याने सदर देखावाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. ही आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे..