Breking News

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

कुणी असं सोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेते एकटी
माझ्याशीच मी हसुन घेते एकटी
तरी येकटीलाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा