Breking News

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

तुला वेळ मिळाला तर.

तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं,
मी समोरुन जाताना
तु दारात उभं रहायचं
आईला संशय नको म्हणुन
झाडानां पाणी घालायचं,
फुलानां फुलवायचं,
आईला भुलवायचं
तुला वेळ मिळाला तर...
को~या कागदावर्,
किवा रुमालावर
मन मोकळ करायचं
अस् एकमेकांनी
काळजात जपायचं
तुला वेळ मिळाला तर...
कळेल एक दिवस तुझ्या घरी
कळेल एक दिवस माझ्या घरी
तेव्हा अखेरीस परिक्षा प्रेमाची
दोघांत एक विषाची बाटली
तु आधी कि, मी आधी
असं नाही भांडायचं
दोघांनी एक-एक घोट घ्यायचं
हातात हात घेउन झोपी जायायचं
तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं.

मी तिला विचारले

मी तिला विचारले .......

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा...

मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा...

मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा...

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा...

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा...

मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा...

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

हवं असतं कुणीतरी

हवं असतं कुणीतरी तुमच्याशी भांडणारं
भांडल्यावर देखील तुमच्या
वाट्यात वाटा मागणारं
हवं असतं कुणीतरी
तुमची वाट पाहणारं
... तुम्ही रागावुन गेल्यावर
ओले डोळे टीपणारं
खरंच असावं कुणीतरी…
खरंच असावं कुणीतरी
कडाडुन भांडणारं
सारं भांडुन झाल्यावर
मायेनं बिलगणारं

नातं आपलं

‎"नातं आपलं कप आणि बशीचं..
कपानं सांडलं तर बशीनं साठवायचं..
रात्रीच्या गोष्टींना सकाळी गुपचूप
आठवायचं..
आठवता आठवता हळूच गालात हसायचं..
नातं आपलं चहा अन् दुधाचं..
दुधाबरोबर चहानं आनंदानं उकळायचं..
कधी रुसायचं, कधी हसायचं,
पण शेवटी एकमेकांच्या मिठीतच
विसावायचं..
नातं आपलं हळव्या प्रेमाचं..
एकाला लागलं कि दुसऱ्यानं कळवळायचं..
एकाच्या कर्तृत्वाला दुसऱ्यानं
नावाजायचं..
एकाच्या सुखदुःखात दुसऱ्यानं
स्वतःला हरवायचं..
नातं आपलं साता जन्माचं,
सख्या का रे अस्वस्थ व्हायचं..
कधी गुरगुरायचं,कधी गोंजारायचं..
पण आपण सदैव बरोबरच रहायचं.."

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल..

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....
इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून
मला वाकुल्या दाखवेल.....
हळूच एखादा MISS CALL करून
मला ती सतावेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
स्वप्नामध्ये माझ्या हळूच
कोणीतरी शिरेल.....
बोलायला "काहीच नाही" म्हणून फोनवर
तासभर
बोलेल....
आणि नेमक महत्वाच बोलताना फोन
ठेवण्याची घाई
करेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
माझ्याही आठवणीत रात्रभर
कोणीतरी जागेल.....
तिच्या विरहाचे चार दिवस चार जन्माचे
अंतर
दाखवेल.....
आणि तास-दोन तासांची भेट सुद्धा क्षणभर
वाटेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल....!
या एकाकी जीवनामध्ये
त्या परीचा प्रेमाचा स्पर्श
लाभेल......
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....

MY SCRAP













                          


























बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

काल ती मला म्हणाली

काल ती मला म्हणाली,
"तुला कधी स्वप्न
तुटायची भीती नाही वाटत....
...?
उंच मनोरे तू स्वप्नांचे
बांधतोस........ .., ते
कधी कोसळायची भीती नाही
वाटत ...........?

मी फक्त हसलो, आणि तिला म्हटले
"अगं तुझ्या स्वप्नातच तर माझे
जग आहे..     
                                                                                                                        
 हे आयुष्यच
स्वप्नांच्या हवाली केले आहे
त्यांच्यातच जगणे आणि त्यांच्यातच विलीन होणे
आहे....."
"केवळ एकच क्षण तुझ्यासोबत
जगायचा आहे
मग नंतर....
तो स्वप्नांचा मनोरा माझ्या सकट
कोसळला तरी चालेल..........!!!"
"इतका कसा रे स्वप्नाळू
तू ?........ इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत
कोणाची.......
किती रमशील
स्वप्नांच्या दुनियेत?"
"एक दिवस मी जाईन
तुला सोडून..... मग काय करशील हं?....."
"आता अजिबात स्वप्ने पाहू
नकोस माझी......"
असं कालच माझ्यावर चिडून
मला म्हटली होतीस
आणि..
"काल देखील रोज
रात्री प्रमाणे
तुझी असंख्य स्वप्ने.....
माझ्याकडेच
पाठवली होतीस
अगदी न चुकता....

चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही


एका ठिकाणी चिमणी व चिमण्याचे एक जोडपे होते. चिमन्याचे नाव सुधास तरी चिमणीचे नाव परी होते. दोघांचे एक मेकांवरती जीवापार प्रेम होते. चिमणा हां चिमणी वरती जिव ओतायचा तर चिमणीही त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती. कधी एक मेकांकडे पाहुन हसत होती तर कधी रडत होती. गतकाळ ते नेहमी आठवत होते. जीवन त्याच आनंदाने जगत होते. कधीतरी एखादे वादळ उठत होते. एकमेकाना त्यांचे भेटने काही काळ बंद होत होते. तरी संकटातुन मार्ग काढत त्यांचे एकमेकांचे भेटने सुरूच होते.
असे करता करता वर्षो उलटली. अचानक प्रेमात वादळ आले परी चिमणीचे लग्न ठरले. त्यामुळे ते जोडपे विभक्त झाले. उरलं आयुष्य जगण्यास राहुन गेले. तरीही धेर्याने ते संकटाना तोंड देत गेले. त्यातच पुन्हा विरहाचा पावसाळयाला सुरुवात झाली. ज्या झुडपांवर त्यानी घरटे बांधन्याची स्वप्न पाहिली होती. दुर्देवाने ते झुडपेच वाहुन गेले. पुन्हा भेटण्याची आस मनातच राहुन गेली. सुधास व परी आता विभक्त झाली. सुधास आजही तिची त्याच जोमाने वाट पाहत आहे. मात्र परी चिमणी आता दुस-याचे घर ठाटते आहे. काय मग ह्यालाच जीवन म्हणावे ? असा प्रश्न मनात घेवुन आस लावुन आजही तो तिची वाट पाहत आहे. तर परी त्याला कधी विसरु ह्याचा ध्यास धरत आहे.मात्र तीला त्याला विसरण येवढ सोप नाही कारण चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही. चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही.

प्रेम हे असेच असते..



एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. एके
दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू
... मला सोडून,,उडून तर जाणार नाही ना? ...
...तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर
तू मला पकडून घेशील... चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर
शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन
चिमण्याचे डोळे भरून आले.. त्याने आपले पंख छाटून
टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर
ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू... ... ... एके दिवशी जोराचे वादळ
सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत
नव्हता.. चिमणी मात्र..
तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे
सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मरून
पडला होता.. बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये..
फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर
कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू
शकले नसते...
प्रेम हे असेच असते.....♥

फक्त तू

फक्त तू
 जिच्या नावाचं जप करतो ती आहेसं तू.
जिच्या येण्याची वाट बघतो ती आहेसं तू
जिच्या नजरेत हरवून जावसं वाटत ती आहेसं तू
जी माझ्या स्वप्नात येते ती आहेसं तू
फक्त तू आणि तूच

माझ्या मनांतली राणी आहेसं तू
माझें मन जिच्यामुळे चलबिचल होत ती आहेसं तू
अप्सरान मधील अप्सरा आहेसं तू
जीवनातील प्रेमाचं किरण आहेसं तू
फक्त तू आणि तूच

देवा कडे जिचा हांत मागतो ती आहेसं तू
माझ्या घरांमध्ये जिच स्थान बघतो ती आहेसं तू
मित्रांमध्ये जिचा नाव सारखं घ्यावसं वाटत ती आहेसं तू
जिला बघून जगावस वाटत ती आहेसं तू
फक्त तू आणि तूच

कल्पनेतली परीच ती

कल्पनेतली परीच ती
ठाउक नाही कशी ती दिसते
अशी ती असते,
कल्पनेतुनी वास्तवात येई
तशी ती कधीच नसते...

वेळी-अवेळी पाउस पडता
आनंदाने सदैव भिजते
अशी ती असते,
भिजता-भिजता
वाहून जाई
तशी ती कधीच नसते...

मदतीस तयार परांच्या
मेणापरी जळुनी थिजते
अशी ती असते,
थिजता-थिजता
उरुन जाई
तशी ती कधीच नसते...

रात्रीस फुलांच्या कुशीत
चिरनिद्रेस ती निजते
अशी ती असते,
निजता-निजता
स्वप्नात विरून जाई
तशी ती कधीच नसते...

उंच अवकाशी उड़ता
क्षणात काळ्या मातीत रूजते
अशी ती असते,
रुजता-रुजता
उमलणे विसरुनी जाई
तशी ती कधीच नसते...

कल्पनेतली परीच ती
वास्तवात कधीच नसते...
वास्तवात कधीच नसते...

असंच राहू दे ना आपलं नातं

                           असंच राहू दे ना आपलं नातं....
                     त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

                        असंच राहू दे ना आपलं नातं
                   त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;

                    आहोत ना एकमेकांसाठी खास
                        मग एकमेकांना घाव नको देऊया!

                   द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,
                   कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल

             हृदयामध्ये थोडी अशी जागा -
              जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,                                                                                              
              तुझ्या सोबतीने    बसता येईल
                 पण ज्या छळतील आपल्याला
                अशा आठवणींचा गाव नको देऊया,

            असंच राहू दे ना आपलं नातं ,
          त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

                 प्रेमात नेहमी दुःखच असते .
          मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया

                         प्रेम आहे न दोघात हे
                       आपल्या नजरेला कळू दे ना

                      असंच राहू दे ना आपलं नातं
                     त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

प़ेम साठवुन ठेवल होत..

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत..

"सचिन-क्रिकेटचा राजा...

२४ एप्रिल ला झाला एकाचा जन्म..
वातावरणही जणू सारे झाले होते दंग...

मुलाच्या त्या आगमनाने
घर सारे खिलले होते...
जणू सारे देवही त्याच्याच आगमनाची
वाट ते पाहत होते...

होता त्याचा जन्म फक्त
एका गोष्टीसाठी...
क्रिकेटला आपण सर्वस्व द्यायचे..
ठरवुनी मनी ते ध्येय आपले तो गाठी...


"सचिन" असे म्हणतो आपण..
आहे तो क्रिकेटचा राजा...
धारधार खेळाने आपुल्या...
वाजवतो तो सर्वांचा बेण्ड बाजा...

नाही भीती त्याला ...
समोर असलेल्या बॉलरची...
करुनी चौकाराची आतषबाजी..
पाहतो पकड आपण त्याच्या खेळाची...

नवोदितानाही खेळात प्रेरणा तो देई..
पाहताना खेळ त्या राजाचा..
मन हि आपले हरपुनी जाई...

आहेत सारे विक्रम खेळातले..
या राजाच्या नावावरती...
धावांचा हि डोंगर पाहता..
भल्या भल्यांचे डोळे फिरती...

क्रिकेटचा बादशहा तू
असाच धावांचा पाउस पडत राहा..
नाही फिकीर वयाची आपल्याला..
राजा तू असाच बहारत राहा...असाच तू बहारत राहा...

जेव्हा काही चुकत असेल

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......
तुला आठवेल बरोबर असलेल....
जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल वार्याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला..........
जेव्हा तू झोपली असशील .........तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला.........

जेव्हा तू एकट असशील तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला.........
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....
माझ तस अस्तिव हि नाही......
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....
तुझे अश्रू बनून......
तुझ्या वेदना घालवायला.......

तुला खूप मिस करतो

तुला काय वाटल,तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,तसा काय मी रागावू शकत नाही!!
तुझ्या आठवणीतडोळे माझे नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस, तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!
तू नेहमीच बरोबर होतीस,माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,
कारण.. देव माझ्याशी नेहमीच चांगला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!
लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त
पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही  तुला खूप मिस करतो ..♥♥♥

व्हायचंय मला

आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशील
त्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील.
तुझ्या केसात फिरणारा तो वारा व्हायचंय मला ...!!!


तुझ्या सुंदरतेला शृंगाराची गरज नाहीयेय,
तरीही आरशात उभी राहून स्व:ताचं ते रूप न्ह्याहाळशील
तुझे रूप हक्काने पाहणारा तो आरसा व्हायचंय मला ...


बाहेर जाशील तेव्हा अंगाला अत्तर लावशील,
तुला पाहून घायाळ होणारे आधीच खूप आहेत,
त्यात ते अत्तर लावून अजून भर घालशील.
तुझ्या जवळ सुगंधाने दरवळनारं ते अत्तर व्हायचंय मला ...


पावसाचा एखादा थेंब अचानक टपकन तुझ्या अंगावर पडेल
तुझ्या अंगावर एक मस्त शिरशिरी येईल
हर्षाने तुझ्या अंगावर उभा राहिलेला तो काटा व्हायचंय मला ...


बसने जाताना खिडकीतून बाहेर बघशील
बाईकवर बसलेल्या जोडप्याच्या गोंडस बाळाकडे बघून खुदकन हसशील
तुझ्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य व्हायचंय मला ...


सगळी कामं झाल्यावर कधीतरी समाधानाने एका जागेवर बसशील
त्या शांततेत फक्त स्व:ताच्याच श्वास ऐकशील
ज्या श्वासाला तुझ्यासोबतचे इतके क्षण मिळालेत तो श्वास व्हायचंय मला ...


कधीतरी एकटे वाटेल,तुला माझी आठवण येईल
तेव्हा तुझ्या पापण्या ओल्या होतील
माझ्याच आठवणीने तुझ्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा तो थेंब व्हायचंय मला .

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय असतं ते
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली रस्त्यावरच्या प्रेमीयुगुलांना पाहताना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे!
अजुन वेळ गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोज करतच नाही.

मोबाईलचे विश्व

मोबाईलचे विश्व

मोबाईलने सर्व जगच बदलून टाकल आहे अस नाही का वाटत आपल्याला? मला तरी वाटत बुआ. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पूर्वीचे मोबाईल तरी बरे होते. फोन आला म्हणजे प्रत्येक मोबाईलवर एकच रिंग वाजायची. ट्रिंगग ग ग ग ग ग………अशी. मग मोबाईल क्रांती झाली. हि पण एक गम्मतच आहे बघा. हळू हळू जास् जसे जग प्रगती करत आहे तास तसे शब्दांचे अर्थ हि बदलत चालले आहे. पूर्वी क्रांती शब्द कानावर पडला की अंगातील रक्त सळसळायच. क्रांती म्हणजे एखादे युध्द डोळ्यासमोर उभ राहायचं. जसे १८५७ ची क्रांती. मध्यंतरीच्या काळात क्रांतीचा अर्थ थोडा सौम्य झाला. जसे एखाद्या सरकारी धोरणाला विरोध करायचा मोर्चा काढायचा म्हणजे क्रांती झाली असे वाटायला लागायचे. आणि आता त्याचा अर्थ पुर्णच बदलून गेलाय. प्रथम टी.व्ही. च्या क्षेत्रात क्रांती झाली. मग संगणक क्रांती झाली. मग मोबाईल आले. हळू हळू मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली. असो. विषय जरा भरकटलाय. क्षमा असावी.

तर आपण मोबाईलच्या क्रांती बद्दल बोलत होतो. तो पूर्वीचा ट्रिंगग ग ग ग ग ग…….चा आवाज झपाट्याने मागे पडला आणि ट्यून सुरु झाल्या आणि मग नवी क्रांती झाली आणि फिल्मी गाणे वाजायला लागले. जो पर्यंत ट्रिंगग ग ग ग ग ग……. होत तो पर्यंत काही वाटत नव्हत. पण जेव्हा ट्यून व गाणे वाजायला लागले तेव्हा मात्र गम्मत व्हायला सुरुवात झाली.

ती कशी असे विचारताय? ऐका तर मग.

एकदा एक मनुष्य एका मयतीत गेला होता. स्मशानात अंतिम क्रिया कर्म सुरु होते. तितक्यात ‘ व्हाय दिस कोलावरी दी’ ह्या गाण्याचे सूर ऐकू आले. एका मोबाईलची रिंग टोन होती ती. सर्वी मंडळी त्या आवाजाकडे बघू लागली. दु:खाचे वातावरण अचानक बदलले. पण ती जागा आनंदाची नव्हती म्हणून सर्व गप्प राहिले. कोणी तरी म्हणाल ‘अरे आपण कोठे आलो आहोत याचे तरी भान ठेवत चला जरा.’

झाल आता दुसऱ्याने विषय पुढे रेटून न्यायचे ठरवले आणि म्हणाला,’अहो बिचारा इतक्या दुखात होता की मोबाईल स्वीच ऑफ करायचा विसरला.’

तिसरा कोठे थांबणार होता. तो म्हणाला, ‘ते ठीक आहे हो, पण कमीत कमीत साईलेंट मोड वर तरी ठेवावा मोबाईल.’

चौथा इसम मोबाईल वरील रिंग वाजली होती तो होता. तो मनात म्हणाला , अरे बाप रे. ही चर्चा आपण कोठे आहोत याचे भान न ठेवता पुढे सुरुच आहे. शेवटी त्याने पुढाकार घेतला आणि म्हणाला, ‘ मी सर्वांची माफी मागतो आणि या पुढे माझ्या मोबाईलवर फक्त ट्रिंगग ग ग ग ग ग……. हीच रिंग टोन राहील याची काळजी घेईल. कृपा करून चर्चा थांबवा.’ तेव्हा सर्व गप्पा बसले. तर मंडळी असे आहे हे आधुनिक मोबाईलचे जग.....



मला आवडायला लागलास.

प्रिय

कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही. कारण शेवट कदाचित मला माहीत आहे. आपली फारशी ओळखही नाही अजून. परंतु, तू मला आवडतोस. धक्का बसला ना?यापेक्षा जास्त धक्का मला स्वतः: ला बसला होता, जेव्हा मला हे जाणवलं, की तू मला आवडायला लागलास.

हे कसं झालं, त्याचा शोध मी स्वतः:च घेत आहे. बॉटनीच्या त्या पेपरमध्ये तू केलेली मदत... त्यानंतर वारंवार आपलं भेटणं.. याचा कधी असा परिणाम होईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं...

हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........ तुला माझ्या बद्दल असं काही वाटतं का? ए खरं सांग ना प्लीज..... मला ना तुला हे सारं काही सांगायचं आहे, तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे.... पण
आता त्याच स्वप्नात तू मला रात्रभर छळतोस.. परवा तर आई म्हणत होती, का गं आज काल जरा जास्त अभ्यास करतेस का? मी म्हटलं का? ती म्हणे आज काल रात्री झोपेत बडबडतेस ती? मला एकदम धस्स झालं. काय बडबडत असेन मी? बापरे तुझं नाव घेत असेल का? आईने ऐकले तर बोंबलंच सारं!

मला तुझ्या बद्दल हे जे काही वाटतं, त्यालाच प्रेम म्हणतात का? मला एकवेळ वाटलं, ज्या प्रमाणे मला अमीर खानही आवडतो, तसंच काही हे असेल.. पण नाही मी अमीर खानचा फोटो न पाहता आठवडा काढू शकते, पण मग तू, तू जर कॉलेजमध्ये दिसला नाहीस तर मग मला काय होतं, लेक्चरमध्ये तर लक्षच लागत नाही प्रॅक्टिकलमध्येही गडबड होते. परवा सरांच्या बऱ्याच शिव्या खाल्ल्या मी, या कारणांवरून. मी काय करतेय तेच मला कळत नव्हतं. मग मी विचार केला, आणि मला जाणवलं, तू नाही आलास ना आज? म्हणून कदाचित असं होत असेल.

आज तिसरा दिवस आहे, तू भेटला नाहीस.. म्हणून मी चक्क तुला हे पत्र लिहितेय.. (प्लीज अक्षरांना पाहून हसू नकोस) आणि मराठीच्या चुका तर मुळीच काढू नकोस. माझं हे अक्षर असंच आहे, आणि मराठीही.

पण मला असं का होतेय? लक्ष लागत नाही, झोप येत नाही, तुझी नुसती आठवण जरी आली, तरी गझल ऐकावी वाटते? का?
हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........ तुला माझ्या बद्दल असं काही वाटतं का? ए खरं सांग ना प्लीज..... मला ना तुला हे सारं काही सांगायचं आहे, तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे.... पण तू भेटतोसच कुठे आज- काल? आणि कॉलेजला आल्यावरही चटकन निघून जातोस हल्ली. ए काय झालंय तुला? प्लीज कदाचित माझ्याशी हे सारं शेअर केल्यावर तुला बरं वाटेल?

तुझ्या उत्तराची वाट पाहतोय

प्रेमपत्र
प्रिय

खरं तर मला हा अधिकार आहे का नाही, हे ठरायचे आहे. तरी मी तुला प्रिय म्हणतो. कारण यानंतर तो कदाचित मला अधिकार मिळू शकेल, किंवा मिळणारही नाही. म्हणूनच प्रिय......

मी यापूर्वी कधीच असे पत्र लिहिलेले नाही. कदाचित इतक्यांदा मला प्रेम झाले नसेल, किंवा तुला आता पत्र पाठवण्याची हिच योग्य वेळ असेल म्हणून. म्हणूनच मी तुला हे पत्र लिहितोय.

गेल्या चार वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. आपल्यात चांगली मैत्री आहे. नकळत दररोज एकमेकांना आपण भेटतो, आणि एसएमएस, नेट चॅटींगही करतो. जोपर्यंत आपण एकत्र असतो, तोपर्यंत एक वेगळाच आनंद माझ्या मनाला स्पर्श करत असतो. तो मी आता पत्रांतून मांडू आणि सांगू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.

पण आज अचानक तू, नाही मी, नाहीच मुळी, पावसाने तुझी आठवण करून दिली. मी खिडकी बाहेर डोकं काढलं, मला एक जोडपं जाताना दिसलं, आणि मला असा भास झाला, की, ते दोघे आपणच आहोत. आपलंच प्रेम या पावसाच्या टपोऱ्या थेंबांमध्ये एकमेकात गुंतत, एकमेकांना आधार देत, आणि एकमेकांच्या भावनांमध्ये चिंब भिजत जातेय. मला तुझी इतकी आठवण आली की चक्क, ते पावसाचे थेंब माझ्या पापण्यांना ओलावून गेले.

मन जड झालं, आणि एक विचित्र अस्वस्थता मला जाणवू लागली, वाटलं, आता सारी बंधनं तोडावीत, चटकन फोन उचलून तुला फोन करून मनातील साऱ्या भावना व्यक्त कराव्यात आणि सांगून टाकावं...... मला तू खूप आवडतेस.... इतक्याच वीज कडाडली. शुद्ध आली. वाटलं हे सारं मी केल्यावर जर तू नाही म्हटलंस तर....? तर मी ते एक्सेप्ट करू शकेल?

तुला माझ्या बद्दल काय वाटेल? तू म्हणशील यासाठी तू माझ्याशी मैत्री केलीस? यासाठी तू माझी इतकी काळजी घ्यायचास?
या प्रश्नांनी माझे दोन दिवस वाया गेले. आणि मग ठरवलं, काही झालं तरी तुला जे खरं आहे, ते सारे सांगायचे. अगदी सारे काही.......

एसएमएस पाठवण्याचे धाडस मी केले नाही, कारण त्यातून समज कमी परंतु गैरसमज जास्त होतात. आपण दोघांनीही ते अनुभवले आहे. नेटवरची चॅटींगही महाग आहे. बाबांना हिशोब द्यावा लागतो त्यात सारखे इंटरनेटवर पैसे खर्च केल्याचे दिसले तर बाबही रागावतात. मग सर्वात चांगले साधन म्हणजे पत्र. आणि म्हणूनच आज मी तुला या पत्रातून विचारतो आहे.

माझ्याशी लग्न करशील? नाही आता लगेच नाही. मी आता शिकतोय नं? मला नोकरी लागल्यानंतर आपण लग्न करूयात. तुला हे सारे वाचून जरा विचित्र वाटेल परंतु प्लीज मला समजून घे. हे पत्र वाचल्यानंतर तुला जर राग आला तर प्लीज.. प्लीज मला तू सांग. हवं तर शिव्या दे, माझ्यावर रागव, पण अबोला धरू नकोस..

तुझा नकार एकवेळ मोठ्या मुश्किलीने मी पचवू शकेन गं, पण तुझा अबोला, तो नाही माझ्याच्यानं सहन होणार........
तुझ्या उत्तराची वाट पाहतोय.............

तुझी फ़ार आठवन येते

खरच विश्वास नाहि मला
हेच ते डोळे आहेत का?जे मला नेहमी टाळायचे
तेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत !
हा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय…

नक्किच i can fill that

जेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणताना
हळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला
तुही माझ्या प्रेमात पडली आहेस !

खरच मला नाहि अजुन विश्वास
तु कित्ति गोड हसतेस हल्लि…
मध्य रात्रिचे तुझे sms वाचताना
मन माझ कित्ति आनंदि असत !

i m just falling into love.........i m just crashing into love

मी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे?

का तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुन मला त्रास दिलास…
पन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कि तुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान !

खरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन
आलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ !

काय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना…
तुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा…
तुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते !

राणी तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गाली
तुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला…!

राणी ये ना लवकर ….

तुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे …!
तुझी फ़ार आठवन येते

मी तूझी वाट पाहतोय

कस सांगु तुला तु माझ्यासाठी काय आहे..........
कस सांगु तुला तु माझ्यासाठी काय आहे
श्वासा शिवाय कदाचित
मी काही क्षण जगू शकेन
पण तुझ्याविना नाही
तु! हो तुच पहीली मुलगी आहेस ,
की जिला मी जिवापेक्षा जास्त प्रेम केल.
आज पण जेव्हा मी मंदीरात जातो
हे वेड मन तुझ्यासाठीच
काही ना काही मागण देवाकडे मागत असत
माझी अवस्था त्या बिना पाण्या शिवाय
तडफ़डना-या माशा सरखी झालिय
माहीत आहे तू येणार नाही तरीही....
हे तारे तुटुन जातील ,
हा सुर्य विझुन जाईल
पण आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत
शेवटच्या श्वासापर्यंत मी तूझी वाट पाहतोय
मी तूझी वाट पाहतोय ...........

प्रेमाचे क्षण....

जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात, त्याची गणती नसते. पण गणतीत न बसणारे तुझ्यासारखे क्वचितच असतात. क्षणभुंगर जीवनात प्रत्येक जण जगायचा असतो आणि मी तुझ्या सहवासात तो जगत आहे. तुला पाहिलं, तेव्हापासून एक अनामिक ओढ लागली. तुला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा मनात घर करू लागली. पण नेमक्या शब्दात मांडता येत नाही... कोणत्याही नात्याची सुरुवात प्रथम मैत्रीतूनच होत असते. मी त्याला आवडते, हे त्याने जरी प्रत्यक्ष व्यक्त केलं नसलं, तरी त्याच्या डोळ्यातील भाव खूप काही सांगून गेले. शब्दाविना झालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचला अन् स्वर्गसुखाचा आनंद मिळाला. त्याला 'आय लव्ह यू' हे शब्द फार बोथट, उथळ वाटतात. त्याची भावना तीन शब्दात मावणारी नव्हती. आमचं प्रेम फार समंजस आहे. त्यातही समान प्रेम देण्याची आणि घेण्याची वृत्ती असल्यामुळे ते अधिकच दृढ झालंय. माझा छोटासा आनंद, दु:ख मी तुला सांगावं अन् तू मला ते समजवून सांगावंस, असं वाटतं. तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणूनच तर तुझ्यापासून दूर राहावंसं वाटत नाही. पण या अशा समंजस प्रेमात माझ्याकडून एक चूक घडली. ती म्हणजे, दुसऱ्याच्या बोलण्यावरून त्याच्यावर संशय घेतला. तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. कारण जसं कोणतंही नातं विश्वास, आपुलकीवर आधारलेलं असतं, तसं आमचंही आहे. चूक उमगल्यावर फार पश्चात्ताप झाला. त्याबद्दल माफी मागते. तू आधी कविता वगैरे करायचास, ते आज बंद केलंस, याचं वाईट वाटतं. कारण कवितांच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, सुखदु:ख व्यक्त करत असतो. माणसाने वेळात वेळ काढून आपला छंद, कला जोपासायला हवी. म्हणून तू पुन्हा कवितेच्या विश्वास रमून मन प्रफुल्लित ठेव, हीच माझी इच्छा आहे. दूर राहूनही तुझी साथ मला हवी आहे... देशील? प्रेमाने ओतप्रोत भरलेले शब्द साठवून माझं ध्येय गाठायचंय. त्यासाठी बळ मला तुझ्याकडून हवंय... देशील ना? प्रेमात बंधनं, मर्यादा काही स्तरावर असाव्यात, कारण ती अंतरीची ओढ असते. जमेल तसं घ्यायचं अन् जमेल तसं द्यायचं असतं. पण त्याच्यासाठी एक जिवंत मन असावं लागतं. प्रेमाचे क्षण वेचायला आणि टिपायला, हो ना?

येशील ना साथी ?

तुला पाहिलं आणि प्रेम या शब्दाचा अर्थ समजला. प्रीतीचं फूल तुलाच अर्पण केलं. तुझ्या त्या पहिल्याच प्रेमळ नजरेच्या दवबिंदूत भिजून गेले मी आणि मग कळलंच नाही , की कधी तुझ्यात इतकी गुंतले मी! तुझ्याही मनाच्या प्रीतबागेत प्रीतीचा केवडा फुलला होता आणि मी तर तुझी राधा झाले होते. पण... पण का कुणास ठाऊक , तू माझ्यावरील प्रेम व्यक्तच केलं नाहीस. मी मात्र प्रीतीच्या शांत किनाऱ्यावर तुझ्या होकाराच्या प्रतीक्षेत बसून राहिले. आपलं प्रेम अबोलच , तरीही ते एकमेकांच्या मनाला जाणवत होतं. म्हणूनच तर... तू वळून पाहिलंस. तुझा तो एक दृष्टिक्षेप... त्या क्षणाला वाटलं. तू फक्त माझा आहेस. फक्त माझा. मी धावले तुझ्या मिठीत विसावण्यासाठी. वाटलं , की विरघळलास माझ्यात तू. पहिली मी आणि नंतर तू असं आपलं वेगळं अस्तित्व आता उरलेलं नाही. पण...तो निव्वळ माझा भ्रम होता. माझ्या हातात गवसली , ती फक्त तुझी सावली. तीही सूर्यास्तानंतर माझ्या हातून निसटली रे..! माझी ओंजळ रिकामी ती रिकामीच. ते दिवस मात्र मोरपंखी होते. आरशात चेहरा पाहताना भाळी लावलेला चंद कसा दिलखुलास हसायचा. केसात माळलेला गजराही मग लाजायचा. मन पाखरू झालं होतं. तुझ्याच अवतीभोवती ते रुंजी घालत राहायचं. आता मात्र... सारंच चित्र बदललंय. आता पूवीर्सारखे गुलाब आवडत नाहीत मला. रातराणीच आवडते. कारण रात्रभर तीच एक सोबत देते. माझ्या माळ्यावरचा चंदही रुसलाय. तुझ्या आठवणींची रोज मैफल भरते आणि डोळ्यांतून श्रावणसरी बसरते. तरीही मनात एक आशा सूयोर्दयाबरोबर जन्म घेते. अजूनही वाटतं , की तू येशील. ओल्याचिंब देहानेच मला कवेत घेशील आणि म्हणशील , ' फक्त तुझ्यासाठी आलोय. तुझी प्रतीक्षा संपली. आपण एक प्रेमनगर वसवू. माझी हृदयस्वामिनी आहेस तू. ' माझ्या स्पर्शाचा नाजूक गुलाब टिपशील तू एखाद्या गुणगुणाऱ्या भ्रमरासारखा. माझ्या केसातील गजराही लाजेल. माझ्या माळ्यावरील चंदही हसेल पुन्हा. आपलं अबोल प्रेम बहरेल , फुलेल. मला अजूनही वाटतं. तू परत येशील , आपल्या अबोल प्रेमाला शब्दांचं दान देशील. येशील ना साथी ?

झुरण्यात काय मजा आहे.

माझ्या मनातील प्रत्येक भाव तू ओळखला आहेस. तुझ्यापासून काहीच लपून राहिलेलं नाही. तुझ्याही मनात माझ्याबद्दल प्रेम, आस, कोमल भावना आहे. माझ्याही मनात तेच आहे. तरीही आपण दूर आहोत. का? कशासाठी? या भेकड समाजासाठी की या समाजाला घाबरणाऱ्या आपल्या आईवडिलांसाठी? कुणी बनवला हा समाज? आपणच. मग याला का घाबरायचं? तुझी आणि माझी जात वेगळी आहे, म्हणून आपण दूर-दूर राहायचं? मला नाही पटत हे सगळं. खरं सांगू, हे सगळं मी तुच्छ मानते. या जगात सर्वश्रेष्ठ मैत्री आणि प्रेम या दोनच गोष्टी खऱ्या आहेत. त्या नि:स्वाथीर् असतात आणि जर या गोष्टी नि:स्वाथीर् नसतील, तर त्या खऱ्याही नसतात. तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी बरंच काही शिकले. प्रेम सगळं शिकवतं, असं म्हणतात ना, ते खरं असल्याचं मी अनुभवलं. तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं. सहनशील, स्वतंत्र विचारसरणीचं नम्र व्हायला लावलं. स्पर्शाशिवायही आधार देता येतो, याची तुला उत्तम जाणीव आहे. तुझा बोलका चेहरा सतत माझ्यासमोर असतो आणि तो पाहून माझी लेखणीही उत्तर देऊ लागते. तुझं ते गोड हसणं पाहून कुणी फिदा नाही झालं, तरच नवल. तुझा खेळकर स्वभाव कुणालाही आपलंसं करतो. तुझ्या शुद्ध आणि नि:स्वाथीर् हसऱ्या-गोड स्वभावामुळेच मी तुझ्यात कधी गुंतत गेले, कळलंच नाही. कदाचित आपलं प्रेम मोठ्यांच्या नजरेत चुकीची गोष्ट असेल. पण प्रेम करताना मी त्यांची परवानगी घेतली नव्हती. आताही मी घाबरत नाही. तुझा स्वभाव 'मोडेन पण वाकणार नाही,' असा आहे. मग आपण चुकत नसलो, तर भीती कशाची? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे गोड क्षण येतात. ते लग्नाआधी आले, तर त्याला मान्यता मिळत नाही. का? ते मलाही माहीत नाही. पण मला इतकं नक्कीच ठाऊक आहे, की तू माझा आहेस... फक्त माझा! आयुष्यात प्रत्येकाने एकदा प्रेम केलंच पाहिजे, लोकं म्हणतात, प्रेम ही एक सजा आहे, पण त्यांना कुठे ठाऊक असतं, की झुरण्यात काय मजा आहे...

- फक्त तुझीच,

तुझी मैत्रीण

प्रेम ही कल्पना मनाला स्पर्शून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात. माझी व्याख्या वेगळी आहे. एकमेकांना समजून घेतलं, विश्वास ठेवला, विचारांची तडजोड केली, तरच संसार सुखाचा होतो. मी तुझ्यावर प्रेम केलं. तुला समजून घेतलं, तुझ्यावर विश्वासही ठेवला. तुला मी आवडत होते, तर का तुला असं वाटलं, की आपलं प्रेम संपवून टाकू या? केवळ ग्रुपमधल्या मैत्रिणी तुला काहीतरी बोलल्या आणि तू मला सोडण्याचा निर्णय घेतलास. असं का वागलास? काय कारण होतं, माझं प्रेम तोडण्याचं? का मला टाळत होतास? हे सर्व प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत. मी तुला विचारलंही, पण तू मला टोलवाटोलवीची उत्तरं दिलीस. म्हणून यापुढे तुला प्रश्न विचारणार नाही. तू स्वत:हून सांगशील, याची वाट बघेन. प्रेम तोडण्याचं कडू विष मला प्यायला लावलंस. पण तू सुखात राहावंस, एवढीच माझी इच्छा आहे. शैलेश, तुला आठवतात, आपण सोबत घालवलेले दिवस? 14 फेब्रुवारी 2004 ते 26 ऑक्टोबर 2004 हे माझ्यासाठी अनमोल क्षण आहेत आणि यापुढेही असतील. आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत. तुला वाटत असेल, की मी खोटं बोलते. पण यातला शब्दन्शब्द खरा आहे. माझ्या आयुष्यात तुला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे तुला माहीत नाही. माझं प्रेम खरं आहे रे तुझ्यावर. मला तुझी मैत्री गमवायची नाही. प्रेमाआधी जी मैत्री होती, ती मला हवी आहे. मनातलं सर्व काही तुला सांगितलं असतं, पण कदाचित तू ऐकलंही नसतंस. एकाच ग्रुपमध्ये राहून तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही ना! म्हणून माझ्या मनातला भावना तुला पत्राने कळवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व मी तुझ्यासाठीच केलं. मी तुझ्यातला प्रियकर गमावला. तुझ्यातला मित्र गमवायचा नाही. तू सांगशील, ते मान्य करेन, पण माझ्याशी मैत्री तोडू नको. ही मैत्री निर्मळ, निखळ असेल. प्रेमाचा एकही विषय मी काढणार नाही. तू सुखात राहा, हीच प्रार्थना मी रोज करते आणि करत राहेन. तुला कधीच विसरू शकत नाही. ज्याला आपण विसरतो, त्याची आठवण येते. तू नेहमी माझ्या मनात राहतोस. तुझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. म्हणून तर प्रेम संपवून टाकलं, तरी तुझी मैत्री नाही संपवली. तुला माझ्या या भावना कळल्या, तर मी सर्व काही जिकलं. माझं प्रेम आजही तूच आहेस, उद्याही तूच राहशील, तू माझ्यासोबत राहा किंवा नको राहू, आयुष्यभर तुझ्या आठवणी माझ्यासोबत राहतील. प्रेम करते तुझ्यावर, तिरस्कार करू नकोस, आयुष्यात माझ्याशी कधीही बोलणं सोडू नकोस. सर्व सहन करेन मी, पण तुझा अबोला नाही. सदैव सुखात राहा, आयुष्यात पुढे जात असताना एकदा तरी मागे वळून पाहा. उभी असेल तिथे फक्त तुझी मैत्रीण, मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.-

तुझी मैत्रीण,

'रुक्मिणी' व्हायचंय मला...

प्रेमात पडणं वगैरे सब झूठ असतं, असं मानणारी मी. आजूबाजूला गळ्यात गळे घालून फिरणारी प्रेमी युुगुलं पाहिली, की हा माझा मार्ग नव्हे, असं मानणारी मी. एकाच कंपनीत काम करताना सुरुवातीला तुझ्याशी तुटकपणे, जितक्यास तितकं वागणारी मी... तू कधी माझ्या हृदयाचा ताबा घेतलास, हे मात्र कळलंच नाही मला! ' मैत्रिणीकडे संत्र्याच्या झाडाचं बोन्साय पाहिलं. एवढ्याशा कुंडीतल्या झाडावर केवढी तरी संत्री लागलेली होती. मोठ्या उत्साहात मी तुला सांगितलं. त्यावर एकदम उसळून तू म्हणालास, 'बोन्साय? छे, मला नाही आवडत हे असले प्रकार. माणसाच्या फायद्यासाठी केलेलं क्रौर्य आहे हे. अगं, झाडांनाही मन असतं. मुक्तपणे त्यांना वाढू द्यायचं. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली, तर किती राग येतो आपल्याला! तसाच त्यांनाही येत असेल. पण ती झाडं बिचारी बोलू नाही शकत. जे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, अशांच्या भावना आपण जाणून घेऊ शकत नसू, तर माणूस म्हणायच्या योग्यतेचेच नाही आपण!' छोटीशीच घटना, पण झाडांच्याही भावना समजून घेणारं तुझं तरल संवेदनशील मन मला अगदी खोलवर आवडून गेलं. माझ्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुला सांगितल्याशिवाय मग मला चैनच पडेनासं झालं. एखाद्या दिवशी मूड नसेल, तर काहीतरी जोक्स सांगून तुझं हसवणं, रागावणं, रुसणं हे सारं मला आवडू लागलं. मला म्हणायचास, की डोळ्यांनी बोलायला शिक. प्रत्येक गोष्ट शब्दात सांगता येत नाही. तुला ती कला चांगलीच अवगत आहे. माझ्या डोळ्यांनी मात्र माझ्याही नकळत माझ्या मृदू भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या असाव्यात. तुझ्याबद्दलच्या भावनांचा माझ्याआधी तुला सुगावा लागला. पण त्या वेळेपासून तू स्वत:ला अलिप्तच ठेवायला लागलास. राधेने श्रीकृष्णाला 'निमोर्ही' असं म्हटलं होतं. दुसऱ्याला आपल्या मोहात पाडायचं आणि स्वत: मात्र कमलदलाप्रमाणे अलिप्त राहायचं. तसंच काहीसं मला तुझ्याबाबतीत वाटू लागलंय. मला माहीत आहे, जात-वय यासारख्या समाजाने घातलेल्या बंधनांमुळे आपण नाही एकत्र येऊ शकत. पण प्रेमात काय आणि युद्धात काय, सारं काही क्षम्य असतं, असं म्हणतात, ते खोटंच म्हणावं लागेल. कुठेतरी वाचलंय, की प्रेम हे प्रतिध्वनीसारखं असतं. जितक्या तीव्रतेने तुम्ही एखाद्यावर प्रेम कराल, तितक्याच तीव्रतेने ते तुमच्याकडे परत येईल. पण ज्याअथीर् ते माझ्याकडे परत येत नाहीय, त्याआथीर् मी असं समजेन, की माझ्याकडून तितकं प्रेमच केलं गेलं नसावं... पण... हेही खरं मानायला माझं मन तयार होत नाही. आता असं वाटतं, की उगीचच आपली भेट झाली. उगीचच इतकी ओळख झाली. या जन्मी जर शक्य नसेल, तर निदान पुढच्या जन्मी तरी असं राधा नाही... 'रुक्मिणी' व्हायचंय मला!-

एक अशी व्यक्ती येते

आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते, की ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो. जास्त विश्वास आपण त्याच्यावरच ठेवतो. तसाच माझ्या आयुष्यात गौरव आला. त्याला पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये पाहिलं आणि मैत्री करावीशी वाटली. फ्रेण्डशिप डेच्या दिवशी मैत्रीही केली. असं वाटायचं, की फक्त त्याला बघत बसावं. त्याचा हास्यचेहरा बघून मला अनोखा आनंद व्हायचा. पण त्याच्याशी बोलण्याची हिंमत व्हायची नाही. फक्त त्याचाच विचार करावा, त्याच्याशिवाय सोबत कोणीही नसावं, असं वाटायचं. मनातलं हे गुपित माझ्या मैत्रिणींना सांगितलं आणि त्यांनी ते जाऊन गौरवला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही मला. या गोष्टीचं काहीच दु:ख नव्हतं. कारण त्याच्या जागी मी असते, तर माझंही उत्तर तेच असतं. ज्या व्यक्तीशी मी फक्त मैत्री केली आणि ज्याच्याबरोबर फारसं बोललेही नाही, त्याला पटकन 'हो' सांगणं कठीण आहे. तरीही मी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याला एक दिवस पाहिलं नाही, तर 'मी कॉलेजला का आले,' असं वाटायचं. त्याच्याशिवाय माझ्या मनात दुसरा कुठल्याच मुलाचे विचार येणं शक्य नाही. काही दिवसांनंतर गौरव आमच्या वर्गात येऊन बसायला लागला. नेहमी मागे वळून आमच्या बेंचकडे पाहायला लागला. त्याचं ते पाहणं, आमची नजरानजर झाल्यावर त्याच्या मित्राकडे बघून बोलणं, पुन्हा बोलता बोलता माझ्याकडे पाहणं असं त्याचं वागणं यातून माझ्या मनात त्याच्याबद्दल आणखी प्रेम वाढलं. त्याच्या काही मैत्रिणी माझ्या वर्गात आहेत. त्यांच्याकडून गौरवबद्दल आणखी काही माहिती मिळाली. मला हे समजलं, की गौरवचं कोणत्याही मुलीबरोबर प्रेमप्रकरण नव्हतं. तो मैत्रिणींशी फक्त मैत्रीच्या नात्याने बोलतो. त्याचे आईवडील जी मुलगी शोधून देतील, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचंय, हे ऐकून माझ्या मनात गौरवसाठी जी इज्जत होती, ती अधिक वाढली. जो एका मित्राचं आणि मुलाचं कर्तव्य इतक्या चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो, त्याला चांगली व्यक्ती म्हणता येतं. प्रत्येक मुलगी हेच स्वप्न पाहत असते, की तिचा जोडीदार चांगला असावा. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. गौरवशी बोलण्याचा प्रयत्न माझा सुरूच होता. पण तो समोर आल्यावर माझ्या तोंडातून शब्द निघत नाहीत. त्याचं ते तिरप्या नजरेने पाहणं मला अस्वस्थ करतं. त्याचं त्याच्या मैत्रिणींशी जास्त बोलणं पाहून मला खूप वाईट वाटायचं. माझा उदास चेहरा पाहून माझ्या मैत्रिणीने त्याला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही. तो माझ्यावर प्रेम करत नसेल, तर? नसो, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते, करते आणि करत राहणार. म्हणतात ना, खरं प्रेम असलं, की ती व्यक्ती स्वत:हून आपल्याकडे येते... माझं मन आजही त्याला पाहण्यासाठी, बोलण्यासाठी व्याकूळ झालेलं असतं. गौरव स्वत:हून माझ्याजवळ येईल, त्या क्षणाची मी वाट बघतेय. या जन्मी गौरव माझा झाला नाही, तर देवाला मी सांगेन, की पुढच्या जन्मी माझा साथीदार फक्त गौरव असावा...

येशील ना?

आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते. याआधी रोजची संध्याकाळ अशी कातर नव्हती. आता वेळ जाता जात नाही. पण सांगणार तरी कसं? तुला तर थांगपत्ताही नाही. तू आपला बेफिकीर, स्वच्छंद, आपल्याच मस्तीत असतोस. जगाकडे लक्ष द्यायला तुला वेळ कुठाय? ' मला 'नाही' ऐकायची सवय नाही,' हा तुझा हेका आणि जे हवंय ते मिळवायचा अट्टहास. माझे नियम वेगळे आहेत रे तुझ्यापेक्षा. तुझ्याइतकं फायदा-तोटा बघून नाही वागता येत मला. त्या क्षणाला जे वाटतं, ते करून टाकते मी. एका अर्थाने मीसुद्धा स्वच्छंदी आहे. पण तुझ्यासाठी तेवढीच हळवी, केअरिंग आहे. आजकाल 'मैंने प्यार किया'चं टायटल साँग मी अगदी तन्मयतेने ऐकायला लागलेय. स्वप्नात रमणं आवडतंय. कधीतरी अगदी खुश होऊन नाचावंसं वाटतं. बासरीच्या सुरांवर डोलावंसं वाटतं. कधी अचानक बेचैनी जाणवायला लागते, डोळे भरून येतात. इतक्या सहज माणूस प्रेमात पडतो? तू कधी प्रेम केलंस कुणावर? इतकं सुंदर, आश्वासक फीलिंग दुसरं कुठलंही नसेल. माहितीय, तुला सांगणं मला कधीच जमणार नाही. भीती वाटते, कुणी दुसरीच आवडत असेल तुला तर? नाही सहन होणार मला ते. त्यापेक्षा हे सीक्रेट माझ्यापुरतं राहूदे. फक्त माझ्यापुरतं! मनोमन वाट बघत राहेन तुझ्या विचारण्याची. पण नाहीच विचारलंस, तरी चालेल. रिमझिम पावसात भिजताना तू आठवतोस. असं वाटतं, आता अचानक मागून छत्री घेऊन येशील. 'किती भिजतेस?' असं म्हणून दटावशील आणि माझ्या हातात गरमागरम कॉफीचा कप ठेवशील. बघ, माझी मनोराज्य सुरू झाली. माझा आतला आवाज सांगतो, की तू कधीतरी येशील. मी दर पावसाळ्यात तुझी वाट बघेन. येशील ना?

आय लव यू.

प्रिय सुनील,
' साया सा कोई आए, तो लगता है की तुम हो, आहट सी कोई छाए, तो लगता है की तुम हो!' तुझी आठवण येत नाही, असा एकही क्षण नाही. सध्यातरी डोळे बंद केले किंवा आरशात पाहिलं, तरी तूच दिसतोस. तू कधीही येतोस मनात आणि मन तुझ्या आठवणीत गुंतत जातं. तुझा चेहरा डोळ्यांसमोर तरंगत राहतो. क्या यही प्यार है? तसं तुला बऱ्याच वर्षांपासून पाहतेय मी. तुझ्यामुळेच सकाळी लवकर उठायची सवय लागलीय मला. शेजारच्या बिल्डिंगमध्ये रोज येतोस पेपर टाकायला. दिवसा दुसरी नोकरी करतोस. पटकन एक चोरटा कटाक्ष टाकते तुझ्यावर. ज्या जागी सायकल लावतोस, तिथे निरखून पाहते. तू नक्की केव्हापासून आवडायला लागलास, हे सांगण कठीणच आहे. अचानक एक दिवस तुला पाहून हृदयाची धकधक जोरात व्हायला लागली. तू खूप छान नाचतोस. तुझ्या डान्सची फॅन आहे मी. पण मला तुझ्या हव्यास नाही. आय थिंक, यू डिझर्व बेटर. कदाचित तुझ्या हातात एखादा हात असेलही. मनाची तयारी करून ठेवलीय मी. 29 सप्टेंबर हा तुझा बर्थ डे. सकाळी तू सायकल लावत होतास ना, तेव्हा मी मनातल्या मनात बर्थ डेचं गाण गात होते. फोन लावण्यापूवीर् मनात खूप काही बोलले. संध्याकाळी धीर करून नंबर डायल केला खरा. पण तुझा आवाच ऐकून शब्दच फुटेना. शेवटी 'हॅपी बर्थ डे' बोलून फोन ठेवून दिला. तुला नेहमी हसताना पाहायचंय. देवाकडे स्वत:साठी आनंद मागताना, तेवढाच आनंद आणि सुख तुझ्यासाठीही मागते. कधीतरी धीर करून तुझ्याशी नक्की बोलेन. तोपर्यंत काळजी घे. माझ्यासाठी स्वत:ची...आणि हो, महत्त्वाचं सांगायचं राहिलंय, की क्यँुकी इतना प्यार तुमसे करते है हम, क्या जानोगे हमारे सनम!, आय लव यू.......