Breking News

शनिवार, २१ मे, २०१६

.चारोळ्या

साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना,
 तु नसण्याचं शल्य कसं दाखवु.....

तुझ्या पासुन दुर होण,
माझ कोणतही पथ्य नाही....
कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन,
विरह सहन करण आता मला शक्य नाही....।।

प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का
पहा कधीतरी स्वताहून देता आल तर...
पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन
 बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर .

मनाला बांध घातला होता
हृदयातला पूर थोपवला होता..
पण डोळ्यांनी चुगली केली
होती अन आसवांनी दगा दिला होता.

कधि तू कधि मी
एकमेकांशी भांडू ....
राग ओसरल्यावर
मात्र पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू.....

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही..
बोललेल कोणाला आवडत नाही..
जवळ असलेलेच मग दूर होताना..
क्षणाचाही विचार करत नाही..

बोटांना माझ्या आता वेगळं
राहायला आवडत नाही ..
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय
त्यांना ही करमत नाही ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा