Breking News

बुधवार, ७ मार्च, २०१८

जेव्हा डॉक्टर देवदूत होतात!

धुळ्याचे डॉ.राहूल भामरेंनी दिले महिलेला जीवदान
तळोदा तालुक्यातील बोरद येथील एका महिलेस किडनीनजीक गाठ असल्याने त्यांना कुटुंबियांनी महाराष्ट्र व गुजरात मधील किडनी उपचार होत असलेल्या रुग्णालयात नेले होते. मात्र, सदर गाठ काढतांना शस्त्रक्रिया करावी लागणार असून यात किमान ६० ते ७० टक्के किडनी डॅमेज होण्याची शक्यता तेथील डॉक्टरांनी बोलून दाखविली. यामुळे नेमके काय करावे या विवंचनेत कुटुंबिय पडले होते. यावेळी धुळे येथील राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहूल भामरे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्यातील तज्ञ डॉ.सुभाष भामरे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स करून त्यांचा सल्ला घेऊन आपल्या
हॉस्पिटलमध्ये सदरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. किडनीला कोणतीही इजा न होऊ देता डॉ.भामरे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने डॉक्टरला खरच परमेश्वराचाच अवतार का म्हणतात, आम्हाला देवदूतच भेटला अशी भावना रुग्ण महिला व त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. . तळोदा तालुक्यातील बोरद येथील मनिषा दत्तात्रय पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना नंदुरबार येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, योग्य निदान न झाल्याने धुळे येथे राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहुल भामरे यांच्याकडे उपचारसाठी दाखल केले. यावेळी मनिषा पाटील यांच्या किडनीला लागूनच गाठ असल्याचे निदर्शनास आले. यावरत्यांचे पती दत्तात्रय पाटील यांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले व मुंबई, बडोदा, नडीयाद येथील किडनीतज्ञांकडे धाव घेतली. गाठीवर ६ सेमीचे फेरी नेफ्रिक मास्क असून गाठ मोठे आतडे व किडनीच्या मध्यभागी असल्याने शस्त्रक्रिया केल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता तेथील तज्ञ डॉक्टरांनी वर्तविली. काही केल्या किडनी निकामी होणारच या भितीने पाटील कुटूंबिय भयभीत झाले. त्यातच राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहुल भामरे यांनी दत्तात्रय पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शस्त्रक्रियेसाठी येण्यास सांगितले. कोणतीही इजा न होऊ देता शस्त्रक्रिया शक्य असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितल्यानंतर दत्तात्रय पाटील यांनी शस्त्रक्रियेसाठी होकार दिला. सदर शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी प्रगत तंत्रज्ञानामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सल्ल्यामुळे व डॉ.राहूल भामरे, डॉ.भूषण वाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी तीन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर किडनीला कोणतीही इजा न होता यशस्वी केली. यामुळे डॉ.राहूल भामरे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. डॉक्टर नव्हे तर देवदूत आम्हाला भेटले, अशी प्रतिक्रिया रुग्ण महिला व त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखविली..





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा