Breking News

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

उदार, दिलदार, सदाबहार मित्र बाप्या !

सुधाकर मराठे 
              काय म्हणावे तुझ्या मैत्रीला, देवाने दिलेली एक साथ सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारा माझे कितीही चुकले असेल तरी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार माझ्यावर येणाऱ्या संकटांचा पहिला वार अंगावर घेण्याची तयारी दाखवणारा मनाने अतिशय मोकळा सदैव माझी पाठ राखण करणारा असा देवरूपी दिलेला एक सखा म्हणजे प्रिय मित्र राकेश गुरव उर्फ बापू ...
       तुझी माझी पहिली भेट ही वयाच्या अवघ्या नऊ-दहा वर्षाचा असताना झाली तू काबाडकष्ट करून पतंग विकायचा तुटलेल्या पतांगाना जोडणी करायचा त्यावेळी मी तिथे पतंग घेण्यासाठी येत असे, त्यानंतर शालेय जीवनात आपली चांगलीच गट्टी जमली तू मला मित्र या नात्यापेक्षा जास्त सन्मान दिला माझा प्रत्येक छोट्या-मोठ्या दुःखात तुझ्या सहभाग जाणवत होता आणि याची जाणीव म्हणून मी देखील तुझ्यासोबत मैत्री जपली, तुझे जे काही भले होईल त्यासाठी मी ही प्रयत्न केले. 
             पहाटे पाच वाजेपासून आपल्या भेटीची सुरुवात व्हायची हातात टमरेट घेवून गेलो तरी घरचे शोधत आपणास यायचे हा गमतीचा भाग असला तरी सहवास यातून दिसतोच. शालेय आयुष्य असो की महाविद्यालयीन आयुष्य मैदानी खेळ असो वा अन्य काही खोडी असोत आपण सोबत एकत्रित केल्यात मात्र या सर्व बाबी घडत असताना आपणामुळे कुणाचे भावनिक, मानसिक, शारीरिक आर्थिक असे कुठलेही नुकसान झाले नाही हे आपले सौभाग्यच.. शिक्षणात तुला गोडी नसली तरी अन्य बाबतीत तुझी महत्त्वाकांक्षा फार मोठी होती त्यातच तुझ्यात असलेले देशप्रेम व देशाप्रती असलेली निष्ठेमुळे तू देश सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता तू देश सेवेत जावे यासाठी प्रयत्नही केलेस मात्र त्यात तुला यश आले नाही. असो प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या नशिबी असतेच असे होत नाही, तू त्या क्षणाला मुकला असला तरी तू जे ही काही केले त्यात तू समाधानी आहेस हे महत्वाचं, या सर्वांमध्ये तुझ्या खोडकर व सर्वांना हसवणारा हा स्वभाव सर्वांना हवाहवासा वाटतो.. तू जेथे गेले तेथे तुझे स्वतंत्र ओळख निर्माण करतो. गणपतीवर असलेले तुझी अपार श्रद्धा, विविध वाद्यांच्या व गायनाचा छंद व आवड ही तू आजही जोपासले आहे..

        अत्यंत हलाखीचा परिस्थितीवर मात करत तू पुढे आयुष्याचा गाडा ओढत आहे. वडील अरुण व आई मोतन यांनी दिलेले संस्काराच्या धडे युधिष्ठिर सारखा लाभलेला मोठा बंधू त्यांनी वेळोवेळी पाजवलेले बाळकडू त्यात मोठ्या वहिणीचा रूपात मिळालेली माया लहान भावाची साथ व आजीच्या आशीर्वादामुळे तू आयुष्याचा पटलावर भक्कमपणे उभा आहे.  
     
      सुरुवातीच्या काळात तुझ्यात जी ऊर्जा होती ती खूप अफाट होती तू खूप हुरहुन्नरी होतास, एका कामावर बसून न राहता असंख्य कामे करण्याचे तुझे धडपड मी पाहिले आहे. अगदी कमी वयात बाजाराची चाहूल तुला लागल्यामुळे बाजाराची ओळख तुला प्राप्त झाली होती, लहान वयापासूनच कधी फोटोग्राफी तर कधी मेकॅनिकलच्या दुकानावर तर कधी पतंग विकताना येवढेच काय तर कधी रस्त्यावर पडलेले भंगार उचलून विकून २ पैसे कमविताना मी तुला पाहिले आहे, काहीही झाले तरी कुठेही कमी पडणार नाही अशा तुझ्यातला जोश मी पाहिले आहे. अगदी नोकरी नाही लागली तरी तळहातावर मेहनत करून पोट भरण्याची तळमळ व मेहनत करण्याची अफाट इच्छा तुझ्या अंगी पाहिली आहे आणि त्या जोरावर मी सुद्धा पावलं उचलले, अगदी लहान वयातच आपण दोघांनी सोबत मंडप बांधले मंडळ बांधण्यापासून प्राप्त झालेल्या दोन पैशाची गुंतवणूक करण्यास आपण सुरुवात केली.. 
             काहीही झाले तरी आपण सोबत राहू, आयुष्य जगताना असंख्य स्वप्न सोबत बघितली, सुरुवातीचा काळ हा खूप गरीबीचा होता असे असले तरी आपण कुठे बडेजावं पणा केला नाही परिस्थितीशी झुंजत आनंद साजरा केला मग तो अगदी सोबत असून हाप चड्ड्यांवरती फिरणे असो किंवा कॉलेजमध्ये लुंगी घालून हिंडणे असो, आपण फार धिंगाणा घातला आयुष्याला आनंद साजरा केला तो आनंद पाहून अनेकांना हेवा देखील वाटला.. काळ लोटात गेला 25 वर्षे पेक्षा अधिक कालावधी लोटल्या आपला सहवासाला मात्र नाते आपले आजही तेवढेच घट्ट आहे. तुझा नातेवाईक असोत व मित्र परिवारात मला कधीही स्वतः ओळख करून द्यावी लागली नाही कारण माझे गुणगान तू माझ्या पश्चात त्यांच्या पुढे गायलेले मला प्रत्येक वेळेस जाणवले आहे. दिपाली वहिनी चा रूपात तुला लाभलेली अर्धांगिनी ही देखील तुला साजेशी व वळणावर आणणारी असल्याकारणाने तिचे देखील कौतुक करण्यासारखे आहे.  तुमच्या संसारात अधिक गोडवा निर्वाह म्हणून देवाने दिलेले दोन मुले हे तुमच्या जीवनाचा आधार आहेत.
      माझ्या मनातील प्रवाह मोकळा करण्यासाठीचे हक्काचे ठिकाण म्हणजे तू कुठलीही बाब निडरपणे पूर्ण विश्वास ठेवून तुझ्याशी चर्चा करू शकतोस कारण चांगल्या गोष्टींचे भांडवल होईल व वाईट गोष्टीला बोलायला जाईल एवढा विश्वास अगदी बालवयातच माझा तुझ्यावर बसला आहे आणि तो आजही कायम आहे भविष्यातही कायम असेल यात तीळ मात्र शंका नाही.
             मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरोधात उभं असतं, तेव्हा मित्रच आपल्यासोबत असतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती खऱ्या मित्राच्या शोधात असते, जो मित्र आपल्या सुख-दु:खात नेहमी आपल्यासोबत असतो तोच खरा मित्र बाकी सर्व प्रवाह असतात.

1 टिप्पणी: