Breking News

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

कानबाई

कानबाई
खान्देशाची आराध्य दैवत म्हणुन कानबाई उत्सव सर्वत्र उत्साहांत साजरी केला जातो. विखुरलेला परिवाराला
 एकत्र आणने हे या उत्सवाचे वैशिष्ट आहे. नंदुरबार जिल्ह्यात रानमाळ, शहादा तालुक्यातील प्रकाशा व धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे या गावात कानबाईचे मंदिर असल्याचे सांगीतले जाते. एका दिवसाच्या कानबाई मातेच्या सण, उत्सव सर्व परिवार एकत्रित येवुन मोठ्या जल्लोषात साजरा करुण पार पाडला जातो. खान्देशची ग्रामदेवता म्हणुन ख्व्याती असलेल्या कानबाई मातेच्या श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतरच्या पहिला रविवारी कानबाई मातेच्या एक दिवशीय स्थापना करुण उत्सव खान्देशात सर्वत्र उत्सवाने साजरा केला जातो. पुर्वी खानाचं राज्य होतं. खान्देश परिसराचा राजा खान ह्याना पुत्र प्राप्ति नसल्याने खान्देश प्रजेने नवस मानला. राजा खान याना कन्या रत्न प्राप्त झाले. त्यावेळी जनतेने "खानबाई' उत्सव साजरा केला. खानभाई उत्सवाला खान्देशात कालांतराने या उत्सवाला अप्रभ्रुष होवुन कानबाई म्हणुन ओळखले जाऊ लागले. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार हां खान्देश- कान्हादेश-खान्देशी लोक कान्हा म्हणजे भगवान कृष्णाला मानतात. म्हणुन त्यानी देवीचा उत्सव साजरी सुरु करण्यासाठी कानबाई हे नाव घेतले. असावे अशी समज आहे. कानबाई हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, या समाजात साजरा होतो. मात्र आता प्रतेक समाजात कानबाई मातेची स्थापना भाविक मोठ्या प्रमाणात करीत असतात. कानबाईच्या आगमनापुर्वी घराला  रंगरंगोटी केली जाते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ  केली जातात. पडदे, चादरी,
बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. परिसर घर। स्वच्छ करुण घरात गोमुत्र शिंपड्तात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य असते. कानबाईच्या सजावटीत साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते.
कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते. 'कानबाई परनुन आणणे'- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक .नदीवरुन पाणी
 आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता दोंडायचा जवळ असलेल्या खेड्यात नारळ परनले जाते. तर चाळीस गावा जवळ खेड गावात देखील कानबाई परनन्याचे कार्य केले जाते. कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात. तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. . आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची    
स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. मनोरंजन म्हणून मोठ्या प्रमाणात सट्टा व पत्त्याचा खेळ पुरुष मंडळी रात्रभर खेळत असते.तर स्त्रिया रात्री जागरण करुण फुगड्या, गरबे, व विविध पारंपारीक नृत्य
करतात तसेच कानबाई मातेचे गाणी म्हटली जातात. काही परिवारात फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात.
गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही. नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा
 वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो. दुसर्या दिवशी नि तिसर्या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं .रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणी
सुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात. कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे. अहिराणी भाषिक कुटुंबीयांचा हा आवडता सण मानला जातो. या सणात रोजचा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्ती खाऊ शकते. कानुबाईचे विसर्जन दुसर्या दिवशी वाजत- गाजत होते. रविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणूनही संबोधले जाते. गावातल्या स्त्रिया आपापल्या कानुबाईला चौरंगावर बसवून डोक्यांवर घेतात. गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करतात. स्त्रिया सजूनधजून – नऊवारी साड्या अथवा
 लुगडि परिधान करून विसर्जनात सहभागी होतात. मार्गांत पाण्याचा सडा टाकला जातो. ‘कानबाई मायनी जतरा दाट. माय..... जतरा दाट हे दर्शन माले, मिये ना वाट. माय.... मिये ना वाट’ अशा प्रकारे भान हरपत, गाणे गात-गात भरल्या अंत:करणाने कानुबाईचे विसर्जन नदीत केले जाते. खान्देशात सर्वत्र कानबाई हां सण जल्लोश्यात साजरी केला जातो. कानबाई हां सण कुटुंब एकत्रिकरणाचे प्रतिक मानला जातो. बाहेर गावी गेलेले कुटुंब या उत्सवाने एकत्रित येतात....
















1 टिप्पणी: