Breking News

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

डॉ.शशिकांत वाणीना लाखमालेाच्या शुभेच्छा

सातपुड्याच्या राजकारणातील तळपता सूर्य डॉ.शशिकांत वाणी
 भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख दादासाहेब डॉ. शशिकांत वाणी यांचा आज वाढदिवस. तळोदा तालुक्यातील प्रतापूर या छोट्याशा गावातून राजकारणात पुढे आलेले डॉ. शशिकांत वाणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून घेतले. स्वयंसेवक म्हणून काम करताना सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यातील माणसाला संघ विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख दादासाहेब डॉ. शशिकांत वाणी यांचा आज वाढदिवस. तळोदा तालुक्यातील प्रतापूर या छोट्याशा गावातून राजकारणात पुढे आलेले डॉ. शशिकांत वाणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून घेतले. स्वयंसेवक म्हणून काम करताना सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यातील माणसाला संघ विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. 1982 मध्ये भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पक्षातील त्यांची यशस्वी वाटचाल आजपर्यंत थांबलेली नाही.
तळोदा तालुकाध्यक्ष, भाजयुमोचे सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून दादांची संघटनात्मक भरारी सुरू राहीली. पक्षात काम करीत असताना सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षांकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. सातपुड्यातील माणसाच्या गरजा काय आहेत, याचा अभ्यास केला.कै. दिलवरसिंग पाडवी पतसंस्थेची उभारणी केली. कै.दिलवरसिंगदादा पाडवी ग्राहक भांडार सुरू केले. तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम करताना शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेतले. सातपुड्यातील गोरगरीब जनता शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी दादासाहेबांनी श्री साईनाथ शिक्षण संस्थेची उभारणी केली. संस्थेच्या माध्यमातून अनंतदिप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कोठार, ता. तळोदा, विद्यावर्धिनी निवासी माध्यमिक शाळा,जांभीपाणी ता. अक्कलकुवा तसेच भुषण आदिवासी 100 मुलांचे केंद्रीय वस्तीगृह सुरू केले. अयोध्या येथील रामजन्मभूमि आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झाले त्यावेळी त्यांना उत्तरप्रदेशातील ङ्गैजाबादमध्ये 15 दिवसांचा तुरूंगवास झाला. सहा डिसेंबरच्या अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला. राजकारणात असले तरी दादांनी समाजसेवेला अधिक प्राधान्य दिले. सातपुड्यातील माणसाला प्रेम दिले.
दु:खीतांचे अश्रु पुसले. हाच वसा पुढेही कायम ठेवला आहे.सतत नवनवीन प्रयोग करीत राहणे, आपल्या सहकार्यांना, शिक्षकांना प्रोत्साहन देत राहणे, यावर दादांचा भर असतो. प्रचंड जनसंपर्क, अतिशय समजूतदारपणा, कनवाळू मन, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेणे, अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग शोधणे आणि तेवढीच कडक शिस्त राबविणे हा दादांचा स्वभाव आहे. दादांच्या रूपाने आम्हाला लाभलेला हा वटवृक्ष अनेकांच्या दु:खावर मायेची ङ्गुंकर घालत आहे. सावली देण्याचे काम करीत आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनिता वाणी या नगरसेविका असून वॉर्डातील समस्या सोडवित आहेत.सुपूत्र अभिषेक आणि आदित्य हे वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सुसंस्काराच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत. आज डॉ.शशिकांत वाणीचा वाढदिवस. जनसामान्यांच्या या आमच्या लाडक्या व्यक्तीमत्वाला आमच्या लाखमालेाच्या शुभेच्छा.........


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा