Breking News

गुरुवार, १९ मार्च, २०१५

तळोदा नगरपालीका अतिक्रमण निर्मूलन मोहीम काल थांबली

तळोदा नगरपालीका हद्दीतील अतिक्रमण निर्मूलन मोहीम काल थांबली असून येत्या काळात टप्पाटप्पाने ही मोहिम राबविण्यात येईल, तसेच नागरपालीकेचा मालकीचा जागेवर बस स्थानक भागातील व्यवसायिकाना
लवकरच पुनर्वसन करून त्यांचा रोजगारचा प्रश्न मिटवुन पालिका आर्थिक उत्पन्न वाढविन्यासाठी नियोजनही करणार असल्याचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार यांची भेट घेतली असता प्रस्तुत प्रतिनिधिशी बोलतांना सांगितले. तळोदा नगर पालीकेने गेल्या तिन दिवस सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम शहरातील कॉलेज रोड. हुतात्मा चौक .तहसील कचेरी रोड.स्मारक चौक. नगरपालीका परिसर.सोनारवाडा. हातोड़ा रोड.ख्वाजा नाईक चौक . देशपांडे फोटो स्टूडियो ते बस स्थानक परिसर. शहादा रोड चीनोदा रोड बदरी कॉलनी रोड अश्या शहरातील महत्वाचा भागातील रस्त्यावर मोहीम जोरदार राबविण्यात आली तिनदिवस केलेल्या कार्यवाहित
एकूण ५७९ किरकोळ व् पक्के अतिक्रमण धारकावर पालिकेकडून कार्यवाही करण्यात आली दरम्यान पालीकेचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार यांनी घेतलेल्या ठोस भूमिका ही सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. तळोदा पालीकेच्या इतिहासात प्रथमच एवढी ठोस कार्यवाही पवार यांनी केल्यान त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही ही फार मोठी जबाबदारी मुक्याधिकारी आणि पालिकेची राहणार आहे.
कारण या मोहिमेनंतर पुन्हा शहरात जैसे थे परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . मुख्याधिकारी .प्रांतअधिकारी व् तहसीलदार आदींची अतिक्रमण धारकानी घेतली भेट तलोदा बस स्थानक भागातील छोटे व्यसायीक बस स्थानकचा असलेल्या भिंतीलगत होते. मात्र शेवटचा टप्प्यात हे सुद्धा अतिक्रमण हटविन्यात आले याबाबत श्री जालंधर भोई यांनी इतर हाथगाड़ी धारकासह प्रांत अधिकारी श्री देवदत्त केकाण व तहसीलदार श्रीमती उषारानी देवगुणे यांची भेट घेवून व्यथा मांडली व् पुनर्वसन करताना आम्हाला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली याबाबत मुख्याधिकारी व् प्रांतअधिकारी व तहसीलदार यानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याच् अतिक्रमण धरकाकडून सांगण्यात आले.
 * जनार्दन पवार यांची भूमिका अतिशय महत्ववाची = तलोदा नगरपालीकेच्या इतिहासात अनेक अनुभवी व नावजलेले मुक्याधिकारी येवून गेले मात्र येथे रुजू होण्यागोदार इरिगेशन खात्यात कामाचा अनुभव असलेले श्री जनार्धन पवार हे मुख्याधिकारी या पदावर प्रथमच सुरुवातीला तलोदा नागरपालीकेत रुजू झाले मात्र रुजू झाल्यानंतर तलोदा शहरातील अत्यंत महत्वाची असणारी अतिक्रमण मोहीम हाती नुसती घेतली नाही तर नगरपालिकेच्या जागा मोकळी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न आपल्या ठोस कृतीतून दाखवुन दिले त्यामूळे ते आता तळोदेकर जनतेचा कायम लक्षात राहतील गेल्या तिन दिवस चाललेल्या या मोहीम अंतर्गत अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्भवले मात्र
मुख्याधिकारी यांनी अतिशय शांतपने व् प्रसंगी कठोर भूमिका घेवून अतिक्रमण मोहीम यशस्वी केली. त्यांची पर्त्यक्षभेट घेतली असता सर्वसामन्य नागरीकाला माझ प्रथम प्राधान्य राहणार असल्याच् सुतोवाच त्यानी केले. तसेच छोटे व्यापरी संकुल तयार करण्याचे आव्हान ह्याप्रसंगी दिले. यामुळे पालीकेच्या आर्थिक सोर्स वाढणार व अतिक्रमण मोहिमेत ज्यांचा व्यवसाईक रोजगाराचा प्रश्न लवकरच सकारात्मक पने सोडवू असा विश्चास व्यक्त केला. अतिक्रमण मोहिमेंनंतर पुन्हा ते होणार नाही ही फार मोठी जबाबदारी पालीका प्रशासनची असेल तसेच लवकरच नागरिकांची तक्रार दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांक नागरपालिकाचा माध्यमातून सुरु करीत असून पालीकेत कोणताही कर अथवा आर्थिक भरणा करण्यासाठी ऑनलाइन पद्दत लवकरच सुरु करणार असल्याच त्यांनी सांगितले.

 * अतिक्रमण बधित अन्याय निवारण समिती शहरातील या मोहिमेत अन्याय झाल्याची भावना काही नागरिकामधे असून या बाबत अतिक्रमण बाधित अन्याय निवारण समितिची मीटिंग घेण्यात आली.
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा