Breking News

गुरुवार, २१ मे, २०१५

सातपुड्यातील केसर आंबा सातासंमुद्रापार

सातपुड्यातील केसर आंबा सातासंमुद्रापार
 सातपुड्याच्या सौंदर्यात उंच-उंच टेकड्यासह विविध जाती प्रजातींचे वृक्षांचे वेगळेच महत्व आहे. काळानुपुर वृक्ष संपदा कमी होवुन, सातपुडा बोड़खा होवु लागला असला तरी आजही विविध प्राणी पक्षी ह्यांचे अस्तित्व टिकून आहे. सातपुड्यातील रानमेव्यास तेवढेच महत्व असुन राज्यासह परराज्यातून आलेले पर्यटक याची चव चाखल्याशिवाय येथून परत नाही. शुद्ध वातावरण, सेंद्रिय खतांच्या वापरातून उत्पादीत केलेले बोर, आवळा, सिताफळ ह्यासह स्ट्रॉबेरीला सिझननुसार मागणी वाढते. याच सातपुड्याचा कुशीतील गोपाळपुर येथील ` केसर' आंबाने सातासमुद्र ओलांडून तो विदेशातील लोकांचा पसंतीचा बनला आहे. ६० एकरच्या आमराईतील केसरसह विविध जातीचा आंबा राज्यचा कानाकोपऱ्यासह दुबई, इंग्लैंडसारख्या देशात पोहचला आहे. तर येथील आमराई सातपुड्याच्या सहलीवर आलेल्या पर्यटकानां आकर्षित करीत आहे. नंदुरबार जिल्हा हां सातपुड्याच्या पायथ्याशी बसला आहे. विशेषतः तळोदा, अक्कलकुवा, व धड़गाव हे तालुके सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात आहेत. या तालुक्यांमधे भौतिक सुविधा
नसल्या तरी सातपुड्यातील वनसंपदा आजही टिकून आहे. काळानुरूप वृक्षतोड़ झाल्याने आज सातपुड्याच्या डोंगर बोड़खा दिसून येतो. मात्र याच दऱ्याखोऱ्यामधे आदिवासी बांधव बोर, आवळा, सिताफळ, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. शुद्ध वातावरण सेंद्रिय खतामुळे आरोग्याला चांगले असलेल्या या फळाना, सर्वत्र खुपच मागणी असते. तळोदा,तालुक्यातील गोपाळपुर येथील किर्तीकुमार राणा ह्या प्रगतशील शेतकाऱ्याने ६० एकर क्षेत्रात वनराई उभारली आहे. ह्या वनराईतील केसर आंबा हां राज्यातील कानाकोपऱ्यासह दुबई व इंग्लॅण्डसारख्या देशात निर्यात होवु लागला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ह्या आंब्याला विदेशातून मागणी वाढली आहे. ह्या आमराईतील श्री राणा ह्यांनी केसर सह हापुस, तोतापुरी, राजापुरी, गावठी, लंगड़ा अश्या विविध जातीच्या आंब्याचे उत्पादन घेत आहेत. यावर्षी उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्याने ४० लाखाला आंबे काढण्याचा ठेका घेतला आहे. श्री राणा हे आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करतात त्यांना २००४ ह्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते उद्यानपंडीत पुरस्काराने गौरवन्यात आले आहे. १७ वर्षापुर्वी कीर्तिकुमार राणा ह्यांचे आजोबा स्व. रघुवीरसिंग राणा यांच्या आजोबाच्या संकल्पनेतून उभी राहिलेली गोपाळपुरची आमराई पाहन्याचा मोह अनेकांना होतो. हे विशेष, तर ह्या आमराईतील आंबा हां राज्यातील नंवे तर विदेशातील लोकांचा आवडीचा होत असल्याने साहजिकच त्याची मागणी वाढली आहे.....
                                         *आमराईत भटकंती करताना, 
                                            *आमराईची पाहणी करताना,
                                              *केसर आंब्याची चव घेताना,
                                      *आंब्याचा सावलीचा गारवा अनुभवताना,
                        *चटकदार, चवदार, दर्जेदार सातपुड्यातील केसर आंबा,



                                                             *बहरलेली आंब्याची बाग़

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा