Breking News

मंगळवार, १५ मार्च, २०१६

स्व.विद्यादेवी बारगळ यांचे निधन

महिला सबलीकरण पर्यावरण बचावच्या खंद्या पुरस्कर्त्या सा. कार्यकर्त्या स्व.विद्यादेवी बारगळ यांचे निधन..
 तलोदा येथील संस्थानिक बारगळ जहागीरदारांच्या स्नुषा तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत अमरजितराजे शिवाजीराव बारगळ जहागिरदार यांच्या सुविद्य पत्नी तसेच तळोदयाच्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या जनक, अनेक आंदोलनांच्या पाठिराख्या असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर राज्य पुरस्कार प्राप्त, पुरोगामी समाजसेविका स्व विद्यादेवी अमरजीतराजे बारगळ यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अल्पश्या आजाराने निधन झाले. त्यांच्या वर पुणे येथील मुक्ति धाम स्मशान भूमित आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जेष्ठ लेखक एकांकीकाकार मार्तंड जोशी लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे देवमोगरा विद्याप्रसारक मंडल चे सचिव प्रा. के. एल. जाधव पुणे येथील नगरसेविका आशा शेडगे धनगर समाजाचे नेते मुकुंद कचेकर वाळमुले, माजी नगरसेवक शेख अकबर शेख हिदायत, भारत मुक्ति मोर्चाचे डॉ देविदास शेंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी ई सह धनगर समाजाचे असंख्य कार्यकर्ते व् बारगळ परिवाराचे सदस्य उपस्थित होते. जळगांव येथील प्रतिष्ठित देशमुख घराण्याची कन्या असलेल्या विद्यादेवी 14 फेब्रु 1977 रोजी वैलेंटाइन डे च्या दिवशी तळोदा संस्थाच्या गादिचे जाहागिरदार श्रीमंन्त अमरजीतराजे बारगळ यांच्याशी प्रेम विवाह करून जहागिरदारांच्या सुन होवून ताळोद्यात आल्या. पुरोगामी व आधुनिक विचारसरणीच्या विद्यादेवी ताळोद्यात आल्या त्याकाळी महिलाशिक्षणा बद्दलची अनास्था, कमी वयात होणारे विवाह, बालकांचे कुपोषण ,अंधश्रदधा, यातून होणारे महिलांचे शोषण हे सर्व पाहून त्यांनी
महिला मुली व् बालाकांसाठी समाज कार्य करण्यास सुरुवात केली. सर्व प्रथम त्यांनी अशिक्षित महिला व् मुलीसाठी प्रौढ़ शिक्षण वर्ग स्वतच सुरु करून त्यांना शिक्षित करण्यास सुरुवात केली. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तळोद्यात पाहिले ब्यूटी पार्लर उघडून त्याचे प्रशिक्षण दिले। महिलांवर चार भिंतीआड होणारे अत्याचार दूर करून् त्यांचे मोडनारे संसार उभे करण्यासाठी त्यांनी त्या वेळच्या धुले व नंतर नंदुरबार जिल्हा महिला दक्षता समिती व् कायदे विषयक सल्लागार समिति वर अनेक वर्ष सदस्य म्हणून काम केले. 1985 ला युवक बिरादरी ची स्थापना करून संचालिका म्हणून सुदृढ़ बालक स्पर्धा द्वारे कुपोषणा वर तर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित त्याद्वारे तळोद्यातील अनेक कलाकार पुढे आणून खान्देश गौरवची ढाल जिंकुन तळोद्यात आणली युवक बिरादरीच्या माध्यमातून युवकांना समाजसेवा शिकवली..
या त्यांच्या सर्वच क्षेत्रातील कामाचा गौरव म्हणून नवनिर्मित नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सन 98- 99 चा अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय पुरस्कार देवून शासनाने त्यांचा सन्मान केला सरदार सरोवर बाधिताच्या पुनर्वसनासाठी सातपुड्यातील जंगल तोडून वसाहती बसविन्यासाठी त्या वेळी शासनाने निर्णय घेतला त्याला विरोध करून जंगल वाचविन्यासाठी त्यांनी वसुंधरा बचाव मोहिम सुरु केली. त्या सोबत मेधा पाटकरानी नर्मदा बचाओ आंदोलन उभे केले. त्यात प्रतिभा शिंदे सहभागी झाल्या त्यांनी सुध्दा नंतर लोकसंघर्ष मोर्चा द्वारे हा संघर्ष सुरूच ठेवला असून ह्या सर्व चळवळीच्या केंद्रबिंदु सुरुवात आश्रय ताळोद्याच्या बारगळ गढ़ी राहिली आहे. त्या नगरसेविका असताना स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात त्यांनी तळोद्यातील ऐतिहासिक गिल्डर चौक येथील ध्वज खांब व चौथ्यार्यावरील अतिक्रमन काढण्यासाठी 500 महिलांचा मशाल मोर्चा काढून आंदोलन केले. त्यात उच्च न्यायालयाने ही जागा खाली करण्याचे आदेश दिल्यावर सुध्दा आजतागायत तलोदा पालिकेने ह्या ऐतिहासिक चौकातील अतिक्रमण काढले नाही. याची खंत्त त्याना मरेपर्यंत होती. त्यांच्या या सर्व कार्यात त्यांना त्यांचे पती श्रीमंत अमरजीत राजे बारगळ तिन्ही मुली श्वेता बारगळ चौधरी, सोनिया संदाशिव व टीना बारगळ यांची त्यांना मोलाची साथ लाभाली. असे हे तळोद्यातील लाभलेले महिला रत्न आज नियतीने हिरावून घेतले आहे.

विद्यादेवी ह्या अंधश्रद्धेच्या विरोधात नेहमी महिलांमध्ये जनजागृती करून अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत या त्यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मृत्यु नंतर कोणतेही पारंपारिक धार्मिक विधि करू नयेत असा पुरोगामी धाडसी निर्णय त्यांचे पति व तिन्ही मुलींनी घेतला आहे. त्या ऐवजी तळोदयात फक्त एक सर्व धर्मीय प्रार्थना सभा आयोजित करून त्यांना खरी श्रध्द्दांजली अर्पण केली जाणार आहे... 

 Post by उल्हास मगरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा