Breking News

बुधवार, २६ जुलै, २०१७

शासकीय मदतीसाठी मयताच्या वडिलांची अधिकारी लोकप्रतिनिधीकडे चकरा!


 धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तळोदे शहरातील दोघा भावांचा तोल जाऊन नदीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना धडगाव तालुक्यात बिलगाव येथे वर्षभरापूर्वी घडली होती. या घटनेचा शासकीय पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी अधिकारी व लोकप्रतिनिधीनी भेटी देऊन शासकीय शासकीय निधी मिळवून देण्याचे पालकांना आश्वासन दिले होते. या घटनेला काल सोमवारी एक वर्ष पुर्ण झाला आहे. मात्र शासकीय निधीसाठी मयताचे वडील गेल्या 6 महिन्यापासून प्रशासनाच्या दारी चकरा मारत आहेत. अधिकारी त्यांना कागदोपत्राची पूर्ततासाठी वेळोवेळी त्यांची दिशाभूल करीत आहेत. यामुळे मुलांच्या अपघाती निधनानंतर मनाने खचलेले वडील शरीरानेही खचले असून त्यांना संबंधीताना वेळीच शासकीय मदत उपलब्ध करून धीर देण्याची गरज आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की; धड़गाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिलगाव येथे "बारामुखी" धबधबा आहे, पावसाळ्यात नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.यात तरुण वर्गाचा मोठा प्रमाणात समावेश असतो. तळोदे शहरासह जिल्ह्यातील तरुणांचे ग्रुप बिलगाव येथील धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी हजेरी लावतात. मागील वर्षी तळोदयातील सात मित्रांचा ग्रुप बिलगाव येथे सहलीसाठी गेला होते. त्यातील काही तरुणधबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने, त्यातील राहुल पाटील व विशाल पाटील हे दोघे सखे भाव पाण्यात बुडाले. यावेंळी बाकीच्या तरुणांनी मानवी साखळी करून त्याना वाचविण्याचा पर्यन्त केले मात्र त्यांना यश आले नाही. पाण्यात बुडल्याने दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबत पंचनामा करून शासकीय सोपस्कार करण्यात आले. यावेळी मयताच्या कुटूंबियांना सांत्वन देण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पो.अधिक्ष राजेंद्र दहाडे, यांच्यासह आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी भेटी दिल्या होत्या. अधिकारी व लोकप्रतिनिधीनी मयताच्या कुटुंबियांना सांत्वन करताना नियमानुसार शासनकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला वर्ष होऊन देखील अद्याप शासनाकडून मदत उपलब्ध करण्यात आली नाही. या मदतीसाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते यांच्याशी देखील संपर्क करण्यात आल्याचे कळते.मयताचे वडील देविदास पाटील हे जिल्हा बँकेत शिपाई पदावर कार्यरत असून त्यांनी दरम्यानच्या काळात आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली आहे. याबाबत देविदास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, शहादा प्रांताधिकारी कार्यालय, तळोदा प्रांताधिकारी व तहसील कार्यालय, धडगाव पो.ठाणे व तहसील कार्यालयासह मुंबई मंत्रालयात निधीसाठी पाठपुरावा केला आहे. मात्र प्रयत्न सुरू आहे. असे त्यांना सांगितले जात आहे.देविदास पाटील हे मुलांच्या निधनानंतर खचले आहेत. तर मदतीसाठी आता त्यांना शासकीय दरबारी चकरा माराव्या लागत असल्याने शरीराने ही खचत असल्याचे त्यांना चेहऱ्यावरील भाव सांगतात. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने मदतनिधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा