Breking News

गुरुवार, २७ जुलै, २०१७

धरणामुळे 272 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

मागील 15 वर्षांपासून रखडलेल्या धनपूर धरणाचे काम पूर्ण झाल्याने सातत्याने लढा देणाऱ्या संघर्ष समितीला खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. या धरणामुळे 272 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. बोरद सह परिसरातील खेड्या पाड्यासह 20 ते 25 गावातील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार आहे. परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांचा पाण्याच्या प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
                               1 जुले 1998 रोजी नंदुरबार जिल्हा निर्मीतीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाठबंधारे मंत्री एकनाथ खडसे आदीं उपस्थित असताना कै. पी.के.अण्णा पाटील यांनी धनपूर धरणाचा प्रस्ताव सादर करून या विषयाला चालना दिली. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे नंदुरबार जिल्हा दौरावर असताना भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते लखनजी भतवाल यांच्या साखर कारखान्याच्या विशेष भेटी दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र राजपूत, प्रवीणसिंग राजपूत, डॉ.शशिकांत वाणी, अजय परदेशी, विजय राणा, संजय चौधरी आदींनी धनपूर धरणाचा आहवाल यावेळी सादर केला. तर निझरी नदीवर धरण व्हावे यासाठी 2003 साली कॉ.जयसिंग माळी, यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय धनपूर संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पुरुषोत्तम नारायण पाटील, उदेसिंग पाडवी, विजय चतुरसिंग राणा, कांतीलाल नारायण पाटील, राजेंद्र राजपूत प्रवीणसिंग भटेसिंग राजपूत, उद्धव पाटील, जर्मनसिग वळवी, कै. लालसिंग वळवी, विजय मराठे, ब्रिजलाल चव्हाण, असे 11 सदस्य या संघर्ष समिती स्थापन केली. प्रथम या संघर्ष समितीने 3 सप्टेंबर 2003 साली मोड येथे रस्ता रोको करून आंदोलन केले. त्यानंतर 26 जानेवारी 2005 रोजी आमलाड येथे अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गवार 5 हजार शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यावेळी प्रांताधिकारी रिचा बागला यांच्या मध्यस्थीने तत्कालीन पालक मंत्री शिवणकर यांची भेट घेऊन चर्चा करून आंदोलन स्थगित करण्यात आले. या बैठकीनंतरच धरणाला खरी चालना मिळाली. मात्र या धरणाचा क्षेत्रात वनविभागाची पाडळपूर, धनपूर, सावरपाडा, राणीपुर, खर्डी पेठे, आदी परिसरातील जमीन जात असल्याने तेवढी जमीन वनविभागाला शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात शासकीय दरात धनपूर धरणाचा मोबदल्यात देण्यात आली. व यामुळे धनपूर धरणाचा कायमचा मोठा अडसर असलेला प्रश्न सुटला. हे धरण पूर्ण होण्यासाठी माजी खासदार माणिकराव गावित, माजी पालकमंत्री ऍड.पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार स्वरूपसिंग नाईक, यांनी
शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला, तर विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी 2016 साली अर्थ समितीचे अध्यक्ष आमदार आशिष देशमुख यांच्या सबोट जाऊन धनपूर धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. व त्याच वेळी विशेष निधीतून 9 कोटी रुपी या धरणाच्या कामासाठी पदरी पाडून घेतले. व धनपूर धरणाचा प्रश्न मार्गी लागला.... त्यामुळे हे धरण पूर्ण झाले. व जून 2017 पासुन या धरणाच्या पाणी साठवण केली जात आहे. हे धनपूर धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कडमसारा, धनपूर, सिलिंगपूर, पाडळपुर, खर्डी, लाखपूर, फॉ. न्युबन, छोटा धनपूर, राणीपुर आदी गावातील 272 हॅकटर जमीन ओलिता खाली येणार आहे. या परिसरातील शेती बागायती होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. व शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवूंन सुखी समाधानी होणार आहेत. हा परिसर पूर्णपणे आदिवासी परिसर असून सातपुड्यावर राहणारा आहे. आदिवासी बंधूं आहेत. त्यांच्या परिसरातील बदल झाल्यावर मुलांच्या क्षिकणाकडे कल झुकणार आहे. यासाठी धनपूर धरण हे या परिसरातील आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश होता तो कायमचा सुटला आहे. या धरणाची लांबी 422 मीटर असुन उंची 20.18 मीटर तर 160 मी. खोली आहे. पाण्याची पातळी वाढण्यानंतर कमी अधिक प्रमाणात धरणाचे पाणी, निझरी नदीत सोडण्यात येणार आहे. या धरणामुळे परिसरातील बोरवेल मध्ये, पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेहमीचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. 15 वर्षानंतर या धरणाचे काम पूर्ण स्वरूपाने परिसरातील शेतकऱ्यांची स्वप्न पूर्ती झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाचे लोकप्रतिनिधीचे, व विशेषतः धनपूर धरण संघर्ष समितीचे आभार मानले आहेत. या धरणाला तत्कालीन मुख्यमंत्री ना.मनोहरराव जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, यांच्या शासनाने मंजुरी दिली. या धरणाच्या तत्कालीन पाठबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने या धरणाला चालना मिळाली आहे. हे धरण धनपूर येथे व्हावे यासाठी कै. पी.के अण्णा पाटील यांनी कृती आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. तेव्हापासून धरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. विशेषतः यावर्षीच शेतकऱ्यांना या धरणाचा फायदा जाणवू लागला आहे. परीसरातील खालावलेली पाण्याची पातळी या धरणामुळे वर आली आहे.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा