Breking News

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

तळोद्यातील ११ वर्षीय बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न!

प्रसंगावधान राखून पळ काढल्याने मुलगा सुखरुप : पालकांमध्ये भीती
तळोदा शहरातील नुराणी चौकीतील ११ वर्षीय बालकास तुझी आई खूप आजारी आहे, असे सांगून चारचाकी वाहनात बसवून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला आहे. बालकाचा आपले अपहरण होत असल्याचक लक्षात आल्यशाने त्याने नंदुरबार येथे प्रसंगावधन साधून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका केली आहे. गावात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रीय झाली असल्याची चर्चा सुरु असून यामुळे पालकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिसांनी विशेष लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत असून मात्र कालच्या घटनेबाबत पालिसात नोंद करण्यात आलली नाही.. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा शहरातील नुराणी चौकात राहणाऱ्या व सहावीच्या वर्गात शिकणारा तौफिक शेख शरीफ (वय ११) हा शाळा सुटल्यावर खान्देशी गल्ली परिसरात मित्रांसोबत खेळत होता. यावेळी एका वाहनातून आलेल्या चौघांनी त्यास तेरी अम्मी काफी बिमार है उन्हे नंदुरबार ले गये है, तुझे जल्दी बुलाया' असे सांगून त्याची सायकल व्हॅनवर टाकून त्याला वाहनात बसवून नंदुरबारकडे रवाना झाले. रस्त्यावर तौफिकने पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. पाणी पिताच त्याला गुंगी येऊन झोप आली. नंदुरबार पासून काही अंतरावरील एका दारूच्या दुकानीजवळ त्या चौघांनी वाहन थांबवले. यावेळी तौफिक शुध्दीवर आला. यावेळी आजुबाजूला कोणीच नसल्याचे पाहून तौफिकने वाहनाच्या वर ठेवलेली सायकली कशीतरी काढून नंदुरबार शहराकडे पळ काढला. यावेळी त्याने एका व्यक्तीला त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन लावून द्या, अशी विनंती केली. दरम्यान, मित्रांसोबत सायकल फिरवण्यासाठी गेलेला तौफिक रात्र झाली तरी घरी आला नसल्याने वडील शेख शरीफ शेख सरदार, आई सुल्तानाबी शेख शरीफ व कुटुंबीयांनी त्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली होती. तौफिकचे मित्र, नातेवाईक गल्ली परिसरासह शाळा, शिकवणी आदी ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत होते. तौफीकचा शोध लागत नसल्याने पोलिसंकडे तक्रार करण्याच्या निर्णय घेवून पोलिस ठाण्याकडे जात असतांनांच तौफिक फोन आला व त्याने घडलेली आपबिती वडीलांना सांगितली. पालकांनी तातडीने नंदुरबार गाठत तौफिक घरी नेले. . दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर बालकांना पळविणारी टोळी सक्रीय झाल्याचा संदेश फिरत असल्याने व त्यातच तौफिकचे झालेले अपहरण यामुळे संदेशाला पुष्टी मिळाल्याने चर्चा होवून पालकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी याकडे लक्ष ठेवून वेळीच कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी पालकांनी केली आहे. कालच्या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कोणतीच नोंद करण्यात आलेली नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा