Breking News

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

विकासाच्या मुद्यावर काँग्रेसला कोंडीत पकडण्यात भाजपाला यश!

विकासाच्या मुद्यावर काँग्रेसला कोंडीत पकडण्यात भाजपाला यश! विश्लेषण 20 Dec 2017NewsImage ViewPrintMailClose Button AAA ईश्वर मराठे, तळोदा . मो. ९६०४४९०७२२. पालिका निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामे केली. मात्र शहरातील जनतेशी निगडीत प्रलंबित पाणी पुरवठा योजना, व्यापारी संकूल व कचरा डेपोची कामे पूर्ण करण्यात त्यांना याकाळात अपयश आले. या प्रलंबित कामांच्या पार्श्वभूमीवर सत्ता कायम राखण्यात सत्ताधारींना अपयश आले. तर निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादीकडे प्रभावी मुद्देच नसल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर संथगतीने होणारे विकास कामे, प्रलंबित विकास कामांसह पालिकेचा कारभाराचे मुद्दे घेत भाजपाने विकासाचे व्हिजन घेऊन पालिकेत परिवर्तन घडविण्यात यश मिळविले. पालिका निवडणुकीतील हा निकाल काँग्रेस व राष्ट्रवादीला आत्मचिंतन करावयास लावणारा आहे. . तळोदा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसला नाकारत सत्तांतराच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपाला मतदारांनी साथ दिली. भाजपा व काँग्रेसमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नगराध्यक्षपदी अजय परदेशी विराजमान होत ११ जागांवर विजय मिळवून पालिकेवर कमळ फुलविले. तळोदा पालिकेत काही अपवाद वगळता नेहमीच काँग्रेसची सत्ता राहिली आहे. काँग्रेसचे नेते भरतभाई माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी पालकमंत्री ॲड.पद्माकर वळवी यांच्या पाठबळावर सुरू होता. पालिका हद्दीत त्यांनी अनेक कामांना चालना दिली. मात्र, पाणी पुरवठा योजना, व्यापारी संकूल, कचरा डेपो आदी काही कामे प्रलंबित राहिली. विकास कामांची जंत्री मांडत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा जाहिरनामा घेवून काँग्रेस मतदारांसमोर गेली. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया व ऐन वेळेला बदलावा लागलेला उमेदवार यासह अनेक अडचणीतून मार्ग काढीत निवडणुकीला सामोरे गेले. तर आ.उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आमदार विकास निधीतुन शहरात दिलेला विकास निधी व केंद्रात व राज्यात भाजपा सरकार काळात झालेली विकास कामे, शहरासह तालुक्यात प्रलंबित कामांना चालना व शहरात सत्ता आल्यास २१ कलमी वचननामा घेऊन विकासाचे व्हिजन घेऊन पालिकेत सत्ता परिवर्तनाचा नारा दिला. यामुळे काँग्रेसपुढे आव्हान निर्माण करण्यात भाजपा यशस्वी झाली. पालिकेत ११ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांना फक्त सहाच जागांवर विजय मिळविता आला. शिवसेनेलाही एका जागेचा फटका बसला आहे. राष्ट्रवादीला तर खातेही उघडता आलेले नाही. पालिकेत फक्त चार जागा असलेल्या भाजपाने गेल्या दोन-तीन वर्षात नियोजनात्मक केलेल्या कामांमुळे त्यांना सत्तेचे यश मिळाले आहे. तर हा पराभव सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. पालिकेत सत्तांतर झाले असून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आ.उदेसिंग पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांना विशेष लक्ष घालावे लागणार आहे. पालिकेत काँग्रेसचे देखील सहा नगरसेवक असून शहराच्या विकासाठी सत्ताधारी व विरोधक नेमकी कशी रणनिती आखतात? विकास कामांसाठी विरोधक काँग्रेस सत्ताधारी भाजपापुढे कसे आव्हान उभे करण्यात कितपत यशस्वी होतात? तर देशात व राज्यात सत्तास्थानी असल्याचा फायदा मिळवित पाच वर्षात भाजपा शहराचा किती विकास करण्यात यशस्वी होते? याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागून असणार आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा