Breking News

रविवार, ६ मे, २०१८

आवाजवी खर्च व जुन्या प्रथांना फाटा देत आदर्श विवाह...

तालुक्यातील मोदलपाडा येथील रिता व शरद या नवदापत्याने पारंपरिक प्रथा व विवाहाला लागणारा अवाजावी खर्चला फाटा देत, एका दिवसात लग्न लावून आलेल्या वऱ्हाडीचा वेळ वाचवत नव्या आयुष्याची सुरुवात आदर्शरित्या केली. याबाबत सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
                           लग्न म्हटलं कि बँड, बाजा, बाराती असे चित्र पाहण्याची सवय आपल्याला झाली आहे. पण या संपूर्ण प्रथा आणि परंपरेला फाटा देण्याचे काम तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथील रिता व शरद यांनी केला आहे. तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथील भानू सोमला वळवी यांची जेष्ठ सुकन्या तर कै. लालसिंग नूऱ्या वळवी माजी जि. प.सभापती यांची पुतणी रिता हिचा विवाह अक्कलकुवा तालुक्यातील बाभलपूर येथील रोहिदास टेडया पाडवी यांचा सुपुत्र शरद याच्याशी जुडला. NIM नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झालेल्या रिताने राज्यात वेळोवेळी पडत असलेला दुष्काळ, शेतकऱ्यांची होत असलेली आत्महत्या, स्थलांतर सह शिक्षण बेरोजगारी आदी विविध समस्यांनी ग्रासलेला आदिवासी समाजातील विवाहात अवाजवी खर्च होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विवाह या शुभ प्रसंगी वाद उफाळून आल्याचे अनेक प्रकार घडतात. यावर आळा बसावा याकरिता विवाहात अवाजवी खर्च टाळत पारंपरिक व साध्या पद्धतीने विवाह करण्याच्या निर्णय तिने घेतला. तिने याबाबत तिचे वडील भामु सोमला वळवी यांना बोलून दाखवले, यावर वडिलांनी शिका मोर्तब करत त्यांचे व्हायी रोहिदास वळवी व जावई शरद यांना विचारणा केली. त्यांनी देखील याबाबत सकारात्मकता दाखवल्याने दोघे कुटुंबियांकडून लग्नात अवाजवी खर्च न करण्याच्या निर्णय घेतला. विवाहात पारंपरिक वाद्य वाजवून तसेच उन्हात आलेल्या वऱ्हाडी मंडळीं, तान्हुनले बालकांचे हाल होऊ नये हा हेतू ठेवत त्यांनी विवाह एका
दिवसात आटोपण्याचे ठरवले. 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 दरम्यान हळद 11 ते 2 दरम्यान आहेर व 4 ते 6 दरम्यान लग्न अश्या पद्धतीने एका दिवसात विवाह पार पडला. या विवाहास खासदार हिना गावित, आमदार विजय गावित, रमेश गावित तंटामुक्त अध्यक्ष, अमरसिंग वळवी, ग्रा.सदस्य जगदीश वळवी उपसरपंच, सतिराम वळवी यासह मान्यवरणी उपस्थिती लावून वधू वरास आशीर्वाद दिले तर माजी मंत्री पद्माकरजी वळवी, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, पो.पाटील विलास पाडवी, दक्षता समिती सदस्य सरपंच बळीराम पाडवी, यांनी या नवंदाम्पत्याचे सत्कार करून त्याच्या या कार्याचे कौतुक केले. 2 दिवस लागणारी हळद, त्यात येणाऱ्या मंडळींचे नियोजन, विविध खाद्य पदार्थ, बँड बाजा, डी.जे. घोडा बग्गी, फोटो शूटिंग,आहेर, मंडप, स्टेज, वाजंत्री, संगीत सजावट आदींसह विवाहास होणाऱ्या खर्चाला फाटा देत अगदी साधेपणाने आदिवसी पारंपरिक ढोल वाद्य लावून, जुन्या रूढी प्रथाना बगल देत, रिता व शरद यांचा विवाह सोहळा पार पडला. विवाहात लाखोंची उधळपट्टी करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा विवाह ठराणार असून लग्नात अवाजावी खर्च करणे टाळत समाजपयोगी कार्य करा असा सल्लाच रिता व शरदने या विवाहातून दिला आहे.......

 प्रतिक्रिया 
रिता व शरदने दाखवले धाडस, तसेच लग्नात आर्थिक उधळण करण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने केलेला एकदिवसीय विवाह सोहळा हा येत्या काळात आदिवासी समाजात परिवर्तन घडविणारा असेल.. 
    *माजी मंत्री पद्माकरजी वळवी* 

 विवाह समारंभाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून तो सर्वसामान्यास पेलावला जात नाही. बँड, डी. जे. आदीवर आवाजावी खर्च होतो. परिणामी अनेकवाडा वाद होऊन आनंदादायी सोहळा हा सुखमय होतो. तसे होऊ नये याकरिता नवीन पायंडाची सुरवात आम्ही करण्याचा प्रयत्न केला... 
          भामु वळवी वधू पिता





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा