Breking News

शुक्रवार, ११ मे, २०१८

पाण्यासाठी 'मरणयातना' आमच्या नशिबी का?

केलवापाणीवासीयांचा प्रशासनाला सवाल ; टंचाई आराखड्यात गावासाठी उपाययोजनांचा उल्लेखही नाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यात तळोदा तालुक्यात एकही गावपाड्यात टंचाई नसल्याचे नमूद केले आहे. मात्र मैलोन्मैल पाण्यासाठी रानोवनी भटकंती करुन डोंगर उतारावरुन जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी खर्डी बु.ग्रामपंचायीतंर्गत येणाऱ्या लक्कडकोट, खर्डी बु., केलवापाणी येथील रहिवाश्यांना कसरत करावी लागत आहे. डोंगर टेकड्यांवरुन पाय निसटून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. पाण्याची तहान भागविण्यासाठी मिळेल त्याठिकाणाहून शुद्ध-अशुद्ध पाण्याने येथील रहिवासी गुजराण करीत असल्याचे दाहक वास्तव मात्र प्रशासनाच्या नजरेआड गेल्याने असे जगणे आमच्या नशिबी का? असा सवाल येथील रहिवाश्यांना उपस्थित होत आहे. .  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यात तळोदा 

तालुक्यात एकही गावपाड्यात टंचाई  नसल्याचे नमूद केले आहे. मात्र मैलोन्मैल पाण्यासाठी रानोवनी भटकंती करुन डोंगर उतारावरुन जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी खर्डी बु.ग्रामपंचायीतंर्गत येणाऱ्या लक्कडकोट, खर्डी बु., केलवापाणी येथील रहिवाश्यांना कसरत करावी लागत आहे. डोंगर टेकड्यांवरुन पाय निसटून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. पाण्याची तहान भागविण्यासाठी मिळेल त्याठिकाणाहून शुद्ध-अशुद्ध पाण्याने येथील रहिवासी गुजराण करीत असल्याचे दाहक वास्तव मात्र प्रशासनाच्या नजरेआड गेल्याने असे जगणे आमच्या नशिबी का? असा सवाल येथील रहिवाश्यांना उपस्थित होत आहे. .

  खर्डी बुद्रुक येथील दिलशा बिलाड्या वळवी यांच्या घराशेजारील  हातपंप पाच महिन्यापासून नादुरुस्त . 
  छगन माकत्या वळवी यांच्या घराशेजारील हातपंप ४ महिन्यापासून नादुरुस्त . 
  लक्कडकोट येथील जालमसिंग हुप्या पाडवी यांच्या घराशेजारील हातपंप  २ महिन्यापासून नादुरुस्त .
  मांग्या हुप्या वळवी मागील १५ दिवसापासून हातपंप नादुरुस्त. *  
  सुरत्या विऱ्या वळवी याच्या घराशेजारील हातपंप मागील ४ महिन्यापासून नादुरुस्त.  
 बाज्या भटया वळवी याच्या घराशेजारील हातपंप मागील महिन्या भरापासून नादुरुस्त.

तळोदा तालुक्यातील खर्डी बु. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या लक्कडकोट, खर्डी बु, केवलापाणी या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून डोंगर उतरून नदीतून पाणी आणावे लागत आहे. पाणी पिण्याजोगे नसल्याने विविध आजाराने सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे पेसा निधी, १४ वा वित्त आयोगाच्या निधी जातो कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत संभ्रमावस्था असून लक्कडकोट व खर्डी बु. या ठिकाणी सहा हातपंप नादुरुस्त आहेत. ते तातडीने दुरुस्त करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी एस.बी.खर्डे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. तळोदा तालुक्यातील खर्डी बुद्रुक, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लक्कडकोट,
 खर्डी बु. व केवलापाणी या तीन गावांना पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी ३ ते ४ कि.मी. डोंगर उतरून नदीतून पाणी आणावे लागत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना रोजंदारी बुडवत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.चिमुरडे भर ऊन्हात पाण्याचा शोध घेत आहेत. तळोदा शिवाराच्या काही भागातील पाणी पातळी खालावली आहे. या भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी हातपंप दुरुस्तीसाठी निवेदने दिले असताना प्रशासनाने उपाययोजना न केल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. यावर उपाय म्हणून केलवापाणी ग्रामस्थांनी श्रमदान करत १२ ते १५ फूट विहीर खोदून पाण्याची सोय केली होती. मात्र पाण्याची पातळी खालावल्याने या विहीरीचे पाणी देखील आटत आले आहे. पाण्याच्या शोधत डोंगर उतरून नदीतुन पाणी आणावे लागत आहे. नदीत पाणी कमी असल्याने झरे निर्माण करून पाणी भरले जात आहे. एका हंडा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मिळालेच पाणी पिण्याजोगे नसल्याने विविध आजार उद्भवत आहेत. यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील हातपंप व पाण्याचे स्रोत आटण्याच्या स्थितीत आहेत. मागील दोन महिन्यापासून गावातील हातपंप नादुरुस्त आहे. याबाबत वेळोवेळो तक्रार केली आहे. याबाबत सरपंच ग्रामसेवक यांना विचारणा केली तर ते हातपंप दुरुस्ती वाहन आल्याशिवाय होणार नसल्याचे सांगत दुरुस्तीकरिता हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात विहिरी मंजूर होऊन दोन वर्षे लोटली तरी देखील कामाला सुरुवात झाली नसल्याने प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लक्कडकोट व खर्डी बु याठिकाणी मागील ५ ते ६ महिन्यापासून ६ हातपंप बंद आहेत. ते तातडीने दुरुस्त करावे. तसेच चौदा वित्त आयोग, पेसा अंतर्गत येणारा निधीचा खर्च कुठे व कसा केला जातो याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण केले असून याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर राजेंद्र पाडवी, काळूसिंग वळवी, मानसिंग पाडवी, दिलवरसिंग वळवी, बिलाड्या वळवी, तुळशीराम पाडवी, सिंग्या नाईक, सुरपसिंग वळवी, मगन नाईक, नूरजी पाडवी, धनसिंग वळवी, कालूसिंग नाईक, रमेश पाडवी आदींसह ४० ते ४५ रहिवाश्यांच्या सह्या आहेत.
              राजेंद्र पाडवी  
सामाजिक कार्यकर्ते लक्कडको

                                              *प्रतिक्रिया* 

 खर्डी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या केवलापाणी येथे भीषण टँचाई निर्माण झाली असून ग्रामस्थरोजनदारी बुडवत पाण्याच्या शोध घेत आहेत. डोंगर उतरून महिला हंड्यावर पाणी आणत आहे. नदीतील झरे आटल्याने एक हंडा भरण्यासाठी 10 मी द्यावे लागतात. याभागात 2 वर्षांपूर्वी विहिरी मंजूर झाली असून अद्याप पावेतो काम झालेले नाही. प्रशासनाने दुर्लक्षकेल्याने ठिकठिकाणी हातपंप नादुरुस्त आहेत.

                                                                                                  
                                                                               *प्रतिक्रिया*
भांगडी जेगला वळवी
               
गावात पाण्याची सोय नसल्याने पाण्यासाठी डोंगर उतरावे लागते. झऱ्यातुने कचरा साफ करत पाणी काढावे लागते. पाणी भरण्यासाठी बराचवेळ लागत असल्याने रोजनदारी बुडते. अनेकवेळा डोंगर चढून जाताना पाय घसरून खाली पडतो, लहान मोठे चिमुरड्याना घेऊन जीव धोक्यात टाकत पाणी आणावे लागते.. एवढे करूनही स्वच्छ पाणी मिळत नाही. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.. 











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा