Breking News

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

हिमाचल टूरचा चुरशीचा प्रसंग: नियमांवरील विजय

०७ नोव्हेंबर २०२४
         सुधाकर व त्याच्या मित्रांच्या समूहाने ३ लाख १५ हजार रुपयांचे हिमाचल पॅकेज एका कंपनीकडून बुक केले होते. आधीच ठरल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचा करार होता. मात्र, टूरच्या दुसऱ्या दिवशीच कंपनीकडून पूर्ण रक्कम तातडीने भरण्याचा आग्रह होऊ लागला. या प्रसंगामुळे प्रवासाच्या उत्साहावर विरजण पडले, मात्र समूहाच्या धैर्याने आणि ऐक्याने हा वाद चुरशीने हाताळण्यात आला.. यात लेखी करणार देताना नियम पूर्णपणे दिले होते मात्र शब्द देताना वेगळे देत होते याबाबत त्यांच्याशी त्याच वेळी चर्चा करून लेखी नमूद करण्याची विनंती केली होती. त्यांनी विश्वास दर्शवला होता. मात्र ऐनवेळी रक्कम मागण्यास सुरुवात केल्यामुळे समूहाने नकार दिला.    
    सुरुवातीला कंपनीने नियमांकडे कानाडोळा करून, ठरलेल्या अटींना डावलून, समूहावर रक्कम पूर्ण देण्याचा दबाव टाकला. कंपनीचा मॅनेजर थेट धमकीच्या सुरात म्हणाला, "जर पैसे भरले नाहीत तर रात्रीच तुम्हाला चेक-आउट करावे लागेल." या वक्तव्यामुळे समूहात तणाव निर्माण झाला, पण सुधाकरने शांतपणे परिस्थिती हाताळली. त्यांना ठामपणे सांगितले की, “आम्ही ठरलेल्या अटींप्रमाणेच वागू.” समूहातील इतर दहा जणांनी सुधाकरच्या मताला पाठिंबा दिला. त्यांनी मॅनेजरला स्पष्ट केले, “सुधाकर जे म्हणत आहेत, तेच योग्य आहे. आम्ही एकत्र आहोत.”

      मॅनेजरचा दबाव वाढत असताना, सुधाकरने ठाम भूमिका घेतली. त्याने सांगितले, "जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही पोलीस ठाणे गाठू. गरज पडल्यास आंदोलन छेडू." हा निर्णय कंपनीला अडचणीत आणणारा ठरला. रात्री १२ वाजता थेट कंपनीचा मालक शिमला येथे आला.
       मालकाने सुधाकर व समूहाशी चर्चा केली. समूहाच्या ठाम भूमिकेमुळे आणि नियमांच्या आधारावर बोलल्यामुळे शेवटी कंपनीने मध्यस्थी केली. रक्कम कमी करण्यात आली, आणि समूहाच्या अटींनुसार उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने घेण्यास कंपनी तयार झाली. व त्यानंतर मिळणाऱ्या सुविधाही उत्तम मिळाल्या, हा प्रसंग समूहाच्या विजयाचा ठरला. यामुळे न केवल प्रवासाचा आनंद कायम राहिला, तर समूहाने एकीची ताकद काय असते हे दाखवून दिले. हा संघर्ष फक्त कंपनीच्या चुकीच्या धोरणांविरुद्धच नव्हे, तर प्रवाशांच्या हक्कांसाठी उभा राहण्याचा आदर्श ठरला.
      या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट झाली - नियमांना डावलून काम करणाऱ्यांविरुद्ध ठाम राहिल्यास यश मिळतेच. समूहाच्या संयमाने आणि एकजुटीने नियमांवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय झाला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा