Breking News

शुक्रवार, ६ जून, २०२५

दिलखुलास, दोस्ती दुनियेतील राजा माणूस : ज्ञानेश्वर राठोड

सुधाकर मराठे                     
                      आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, काहींचा सहवास जास्त काळ लाभतो, तर काही चुटपुटत्या सहवासातही आपल्या मनावर कायमच्या कोरल्या जातात. काही चित्रपटाच्या माध्यमातून भेटतात, तर काही पुस्तकातून, चित्रातून, गाण्यातून. प्रवासातून आपल्याला आकर्षित करून जातात. अशा भेटलेल्या, आठवणीतल्या, सहवासातल्या, स्मरणात कोरल्या गेलेल्या काही व्यक्तींचे मनावर उमटलेले ठसे म्हणजे मित्र सखा ज्ञानेश्वर राठोड ...       
          आपण चांगलं काम केलं की मित्रच नव्हे तर समाज ही आपल्या मागे उभा राहतो. याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानेश्वर यास आम्ही प्रेमाने ज्ञानु असे म्हणतो, चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव या छोट्याश्या बंजाऱ्यांच्या तांड्यातून आलेले ग्रामीण भागातील हरहुन्नरी नेतृत्व, राजकारण समाजकारण आणि ग्रामीण पर्यटनशाखाचा अभ्यासक अशी एक त्यांची वेगळी ओळख, सहज, सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे. निगर्वी, प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे. कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा, आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभाव गुणामुळे तळोदा शहरातील प्रत्येक तरुणासोबत त्याचे मैत्रिपूर्वक संबंध प्रस्थापित झाले होते.  मनात कुणाबद्दलही आकस, राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे. 

वडिलोपार्जितच शेती व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय, वडील दगडू राठोड हे घोडेगावात सर्वांना परिचित धार्मिक वृत्तीचे, त्यांच्या पत्नी घोडेगावातील माजी सरपंच राहून चुकलेल्या महिला, त्यांचे दोघे भाऊ उच्चशिक्षित, एक जण दुबई येथे स्थित होते तर दुसरे मुंबई येथे बेस्ट मध्ये वाहन चालक होते. अत्यंत हालाखीचा परिस्थितीवर मात करत तीन मुली व दोन मुलांचा प्रपंच हाकत मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करणारे हे दोघी दाम्पत्यांनी आपल्या मुलांना संस्काराचे चांगले धडे दिले आणि त्यामुळेच 'मुहँ मे राम बगल में छुरी! अशी कपटनिती ज्ञानु यांच्या जवळपासही नाही. समाजपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी, त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते.         
                २००६ या वर्षी तो शिक्षणासाठी आपल्या मोठ्या बहिणीकडे तळोदा येथे आला. बारावीचे वर्ष असल्याने अभ्यासाची एक वेगळी स्पर्धा स्वतःशीच त्याची होती. या निमित्ताने कधी रोकडमन हनुमान, कनकेश्वर महादेव मंदिर तर कधी शाळा कोलेजचे पटांगण, ओट्टे, मोकळे मैदान हे त्याचे अभ्यासासाठी आवडते ठिकाण, त्याची व माझी एक वेगळीच गट्टी झाली, दिवसभरात सोबत असणे अभ्यासा सोबतच खेळांवर विशेष लक्ष देत तळोदा शहरात एक वेगळे स्थान आम्ही प्रस्थापित केले, ही मैत्री जपत असताना कुठेही काही संकट आले तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची आमची तयारी असायची.
   
 ज्ञानूने बहुतांश शिक्षण हे घरापासून लांब राहूनच पूर्ण केले, त्यामुळे विविध गावात राहून आलेला वेगवेगळ्या शहरांची माहिती त्याला होती. सर्वात प्रथम स्वप्नाचे शहर असे संबोधले जाणाऱ्या मुंबईला तो आम्हाला घेऊन गेला, मुंबईला त्याचे काका राहत असल्यामुळे बऱ्यापैकी मुंबई त्याने पायीच रोंदली होती, याचा फायदा आम्हालाही झाला. त्याने मुंबईचे बहुतांश परिसर आम्हाला पाईचं फिरवल्यामुळे पहिल्या फेरीतच मुंबई माझ्याही चांगलीच डोक्यात बसली. त्या दिवसापासून ते सलग आजवर विविध कडू गोड अनुभवांसह त्याचे आणि माझे नाते एक भावाप्रमाणे आहे. त्याचे कुटुंब व माझ्या कुटुंबातील असलेले हितसंबंध हे रक्ताच्या नात्यासारखे आहेत. एकमेकांच्या सुख दुखात धावून येत, नाते संबंध जोपासण्यासाठी सुरू असलेले आमचे प्रयत्न यामुळे आम्ही आजही शारीरिक दृष्टिकोनातून लांब असलो तरी मानसिक दृष्ट्या सदैव सोबत असतो. 
 
                                शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात बहुतांश कालावधी गेला कमी वयातच मेहनत करण्याची तयारी असल्याकारणाने कुठलेही काम हाती आले तरी ते करून आपले जीवन सार्थक होईल हे ठाऊक असले तरी प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जात संसाराचा गाडा ओढावा लागतो.
तळोदा सारख्या शहरात शिक्षण घेऊन आज तो समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून  समाजकार्यात अग्रेसर असलेल्या प्रथम फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहे. या माध्यमातून तळागाळातील लोकांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे कार्य त्याचे आजही सुरू आहे, असे करत असताना त्याची आवड देखील जोपासली जात आहे याचा आनंद वेगळाच आहे, वर्ष लोटत चालली वेळ निघत आहे अनेक जबाबदाऱ्या आपल्या अंगी येत असल्या तरी या सहजरीत्या पार करत आयुष्याचे कडू गोड आठवणी घेऊन जीवनप्रवास हा सुरू आहे. ज्ञानेश्वर यास मिळालेली अर्धांगिनी देखील हुशार मितभाषी सी देखणी मनमिळावू व समंजस असल्यामुळे आयुष्याचा जीवन प्रवास हा सुखाचा सुरू आहे या सुखात एक मुलगा व एक मुलगी अशी भर पडली आहे.  
           या जीवन प्रवासात अगदी किशोरवयापासून असलेला मित्र सोबत असल्याचा आनंदच वेगळा आहे या माध्यमातून केवळ आम्ही दोघेच नव्हे तर बहुतांश मित्रांना सोबत ठेवून वार्षिक सहल काढून एक मित्रत्वाचे नाते रक्ताच्या नात्या सारखे घट्ट करण्याचा आमचा प्रयास आहे. आपण सामाजिक ऋण फेडण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत या उक्तीचा साजेसे वागण्याचा त्याचा प्रयत्न आयुष्याची एक शिकवण देणारा आहे....

गुरुवार, १ मे, २०२५

कष्ट, प्रेम आणि एकता यांचे प्रतीक ; शांताराम मराठे (आप्पा) संघर्ष, कष्ट आणि यशाचा गाथा

काही व्यक्तींचे जीवन संघर्ष आणि कठोर परिश्रमांनी भरलेले असते, परंतु त्यातूनच ते आपले व्यक्तिमत्त्व घडवतात आणि एक मजबूत पाया उभारतात. अशाच व्यक्तींमध्ये आमचे वडील शांताराम मराठे (आप्पा) यांचा समावेश होतो. आप्पांचे जीवन हे परिश्रम आणि साधेपणाचे प्रतीक आहे. बाहेरून कडक स्वभाव असला तरी, त्यांच्या अंतरंगात मृदुता, प्रेम, आणि मुलांवर उत्तम संस्कार करण्याची अपार क्षमता आहे. त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासातून प्रेरणा घेत, मुलांनीही मेहनतीने मार्गक्रमण करावे, असे संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांना दिले. त्यांच्या जीवनाचे हे दर्शन म्हणजेच 'नारळ'सारखे व्यक्तिमत्त्व – बाहेरून कठोर, पण आतून प्रेमळ आणि मृदू आभाळ भर माया देणारे विशाल हृदयी आमचे आप्पा..
                                                                    *जन्म आणि प्रारंभ*

               पारोळा तालुक्यातील देवगाव येथे शांताराम मराठे यांचा वेडू सखाराम मराठे यांचा कुटुंबात जन्म झाला. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील पहिला धक्का बसला. त्यांच्या आई, पार्वता हिने कष्ट करून संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण केले. तिच्या कठोर परिश्रमामुळे शांताराम यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली, आणि त्यांनी १२ वी पावेतो शिक्षण पूर्ण केले.                                             *कुटुंबाची जबाबदारी*    


        आप्पाचे मोठे बंधूं स्व.गोविंद मराठे नोकरीसाठी बाहेर गेले आणि लहान बंधू स्व.दिगंबर मराठे हे राजकारणात बळी गेले. यामुळे कुटुंबाची जबाबदारी आप्पांवर आली. या परिस्थितीत त्यांनी धाडसाने पुढे येऊन आपल्या कुटुंबासाठी काम करणे सुरू केले.                  

 *करियरची सुरुवात*

           आप्पांनी आपल्या करियरची सुरुवात पोस्टमन म्हणून केली. त्यानंतर त्यांनी टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला, ज्या अंतर्गत त्यांनी लेडीज टेलर म्हणून काम केले. त्यांची हातकला आणि कष्ट यामुळे त्यांना शेतीसाठी देखील वेळ मिळाला, ज्यामुळे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय बनला.      

                   संघर्ष*                                                 सुरुवातीच्या काळात, आप्पांनी हाताला मिळेल ते काम केले. त्यांच्यासोबत आमच्या आई आशाबाईने देखील त्यांच्या व्यवसायात साथ दिली. बाजारात मठ पापड विक्री करताना त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर केला. तसेच, भाजीपाला विक्री, बर्फाचा गोला, कुल्फी विक्री आणि भाजलेल्या शेंगांची विक्री करून त्यांनी उदरनिर्वाह चालवला.  

*पत्नीची लाभली साथ:*

       आप्पांच्या विवाह आशाबाई मराठे यांच्याशी झाला, जे नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नबाबाई आणि संपत बढे यांची एकुलती एक मुलगी होती. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर १५ दिवसांनी, त्यांची आई नबाबाईने तळोदा येथे घर जवाई म्हणून राहण्यास आमंत्रित केले. या समर्थनामुळे शांताराम यांना स्थिरता मिळाली. आप्पांच्या जीवनात पत्नी आशाबाई यांची साथ ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या सहकार्यामुळे आणि समर्पणामुळे शांताराम यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार मिळाला आणि अनेक आव्हानांचा सामना करण्याची शक्ती प्राप्त झाली. आप्पांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक कठीण काळांचा सामना करावा लागला. आईने या सर्व कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन दिले. घरच्या कामातून ते बाहेर कसे पडतील याची काळजी घेत, त्यांनी आपले सर्वस्व कुटुंबासाठी समर्पित केले. दोघांनी मिळून व्यवसायात काम केले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य मजबूत झाले. त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आणि योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मुलांचे यश हे आप्पा आणि आई यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. आईने आप्पावर नेहमी विश्वास ठेवला. त्यांनी एकमेकांना प्रेरित केले आणि संकटांच्या काळात एकमेकांना आधार दिला. या विश्वासामुळे त्यांच्यातील प्रेम आणि एकजुटीला एक विशेष बळ मिळाल

संतती आणि संस्कार

             आप्पांचे ४ मुलांचे विवाह झाले. त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. मोठा मुलगा योगेश मराठे राजकारणात सक्रिय आहे, तर लहान मुलगा सुधाकर मराठे नोकरी, पत्रकारिता व व्यवसायात सक्रिय आहे. दिपीका शिंदे ही नंदूरबार येथे तर रुपाली पाटील हिचा विवाह भाच्याशी करून नात्यात दृढता निर्माण केली आहे. ते स्पर्धा परीक्षेचा माध्यमातून मुंबई येथे वर्ग दोन अधिकारी आहेत.  त्यांच्यातील हिम्मत आणि कष्टामुळेच त्यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

                                                                             *पुतण्याना सांभाळण्याची जबाबदारी* त्यांचे मोठे बंधू स्व.दिगंबर मराठे हे अभद्र राजकारणाचा शिकार झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पुतण्याचा देखील सांभाळ केला, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची एकता आणि एकमेकांसाठी प्रेम वाढले. यामुळे त्यांच्या कुटुंबात एक विशेष बंध तयार झाला, जो नेहमीच एकत्र राहण्यासाठी प्रेरित करतो.

         *अवास्तव पैसा खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकीवर भर

              आप्पाचे आर्थिक नियोजन नेहमीच उत्तम होते. त्यांनी आपल्या जीवनात आर्थिक व्यवस्थापनाचे महत्व लक्षात घेतले आणि कधीही अनावश्यक खर्च करण्यापेक्षा वाचवण्यात आणि गुंतवणुकीत विशेष लक्ष दिले पाहिजे असे ते नेहमी म्हणत. त्यांना अनावश्यक खर्च टाळण्याची खूप आवड होती. त्यांनी नेहमीच आवश्यकतेनुसार खर्च करण्याचा विचार केला. या मानसिकतेमुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता दिली. त्यांचे आर्थिक नियोजन त्यांच्या जीवनाच्या अनेक आव्हानांमध्ये मदतगार ठरले.

*जळला अर्धगवायूच्या आजार*

           2022 साली आप्पांना अर्धगवायूचा झटका आला, ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक मोठा धक्का बसला. यामुळे त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता भासली आणि त्यांना सुरत येथील नामांकित INS रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गंभीर परिस्थितीत, त्यांना त्यांच्या पत्नी आणि लहान मुलगा सुधाकर यांचा खूप मोठा आधार मिळाला. कुटुंबाने या कठीण काळात आपल्या पतीला प्रोत्साहन दिले. तसेच, सुधाकरने आपल्या वडिलांची काळजी घेतली आणि त्यांना बरे होण्यासाठी प्रोत्साहित केले. अर्धगवायूच्या उपचारानंतर, त्यांचे आरोग्य सुधारले, आणि यानंतर सुधाकरने आपल्या वडिलांच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. 

त्यांनी नबाई वास्तू साकारली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला एक स्थिरता मिळाली. वडिलांचा मनात एक चिंता होती, ती म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीची आर्थिक परिस्थिती बाबत. तिच्या भविष्यातील चिंता लक्षात घेऊन, सुधाकरने तिला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. या कृतीने मुलीला सुरक्षिततेची भावना दिली आणि तिला एक स्थायीत्व मिळवून दिले. 

*नातेवाइकांशी भेटीगाठी*  आजारपणानंतर, सुधाकरने सर्व नातेवाइकांना भेटीगाठी घेण्याची संधी साधली. त्यांच्या कुटुंबात एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण झाली आणि सर्वांनी एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी होण्याचे महत्त्व जाणले.

                      त्यांचे जीवन हे प्रेरणादायी असून संघर्षातही धैर्याने टिकून राहण्याची शिकवण देते. त्यांच्या यशाची कथा ही सुर्यवंशी कुटुंबातील प्रत्येकासाठी प्रेरणा आहे, ज्यांनी आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी कठोर परिश्रम घेतले त्यांच्या जीवनातील मूल्ये, आदर्श आणि कष्ट यामुळे ते त्यांच्या कुटुंबासाठी एक महान नायक बनले आहेत....   


9595008844