
त्यांच्या कष्टाचे कौतुक करणारा वर्ष सण म्हणजे बैलपोळा होय. कर्नाटकात यालाच बैंदूर असेही म्हणतात. बैल पोळा हा श्रावण अमावास्या अर्थातच पिठोरी अमावास्येला महाराष्ट्रात सार्जया होणार्या या सणाला विशेष महत्त्व आहे. शेतकर्याकरिता हा दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवाच जणू. या दिवशी आपल्यासोबत वर्षभर शेतात राबणार्या सर्जा-राजाला मनोभावे सजवण्याचीच जणू बळीराजांमध्ये स्पर्धा सुरू असते. ग्रामीण भागात गावोगावच्या चावड्यांसमोर बैलांना सुशोभित करीत त्यांच्या मिरवणूका काढल्या जातात. बैल सुशोभनाच्या स्पर्धा, तसेच बैल गाड्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यंदा न्यायालयाने बैलगाड्यांच्या स्पर्धांवर बंदी घातली असल्याने या स्पर्धा यंदा भरवल्या जाणार नाहीत, असे दिसते. शेतकर्यांच्या घरोघरी पुरणपोळ्यांचा घास आज सर्जा-राजाच्या कष्टाकरिता कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता बनवला जातो.
. शहरी भागातले चाकरमानी आजच्या दिवशी मातीच्या बैलाच्या प्रतिकृतींची पूजा करतात आणि ज्यांनी आपल्याला घडवलं त्या सर्जा-राजाची आठवण काढतात. आपला देश शेतीप्रधान असल्याने या देशात बैल पोळा या सणाला महत्त्व आहे. ग्रामीण भागातील शेतकरी हा कृषिप्रधानतेवर अवलंबून असल्याने तो आपला उदरनिर्वाह शेतीवरच करत असतो. शेती म्हटली की, ती बैलाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ऊन, वारा, पाऊस असो अशा कोणताही ऋतू असला, तरी बैलांकडून शेतीचे काम करून घेतले जाते. यामध्ये बैलांना कोणत्याही प्रकारचा आराम मिळत नसतो. बैलांना आराम मिळावा, यासाठी हा सण शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही ठिकाणी मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते,
त्यांच्या अंगावर रंगरंगोटी करून त्यांना सजवले जाते. त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. बैलांना सजवून गावातल्या गावात त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यांच्या अंगावर गुलाल फेकला जातो. बैलांना गावतल्या गावात मिरवले जाते. प्रत्येकांच्या घरासमोर जाऊन बैलांची पूजा केली जाते. - या सणासाठी शेतकर्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.पोळ्यास 'बैलपोळा' असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.
ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते. या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.' या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात


.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा