Breking News

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

तळोदा येथील चिंतेश्वर महादेव मंदीर

तळोदा  शहरासह जिल्ह्याभरात महादेवी मंदीरे महाशिवरात्री निमित्त सजली असून मंदिरांवर आकर्षक
रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र महादेव मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी भजन किर्तन, महाप्रसाद, यात्रोत्सव आदी कार्यक्रम घेण्यात आले. हर हर महादेव या जयघोषात तलोदा शहरातील चिंतेश्वर मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली़ मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता़. यावेळी महिला, लहान मुलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती़. सकाळी आरती, पूजा आदी कार्यकम पार पडले़ याशिवाय गावातील महादेव मंदिरांमध्येही भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली़........ शहरातील वानी गल्लीतील सिद्धेश्वर महादेव मंदिरात भंडाराचा आयोजन करण्यात आले असून गावातील पाताळेश्वर मंदिर, काकाशेठ महादेव मंदिर,त्रिपाळेश्वर महादेव मंदिर,तर शहादा रस्त्यावरील कंकेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर महादेव मंदीरावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तर
 तलोदा शहराच्या पश्चिमेकड़े मोठ्या माळी वाडयात कालिका देवी गल्लीला लागून 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वीचे चिंतेश्वर महादेव मंदीर आहे. ह्या मंदिरात जावून भाविकांच्या चिंता दूर होते अशी ख्व्याति ह्या मंदिराला प्राप्त झाली आहे. चिंतेश्वर मंदिर हे आहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले गेले असुन ह्या मंदिराच्या स्थापनेपूर्वी गावातील नागरिक वेगवेगळ्या रोगानी व आजारानी ग्रस्त झाले होते.व अश्या काळात मंदिराची स्थापना झाली व योगायोगाने लोकांचे आजार नष्ट होऊ लागले. व लोकां ची अशी भावना झाली की या मंदिराचा स्थापनेमुळे लोकांच्या चिंता दूर होतात. अशी आख्यायिका प्राप्त झाली आहे. म्हणून मंदिराला चिंतेश्वर म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. ह्या मंदिराचा परिसराची लांबी 17 फूटापेक्षा अधिक असून रुंदी 24 फुट आहे. चिंतेश्वर मंदिरात श्री. गणपती श्री. कृष्ण तर माता लक्ष्मी अश्या दीड दीड फुटाच्या 4 मुर्त्या आहेत. तर मध्यभागी 24×29 इंचची महादेव पिंड असून पिंडच्या प्रवाह उत्तरेस आहे. मंदिराच्या
गाभाऱ्या समोर पश्चिमेस तोड़ करुण नंदी बसविला आहे. स्थळाच्या गाभाऱ्यात चारही बाजुनी कोरीव गोखले असुन मंदिराला 14 फुट व्यासाच्या घूमट असुन त्यावर 3 फुटाचा कोरिव कळस आहे..... सध्या असलेल्या मुर्त्यांच्या जागी सन् 2001 पुर्वी या वर्षापुर्वी जुन्या मुर्त्या होत्या, त्या मूर्तीची झिज झाल्याने त्यांचे तापी नदीत विसर्जन केले. व त्यांच्या जागी राजस्थान येथून नविन मुर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे. सदर मुर्त्या ह्या संगम रवरच्या पाश्याणाने कोरलेल्या आहेत. श्रावण महीना व् महाशिवरातत्रीला, भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. पाउसाळयात पाऊस येण्यास उशीर झाला तर परिसरातील नागरिक मंदिर पाण्याने भरतात ह्यामुळे पाऊस यतो अशी भावना आहे. तसेच ह्या मंदिरावर येवून मनातील इच्छा पूर्ण होवून लोकांची चिंता दूर होत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते.



तलोदा शहरात मगरे चौक व कालिका देवी गल्लीला लागून 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वीचे चिंतेश्वर महादेव मंदीर आहे. ह्या मंदिरात जावून भाविकांच्या चिंता दूर होते अशी ख्व्याति ह्या मंदिराला प्राप्त झाली आहे. चिंतेश्वर मंदिर हे आहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले गेले असुन ह्या मंदिराच्या स्थापनेपूर्वी गावातील नागरिक वेगवेगळ्या रोगानी व आजारानी ग्रस्त झाले होते. अश्या काळात मंदिराची स्थापना झाली व योगायोगाने लोकांचे आजार नष्ट होऊ लागले. ह्यामुळे लोकांची भावना झाली की या मंदिराचा स्थापनेमुळे लोकांच्या चिंता दूर होते. व ह्यामुळे मंदिराला आख्यायिका प्राप्त झाली. म्हणूनच मंदिराला चिंतेश्वर म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. ह्या मंदिराचा परिसराची लांबी 17 फूटापेक्षा अधिक असून रुंदी 24 फुट आहे. चिंतेश्वर मंदिरात श्री. गणपती श्री. कृष्ण तर माता लक्ष्मी अश्या दीड दीड फुटाच्या 4 मुर्त्या आहेत. मध्यभागी 24×29 इंचची महादेव पिंड असून पिंडच्या प्रवाह उत्तरेस आहे. मदिराच्या गाभाऱ्या समोर पश्चिमेस तोड़ करुण नंदी बसविला आहे. स्थळाच्या गाभाऱ्यात चारही बाजुनी कोरीव गोखले असुन मंदिराला 14 फुट व्यासाच्या घूमट आहे त्यावर 3 फुटाचा कोरिव कळस देखील आहे.. सध्या असलेल्या मुर्त्यांच्या जागी सन् 2001 या वर्षापुर्वी जुन्या मुर्त्या होत्या, त्या मूर्तीची झिज झाल्याने त्यांचे तापी नदीत विसर्जन केले. व त्या जागी राजस्थान येथून नविन मुर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे. सदर मुर्त्या ह्या संगम रवरच्या पाश्याणाने कोरलेल्या आहेत. श्रावण महिना व महाशिवरात्रि काळात भाविकांची प्रचंड गर्दी असते. पाउसाळयात पाऊस येण्यास उशीर झाला तर परिसरातील नागरिक मंदिर पाण्याने भरतात ह्यामुळे पाऊस यतो अशी भावना आहे. तसेच ह्या मंदिरावर येवून मनातील इच्छा पूर्ण होवून लोकांची चिंता दूर होत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. (आपल्या आठवणी शेयर करा) सुधाकर मराठे http://sudhaspari.blogspot.in/2015/02/blog-post_42.html?m=1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा