
एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. देशाच्या फाळणीला व काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची सुरक्षा वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. स्वातंत्राच्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व झोकून देणारे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारतात भेटी देवून निधी गोळा करीत स्वातंत्रयसमर अधिक चेतविला. त्याच अभियानाअंतर्गत दि.१३ मार्च १९४० रोजी त्यांनी तळोदा शहराला भेट दिली. आज १३ मार्च २०१५ रोजी त्या भेटीला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. तळोदा तालुक्यासह शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तळोदयाला अनेक स्वातंत्रवीरानी

जहागीरदार शंकरराव् बारगळ यांनी सावरकरांना मानपत्र देवून त्यांचा सत्कार केला होता. १३ मार्च १९४० रोजी दुपारी दोन वाजता बारगळाच्या गढ़ीत स्वातंत्रवीर सावरकर यांचे आगमन झाले. त्यांचा सत्कार करुण त्यांचा कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले. गावकऱ्यातर्फे त्यांना देशकार्यासाठी निधीही देण्यात आला. याप्रसंगी सावरकर यांनी देशभक्तीपर भाषणही केले. त्यांची देशप्रेमाने भरलेली अमृतवाणी ऐकण्यासाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याचे धगधगते अग्निकुंड चेतविण्याचे, देशप्रेमाचे मंतरलेले ते दिवस होते. अनेकांनी त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांचे दर्शन घेतले.
तळोदा स्वतंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या तलोद्यातील इतिहासाची साक्ष् देणारी बारगढ़ गढ़ीच्या भेटीला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधुन तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने गढ़ीतच सावरकरांची प्रतिमा पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले. या निमित्ताने मराठी पत्रकार संघाने आठवणींना उजाळा देत स्मृति जागवल्यात. तळोदा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात सर्वस्व झोकूनदेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारत भेटीत तळोद्यात दि.१३ मार्च १९४० रोजी भेट दिली होती. त्या भेटीला १३ मार्च २०१५ रोजी 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त त्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी बारगढ़ गढ़ीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सावरकर यांच्या तळोद्याचे जहांगीरदार शंकरराव बारगढ़ यांच्या हस्ते सत्कार केलेल्या दुर्मिळ प्रतिमेंचा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास अरुणराव वडाळकर, प्रा अशोक वाघ जहागीरदार यांचे वारस असलेले प्रसन्नकुमार बारगढ़, ऋषिकेश बारगढ़, तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष फुंदीलाल माळी सचीव उल्हास मगरे, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, किरण पाटिल, चेतन इंगळे, महेंद्र लोहार आदीच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी अरुणराव वडाळकर यांनी मनोगतात सावरकर यांच्या कार्याचा स्मृती जागवल्यात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा