
Breking News
दिलखुलास, दोस्ती दुनियेतील राजा माणूस : ज्ञानेश्वर राठोड
sudhaspari - Jun 06 2025कष्ट, प्रेम आणि एकता यांचे प्रतीक ; शांताराम मराठे (आप्पा) संघर्ष, कष्ट आणि यशाचा गाथा
sudhaspari - May 01 2025
बुधवार, २४ मे, २०१७
वीज वितरणच्या सहायक अभियंत्यास शिवसेनेचा घेराव...

गल्लीबोळातील क्रिकेट करतेय मनोरंजन!...
आयपीएलचा हंगाम व शाळांना उन्हाळयाची सुट्टी असल्याने बाल गोपालमंडळी सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहे. आयपीएलमुळे क्रिकेटचा जोर पसरल्याने गल्लोगल्लीत उन्हातान्हाची पर्वा न करता गल्ली क्रिकेटचे सामने रंगल्याचे पहावयास मिळत आहे. यावेळी करण्यात येत असलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी व अहिराणी कॉमेंट्रीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
गेल्या महिन्याभरापासून आयपीएलचे रंगलेले सामने रविवारी मुबईने फायनल जिंकल्याने संपले. टेलिव्हिजनमुळे क्रिकेटची लोकप्रियता सर्वत्र वाढली असून क्रिकेट हा लहान-मोठयांचा आवडता खेळ बनला आहे. अनेक गावांमध्ये मोठय़ा मैदानांचा वणवा आहे. त्यामुळे गल्लीतच क्रिकेट खेळण्याची हौस भागवली जाते. या गल्ली क्रिकेटमध्ये लहाण्यासोबत मोठेही सहभागी होताना दिसत आहेत. स्टंप म्हणून कधी स्टूल, सायकल, डब्बे, भिंत, मोटार सायकलीचे चाक किंवा टायर याचा वापर केला जात आहे. उंच फटका मारल्यास बाद, एक टप्पा झेल बाद, घरावर चेंडू गेल्यास बाद असे विविध नियम गल्ली क्रिकेटच्या खेळात लागू करण्यात आले आहेत. खिडक्यांची काच, येणार्या जाणार्यांना चुकवून चेंडू तुडविण्याची कला या गलली क्रिकेटमध्येच पाहावयास मिळत आहे. क्रिकेटमध्ये रस असणारे अनेक भाषेचा वापर करत कॉमेंट्रीने प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडत आहे. दुधाची तहान ताकावर का होईना भागविण्याचा हा प्रकार असल्याने सध्या सर्वत्र गल्ली क्रिकेटचे दिवस सुरू आहे.
गल्लीत येणार्यांना चेंडू लागू नये, खिडक्यांच्या काचा फुटू नयेत याकरिता कापड, मोजाच्या चेंडू बनवून क्रिकेटचा आनंद घेतला जात आहे. टाइमपास म्हणून जरी क्रिकेट खेळत असले तरी त्यांच्यात जिंकण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहून ओट्यांवर बसलेले प्रेक्षक प्रोत्साहीत करतांना दिसून येत आहेत.
सोमवार, १५ मे, २०१७
तळोद्यात बर्फ कारखान्यात वीजचोरी

तळोदा शहरातील एका बर्फ कारखान्यास वीज वितरणच्या भरारी पथकाने अचानक दिलेल्या भेटीत वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बर्फ कारखाना मालकास तब्बल साडेपाच लाखाचा दंड वीज वितरणने ठोठावला आहे. यामुळे वीज चोरी करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. महावितरणकडून घरगुती, व्यावसायीक व कृषीकरिता वीज पुरवठा दिला जातो. यासाठी महावितरणकडून रीतसर वीज देयक दिले जाते. वीज वापरापोटी ग्राहकांनी विद्युत देयक भरणो अपेक्षित असते. परंतु काही ग्राहक वीज देयक कमी यावे, यासाठी मीटरमध्ये तांत्रिक बदल करणो किंवा थेट विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेणो आदी प्रकारातून वीज चोरी करतात. तसेच काही ग्राहक वीजेचा अनधिकृत वापर करतात. अशा ग्राहकांना चाप लावण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील औद्योगिक अथवा मोठे ग्राहकांना झिरो युनिट अथवा कमी बिल जात असल्याचे मुख्यालयाच्या निदर्शनास आल्याने जिल्हातून भरारी पथक तयार करून तालुक्यात होत असलेली वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. संबंधित पथकाने तळोदा शहरात ठिकठिकाणी जाऊन वीजचोरी बाबत तपासणी केली. शहरातील खटाई माता परिसरात कमलेश भामरे यांचा बर्फ तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यावर पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली. यावेळी थ्रीफेज लाईन असून मिटरच्या सप्लाय बायपास करण्यात आल्याचे संबंधित पथकास आढळून आले. तसेच इतर काही गोष्टींची तपासणी केली असता ठीकठिकाणी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने भरारी पथकाने पंचनामा करून मिटरला सील लावले. पथकाने सर्व्हिस केबल व इतर साहित्य ताब्यात घेतले. या वीजचोरी प्रकरणी संबधित कारखाना मालकास पाच लाख ४९ हजार ५६0 रुपये एवढा दंड ठोठावला आहे. बसस्थानक परिसरातील घरगुती ग्राहक गोरख गोविंद चव्हाण यांनी रिमोटच्या सहायाने वीजमिटर गोठून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना ३३ हजार ६५0 एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता इंगळे, सहायक अभियंता कोष्टी व सहकार्यांनी केली. या कारवाईमुळे वीज चोरी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवार, ८ मे, २०१७
हातोडा पुलाचे उदघाटन पुन्हा ऐरणीवर!

*या पुलाला पुलाला एकूण सुमारे ५८ कोटी ४० लाख निधी खर्च करण्यात आला आहे. पुलाच्या बांधकामाचे काम अहमदनगर येथील राजदीप बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रा.ली या कंपनीला देण्यात आले आहे. नदीत असलेल्या पाण्यामुळे पुलाचा कामाची मुदत अनेकदा वाढवून घ्यावी लागली आहे. पुलाचा इंस्टीमेट व कालावधी ठरवतांना तापी नदीत असलेल्या पाणी साठ्याचा विचार केला गेला नाही. नदीत पावसाळा व हिवाळ्या दरम्यान भरपूर पाणी साठा असतो.त्यामुळे ठेकेदाराला काम करणे सोयीचे नसते. फक्त उन्हाळ्यातील तीन चार महिने काम करण्यात येत असते. या कामाचा कालावधी सन २००९ ते २०११ पावसाळ्या सह देण्यात आला होता. पुन्हा २०११ -१२ कालावधी वाढविण्यात आला. नदीत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पाणी साठ्यामुळे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यासाठी ३ मार्च १७ च्या
*या उन्हाळ्यात तापी नदीतला पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुलाचे काम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. पुलाचे ९ पिलर्स व ११ फाउंडेशन झाले आहे. पुलाला ६२.५० मीटर लांबीचे १० स्लॅब असून नंदुरबार बाजूकडील १५ मीटर अप्रोज रस्ता व तळोदा बाजूकडील ३५ मिटर ऑप्रोज,असा एकूण ६७५ मीटर लांबीचा हा पूल आहे.*
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)