Breking News

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

अखेर कुटुंबीयांना मिळाला त्यांच्या नावाचा धनादेश

दै.'पुण्यनगरी'कडून करण्यात आला होता पाठपुरावा.
रूग्णवाहिकेच्या अपघातात मयत अनिल गुरव यांच्या कुटूंबियांना बीव्हीजी ग्रुपतर्फे अनावधानाने दुसऱ्या नावाने देण्यात आलेला धनादेश परत घेण्यात आला होता. मात्र दै.'पुण्यनगरी' ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर काल तात्काळ गुरव कुटूंबियांना त्यांच्या नावाचा धनादेश देण्यात आला. . गेल्या महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्त करून येत असताना नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात घडल्याने यामध्ये चालक अनिल गुरव, अल्लारखा मक्रानी, भिक्कन पवार, या तिघांच्या मृत्यू झाला होता. वेळोवेळी याबाबत दै.पुण्यनगरीने पाठपुरावा करून सदर विषयाला वाचा फोडल्यामुळे मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तातडीने उपलब्ध झाली. आर्थिक मदतीचा धनादेश पुणे व नाशिक पथकाने मयताच्या कुटुंबियांना स्वाधीन केले. काही दिवसांपूर्वी अनावधानाने कंपनीच्या सदस्यांकडून गुरव यांच्या धनादेश देण्याऐवजी भिक्कन पवार यांच्या धनादेश गुरव यांना देण्यात आला होता. सदर बाब दुसऱ्या दिवशी कुटूंबियांना दूरध्वनीद्वारे कळविल्यानंतर तातडीने कंपनीच्या सदस्यांनी तो परत घेतला. याबाबत लेखी मागितली असता ती देण्यात टाळाटाळ केल्याने कंपनीने सोबत नेलेला धनादेश कधी परत मिळतो याबाबत कुटुंबीय प्रतीक्षेत होते. मात्र दै. पुण्यनगरीच्या वृत्तानंतर तातडीने डॉ.यु.आर.साने जिल्हा व्यवस्थापक, राकेश पाटील, राजेश परदेशी आदीनी येऊन पंडित गुरव यांना धनादेश स्वाधीन केला. गुरव कुटुंबीयांनी दै.'पुण्यनगरी' चे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा