Breking News

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

पुढाऱ्याने बिव्हिजीच्या व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावताच दिले ३० हजार...

मयत कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश देताना 
नंदुरबार - दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर मयताच्या कुटुंबियांना भारत विकास ग्रुपतर्फे आठ हजाराची मदत देऊन थट्टा करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त दै.पुण्यनगरीने प्रकाशित केल्यानंतर मयताच्या कुटुंबियांना मदतीसाठीच्या हालचाली गतिमान होऊन एक लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. असे असले तरी अनावधानाने धनादेश बदली झाल्याने सदर धनादेश कंपनीने परत घेतला असून आता पुन्हा धनादेश कधी मिळतो याची प्रतीक्षा आहे.         यादरम्यान कंपनीच्या व्यवस्थापकाने मयताच्या कुटुंबियांना मिळालेल्या रक्कमेच्या अपहार केल्याच्या प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्त करून येत असताना नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात घडल्याने यामध्ये चालक अनिल गुरव, अल्लारखा मक्रानी, भिक्कन पवार, या तिघांच्या मृत्यू झाला होता. नेहमी रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी आटापिटा करणाऱ्या तिघे मयत तरुणांची आर्थिक परिस्थिती बेताची असून भारत विकास गृपतर्फे अवघ्या आठ हजाराची मदत करून गुरव कुटुंबियांची थट्टा केल्याचे वृत्त दै.पुण्यनगरीने 2 एप्रिल रोजी प्रकाशित केले. यानंतर मदतीसाठी हालचाली गतिमान झाल्या. दि. २१ एप्रिल रोजी नाशिक येथील विभागीय प्रमुख बाळासाहेब कंकराळे, पुण्याचे डॉ.ज्योत्सना माने, विभागीय अधिकारी डॉ.किशोर देव, रोहित शिंदे या पथकाने तळोदा गाठून गुरव कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश दिला. मात्र अनावधानाने गुरव कुटुंबियांना दुसऱ्याच नावाने धनादेश देण्यात आल्याने सदरचा धनादेश कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परत घेतला आहे. यामुळे आता परत धनादेश कधी मिळतो, याकडे लक्ष लागून आहे. यावेळी उपस्थितीतांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अंत्यसंस्काराप्रसंगी मदतीची अपेक्षा होती. केवळ आठ हजार आर्थिक मदत देऊन कंपनीकडून थट्टा करण्यात आल्याचे रहवाश्यांनी सांगितले. यावर संबंधीत कंपनीकडून घटनेनंतर तातडीने 50 हजार रु नंदुरबार व्यवस्थांकाच्या खात्यात व 50 हजार रु धुळे येथील डॉ.चव्हाणच्या खात्यावर टाकून मदत करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी संबधित व्यवस्थापकाने सदर रक्कमेच्या अपहाराचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

*आणि व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली*
मयताच्या कुटुंबियांना मदतीसाठी प्रत्येकी 33 हजार रुपये याप्रसंगी कंपनीने मदत पाठविलेली असताना व्यवस्थापकाने प्रत्येक्षात मात्र केवळ आठ हजार रुपये याप्रमाणे मयताच्या कुटुंबियांना मदत केल्याने स्थानिक नेते संतापले. नेत्यांमध्ये व कंपनीच्या व्यवस्थापकात बाचाबाची झाली. शाब्दिक चकमक वाढल्याने स्थानिक राजकीय पुढाऱ्याने व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली. यावेळी वातावरण सुन्न झाले आणि तात्काळ एक लाखाचा धनादेश पंडित गुरव यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच उर्वरित 30 हजार रुपये देखील गुरव कुटुंबियांना देण्यात आले. त्याचप्रमाणे पी.एफ, पेंशन इन्शुरन्स, एलआयसीच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचे सांगितले.

  *कारवाईकडे लक्ष*
भारत विकास ग्रुप राज्यासह परराज्यात देखील आपल्या सेवेमुळे नावलौकिक आहे, मात्र व्यवस्थापकाने केलेल्या चुकांमुळें कंपनी बाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. कंपनी संबंधित व्यवस्थापकवार काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.... *रुग्णकाहिका कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र विमा काढणे गरजेचे* स्वतःच्या जीव धोक्यात घालून रुग्णाना तातडीने सेवा मिळावी म्हणून रुग्णवाहिकेत असलेले कर्मचारी प्रयत्न करतात. बऱ्याचदा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागतो. याकरिता रूग्णासोबत असणाऱ्या नर्स, वाहन चालकांचे कंपनीकडून स्वतंत्र विमा काढणे आवश्यक आहे. तसेच अपघात घडल्यास भरीव आर्थिक मदत करणेही गरजेचे आहे.

 *108 रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांचे मागण्यांबाबत बीव्हीजीला निवेदन* 
 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागनीबाबत बिव्हीजीचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या निवेदना म्हटले आहे की, रुग्णवाहिकेचा अपघातात जिल्ह्यातील अनिल गुरव, भिक्कन पवार, अल्लरखा मक्रानी या तिघांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विविध मागण्यामध्ये ओंनड्युटी मृत्युमुखी झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. कुटुंबियामधील एखादया व्यक्तीस नौकरीत सामावून घेण्यात यावे. तिघांचे प्रॉव्हिडंट फंडातील पैसे तात्काळ मिळवण्याची व्यवस्था करण्यात यावी, सदरच्या मागण्या येत्या चार दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा 108 कर्मचारी संघटनेने निवेदनातून दिला आहे.

 *प्रतिक्रिया* 
 कँपनीकडून 1 लाख रु देण्यात आले होते.मात्र व्यवस्थापकांकडून 8 हजार रु मयताच्या कुटुंबियांना देण्यात आले. यातून गैरसमज निर्मान झाला असून घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठाना कडविले आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून योग्य तो निर्णय घेतील..
 *डॉ.ज्योत्स्ना माने*

 *प्रतिक्रिया* 
कँपनीकडून मयताच्या कुटुंबियासाठी नंदुरबार करीत 50000 रु देण्यात आले होते तर 50000 रु धुळे येथील डॉ. निलेश चव्हाण यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र सदर रक्कम एकत्रितरित्या धनादेश स्वरूपात अथवा रोख न देता 3 दिवसाचा दुखवटा पाळण्यासाठी लागणारा खर्च घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांचा हातात द्यावा, असा आदेश वरिष्ठांकडून देण्यात आला होता. या आदेशांचे पालन केले. सदर 8 हजार एवढी रक्कम कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी नाकारली.
 व्यवस्थापक बिव्हीजी ग्रुप नंदुरबार

 *प्रतिक्रिया*
अपघातात कमवता मुलगा गेला आहे. वाहन दुरुस्तीचे नाव करून वयक्तिक कामाकरिता सदर वाहन नेले असल्याचे आम्हास कळत आहे. याबाबत अर्ज फाटे करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आर्थिक मदत म्हणून देण्यात आलेला धनादेश हा आमच्या नसून भिक्कन पवार यांचा आहे. तो आम्ही परत केला असून अद्याप पावेतो आमच्या नावाचा धनादेश प्राप्त झालेला नाही.
 पंडित गुरव मयत अनिलचे वडील




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा