Breking News

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

अटलजींचे तळोदयातील अविस्मरणीय चार तास


काँग्रेसचे तत्कालीन खा. सुरुपसिंग नाईक यांनी राजीनामा दिल्याने सन 1980 मध्ये नंदुरबार लोकसभची पोटनिवडणुक लागली होती. त्यावेळी सुरुपसिंग नाईक यांना विधानसभेवर पाठविण्यात आले होते. काँग्रेसतर्फे माजी खा.माणिकराव गावित हे उमेदवारी करीत होते. तर भाजपाच्या वतीने दिलवरसिंग दादा पाडवी यांच्या प्रचारसभा व आदिवासी मेळाव्यासाठी अटलजी धुळ्याहून चारचाकी वाहनाने नंदुरबार, शहादा, तळोदा या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी ऐतिहासिक सभा घेतल्या. त्यांच्यासोबत धुळ्याचे नेते लखनजी भतवालं, शिरपूरचे आ.प्रल्हाद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर तळोदा शहरातील आनंद चौकात त्यांची दणदणीत सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावर उमेदवार कै. दिलवरसिंग पाडवी, माजी भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कलाल, त्यावेळेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. गुलाल बुलाखी माळी, अनुपचंद जैन, कै.भाई बारगळ, कै.नारायण पाटील, वसंत मराठे, कै.दौलत पाटील, भगवान चौधरी, कै.ईश्वरलाल कुंभार, कै.त्रंबक शिंपी, कै.तुकाराम जगदाळे, प्रसन्न कुमार बारगळ, मोनिका बारगळ, मांगीलाल पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी अटलजींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कलाल यांनी अटलजींना त्यांच्या उंचीचा पुष्पहार टाकून सत्कार केला. त्यावेळी अटलजींनी  विश्वनाथजी मैं. भगवान नही! मैं इन्सान हु! मुझे इन्सान रहने दो! असे म्हणत सर्व मान्यवरांचे मने जिंकली. त्यानंतर
  अटलबिहारी वाजपेयी यांच्या धाराप्रवाह हिंदी भाषेतील भाषण ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी दुर्गम भागातुन आदिवासी बांधवांसह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषण करताना अटलजीनी कुपोषण, वनजमीनीच्या प्रश्नावर बोलताना आदिवासी बांधवांना वनजमिनी मिळाल्या पाहिजेत असे सांगितले. याकरिता संसदेत आवाज उठवंत राहिल आदिवासी बांधवांना न्याय देण्याची मागणी तत्कालीन पंत प्रधानाना वेळोवेळी केली होती. सभा आटोपून त्यांनी अनुपचंद जैन यांच्या घरी कार्यकर्त्यायासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे त्यांनी बाजरीचा भाकर व खुळा बनविण्यास सांगितले होते. असे अविस्मरणीय  चार तास त्यांनी तळोदयात घालवले..

 *आठवण* 
अटलजींनी तळोद्यात सभा होती त्यावेळी मी दहावीत होतो. प्रतापपूरला आर.एस.एस.ची शाखा चालवीत होतो. माझ्यासह प्रत्येक तरुणाला अटलजीचा भाषणाचे आकर्षण होते. सर्व मित्रांना घेऊन सायकलीवर तळोदा येथे भाषण ऐऐकण्यास गेलो होतो. सभेत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभा चांगलीच गाजली होती. सभा आटोपून त्याच्या ताफा विश्रामगृहाकडे वळला. अटलजीना काहीही झाले तरी भेटायचे असा दृढ निश्चय मनात ठेवून विश्रामगृहावर गेलो. शिरपूरचे आमदार प्रल्हाद तात्या पाटील यांना अटलजीना भेटण्यासाठी विनंती केली. त्यांनी माझी भेट घालून दिली. त्यांना पाहून त्याच्या पायावर डोके टेकले. व आशीर्वाद घेतला. प्रल्हाद तात्यांनी तरुणांनो संघाचे काम प्रखडपणे करत राहा असे सांगितले. *साहेब जुने ते सोने असते* असे उच्चारताच अटलजी ठा-ठा असे मनसोक्त हसले. लगेचच तात्या पाटीलानी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यानंतर विविध अधिवेशनात त्याचे भाषण ऐकण्याचा योग आला. मात्र तळोद्यातील भेट ही अविस्मरणीय अशी आहे.
     डॉ.शशिकांतजी वाणी 
भाजपा प्रदेश सदस्य महा.राज्य

 *आठवण*
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे श्रध्दास्थान
भारत रत्न माजी पंतप्रधान अटलजींचे दुःखद निधन
 मनाला चटका लावणारे आहे. 1980 च्या काळात लोकसभेच्या पोटनिवडणूकी दरम्यान त्यांनी तळोदा येथील आनंदचौकात सभा गाजवली होती. दरम्यान रेस्ट हाऊस येथे बैठकी दरम्यान त्यांनी माझी विचारपूस केली होती. त्यांच्या निधनानंतर एक लढवय्या नेतृत्व, सोज्वळ स्वभावाचा, हिंदुत्ववादी नेता हरपल्याचे दुःख आहे...
        भगवान चौधरी भाजपा 
जेष्ठ कार्यकर्ते जुने भाजपा पदाधिकारी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा