Breking News

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम

आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम तळोदा येथील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळातर्फे स्थलांतराची व्यथा या ज्वलंत विषयावर सजीव देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

 तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २3 वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदांना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, स्त्रीभ्रूण हत्या, बाल कामगार रोखणे, भूत महल, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्य संग्रामातील यशोगाथा, बेटी बचावाचा संदेशसह, धार्मिक, पौराणिक, देशभक्तीपर, देखावे सादर केले आहेत.. या वर्षी *स्थलांतराची व्यथा* या ज्वलंत विषयावर आरास तयार केली आहे. गावाकडे रोजगाराचे साधन नाहीत, शासनाचे सतत बदलणारे धोरण, आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीत होणारे आर्थिक नुकसान आदींवर मार्ग काढणे कठीण होते. शासनाच्या भरवश्यावर न राहता स्वत:च रोजगार कसा मिळेल यासाठी अनेक कुटुंबे गावोगावी भटकतात. वीटभट्टी, इमारत बांधकाम, रेती काढणे यासारखे मिळेल ते काम करून जगण्यापुरतीच मजूरी पदरात पडली तरी ते समाधानी राहतात. परंतु रोजगाराच्या या भटकंंती मुळेच आरोग्याचे गंभीर प्रश्न, तसेच वर्षातील ७ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागल्याने मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, गरोदर माताचे व कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमानात वाढ झालेली पहावयास मिळते. या ज्वलंत विषयावर सर्वोदय गणेश मंडळातर्फे आरास स साकारण्यात आली आहे. यात एक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असल्याचे दाखवले आहे. कुटुंब प्रमुख असलेला श्यामने
कामासाठी अटीतटीचे प्रयत्न करून ही त्याच्या नशिबी निराशाच येते. कुटुंबाच्या दै. गरजा पूर्ण होत नाहीत. मुला बाळाच्या शिक्षणापेक्षा त्यांचे पोट भरणे अवघड होते. या करिता रोजगाराच्या शोधात श्याम कुटुंब घेऊन शहराकडे उदरनिर्वाहासाठी जातो. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. मात्र शहरात आल्याने त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम झाल्याने मुलगा अपयशी झाल्यावर नैराश्यातून आजारी पडतो. मात्र श्यामकडे पैसे नसल्याने तो मुलाचे उपचार करु न शकल्याने मुलगा दगावतो. तर यातून श्याम पूर्णपणे खचून दारुच्या आहारी जाऊन त्याचाही व्यसनामुळे मृत्यू होतो, असे देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे स्थलांतरीय कुटुंबाची व्यथा सजीव देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न सर्वोदय गणेश मित्र मंडळाने केला आहे. यात पप्पू साळवे, कल्पेश चौधरी, जितेंद्र चित्ते, कुशल चौधरी, गुंजन चौधरी, शुभम ठाकरे, हर्ष किनगावकर, संदेश देवरे, जयेश चित्ते, उमेश पाटील, रोहित कलाल, समीर ठाकरे आदींनी अभिनय केला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, उपाध्यक्ष किरण ठाकरे, सचिव राकेश साळवे, खजिनदार दीपक पवार सदस्य दीपक चौधरी, उमेश ठाकरे, नरेश चौधरी, दीपक सूर्यवंशी, कुणाल ठाकरे आदींसह सदस्यांनी देखावा सादरीकरणासाठी परिश्रम घेतले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा