
Breking News
दिलखुलास, दोस्ती दुनियेतील राजा माणूस : ज्ञानेश्वर राठोड
sudhaspari - Jun 06 2025कष्ट, प्रेम आणि एकता यांचे प्रतीक ; शांताराम मराठे (आप्पा) संघर्ष, कष्ट आणि यशाचा गाथा
sudhaspari - May 01 2025
शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८
विविध कार्यक्रमांनी ॲड.वळवींचा वाढदिवस साजरा

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८
२६/११ घटनेतील वीरांच्या शौर्यगाथेचे स्मरण तळोद्यातील तरुणांनी सायकल रॅली काढून वाहिली शहिदांना श्रध्दांजली
गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८
पत्रकारितेचे शस्त्र समाजातील धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करा अनिल चव्हाण :
पत्रकारिताकडे कल द्या, आपल्या सकारात्मक वृतांमुळे समाजात ऊर्जा निर्माण होते. माती अन माणसाची बातमी केल्यास ती हृदयस्पर्शी ठरते. सोशल मिडीयाच्या वाढता प्रकोप पाहता बातमीदाराने जबाबदारी लक्षात घेऊन वास्तव पत्रकारिता करण्याचा दृष्टिकोन ठेवावा, असे मत धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग प्रमुख तथा पत्रकार अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले. . तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन तळोदा महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक
म्हणून धुळे येथील एस.एस. व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण, इलेक्टॉनिक्स मिडीयाचे पत्रकार प्रशांत परदेशी होते. याप्रसंगी पत्रकार हिरालाल चौधरी, बळवंत बोरसे, निलेश पवार, भिकेश पाटील, धनराज माळी, जयप्रकाश डिगराळे, रमेशकुमार भाट, मंगेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अनिल चव्हाण म्हणाले की, पत्रकारिता हे शस्त्र असून त्याचा वापर समाजातील धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करा, असे सांगत पत्रकारांची भूमिका, बातमी म्हणजे काय?
लेख, वार्तापत्र, अग्रलेख म्हणजे काय? पत्रकारांची जबाबदारी आणि त्यातील बारकावे, इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि प्रिंट मिडीया यातील बदलते प्रवाह यासह विविध पत्रकारितेचे बदलते संदर्भ व इतिहास अश्या विविध विषयाबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. प्रशांत परदेशी म्हणाले की, सध्याची पत्रकारिता गतिमान झाली आहे. क्षणातच ई-पेपरच्या माध्यमातून वृत्त प्रत्येकापर्यंत पोहचत आहे. अफवा असलेले वृत्त तसेच खऱ्या-खोट्या बातम्यांची शहानिशा करणे हे आव्हान पत्रकारितेत निर्माण झाले आहे. यामुळे भविष्यात पत्रकारितावर देखील आचारसंहिता लादली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. डिजिटल युगात संवादाची साधने वाढली असली तरी संवाद मात्र कमी झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यशाळेत शहादा, अक्कलकुवा ,नंदुरबार, दोंडाईचा, तळोदा, धडगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते. सुत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले. प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष सुधाकर मराठे, सचिव सम्राट महाजन, उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, कोष्याध्यक्ष चेतन इंगळे आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले..
शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८
तळोद्याच्या भाग्यश्री मगरेला दुबईत नोकरीची संधी

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८
कपडा बॅकेत जमा झालेले वस्त्र अनाथांसाठी ठरताय आधार
तळोदा येथील युवकांचा उपक्रम; बालदिनाचे औचित्य साधत केले वस्त्र वाटप
आपल्याकडे असणारे जुने कपडे फेकुन देण्यापेक्षा कपडा बँकेत जमा केल्यास गरजूंची गरज भागणार आहे. अनेकांना आधार मिळतो. यामुळे जास्तीत जास्त कपडे जमा करण्याचे आवाहन कपडा बँकेमार्फत करण्यात आले.. बोरद : तळोदा येथील कपडा बँकेत जमा झालेले कपडे नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रम केंद्रातील चिमूकल्यांसाठी आधार ठरणार आहे. बालदिनाचे औचित्य साधत तळोदा येथील कपडा बँकेचा उपक्रम राबविणाऱ्या युवकाच्या एका गृपने कपडा बँकेतील सुमारे १०० ड्रेसचे वाटप करून खऱ्या अर्थाने बालदिन साजरा केल्याचे सार्थक केले.. गरीब व गरजूंसाठी तळोद्यातील संतोष माळी, पंकज शेंडे, सुकलाल जाधव, राहुल राणे, अमोल चव्हाण, दीपक जाधव, चेतन माळी, सचिन सूर्यवंशी, कार्तिक माळी या युवकांनी तळोद्यात कपडा बँकेचा उपक्रम राबविण्यात सुरूवात केली आहे. कपडा बँकेच्या माध्यमातुन अनेकजण जुने कपडे गरजूंची गरज भागविण्यासाठी देत आहेत. सद्या मध्यमवर्गीय व गरीबांच्या महागाईच्या चटक्याने हाल सुरू आहेत. या उपेक्षित वर्गाला दिलासा देण्यासाठी तळोद्यातील या युवकांनी समाजाचे ऋण अदा करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून कपडा बँकेचा उपक्रम सुरू केला. यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. काल बालदिनाचे औचित्य साधुन नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रमात कपडा बँकेच्या माध्यमातुन सुमारे १०० ड्रेस वाटप करण्यात आले. दरम्यान हेमंत विश्वनाथ हिवरे यांनी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २० चादरी वाटप केल्या. तसेच विनोद पाठक यांनीही सुमारे ५० शालेय गणवेश वाटप केले. याप्रसंगी अनाथ आश्रमाचे बालकल्याण समिती सदस्य नितीन सनेर, सुरेश पाटील, नितीन पाटील उपस्थित होते. .
आपल्याकडे असणारे जुने कपडे फेकुन देण्यापेक्षा कपडा बँकेत जमा केल्यास गरजूंची गरज भागणार आहे. अनेकांना आधार मिळतो. यामुळे जास्तीत जास्त कपडे जमा करण्याचे आवाहन कपडा बँकेमार्फत करण्यात आले.. बोरद : तळोदा येथील कपडा बँकेत जमा झालेले कपडे नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रम केंद्रातील चिमूकल्यांसाठी आधार ठरणार आहे. बालदिनाचे औचित्य साधत तळोदा येथील कपडा बँकेचा उपक्रम राबविणाऱ्या युवकाच्या एका गृपने कपडा बँकेतील सुमारे १०० ड्रेसचे वाटप करून खऱ्या अर्थाने बालदिन साजरा केल्याचे सार्थक केले.. गरीब व गरजूंसाठी तळोद्यातील संतोष माळी, पंकज शेंडे, सुकलाल जाधव, राहुल राणे, अमोल चव्हाण, दीपक जाधव, चेतन माळी, सचिन सूर्यवंशी, कार्तिक माळी या युवकांनी तळोद्यात कपडा बँकेचा उपक्रम राबविण्यात सुरूवात केली आहे. कपडा बँकेच्या माध्यमातुन अनेकजण जुने कपडे गरजूंची गरज भागविण्यासाठी देत आहेत. सद्या मध्यमवर्गीय व गरीबांच्या महागाईच्या चटक्याने हाल सुरू आहेत. या उपेक्षित वर्गाला दिलासा देण्यासाठी तळोद्यातील या युवकांनी समाजाचे ऋण अदा करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून कपडा बँकेचा उपक्रम सुरू केला. यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. काल बालदिनाचे औचित्य साधुन नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रमात कपडा बँकेच्या माध्यमातुन सुमारे १०० ड्रेस वाटप करण्यात आले. दरम्यान हेमंत विश्वनाथ हिवरे यांनी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २० चादरी वाटप केल्या. तसेच विनोद पाठक यांनीही सुमारे ५० शालेय गणवेश वाटप केले. याप्रसंगी अनाथ आश्रमाचे बालकल्याण समिती सदस्य नितीन सनेर, सुरेश पाटील, नितीन पाटील उपस्थित होते. .
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)