Breking News

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

लढाऊ बाण्याचे शिलेदार'सुहासदादा नाईक'


आदिवासींच्या खडतर प्रवासात १९७०-८० चे दशकही तसे संघर्षाचेच राहिले. अशा काही संघर्षांना सुहासदादा नाईक हे बाल साक्षीदार ठरले. १९७२ मध्ये जन्मलेले नाईक यांच्या डोळ्यासमोर अनेक घडामोडी घडतच होत्या. त्यातून समाज हिताचे काय अन् विघातक काय याची उकल सुहासदादा नाईक यांना बालपणीच होत होती. या घडामोडीतून अस्वस्थ होणारे दादा हे सामाजिक संघर्षास प्रेरीत झाले. बालवय असले तरी त्यांनी अन्य बाबी तथा घटकांमधून बोध घेण्यास सुरुवात केली. पुढे तळोदा तालुक्यातील रामपूर येथील महाराज वेच्या नाईक यांच्या प्रतिष्ठीत परिवारातला एक चाणाक्ष बुद्धीमत्तेचा नवयुवक म्हणून नवी ख्याती त्यांना मिळाली. मुंबईच्या चळवळीतून
 पुढे आलेले क्रांतीचे प्रणेते
शाळा-महाविद्यालयीन जीवनही नेतृत्वाचेच राहिले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे पेलवत मुंबईसारख्या महानगरात अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदावरुन आदिवासींची धुरा समर्थपणे सांभाळली. मुंबईत राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर तत्कालीन धुळे जिल्ह्यातील अन्य समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील ते लढत होते. यातून'आपली माती; आपली नाती' हे ब्रीद ते जपत होते. 
विद्यार्थ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देत त्या सोडविण्यासाठी सुहासदादा हे थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करीत होते. हेच नेतृत्व मुंबई, ठाणे महानगरपालिका व मुंबई बेस्ट भरतीतही आदिवासी व धुळे जिल्ह्यातील मुलांच्या पाठीशी राहिले.
सातपुड्याच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागातील  असंख्य तरुण मुंबईसह अन्य मेट्रो सिटींमध्ये नोकरीच्या शोधासाठी जात होते. आदिवासी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी सुहासदादा सातत्याने प्रयत्न करत होते. विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करुन देत होते. यातून अनेकांनी कठीण परिश्रमातून नोकरी मिळविली देखील. यामुळे की काय अनेक परिवार आजही सुहासदादांच्या संपर्कात येऊन त्यांचे आभार मानतात. दादांकडे असलेल्या दातृत्वातून अनेक आदिवासी बांधवांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आदिवासी तरुणांप्रती असलेल्या या तळमळीमुळेच ते आज आदिवासी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अशा या भक्कमपणे उभ्या नेतृत्वाने अनेक परिवारात सुख-समृद्धी आणली. या सुख प्राप्त परिवाराने हृदयाच्या एका कोपऱ्यात सुहासदादांचे नाव कायमचे कोरले असून ते त्यांच्या प्रती ऋणही व्यक्त करीत आहे. या सुखी परिवाराच्या अन्य नात्यागोत्यांच्या माध्यमातून दादांची ख्याती सर्वदूर निर्माण झाली.

या आदिवासी नेत्यांची मुंबईत चळवळ सुरु असतानाच समाज कल्याण विभागाने आदिवासी आरक्षणाची टक्केवारी कमी करण्याचा घाट घातला. तसा शासन निर्णयही जारी केला. ही बाब समाजासाठी कधीही भरुन न निघणारे नुकसानच होते. दरम्यान, या उमद्या नेत्यांने आदिवासींचा आवाज बुलंद केला. काही राजकीय नेत्यांच्या सहकार्याने तत्कालीन आदिवासी विकास मंत्री गोविंदराव चौधरी यांच्यावर दबाव टाकत शासनास संबंधित शासन निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. हे आदिवासींच्या चळवळींपैकी एक क्रांतिकारी यश ठरले. या क्रांतीचे प्रणेते म्हणून सुहासदादा नाईक यांनाच श्रेय दिले गेले.

कायदा व हक्क यातील उज्वल नेतृत्व
 राज्यशास्त्र व इतिहास विषयातील पदवीधर दादांनी एलएलबीला प्रवेश घेत वकिली तथा कायद्याची धडेही मुंबईत गिरवले. भूतलावरील सर्व आदिवासी संस्कृती, रुढी, बोलीभाषा, इतिहास व मौखिक परंपरा यांची खोलवर माहिती, सोबतीला भारतीय कायदा, आदिवासी हक्क व अधिकार यांचा चिकित्सक अभ्यास. यातून आदिवासी चळवळीशी त्यांचे नाते जोडले गेले. चिकित्सक अभ्यासामुळे ख्यातीप्राप्त सुहासदादा हे ख्यातनाम वक्तेही ठरले. व्याख्यान व प्रबोधनासाठी राज्यभर फिरताना त्यांना त्यांच्या ऋणानुबंधातले जुन्या मित्रांच्या भेटी होत गेल्या व नवे मित्रही त्यांच्याशी जुळत गेले. दादा त्यांच्या प्रत्येक व्याख्यान व मार्गदर्शनात जराशीही कसर सोडत नसत अगदी काळजाला भिडणाऱ्या भाषेतून ते थेट श्रोत्यांच्या मनात घर करुन जातात. आदिवासी चळवळ व लढ्यांच्या बाबतीत प्रत्येक बांधवांमध्ये सुहासदादांनी चेतना जागवलीत. कायद्याच्या चिकित्सक अभ्यासामुळे आदिवासींचे हक्क व अधिकार व्याख्यानातून प्रत्येकाच्या मनावर बिंबवत गेले. त्यांचे प्रभावी व्याख्यान आदिवासी बांधवांमध्ये संघर्ष सज्जतेची उर्जाच भरुन जाते. त्यातून केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही लढा अन् विद्रोहासाठी उभा ठाकतो. सुहासदादा 'लढाऊ बाण्याचे उज्वल नेतृत्व' ठरतात.

बोगस आदिवासींच्या विरोधातील वादळ
 आरक्षणदृष्ट्या आदिवासींना वाढलेल्या ताटाकडे अनेकांचे वर्षानुवर्षे लक्ष लागून आहे. त्यांनी ताटातलाच नव्हे तर आदिवासींच्या तोंडचा घासही पळवला. अशा बोगस आदिवासींविरुद्ध सुहास दादांनी नवा लढा उभारला. देशाच्या कानाकोपऱ्यात नेमका आदिवासी कोण, कुठे विखुरला? याचा दादांना गाडा अभ्यासच. त्यामुळे खरा कोण, खोटा कोण ते त्यांना सहज कळते. सेवा सहकार्य व दानधर्म पाळताना सुहास दादांनी जातीचा विचार न करता मानवी मुल्ये जपत सढळ हाताने मदत केली. मात्र जातीबाबत ते अगदी गंभीर राहिले. आदिवासी समाज अधोगतीला प्रमुख कारण ठरणाऱ्या बोगस आदिवासी नोकरदार, विद्यार्थी यांचा सुहासदादा प्रत्येक पातळीवर सुक्ष्म निरीक्षण करतात. ही त्यांची विशेष ओळख. बोल-चालीतूनच व्यक्तींची जातीविषयक पारख करणारे सुहास दादा जात प्रमाणपत्रबाबत दक्ष राहण्याचा इशारा अवघ्या खान्देशातील आदिवासींना देतात.
लाखो बोगसांनी आदिवासींच्या नोकऱ्या, जागा बळकावल्याने सुहासदादांनी शस्त्रांची नव्हे कायद्याच्या लढाईला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून बोगसांच्या मुद्दयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यासाठी त्यांच्यावर संकटाचे आभाळच कोसळलेत मात्र  दादा डगमगले नाही. समाजाप्रती एकनिष्ठ राहिले. बोगसांविरुद्ध प्रखरतेने व्यक्त होणारे दादा आजही समर्थपणे लढतच आहे. म्हणून बोगसांची बीपी वाढवणारे दादा आज खोट्यांच्या विरोधातील वादळच ठरत आहे.

शिष्टाचारपूर्ण प्रगल्भ राजकारणी
 सुहासदादा सन २००३ पासून राजकारणात असले तरी बहुतांश राजकीय बाबी त्यांना नवीन नव्हत्या. १९९५ मध्ये माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी तळोद्यातून विधानसभेची अपक्ष उमेदवारी केली. त्यावेळी दोन तालुक्यांच्या विशाल प्रदेशात प्रचाराची अवघड असे आव्हान एकट्या दादांनी स्वीकारले. ते त्यांनी सहज पेलवलेही. विद्यार्थी दशेतच मोठ्या नेत्यांनाही लाजवेल अशी महान कामगिरी त्यांनी मुंबईसारख्या महानगरात राहून बजावली होती. विधी शाखेचा अभ्यास व राज्यशास्त्रातील पदवीमुळे त्यांना जणू राजकीय वलयच होते. २०१४ मध्ये अमोनी ता.तळोदा गटातून निवडून आल्यानंतर २०१६ ते २०१९ पर्यंत त्यांनी जि.प.उपाध्यक्षपद भूषविले. जि.प.मध्ये प्रतिनिधित्व करताना जनसेवेत तत्परता, पारदर्शकता ठेवणारे दादा निष्पक्ष राहिले. त्यांच्यातील शिष्टाचारपूर्ण वागणुकीने दादाांना नवी प्रतिष्ठा लाभली. अधिकारी-पदाधिकारी, जनता, कर्मचारी यांच्यात समन्वय राखणाऱ्या दादांच्या प्रगल्भतेमुळे त्यांच्याशी अवघ्या जिल्ह्याची जनता जोडत गेली. जनसंपर्कात मोठी भर पडली अन् बघता-बघता ते जिल्ह्याचेच नेते बनले.

जनतेच्या नजरेत भविष्यातला कर्तव्यदक्ष आमदार
 मुळात सेवा, सहकारी पार्श्वभूमीचे सुहासदादा प्रत्येकाला आपलेसे वाटू लागले. निष्पक्ष सेवेमुळे भविष्यातला कर्तव्यदक्ष आमदार या नजरेतून जनता त्यांच्याकडे पाहू लागली. दादांना विधीमंडळात पाठवायचे व तेथे पाहायची इच्छा जिल्ह्याची तरुणाई व अबालवृद्धांकडून व्यक्त होऊ लागली. जनतेत दादांप्रति विश्वासार्हताही वाढीस लागली. यामुळे त्यांनी २०२४ ची तयारी सुरू केली. त्या दिशेने पाऊल टाकतांना काँग्रेस विचारधारेचे सुहास दादांनी पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांची सदिच्छा भेटही घेतली. तेथे नंदुरबार जिल्हा व गांधी परिवार यांच्यातील जुन्या नात्यावर चांगलीच चर्चा रंगली. दरम्यान, आपले विचार व काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या सुहास दादांच्या विधानसभा उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा करीत राहुल गांधींनी त्या दृष्टीने शब्दही दिला. त्यामुळे 'आदिवासी चळवळी व संघर्षातून उदयास आलेला हा लढाऊ बाणा' राजकारणात 'ध्रुवा'सारखे आपले अढळ स्थान निर्माण करेल यात
शंका नाही.  

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

अन् ८० फुटावर लागले पाणी...

                    गणेश स्थापनेच्या दिवशी बोअरवेल करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थापने नंतर म्हणजेच १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्षात बोरवेल करण्यास सुरुवात केली, पाणी कोणत्या दिशेला लागेल याबाबत कुठल्याही तज्ञाशी चर्चा न करता अथवा कुणालाही न दाखवता पाणी या ठिकाणी हमखास लागेल, कारण चिंतेश्वर महादेव शेजारी आहे याशिवाय पश्चिमेला बाजूला सार्वजनिक व उत्तरेला खुशाल सागर यांचे असे साधारणत: २० फुटाच्या अंतरावर दोन बोअरवेल असल्याने पाणी लागेलच अशी श्रद्धा व आत्मविश्वासावर आम्ही बोरवेल करण्याचा निर्णय घेतला. घराचा लांबी रुंदी नुसार व घर बांधकाम सर्व सोय सुविधायुक्त यावे याशिवाय आपल्यामुळे अन्य कुणाला अडचण भासू नये म्हणून जागेच्या अनुषगाने बोअरवेल बैठक हॉल मध्ये म्हणजेच घराचा ईशान्य कोपऱ्यात येणार होती. तसेच आज दोन खोलीचे नियोजन असल्याने व भविष्यात काही बदल केल्यास एक खोलीचे बांधकाम केल्यास सदर बोअरवेल ओट्यावर यावे म्हणून मंदिरापासून ६ फूट व पश्चिममे कडील असलेले शेजारी राजेंद्र बोरसे (शिंपी) यांच्या घराला लागून साधारणत: १७ फूट येवढे बोअर करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता ठेकदार दिलीप शिंदे, इंजि. आयुष्य गांधी यांनी प्रत्यक्ष भेटून मोजमाप करून जागा निश्चित केली.
                 गुरूवार (१ सप्टेंबर २०२२) रोजी आई-वडिलांचा आशीर्वादाने त्यांच्याच हस्ते बोरवेलचे पूजन करून सुरुवात केली. दुपारी उशिरा काम सुरू झाल्यामुळे पहिल्या दिवशी केवळ चाळीस फूट खोल बोरवेल करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते एक वाजेच्या दरम्यान पुन्हा ४० फूट खोल बोरवेल करण्यात आली. ऐंशी फुटावर मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे संबंधित बोरवेलकर्त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने या दिवशी दिवसभरात साधारणता १५० फूट खोल बोरवेलचे पाईप आम्ही उतरवले. 
         उद्या दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी देखील पुन्हा वीस ते तीस किंवा चाळीस फूट पावतो खोल बोरवेल जाऊ देण्याचा आमचा इरादा होता मात्र अखेर १६० फुटा पावेतोच बोअर गेले, बोरवेल झाल्या नंतर सुपर टेक कंपनीचे सहा इंची पाईप पीयुष गांधी, गांधी ट्रेडर्स यांच्याकडून १९०० रू प्रमाणे ८.५ पाईप खरेदी केले. सोलेशन ५०० रू व भाडे ५०० असा एकूण खर्च आला. काळ्या रंगाचे पीव्हीसी पाईप व डुक् कंपनीचे १.५ ची मोटार व स्विच शहरातील अण्णा भोई यांच्याकडून २२००० रू घेतला. 
                  कष्टभंजन बोअरवेल बबलू महाजन (खान्देशी गल्ली) यांना ९० रू फूट प्रमाणे बोरवले करण्याचे काम दिले. सुरुवातीला ६०० रू खड्डे करण्यासाठी दिले. त्यानंतर दोन माणसे प्रकाश वळवी (बहुरूपा) व पिंटू वळवी (कढेल) येथील २ घे जणांनी  बोअरवेलचे खड्डे केले. शेवटी बोअरवेल धुण्यासाठी ३२०० रू लागले. बोअरवेल करताना लागणारे पाण्याचे टँकर अनिलभाऊ मोरे (भोई) यांनी उपलब्ध करून दिले. अश्विनभाऊ परदेशी यांनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिली. ४ सप्टेंबर २०२२ रोजी बोअरवेलचे होल साधारणतः ४ तास मोटार सुरू ठेवून धुण्यात आले. अपेक्षेप्रमाणे पाणी लागल्याने सर्वांचा सेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले.   
               बोअरवेल कुठे करावी कशी करावी, किती खोल करावी, पाईप किती उतरवावे, बोअरवेल दरम्यान लागलेली रेतीत असलेले लहान सफेद दगडांवरून पाणी साठा मुबलक असतो, बोअर खड्डे अधिकाधिक स्वच्छ करावे ज्यामुळे जमिनीतील झरे मोकळे होतात व पाण्याची क्षमता वाढते, कुठल्या कंपनीचे पाईप टाकावे, मोटार टाकावी अश्या बारीक सारीक बाबी व अन्य बारकावे गल्लीतील शशिकांत माळी, सचिन माळी, धीरज माळी, राहुल सागर, विलास हिवरे, जगन्नाथ अग्निहोत्री, व्ही.बी.पाटील, गौरव वाणी, सुनील सुर्यवंशी (कालू भाऊ), अक्षय जोहरी मोठे बंधू योगेश मराठे आदीनी समजवले यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे खूपच सहकार्य लाभले...           

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

वारसाने मिळालेल्या संधीला कर्तुत्वाने सिद्ध करणारे... तळोदा शहराचे उमदं नेतृत्व


वारसाने संधी मिळते.
कर्तृत्व सिद्ध करावे लागते 
या उक्ती प्रमाणे राजकीय वारस असला तरीही ते सिद्ध करणे टिकवून ठेवणे व वारसा पुढे नेणे हे महत्वाचे असते असेच काही सिद्ध करत वारसा पुढे नेणारे युवा नेतृत्व म्हणजे शहरातील राजकारणात अवस्थेत येत असून अनेक तरुण राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरात सर्वच राजकीय पक्षात तरुण असले तरी एक नवीन सुशिक्षित चेहरा तळोदा शहराचा जनतेसमोर येत असून कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने ज्या व्यक्तीकडे भविष्यातील लोकप्रतिनिधी म्हणून जनता पाहत आहे असे जितेंद्र सूर्यवंशी.... असून तळोदा नगर पालिकेचे राजकारण असो अथवा सहकार क्षेत्र असो अथवा शैक्षणिक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रात राजकीय वजन असणारे माळी कुटुंबातील एक तरुण नेतृत्व जितेंद्र सूर्यवंशी यांच्या रूपात पुढे येत आहे.
          माजी नगरअध्यक्ष भरत माळी यांच्या राजकीय छत्रछायेखाली राजकीय क्षेत्रात अतिशय कमी वयात उडी घेतली असून राजकीय वारसा असल्याने विविध राजकीय डावपेच लहान पणा पासून जितेंद्र सूर्यवंशी यांनी गिरवले. याच काळात राष्ट्रीय काँगेसचा माध्यमातून त्यांचा संपर्क युवा काँग्रेस संघटनसाठी काम करत असताना सत्यजित तांबे यांच्या जवळ आला. एक विचार जुळले त्यामुळे राष्ट्रीय काँगेसचे तांबे यांचा विश्वास असल्याने त्यांना युवक काँग्रेसची जिल्ह अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली मागील काळात झालेल्या राजकीय घडामोडी तसेच जिल्हा व शहरातील राजकीय वातावरण पाहता अत्यंत धाडसी निर्णय घेत त्यांनी भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय घेत असताना त्यांना अनेक स्वकीय यांनी निर्णय घाईत घेवू नका असे सांगितले. मात्र जितेंद्र माळी यांनी अतिशय विचाराअंती भाजप प्रवेश निश्चित केला. आपले कुटुंब जरी काँग्रेस संघटनेत सुरुवातीपासून काम करत असेल तरी विकास हा मुद्दा महत्वाचा असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडवणीस तसेच डॉ विजय कुमार गावित तसेच विद्यमान आमदार राजेश पाडवी यांचा कामाचा झंझावात पाहून हा निर्णय घेतला आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शाखाली पुढील राजकीय वाटचाल ते आता चालणार आहेत. त्यांची तिसरी पिढी मागील राजकारणात पुढे येत असून त्यांचे बाबा स्व. बबनराव छगनराव माळी यांनी नगरअध्यक्षपद भूषविले होते. त्यांचा आजी विमलताई बबनराव माळी या देखील नगर अध्यक्ष व नगरसेविका होत्या. तर त्यांचे काका भरत माळी यांनी तळोदा नगर पालिकेवर तब्बल तीन दशके राज्य केले असून त्यांचे वडील लक्ष्मण बबनराव माळी हे समाजकार्य सोबतच शेक्षणिक संस्था सांभाळत आहेत. तर काका संजय माळी हे आज सभागृहातील सर्वात जेष्ठ नगरसेवक आहेत.
          याबाबत जितेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांचा राजकीय वाटचालीबाबत सांगितले ....... मला राजकीय वारसा जरी असला तरी मी स्वतः ग्राऊंडवर जाऊन काम केल्याने शहरातील युवकांचा मोठा प्रतिसाद मला या काळात मिळाला. मला पहिली संधी मिळाली ती म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून. ही नियुक्ती पद्माकरजी वळवी साहेब. भरतभाई माळी यांनी दिली त्यामुळे शहरातील लोकांचा समस्या जाणून सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत.
       मा.ना. के.सी पाडवी साहेब व सत्यजीतदादा तांबे यांनी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्या माध्यमातून जिल्हाभरात हेल्पलाईन नंबर दिला. कोविड काळात लोकांची सेवा करू शकलो. जिल्ह्यात स्वतंत्र कॉविड तपासणीसाठी लॅब मंजुरीसाठी मागणी केली व तत्कालीन पालकमंत्री मा.ना.के सी.पाडवी साहेब यांनी मंजुरी दिली. त्याचा काळात सत्यजीतदादांच्या मार्गदर्शन खाली जिल्हाभरात गरजू लोकांना शिधा वाटप, गरजूंना दैनंदिन अन्नदान, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संधी -सोबत मिळाली हे कार्य करत असतानाच जिल्हा भरातून युवकांचा प्रतिसाद मिळाला.
        कृषी उत्पन्न बाजार संचालक म्हणून मा. आ. उदेसिंग समितीच्या प्रशासकीय नियुक्त संचालक म्हणून दादा यांचा नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या तळोदा शहरातील नामांकित ह शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शाळेचा 3 चेहरा मोहरा बदलला, गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलंत यात सर्व कर्मचारी सहकाऱ्यांचे मन जिंकुन त्यांचा सोबत काम करून त्यांच्यातला एक सहकारी म्हणून वावरत असतांना त्यांचा समस्या समजल्या त्या एक संघ होऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत.
सत्यजीत दादा यांचा एस.एम. गर बी.टी. हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गरजु लोकांना पण वैद्यकीय मदत करून देता येत आहे. मा आ राजेश पाडवी यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधुन महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले त्यात १०७७ रुग्ण तपासणी करून आवश्यक त्या शस्त्रक्रियासाठी घोटी येथील एस.एम. बी. टी. हॉस्पिटल येथे य रुग्णांना स्वखर्चाने पाठवले. अजूनही गरजू रुग्णांना जरी त्याठिकाणी सवलतीत योजनेतून  उपचारासाठी मदत होत असते. शहरात एक नावीन्य उपक्रम राबविला मला wifi zone स्मारक चौक परिसरात सेवा आजही कार्यरत आहे. जेव्हा इतर शहरात जात असतो गून त्यावेळेस त्या त्या ठिकाणी जे जे चांगले आहे ते ते माझ्या शहरातही असले पाहिजेल या भावनेतूनच प्रामाणिकपणे सर्वच समाजातील युवकांना सोबत घेऊन काम सुरू आहे....
       कोविड काळात लसीकरणचे विविध शिबिर राबविली. दरवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थीसाठी शेक्षणीक साहित्य वाटप केले जाते. तसेच १७ जानेवारी सुधीर तांबे यांचा वाढदिवसानिमित्त  पुस्तक दिवस म्हणून साजरा करत पुस्तकांचे वाटप केले जाते.

*वारसाने संधी मिळते कर्तव्य हे सिद्ध करावे लागते.*

यावडीप्रमाणे मी माझा काम गेली पाच वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे अविरत करत आहे प्रसिद्धीच्या मागे कधीही लागलो नाही माझा उद्देश एकच ठेवला आपण केलेल्या कार्याचा लाभ हा सरळ लाभार्थ्याला कसा होईल. यासाठी प्रयत्न करत आलो. तसेच जो नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो त्याला माझी पाठिंबा असतो. . 

*सर्व जाती धर्माला संधी देणारे कुटुंब*

       भरतभाई माळी यांनी मागील ३५ वर्षात त्यांचा राजकीय वाटचालीत. कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व जाती धर्माचे समाजाचे लोकांना सोबत घेत वाटचालच केली नाही तर अनेकांना राजकीय दृष्ट्या उभे केले व राजकीय संधी दिल्या तसेच मोठ मोठ्या पदावर सन्मान दिला. विविध समाजाचे लोकांना नगरसेवक यात नगर अध्यक्ष, उपनगरअध्यक्ष, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक त्यात आदरणीय दीपाली वळवी पहिल्या आदिवासी महिला नगराध्यक्ष बसवत असताना भरतभाई यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. तसेच कलाल समाजाचा आदरणीय ताराबाई बागूल कलाल समाजातील नगराध्यक्ष केल्या. रत्ना चौधरी चौधरी समाजातील नगराध्यक्षा केल्या. वाणी समाजातील अल्पसंख्याक व्यक्ती गौरव वाणी याना उपनगराध्यक्ष केलं. रुकसनाबी सैय्यद उपनगराध्यक्ष, नंदूगिर गोसावी यांना उपसभापती पं.स. सदस्य मार्केट कमिटी मार्केट कमिटी, विजय क्षत्रिय यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले.  दत्तात्रय पाटील उपसभापती त्यांचा नेतृत्वखाली हितेंद्र क्षत्रिय तसेच संदीप परदेशी यांचा पत्नी अनिता परदेशी या नगरसेवक पदी निवडून आल्या असे अनेक लोकांना सर्व समाजातील घटकांना विविध क्षेत्रात संधी दिली.
*भरतभाईचे तळोदा शहरातील महत्त्वाचे निर्णय*

     तापी पाणी शुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्यात आणला. तसेच राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित व तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमुदिनी गावित यांचा माध्यमातून १२ कोटी रुपये इतका निधी जलशुध्दीकरण प्रकल्पसाठी सतत पाठपुरावा करून मंजूर करून आणला. त्यात पहिल्या टप्प्याचा निधी त्याच काळात प्राप्त झाला. तसेच पालिकेचे व्यापारी संकुलाचे निधी मंजूर व भूमिपूजन त्यांच्याच काळात झाले. नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे निर्माण हद्दवाढ प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवली. नवीन वसाहतीत खुल्या जागा संरक्षण भिंती, गार्डन निर्माण शहादा रोड दुभाजक शहरातील जुने चिखलमय रस्ते चे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यास सुरवात त्यांचा नेतृत्व खाली असणाऱ्या माजी नगर अध्यक्षा रत्ना सुभाष चौधरी यांचा काळात झाली. शासनाकडे पाठपुरावा करत मोठा निधी याच काळात आला. भरतभाईकडे त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहे. ते राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळीही नगरसेविका होत्या. पत्नी सौ. योजनाताई माळी ह्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. तसेच त्यांचे मोठे बंधू आप्पासाहेब लक्ष्मण माळी हे शेक्षनीक व सामजिक क्षेत्रात सदैव सक्रिय असतात तर लहान काका संजय माळी हे आज सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून परिचित असून श्री गणेश सोशल ग्रुपचा माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतात. आज या राजकीय दृष्ट्या संपन्न असणाऱ्या कुटुंबाचा राजकीय वारसा जितेंद्र सूर्यवंशी यांच्या खांद्यावर आला आहे. अनेक अडचणींवर मात करत आला त्याचा सोबत नाही आला त्याचा विचार न करता... राजकीय वाटचाल करत आहेत. कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी काय करावे लागते या बाळकडू त्यांना लहान पणी मिळाले असले तरी त्या काळातील राजकीय स्थिती व आजची राजकीय स्थिती या दोघांची सांगड घालून नवीन जे आवश्यक बदक ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबत कुटुंबाची अनुभवाची शिजोरी आहेच. येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी सर्व समाज व जाती धर्मांना सोबत घेवून नवीन दृष्टीकोन घेत तळोदा शहराचा विकासासाठी पक्ष संधी देईल त्या पदावर राहून बदल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
बबनराव पेहलवान यांचा तळोदा शहरातील सांस्कृतिक वाटचालीत एक वेगळेच महत्व होते. पूर्वी या कुटुंबाचा लाकूड व्यवसाय होता त्या वेळी शहरातील मानाचा दादा गणपतीचा मंडपासाठी लागणारे लाकडी खांब पुरवण्यासाठी स्व. बबनराव पेहलवान यांची मोलाची साथ लाभली होती.तसेच शहरातील कालिका मात्रा उत्सव काळात पूर्वी त्यांचा स्मारक चौकमधील हॉटेल गणेश समोर उंच लाकडी मंडप हे आकर्षण होते. त्यांना व्यायामाची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे कुस्ती प्रेम पाहता इतर तरुण मुलांना देखील कुस्ती खेळण्यासाठी संधी मिळावी म्हणून व्यायामशाळा काढली व तरुणांना व्यायामाबाबत प्रेरित केले.