Breking News

शुक्रवार, ५ जून, २०२६

माणुसकीच्या स्पर्शाने उभारी देणारा अधिकारी - निर्मल तोरवणे

  धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले निर्मल तोरवणे हे नाव केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर माणुसकीचा जीवंत अनुभव देणारा एक दिलदार, प्रेमळ आणि सोज्वळ व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या वागणुकीतला आत्मीयतेचा सूर, सहकार्याची तयारी आणि मनमिळावूपणा अनेकांना आजही सावरणारा, आधार देणारा ठरला आहे. अशा व्यक्तींचा आपल्या जीवनात असणं म्हणजे नशिबाचं भाग्यच.

        माझ्या व्यक्तिगत संघर्षाच्या काळात मी खूप अडचणीत होतो. आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि निर्णयाच्या उंबरठ्यावर थांबलेला. त्या वेळी तोरवणे साहेब एका देवदूतासारखे आले. सुधाकरजी, टेन्शन घेऊ नका. तुमचे काहीही काम असले तरी आपण मार्गी लावु, हे त्यांचे शब्द अजूनही कानात घुमतात. त्यांनी एकाही क्षणी कुठलीही मागणी केली नाही, कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. दिलं तर केवळ भरभरून प्रेम, मदत आणि साथ.
           माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी त्यांनी ज्या प्रकारे मदतीचा हात दिला, ती उभारी विसरणं अशक्य आहे. माझं आयुष्य जेव्हा आर्थिक संकटांमुळे ढवळून निघालं होतं, तेव्हा त्यांच्यामुळेच स्थिरता आली. कठीण प्रसंगांमध्ये त्यांचं नेहमीच एक वाक्य असायचं सुधाकरजी, टेन्शन घेऊ नका, मार्ग काढू. आणि हे केवळ बोलण्यापुरतं नव्हतं, तोरवणे साहेब प्रत्यक्ष कृतीतून तो मार्ग शोधून देत असत...
          त्यांनी माझ्याकडून कुठलीच अपेक्षा केली नाही मी त्यांना भेटायला गेलो तर फक्त एक चॉकलेट ते माझ्याकडून घेत आणि या गोड माणसाला मी जाताना अगदी निरागसपणे न विसरता चॉकलेट घेऊन जात. त्यांची बदली झाली याचा मेसेज नुकताच त्यांच्या तोंडीच समजला. साहजिकच, मनाला एक कळ लागली. तो मेसेज ऐकून दुःख वाटले.. खरं सांगायचं तर ते केवळ अधिकारी नव्हते, तर एका मोठ्या मनाचे, दयाळू हृदयाचे माणूस आहे. त्यांच्या अशा वृत्तीमुळे त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. जी फक्त फाईल किंवा टेबलपुरती नव्हती, तर थेट लोकांच्या हृदयाशी जोडलेली होती.
         तोरवणे साहेबांनी माझ्यासह अनेकांना हात दिला, आधार दिला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन आज मी जे काही स्थिर आहे, ते केवळ त्यांच्या निःस्वार्थ मदतीमुळे. माझ्या आयुष्यात त्यांनी जे स्थान निर्माण केलं आहे, ते शब्दात मांडणं कठीण आहे. माणसं येतात आणि जातात, पण काहीजण आपल्या आयुष्यात अशी छाप सोडतात की ती आठवण संजीवनी ठरते. निर्मल तोरवणे साहेब म्हणजे अशीच एक व्यक्ती – ज्यांना विसरणं अशक्य, आणि ज्यांचं ऋण शब्दांनीही फेडणं अशक्य!..
           आयुष्यात खूप प्रेम करा आणि माणसं भेटले साहेब यात आपण माझा हृदयात कधी स्थान केलं हे मलाही कळलं नाही पण या संकटात आपली लाभलेली साथ ही कधीही मला विसरता येणार नाही आपणास कधीही कुठलीही कशीही पद्धतीची मदत लागली तर मी कशाही पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल हा शब्द मी तुम्हाला देतो.. बदली झाल्याचा संदेशाने थोडा भारावून गेलो मात्र पुणे सारखा मेट्रोपोन्टीन सिटी मध्ये तुमच्या माध्यमातून आमचं स्थान कुठेतरी राखले जाईल याची शास्वती ही तेवढीच प्राप्त झाली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा