Breking News

गुरुवार, २४ मे, २०१२

लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही,
पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो,
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो,
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो,
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही,
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे.
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे.
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे,
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही,
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे,
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही.
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही... ........

माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात नयनांच्या माझ्या पापण्यात थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
तुझ्या एका नजरे साठी असतो सदा तुजपाठी मज भरकटलेल्या जीवन मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
एकच ध्येय माझ्या जगण्याचे तुला माझी झालेली बघण्याचे करण्या मज इच्छापूर्ती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
तुझ्यात असतो मी गंभीर करतेस मज तू अधीर शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?


                                                                                                                       साभार - कवी: म.श.भारशंकर

मराठी लव्ह स्टोरीज . . .

प्रेयसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ...........
तू ऐकत का नाहीस ?
प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय,
पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचे tension देत आहेत ....
लग्नाला नाही म्हणत आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पण आहे ............
पण म्हणून मी पिते का सिगारेट ?
प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना ......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू, चीडचीडपणा ......
हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ......
त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार कर !!
प्रेयसी :- घरच्यांच्या आधी तुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ..................
प्रियकर :- म्हणजे ?
प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..
प्रियकर :- कुठे ? (तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते ................
मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून द्यावी लागते,
तो नाराजीने हाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो) प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपती बाप्प्पा ला म्हणते :-
हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक दिवस ..........
ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर ......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!! ♥♥

तुझा पासून खूप दूर गेले तर


मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
माझी आठवण काडशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एकांतात एकदा तरी माझासाठी रडशीला ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एकदा तरी मनापासून love you बोलशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
तुझा जवळ असलेला माझा फोटो कधी तरी बगशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एका क्षणापुरता मी तुझा जवळ आहे असा विचार करशीला ना..

चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो

चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो



♥ एका तलावाच्या काठावर ...
♥ प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ ...............
त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,
किती छान बदके आहेत बघ,
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच
आत मधले प्रेम लवकर कळून येत नाही ...
वास्तविक मी तुझ्यावर, "
त्या पांढर्‍या शुभ्र सुंदर बदकांसारखे नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ?
प्रियकर:- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते..."

प्रेम करतोस तुझ्यावर

प्रेम करतोस तुझ्यावर

 "प्रेयसी :- दादर स्थानकावर मुलीच्या चेहर्यावर असिड टाकण्याची बातमी वाचलीस का ?
किती भयानक ना ?
प्रियकर :- होना ...
खूप दुखदायक घटना,
म्हणून तू सांभाळून व हुशारीने रहात जा.
प्रेयसी :- हो रे, कित्ती प्रेम करतोस माझ्यावर ♥ ......
बर मला सांग,
असे असिड जर माझ्या चेहर्यावर कोणी टाकले
आणि जर मी त्यात मरण पावले
 तर आयुष्यभर काय करशील ?
प्रियकर :- मी आयुष्यभर तुरुंगात असेन.
प्रेयसी :- म्हणजे ???
प्रियकर :- तुला दुखावणार्या माणसाला मी जिवंत सोडेन का ?"

बुधवार, २३ मे, २०१२

जबाबदार माणूस जरुर व्हायच.................

जबाबदार माणूस जरुर व्हायच.................
मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपाय
धूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात
तिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली.
डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला
टाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे
कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनं
काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी
लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.......

नुस्तच कालावाण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय.
तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली.
मी विचार करीयला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर?
इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया?
तुम्हाला मुलबाळ नाही का?

त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाय काय, पोरगा मोठा, सायब हाय,
परदेशाला इंजनेर हाय पण त्याला येळच न्हाय!
कानाखाली कोणतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल.
माणूस
इतका बदलतो का? आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला
क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. माझी चेहरा खाली घालूत
मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी
वरती पाहील तर तिच बाई मला म्हणाली.
इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल...........


मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एका
क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच
थोडस दु:खसुद्धा कधीच जाणता येत नाही.
जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.

सेटलमेंट,
न्यूजाँब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन
बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लागलो.
शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो?
मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरुर व्हायच.................

मंगळवार, २२ मे, २०१२

ऐक सुंदर प्रेम कथा

ऐक सुंदर प्रेम कथा

ऐके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी ऐक खुर्ची पाठवतो .
ती खुर्ची खूप खास असते . कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर ...
त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो
आणि जर त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणारअसतो
मुलगा त्या खुर्ची वर बसतो मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच लाल दिवा पेटतो )
मुलगा घाबरतो मुलगी : घाबरू नकोस .
देवाची काहीतरी चूक झाली असेल हि खुर्ची बनवताना आपण परत एकदा प्रयत्न करून बघू
मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जावून बसतो .
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच हिरवा दिवा पेटतो ) काही कळल का तुम्हाला ?
जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्याखुर्चीवर बसला तोपर्यंत तरी त्या मुलाच त्या मुलीवर खर प्रेम नव्हत .
पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असेलला विश्वास पाहिला आणि
तो तिच्यावर खर खुर प्रेम करू लागला यालाच म्हणतात प्रेम ............... ..
म्हणून लक्ष्यात ठेवा मित्रानो ऐक तर्फी प्रेम सुद्धा यशस्वी होऊ शकत
फक्त तुमचा तिच्यावर / त्याच्यावर असेलला विश्वास कुठेही कमी झाला नाही पाहिज...

तु आपलं म्हणालीस आणि ,


तु आपलं म्हणालीस आणि , जग माझं बदलल .
सगळं काही मीळlल ,
स्वप्नं सत्यात उतरल .
झुरत होतो तुझ्यासाठी ,
मरतहोतो तुझ्यासाठी ,
कळत होता वेडेपणा तरी ,
तसेच वागत होतो तुझ्यासाठी.
तु आपल म्हणालीस आणि , जग माझे बदललं .
सगळ काही मीळlल,
आयुष्य माझंपालटल .
क्षणो क्षणी , ओढ़ होती क्षणो क्षणी बैचैनी ,
मनामध्ये शिरली होती तुझीच ती धुंदी .
तु आपल म्हणालीस , आणि सुख मला मीळlल .
हवे होते जसे मला उत्तर तसेच मीळlल .
तु आपलं म्हणालीस आणि जग माझं बदललं .
सगळं काही मीळlल
मन आनंदाने भरलं .
किती स्वप्नं पहिली होती किती कल्पना रंगवल्या होत्या
तुझ्या विचlरने सखे रात्र रात्र जागवल्या होत्या
स्वप्नातून सत्यात तु आलीस आणि
मन माझं खरं ठरलं तु आपलं म्हणालीस आणि जग माझं बदललं .... !!!

सोमवार, ५ मार्च, २०१२

मिलनाची ही रात्र अचानक आली


मिलनाची ही रात्र अचानक आली
आणि क्षणात सर्व रुसवे-फुगवे घेऊन गेली

लाजत लाजत ती माझ्या मिठीत आली
आणि मला जगाचा विसर पाडून गेली
...
दोन जीवांचे हे पवित्र मिलन पाहून
आकाशातील चंद्राला पण हेवा वाटला
आणि माझ्या मिठीत माझ्या प्रियेला
पाहून तोही क्षणभर वेडावून गेला

साक्षात माझी प्रेरणा माझ्या समोर आली
आणि उरलेल्या ओळींची मला विस्मृती झाली

होना तू हलका वारा

होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा
मनास माझ्या स्पर्श करण्या होना तू हलका वारा

रंगी तुझ्या न्हाले मी
नकळत तुझे झाले मी
का गुणगुणू लागल्या आज त्या
हृदयाच्या अजीर्ण तारा
होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा

अबोल वेलींशी बोलते मी
तुझ्यात मला शोधते मी
नजर जाई जिथे माझी
दिसे फक्त तुझाच चेहरा
होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा

पाखरू माझ्या मनाच
बसत कधी तळ्याकाठी
अतूट बंधन जुळल तुझ्यासवे
ज्याने बनल्या नात्यांच्या रेशीमगाठी
एवढी गुंतते तुझ्यात मी कि
भर उन्हात पडताना दिसतात पावसाच्या गारा

होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा
मनास माझ्या स्पर्श करण्या होना तू हलका वारा.....

जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून

‎|| जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून झळकले मंदिराचे कळस
 जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून दिसले सुहासिनिंच्या कुंकू भाळी
 जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पतीव्रतांच्या किंकाळ्या विरल्या नाहीत रानोमाळी || १ ||
... ... जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून दिसले स्वप्न स्वराज्याचे
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून फुलले कर्तुत्व शिवरायांचे
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून विझली सतीच्या सरणाची आग
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून मुर्दाड मनाला आली जाग || २ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून झाली अन्याय,अत्याचार ाची अधोगती
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून स्वराज्याला मिळाले दोन दोन छत्रपती
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पिलांना क्रांतीचे पंख फुटले
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून भटशाहीचे बुरुज तुटले || ३ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून शिवबा सार्वभौम छत्रपती बनले
जिजाऊ तुमच्याच हयातीत रयतप्रिय राजाला भटांनी शुद्रात गणले
जिजाऊ तुम्ही सल अपमानाची काळजात ठेवून पाचाडी विसावल्या तेव्हा विव्हळल्या मनानं दुखाश्रू ढाळत होत्या रायगडच्या सावल्या || ४ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणूनच लढला मावळा जगला महाराष्ट्र आणि तगला मानव धर्म
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पेटून उठला आज मराठा आणि प्रगटला घराघरातून शिवधर्म....
 || जय जिजाऊ || || जय शिवराय ||

राजा शिवछत्रपती


सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
... जिजावुंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास
तोफांचा आवाज होता
घोड्यांच्या टापांचा नाद
कडेकपारीत फिरत होता
मर्द मराठ्यांचा वाघ
यौवनांच्या छातीत धडकी होती
आमच्या छातीत राम
पळता भुई कमी पडली ज्याच्या भीतीने
राजा शिवछत्रपती त्यांच नाव .

माझा राजा शिवछत्रपती

माझा राजा शिवछत्रपती

परवा परवा मुंबईमध्ये हिंदु - मुसलमानांची दंगल झाली , का झाली , कशासाठी झाली ,
कारणं परंपरा हा भाग वेगळा ,... पण त्या दंगलीचा फायदा उठ्वून ,
 एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काहि गुंड होते
आणि त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एन पंचविशितली एक लावण्यखणी युवती होती .
देखणी ,.... आरसपणी .. बस बघावं आणि बघतच रहावं इतकी लावण्यखणी ,
 या गुंडांचा तिच्यावर डोळा होता , दंगलीच्या कल्लोळाचा फायदा...
उठ्वावा आणि त्या युवतीची आब्रु लुटावी ......
असा बेत त्यांनी आखला आणि दंगल एन जोमात असतानाच ,
रात्रिच्या बारा साडे बारा वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले ..........
बघता बघता दरवाजावर धड्का पडू लागल्या , आतली ती बावरली ..... शहारली ........ घाबरली ,
खिडकितुन बघितलं .... गुंड दिसले ... इरादा ध्यानी आला तसे जिवाच्या आकांताने धावत सुटली .

मुंबईच्या रस्त्यावरुन रात्रिच्या बारा साडे बारा वाजता बेभानपणे पळतेय .
गुंड पाठलागावर आहेत , तिला कळून चुकलं ....
या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आब्रुची लक्तरे ईथे रस्त्यावरच टांगली जातील ,
म्हणून बेभान पळतेय जिवाच्या आकांताने काळोख चिरत धावतेय ..... धावता .... धावता एका बोळात
शिरली बोळातल्या एका घरात तीला उजेड दिसला धपापत्या उरानं दारापुढं आली ....
दार ठोठावलं दार उघडलं गेलं ..... दारात उभा होता एक एन तिशीतला एक हिंदु युवक .........
दारात मुसलमानी पाहीली त्याला आश्चर्य वाटले . बाहेर दंगल चाललीय हिंदु - मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मग या हिंदुच्या दारापुढं कशी ?.....
त्याने विचारले " काय हवयं ?"

ती युवती म्हणाली " काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत , एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का ? माझी आब्रु लुटायचा बेत आहे त्यांचा ."
हा युवक म्हटला " निश्चिंत आत ये घर तुझच आहे " तिला आत घेतलं , स्वतःच अंथरुण् - पांघरुन दिलं आणि सांगितलं " शांत झोप इथ तुला कसलीही भिती नाहि , मी स्वता : दाराशी राखण करीत राहतो रात्रभर .. ते गुंड परत येणार नाहित तुला त्रास दयायला ."

ती युवती युवती झोपी गेली , हा दाराशी राखण करीत बसला , पण राखण करता करता डोक्यात विचार आला .... बाहेर दंगल चाललीय हिंदु - मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मी हिंदु मग या हिंदुच्या घरात तिने आसरा मगितलाच कसा ?..... तिला भिती नाही का वाटली ?.....
आणि ते गुंड तिची आब्रु लुटाण्यासाठी तिच्या मागावर आहेत ..... मि ही घरात एकटाच आहे ,
मी हि तरुण आहे ,
मनात आणलं तर ... आता ... याक्षणी .... इथच ... या युवतीची आब्रु मि लुटु शकतो , हिला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नाही ...... मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात निश्चिंत पणे थांबलीय ?
रात्रभर विचार केला उत्तर मिळलं नाहि ..... सकाळ झाली ति युवती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले ......... पण न रहावून याने विचारले

" बाहेर दंगल चाललीय हिंदु - मुसलमानांची त मुसलमान मी हिंदु मग माझ्या घरात आसरा कसा मगितलास ? ते गुंड तूझी आब्रु लुटाण्यासाठी तूझ्या मागावर होते ... पण मि ही घरात एकटाच होतो ....... मी हि तरुण होतो ........... मनात आणलं तर रातोरात तुझी आब्रु मि लुटु शकलो आसतो ........
तूला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नव्हतं ......
 मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात थांबलीस ?
त्यावर ती युवती म्हणाली " त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे धावत होती .
मुंबईच्या रस्त्यावरुन सैरावैरा पळत होते ....... धावता .... धावता या बोळात शिरली
बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला धपापत्या उरानं मी दारापुढं आले ....
 पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मि आत डोकावुन पाहिलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला ....... छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला .
........ आणि
मगच मी दार ठोठावलं ................
कारण मला माहिती आहे ,... ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आब्रुला धोका नाही .....

पाहिलतं गेल्या साडेतीनशे वर्षा नंतरही माझ्या शिवाजी राजा बद्द्ल जनमाणसांमध्ये जी प्रतिमा आहे ... ती हिच प्रतिमा आहे
शिवाजी राजे स्मरणात आहेत ते फक्त एव्हढ्यासाठी .......... त्यांचा जयजयकार आहे तो फक्त एव्हढ्यासाठी .......... त्यांच्या विचरांचा जागर आहे तो सुद्धा फक्त एव्हढ्यासाठी......
॥जय शिवराय॥


                                 जय हिँद                                                                      जय महाराष्ट्र

तो फक्त मराठाच

वाघाला जो हरवतो, अन शत्रूलाही रडवतो,
तो फक्त मराठाच .
अपमानही जो रिचवतो,
अन हलाहलही पचवतो,
तो फक्त मराठाच .
... कोणासही ना जो दुखवितो, अन बाग मैत्रीची फुलवतो,
तो फक्त मराठाच .
अपार कष्ट जो सोसतो,
अन प्रेम... जगी वाटतो,
तो फक्त . मराठाच ,
वचनाची लाज जो राखतो, अन दिल्या शब्दास जगतो.
तो फक्त .मराठाच ,
पर्वतालाही जो हरवतो,
अन आकाशाला नमवतो,
तो फक्त...... ... मराठाच . ..........
मराठाच .......... !!!!

कोण तूं रे, कोण तूं ?

"महाराज" या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथातून साभार :-

--------------------------------------------------------
कोण तूं रे, कोण तूं ?....

कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?


जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ?


खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ?


वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ?


भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ?


मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ?


अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ?


कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ?


वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ?


शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ?


की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ?


शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ?


की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ?


कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ?


चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ?


तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ?


मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ?


द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ?


गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं !


संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं !

शुक्रवार, २ मार्च, २०१२

छत्रपती शिवाजीराजे

अंधाराला घाबरत नाय
आभाळाची साथ हाय,
मोडेन पण वाकणार नाय अशी मराठ्याची जात आहे,
शब्दा मध्ये गोडवा आमच्या,
रक्तामध्ये इमानदारी,
बघत नसतो कधीच आम्ही..
किती कोणाची जहागीर दारी,
भगव्या समोरच महाराष्ट्रात मराठीचा घात हाय,
मोडेन पण वाकणार नाय अशी
मराठ्याची जात आहे,
हक्कासाठी भांडतोय आम्ही,
नोकरीसाठी लढतोय,
महाराष्ट्रात क्रांतीचा इतिहास पुन्हा घडतोय,
हे नुसतेच तांडव नाही,
आम्हचे अन्यायावर मात हाय,
मोडेन पण वाकणार नाय अशी मराठ्याची जात आहे,
पुरे झाले आता हे तुमचे मराठीवर हल्ले,
बुरुजा सकट जागे करु महाराष्ट्रातील किल्ले,
पाठीवरती अजुन आमच्या शुर शिवाचा हात हाय,
मोडेन पण वाकणार नाय अशी मराठ्याची जात आहे,
स्मरण ठेवा तानाजीच,
मरण आठवा संभाजीच,
स्वराजासाठी रक्त सांडल पावनखिडीत बाजीच,
साल्यानी पाठीमागुन वार केले,
हाच मोठा घात हाय, मोडेन पण वाकणार नाय अशी मराठ्याची जात आहे,
जय हिँद
जय महाराष्ट्र

नाही विसरलो


नाही विसरलो ते डोळे तुझे....
हरिणीलाही लाजवणारे
नाही विसरलो ते गाल तुझे....
... गुलाबाहून गुलाबी असणारे
नाही विसरलो ते केस तुझे....
वाऱ्यावर भुरभुरणारे
शोधतो रोज नवी युक्ती
प्रेम व्यक्त करण्याची
पण आहे मनात इच्छा अजून
चोरून तुला बघण्याची ...
आहे मनात इच्छा अजून
पुन्हा प्रेमात तुझ्या पडण्याची .....
कसे विसरू ग ते क्षण
सोबत माळावर फिरण्याचे
कसे विसरू ग ते क्षण
तुझ्या मिठीतल्या आनंदाचे...
पण वाटते कधी कधी !!!
पुरेल तुझं ते हसण रुसण आयुष्यभर
ये ना पुन्हा अशी मिठीत क्षणभर
फक्त क्षणभर ....
पुरवेल तो क्षण मी आयुष्यभर
फक्त आपल्या प्रेमाखातर ..

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे
मी तुला रोज सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे

पहिले मी जेव्हा तुला
... फक्त तूच दिसत होतीस
जिथे तिथे मी पाहावे
फक्त तूच भासत होतीस..
माझ्या नजरेपासून दूर जरी गेलीस
तुझ्याबरोबर मीही चालणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे

प्रेमाला प्रेमाने जिंकता येते
अशीच मला आशा आहे
प्रेम दिल्याने वाढत जाते
हीच प्रेमाची भाषा आहे
प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच
मी सर्वाना सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे —

(Romantic Propose - Marathi Love Story .

हो ..... मलाही !

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "