Breking News

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

पुष्पेंद्र दुबे यांच्या कार्यला सलाम...

मितभाषी मनमिळावू सर्वांशी प्रमाणे वागणारे मित्रत्व जपत जातीपातीच्या तिढ्यात न पडणारे दिलदार व्यक्तिमत्व अशी ख्वाती प्राप्त झालेले तळोदा येथील सर्वांना परिचित असलेले दुबे परिवारात जन्मलेले पुष्पेंद्र दुबे उर्फ ददूच्या वाढदिवसानिमित्त दद्दुला भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीची जाओ अशी प्रभू चरणी प्रार्थना. मनमिळावू मितभाषी जाती भेदाच्या तिढात कधी न पडता, दगडाच्या मूर्ती ऐवजी माणसात देव शोधणारा, सर्व धर्म समभाव मानणारा श्रीरामावर अपाट श्रद्धा असणारा सतत जयश्री राम नावाचा गजर मुखातुन करत, गौर गरीब जनतेचे सुख दुःखात सहभागी असणारा तळोदा येथील पुष्पेंद्र दुबे उर्फ पुत्तन/यांनी खरी मानवी सेवाच जणू वसाच घेतला आहे. पुष्पेंद्र यांची समाजसेवा करण्याची पद्धत ही जरा अनोखी असली तरी समाजासाठी प्रेरणादायी व गरजेची आहे. त्यांच्याकडे समस्यां घेऊन येणारा प्रत्येक व्यक्ती गरीब अथवा श्रीमंत असो कुठल्याही जाती पतीचा असो त्याची पूर्ण मदत पुष्पेंद्र दुबे हे करीत असतात. तळोदा तालुक्यात कुठल्याही जाती धर्माचा व्यक्तीचा अंत्यसंस्कार त्यांच्या उपस्थितीशिवाय पुर्ण होत नाही. आज पावेतो त्यांनी शेकडो जनांचे अंत्यसंस्काराला त्यांच्या हात लागला असावा. पुष्पेंद्र दुबे हे दद्दु व पुत्तन नावाने शहरात प्रसिद्ध आहेत. व्यक्ती आपल्या नावाने नव्हे तर आपल्या कार्याने प्रसिद्ध असतो. दद्दु हे त्यापैकीच एक आहेत.
कोणत्याही लालसापोटी नव्हे तर गौर गरीब व्यक्ती असो अथवा श्रीमंत व्यक्ती त्यांच्यासाठी आपल्या हातातील सर्व कामे सोडून ते स्वतःला दुसऱ्याच्या कामासाठी झोकून देतात. सामाजिक क्षेत्रातील कामे असो, धार्मिक क्षेत्रातील कामे असो, अथवा राजकीय क्षेत्रातील कामे असो गाव परिसरात लग्न समारंभ असो, कुणी आजारी असो, शहरात कुठे दुर्घटना घडली असो अपघात घडला असो, धार्मिक भंडारा, गावात होणाऱ्या मिरवणूका आदी सर्वच ठिकाणी दद्दु फक्त हजर राहत नाही तर प्रत्येक कार्य माझे आहे म्हणून ते पुढाकार घेऊन कार्यात राबतात व ते हसत मुखत पार पाडतात. शहरातील कुठल्याही जाती धर्माची व्यक्तीकडे विशेष श्रमदान करून ते कार्य पार पाडतात. गावातील जळीत प्रकरणे, आत्महत्येची प्रकरणे, दवाखान्यातील अपघात प्रकरणे, आदी विविध कार्यात दद्दुचा मदतिचा हात असते. गावातील कोणत्याही समाजाच्या व्यक्तीची अंत्ययात्रा असो, दद्दु तेथे आवर्जून उपस्थित राहतात. लाकडांपासून ते अग्निडाग देण्यापर्यंत सर्वच कार्य ते स्वतः करतात. मानव जन्म एकदाच मिळतो प्रत्येकाने मिळालेल्या आयुष्य समता व समभावाने जगले पाहिजे या कार्यापेक्षा दुसरे कोणतेच मोठे कार्य असू शकत नाही असेही ते सांगतात...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा