Breking News

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

हातोडा पुलाला पुन्हा पडले भगदाड

 तापी नदीवरील हातोडा पूल रहदारीसाठी सुरु होऊन अवघे सहा महिने झाले आहेत,
मात्र, पुलावरील जोड रस्त्याचा लगत एक भगदाड पडले असून ठिकठिकाणी भराव खचला आहे. यामुळे पुलाचा कामांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर अवजड वाहने यात अडकून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. . तापी नदीवरील हातोडा पुलाचे कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मागीलवर्षी काम पूर्ण झाल्यानंतर १५ आगस्ट रोजी हातोडा पुलाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली खा.डॉ.हीना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.उदेसिंग पाडवी, आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, भरत माळी, डॉ.शशिकांत वाणी यांच्या उपस्थितीत पार पडला. हातोडा पूल बांधकाम ते उद्घाटन असा सतत चर्चेंत होता. लोकर्पणानंतरही हातोडा पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान एक मोठ भगदाड पडले असून भराव खचला आहे. यामुळे वाहन त्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला या पुलावरून लहान वाहनांना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर नागरीक व विविध संघटनांच्या मागणीवरून पुलावरुन मिनीबस व स्कुल बसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली. या पुलामुळे नंदुरबारचे अंतर तळोदा, धडगाव येथून २० किमी. ने कमी झाले आहे. दरम्यान, कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या पुलावर भगदाड पडले असून भराव खचला आहे. यावरुन अवजड वाहने, रेती वाहतूकीची वाहने धावतात. जोडरस्त्या दरम्यान पडलेले भगदाड तातडीने बुजले नाही तर यात वाहने रुतून अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा