Breking News

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

एक अश्रू गळाला होता...

                                                             -----------------------------
जो पक्षी घरटे सोडून उडाला होता
तो जगाच्या प्रवासास निघाला होता ||
आपलेच अस्तित्व नष्ट करण्यासाठी
ओढा, सागराला जाऊन मिळाला होता ||
जो होता जलतरणात जगविख्यात
नेमका तोच काठावर बुडाला होता ||
पाषाणालाही ज्याने पाझर फोडला होता
तो 'व्यक्ती' हि पाषाणातूनच घडाला होता ||
चंद्र हि माझ्याकडे कृपादृष्टी करून होता
मी रडालो तर तोही रडाला होता ||
तुझ्या डोळ्यातील अश्रूंच्या लाटा पाहून
माझ्याही डोळ्यातून एक अश्रू गळाला होता ||

एक अपूर्ण स्वप्न....

एक अपूर्ण स्वप्न....



मी एक स्वप्न पाहिलं, कोणावर तरी प्रेम करायच, स्वप्न पूर्ण झालं.....
मी एक स्वप्न पाहिलं, तुला आपलसं करायच, स्वप्न पूर्ण झालं.....
मी एक स्वप्न पाहिलं, तुझ्या नजरेत हरवुन जायच, स्वप्न पूर्ण झालं.....
पण काही गोष्टी होत्या त्या अपुर्णच राहिल्या, जसं कि.............
तुझी शेवटपर्यन्त न मिळालेली साथ्,
तुझा लागलेला शेवटपर्यन्तचा ध्यास,
मला दुख याचं नाही कि, तु आता माझी नाहीस,
दुख याचं कि, प्रेम तुला कधी कळ्लच नाही,
आयुश्याच्या वाटेवर निर्णय घेण, तुला कधी कळ्लच नाही,
प्रेमापेक्षा दुसर्यावरचां तुझा विश्वास, मला कधी पटलच नाही.......
असं, खुप काही...
किती सांगणार ग मी, तुला सगळ्च तर माहित आहे???????????????? —

ती रुसली तेव्हा काय घडले…

ती रुसली तेव्हा काय घडले…

ती रुसली तेव्हा काय घडले…

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…

मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…

मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा…

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा…

मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा…

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..

मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा…;

खर प्रेम..........True Love

खर प्रेम..........True Love


पहिल्या सरीचा पहिला थेंब
म्हणजे प्रेम
मनात पेटलेला गारवा
म्हणजे प्रेम

सावरता आवरता येत नाही
ते म्हणजे प्रेम

एखाद्यच्या नावाच कपाळावरच
कुंकू म्हणजे प्रेम

कुणाच्या नावावर आयुष्य लिहून
स्वतःचा पत्ता विसरायला लावत
ते म्हणजे प्रेम

त्याच नुसत सोबत असण
हे आधार वाटण म्हणजे प्रेम

जीवनातली नवी पहाट
म्हणजे प्रेम

जगण्यातला खरा अर्थ
म्हणजे प्रेम

फक्त एकदा होत
ते म्हणजे प्रेम
आणि शेवट्च्य श्वासपर्यंत
जे प्रामाणिक असत
ते म्हणजे प्रेम

प्रेम आणि वेडेपणा

खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि

मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि
दुर्गुण इकडे तिकडे फिरत होते. काय करावे हे न कळल्याने कंटाळले होते.
एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना
खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते' ला एक कल्पना सुचली. ती
म्हणाली, "आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली.
लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्या मागे
लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता
दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला,........
एक, दोन, तीन..............
वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण
लपायला गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह'
कचऱ्याच्या ढिगात लपला. 'आपुलकी' नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल.
'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं.
प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला. 'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी
लपली. 'लोभ' एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला.
वेडेपणा आकडे मोजतच होता...... ७९, ८०, ८१, ८२......
बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून
'प्रेम' मात्र कुठे लपाव याचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं.
अर्थात आपल्याला याचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि,
'प्रेम' लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच... ९५, ९६, ९७....
शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा' ने
एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला. "मी येतोय!
मी येतोय!"
'वेडेपणा' न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या
पायाशीच त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्या एवढा उत्साह आणि
शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली.
तळ्याच्या तळातून त्याने 'खोटेपणा' ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून
'वासना' शोधून काढली. एकापाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध
लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात
'मत्सरा' ने, त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या
'वेडेपणा' ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या
गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय".
'वेडेपणा' ने एक लाकडाचा धारदार ढलपा
घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा.
शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्या फटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा' ने
त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वर केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू? प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता
दाखव." तेव्हापासून प्रेम आंधळ झालं आणि वेडेपणा त्याचा नेहमीचा सोबती झाला.

लाडकी मैत्रिण होती.

तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती.

तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...थोडा जरी शोधायला उशीर झाला की मात्र लगेच रुसायची...ती होती गाण्यांची दिवानी..तिला आवडायची...सगळी सुंदर गाणी....मी देखील मग फक्त तिच्या साठी सगळी शोधाशोध करायचो....मला नव्हती गाण्यांची आवड....तरी तिच्या साठी फक्त ऐंकायचो...कधी मित्रा कडून मिळव..तरी कधी दुकानात जावून तिच्यासाठी सिडिस घ्यायचो...मग ती जेव्हा गोड हसुन "थॅक्स" म्हणायची, तेव्हा ती खुपच छान वाटायची....कारण ती माझी.....लाडकी मैत्रिण होती.....

तसा मी खुप समजुतदार,पण तिच्यासमोर वेंधळ्यासारखा वागायचो..सांगायचे काही वेगळेच असायचे,पण काही वेगळेच बोलायचो....मग मात्र ती खुप खुप चिडायची..तू काय मुर्ख आहेस का?असे सुद्धा म्हणायची.तिच्या नाकावर कधी कधी खुप राग असायचा,कधी शब्दातून नाही दिसला तरी,तो तिच्या अबोल्यातून कळायचा.अश्या वेळी ती खुप खुप गप्प असायची,मी एकटाच "हाय" करायचो तरीही नाही बोलायची.मी मात्र सगळ काही हसण्या वरती न्यायचो...तिच्या समोर जरी वेधळा असलो तरी, तेव्हा मात्र समजुतदार व्हायचो.तिलाच माझी नंतर थोडी थोडी दया यायची,मग ती हळूच हसायची....तिची कळी खुललेली पाहून,माझी मुद्रा ही खुलायची...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

एक दिवस का कुणास ठाऊक कसे आक्रीत घडले...नियतिच्या मनात काही वेगळेच असते, हे त्या दिवशी कळले.सांगायचे होते काय? आणि प्रकरण भलतीकडे वळले.....माझ्या ही डोक्यात त्या दिवशी भरपुर राग गेला...शस्त्रांनी जितक्या जखमा केल्या नसतील..तितक्या दोघानाही शब्दानी झाल्या.देवाला ठाऊक असेल फक्त,कोणी कोणाला हर्ट केले,पण एक मात्र नक्की, तिचेमाझे भांडण झाले.मैत्री पेक्षा तिचे माझे इगो मोठे झाले,शेवटी एकमेकाशी न बोलायचे ठरले अन दोघांचे जीव शांत झाले.मी मात्र आज ही तिला खुप मिस करतो,आता ती कशी असेल,याचा सुद्धा विचार करतो. तिच्या काळजीने आज ही जीव तितकाच जळतो.कधी कधी तिच्याशी खुप बोलावेसे वाटते,आज काय घडले ते सगळे सांगावेसे वाटते.विचार येतो मनात,"ती तुला विसरली सुद्धा असेल,तू कोण हे देखील तिला आठवत नसेल."......फोन पर्यन्त हात जातो,पण मी रिसिव्हर खाली ठेवतो...आज नाही पण उद्या नक्किच बोलू असे मनात म्हणतो...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

आजकाल कोणाशी मैत्री करायची देखील भिती वाटते.कारण ज्याना आपण आपले मानतो,तिच व्यक्ती शेवटी तोडून जाते...तोडने किती सोप्पे असते,पण जाणाऱ्यांना त्याची काही किंमत नसते.ते हरवून जातात या विश्वाच्या पसाऱ्यात....ठेवून जातात मना मध्ये आठवणींचे मोरपंख,दुखऱ्या जागाना ह्ळुवारपणे स्पर्श होवून,जखमा अधिक सुगंधी करण्यासाठी.....मी आजही वाट पाहतोय तिच्या परत येण्याची,ती अशीच विश्वाच्या पसाऱ्यात हरवली आहे,की तिच्या कोशात ते तिला माहित...पण खात्री आहे एक ना एक दिवस ती नक्की परत येईल...पुन्हा भांडण करण्यासाठी.मीही तिची आतुततेने वाट पाहतो आहे,तिला पुन्हा पिडण्यासाठी......कारण ती माझी........

आई अजिबात आवडत नाही.

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,



""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??

मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण


आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !!

प्रेम पत्र........

तू माझ्या आयुष्यात आलास , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडले. मी प्रथम तुला होकार दिला , तेव्हाही मला वाटत नव्हतं , की मी प्रेमात पडले आहे. या 14 फेब्रुवारीला आपल्या प्रेमाला तीन वर्षं पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं. या तीन वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं… तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही. आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे , की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतं. तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस , असं तुला का वाटतं ? तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस. आज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आज आपण अशा वळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाही. आपला विश्वास , आपलं प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. तू म्हणतोस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे… ते खरंच वेगळं आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत. पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत राहायचं असतं. कधीकधी वाटतं , की तू एवढं करतोस , तर मीच कमी नाही पडणार ना ? कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांग. खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान छान लिहिता-बोलता येत नाही. तू म्हणतोस ना , काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही , त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस , मला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे , ‘ हृदयाचा ठोका चुकला तरी , तू मात्र चुकू नकोस , प्रेमाचं नातं परी , साथ कधी सोडू नकोस… ‘

- तुझीच.......

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

प्रेम कथा

Wo meri best thi. Main use poore dil se love karta tha aur wo bhi mujhse pyar karti thi.Meri anu Aaliya li Love story 3 saal se chal rahi thi. Inter passout hone k bad main Dehradun aa gaya aur wo Kanpur reh gai but hum dono ek doosre se contact me the using phone and facebook. Humari batein daily hoti thi. Dil bekarar rehte the milne k liye but doori kafi thi hum dono k cities k beech. Main Engineering kar raha tha aur chahta tha ki Aaliya ko bhi apne pas bulau. Wo mujhse ek class peechhe thi so maine use dehradun banana ka man bana liya tha.Aaliya mere liye sabkuchh thi, humari Love Story me Koi rukawat nahi thi. Beintaha muhabbat thi aur dheere dheere        hamari love story marriage tak pahuch gai.


But Kuchh baton ne mere liye “Love” ki definition hi badal di. Hua u ki engineering me admission k bad mera dil padhai se hatne laga,mujhe ehsas hone laga ki mera interest business hai. Isliye main ab utne dil se padhai bhi nahi karta tha isliye marks aur performance bhi low ho gaye.but main business ko le kar serious tha.

Doosre sal ka result bahut bura raha aur main do subjects me pass nahi ho paya.college walo ne ghar pe report bhej di ki main absent rehta hu class me. Aaliya ne mujhse poocha to maine kaha ki mera dil nahi lagta padhai me. Usne bahut samjhaya but next year me phir se wohi condition thi. Idhar maine business marketing k about knowledge lena shuru kar diya but kisi ko bhi btaya nahi iske about.

3 saal khatm hone pe jab holidays me main ghar gaya to aaliya ajeeb tarike se behave kar rahi thi mere sath. Mujhe laga ki mjhse gussa hai to maine use manane ki koshish ki but ab wo pehle jaise mere pas nahi rehti thi. Door door si raha karti thi.main apne love relationship ko le kar kafi pareshan rehne laga.

Phir maine aaliya se ek din movie dekhne chalne ko kaha but usne inkar kar diya. Mujhe kafi dukh hua. But main apne business project me laga raha aur maine socha ki ek bar business chal jae,phie aaliya aur gharwale dono maan jaenge. Main apne kam me laga raha.



Do din bad maine aaliya ko phone kiya to uska phone busy mil raha tha lagatar. Main uske ghar gaya aut bahar se dekha ki aaliya andar kisi se phone pe bat kar rhi thi.wo kafi khush thi. Maine darwaza knock kiya to andar se ek bachha nikal kar aaya aur bola ki aaliya didi ghar pe nahi hain.

Mujhe kafi hairat hui,maine next din aaliya se pochha to usne koi jawab nahi dia. Do din bad mere phone pe message aaya ki “aaliya ka peechha chhor do”. Maine phone karke poochha to udhar se mujhe warning mili k aaliya use chahti hai isliye main aaliya ko chhor du.



Mujhe laga ki koi majak kar raha hai. Main aaliya k pass gaya aur usse kaha ki koi majak kar raha hai mere sath phone pe. But wo kuchh nahi boli, main jab kareeb gaya aur poochha ki kya bat hai then usne mujhe dhakka diya aur mujh pe chillane lagi aur kaha “tum meri life se chale jao Rajeev,main kisi aur se pyar karti hu,mujhe tum jaise aawara aur nakaam ladke ki jaroorat nahi”



Mujhe yakin nahi ho raha tha.mere dil jor jor se dhadakne laga maine usse poocha ki mera qusoor kya hai aaliya,but usne mujhe bahar nikal kar darwaza band kar diya. Main ro raha tha. Toot gaya tha main. Sadness k teer dil ko cheer rahe the.Main chup chap ghar chala aaya.
Udhar aaliya rahul nam k ladke k sath love relationship me bandh gayi. Main dehradun me tha,ek din mummy ka phone aaya aur wo bata rahi thi ki aaliya bhi dehradun aa rahi hai. Kisi bade businessman k seminar ko attend karne aa rahi hai wo.




Do din bad main Hotel Grand me ek apni car se utar raha tha tabhi meri nazar ek couple pe pari jise guards hotel k andar aane se mana kar rahe the kyuki unke pas invitation card nahi tha. Main najdeek gaya aur poochha ki kya problem hai to mujhe ek aawaz sunai di “sir,hamne invitation card kho diya hai but hum kafi door se aaye hain is seminar ko attend karne,please humein andar aane dijiye”. Maine sar utha k dekha to meri aankhein aur badi ho gayi. Wo ladki koi aur nahi balki meri Aaliya thi.Main kuchh sochh hi raha tha ki uski aawaz aai “sir,apka chehra mere ek bachpan k friend se kafi milta hain,uska nam Rajeev tha”

Main muskurane laga aur maine sirf itna kaha –
“aapke bachpan ka wo friend ab Mr. Rajeev khanna ban chukka hai a
ur wo aapka friend hi nahi kuchh aur bhi tha”
Ab wohi Rajeev Khanna Mr Rajeev Khanna Ban Chuka tha,jiske liye log door door se milne aate the. Maine apne dil li Suni but mere dil ne meri nahi suni but finaaly mere dil ko pachhtana hi pada..Aaliya apne kiye per o rahi thi aur main seminar attemd karne hotel me chala gaya.......

एक प्रेम कथा

!!!...एक प्रेम कथा....!!! ---- पैसा !!!



तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा होकार कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. .....

१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,

ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता................

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

letter to mom

ºआई, असं का ग केलंस?

º(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..)

ºउरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ

ºपाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.

ºत्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून

ºदिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणिº

ºत्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा

ºअनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.

º( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंतीº

ºआहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....

ºहे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हेº

ºपत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी.

ºआणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )

ºआई, असं का ग केलंस?

ºका ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?

ºमी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.

ºतुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता

ºझाला मला.

ºमाझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्तº

ºतुझ्याचमुळे ग.

ºआई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि

ºरडू नकोस.º

ºआता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

ºतेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.

ºराजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

ºतू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.

ºभाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात

ºअसूनही मी त्याला

ºहळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने

ºढकलत असे. मला लागायचं.

ºतरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीचº

ºअसते!

ºकधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखीº

ºठेव.º

ºते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली

ºआहे.

ºमुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ"

ºआहे,

ºजी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

ºमाझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा,

ºतुला बघण्याचा!

ºएकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास

ºसोसल्यावर तुझा जन्म झाला.

ºमोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

ºत्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या

ºआईला बघण्यासाठी मला अजूनº

ºसहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

ºमग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेरº

ºपडलात.

ºरस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग

ºतू पप्पांना

ºगाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी कितीº

ºकाळजी वाटते,

ºहे पाहून मला किती बर वाटल होत.

ºदवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावरº

ºकाहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,

ºतेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापटº

ºफिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,

º"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

ºथोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तोº

ºपप्पा नावाचा माणूस म्हणाला,........

º"सर, अबोर्शन करा...

ºडॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."

ºमी पोटामध्ये खिदळत होते.

ºदुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणेº

ºजाऊन सुखरूप घरी येऊ दे."

ºमला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्याº

ºमोठ्या आईला म्हणाले,

ºकी माझ्या आईला लवकर बर कर....

ºनंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

ºआई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.

ºमी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.

ºआई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत

ºजायचं आहे.

ºराजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.º

ºआई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्याº

ºकानाशी म्हण....ºff01º

º'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....

º............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.....

ºसमाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे .....

लहान मुले

लहान मुले किती निरागस असतात
त्याचा एक अनुभव :

४ वर्षाचा मुलगा (जय).. एकदा सुट्टी मध्ये तो त्याच्या आजी आजोबांकडे राहायला गेला होता.. त्या दिवशी शिवजयंती होती.. ठीक ठिकाणी मंडप बांधून शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले होते... महाराजांचे पोवाडे सुरु होते... चांगली वातावरण निर्मिती झाली असल्यामुळे माझ्या आई ने जय ला शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या.. (तेवढाच त्याच्या मस्तीखोर स्वभावाला control करण्याचा प्रयत्न ..:) जय ने सुद्धा मन लावून गोष्टी ऐकल्या. मग प्रश्न-उत्तर सेशन सुरु झाले..

जय : आजी शिवाजी महाराज खूप चांगले होते ना?
आजी : होय जय.. खूप चांगले होते.
जय : आज त्यांचा 'Happy Birthday' ना?
आजी : होय .
जय : आता ते कुठे आहेत?
आजी : स्वर्गात देव बाप्पा कडे गेले.
जय : ते देव बाप्पा कडे का गेले?
आजी : (थोडा अवघड प्रश्न.. पण आज काल ची मुले खूप हुशार असतात असा विचार करून..) अरे, खूप मोठे झाले ना कि माणूस मरण पावतो आणि मग देव बाप्पा त्याला स्वर्गात आपल्या कडे बोलावून घेतो.
जय : ( थोडा वेळ विचार करून) आजी तू पण खूप मोठी आहेस ना.. मग तू पण आता काही दिवसांनी मरशील... ?
आजी : (काय बोलावे हे न कळून ) ..............................
जय : मेल्यावर तू खूप खुश होशील नाही?
आजी : (प्रश्नार्थी चेहरा) खुश का बरे????
जय : अग, मेल्यावर तू पण स्वर्गात जशील ना आणि तिथ तुला शिवाजी महाराज भेटतील.. मग त्यांना भेटून तू खूप खुश होशील ना......

या उत्तरानंतर आजीला कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता आली नाही हे सांगायला नको.

आपल्याला मराठीची किती माहिती आहे?

आपल्याला मराठीची किती माहिती आहे?

1) झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच "मी माझी झाशी देणार नाही " असे म्हटले आहे.

2) रशिया,ऑस्ट्रेलिया सह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.

3) हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.

4) कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथलेविद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.

5) मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.

6) मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३०पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.

7) संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठीकिंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.

8) महाराष्ट्र तील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ् यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.

9) देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्रचा आहे.

10) सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटाआहे.

11)पूर्वी अफ़गाणिस्तन ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्यपसरले
होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती. आज
मराठीचे स्थान दहावे आहे. मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर
ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.

हि सर्व माहिती माहित असणे अपरिहार्य आहे असे मला वाटते .....जय महाराष्ट्र !!!

झाडे लावा

एका दिवसात सामान्यत: माणुस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (Oxygen) श्वसन करतो.

एका Oxygen सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे.
म्हणजे एका दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो.
सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत रु.७,६६,५०० इतकी येते.
सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते.
हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो.
आणि आपण झाडांची कत्तल करीत सुटलो आहोत.

झाडे लावा!!! झाडे वाचवा!!! झाडे जगवा!!!













                                                                                                                                           



राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा
२६
जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज उभारतो. आपल्या सदऱ्यावर
लावतो; परंतु नंतर हेच राष्ट्रीय ध्वज दुसऱ्या दिवशी, रस्त्यावर, कचऱ्यात,
बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही चुरगळलेल्या अवस्थेत, फाटलेल्या
अवस्थेत पायदळी तुडविले जातात. याचा अर्थ आपण आपल्या देशाची शान पायदळी
तुडवितो. असे इतस्तत: विस्कटलेले राष्ट्रध्वज पाहिले की मनाला प्रचंड यातना
होतात.
याबाबत सरकारने, सामाजिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी, दक्ष
नागरिकांनी काही उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता
पुढील काही उपाययोजना सुचवाव्याशा वाटतात.
सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज
उभारून राष्ट्रीय सण सााजरे होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक
वर्गातून राष्ट्रध्वज गोळा करावेत व मुख्याध्यापकांकडे सुपूुर्द करावेत.
सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा जवळच्या शाळेत अथवा जवळच्या पोलीस
स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज जमा करावेत. याकरिता शाळेने पोलीस स्टेशनने डबे
ठेवावेत. रेल्वे स्टेशन अगर बसस्टॉप वा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले
राष्ट्रध्वज नागरिकांनी कर्तव्यदक्ष भावनेने जवळच्या बस डेपोमध्ये अथवा
सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. स्थानिक समाजसेवक
संस्थांनी आपआपल्या विभागातील रस्त्यांवरील व कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज
गोळा करण्याची व शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. शासनाने सर्व
जमा केलेले राष्ट्रध्वज योग्य रीतीने नष्ट करण्याकरिता तात्पुरत्या
स्वरूपात विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज
नष्ट करताना आदरपूर्वक व सन्मानाने नष्ट करावेत. देशातील प्रत्येक राज्यात
याबाबत दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा.
कागदी लहान आकाराचे
राष्ट्रध्वज, प्लास्टिकचे काडीवाले राष्ट्रध्वज, धातूचे राष्ट्रध्वज असे
वेगवेगळे ध्वज जमा करावे. धातूचे राष्ट्रध्वज पुन्हा वापरता येणे शक्य
असते. ते जपून ठेवावेत. शासनाने अशा जमा केलेल्या विविध प्रकारच्या
राष्ट्रध्वजांची आदरपूर्वक व योग्य रीतीने विल्हेवाट लावावी.
वरील
उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत यात शासनाला सुधारणा करणेही शक्य आहे.
यातील किमान ५० टक्के उपाययोजना जरी अंमलात आणल्या तरी राष्ट्रध्वजाचा
होणारा अपमान टाळता येईल. त्याकरिता देशातील सर्व शाळांनी, समाजसेवी
संस्थांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी ही गोष्ट मनावर
घेतली पाहिजे.









                                                                                                                                         

                                                                                                                               



राष्ट्रध्वज

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना
अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे
पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल
तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे
अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.
ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या
उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी
राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.
कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू
नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.



राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी
करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच
राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो
फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.
ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.
त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या
अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही
वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.



ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे
कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू
नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही
जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात
लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या
ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक
कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी
ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात
असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज
जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय
व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

आठवण

आठवण



                                                      तू बोलत नाही काही
                                                      अन् मी ही बोलत नाही
                                                      पण क्षण आठवांचे
                                                      गुणगुणतात काही


                                                      अबोल शब्दातही
                                                      प्रीतीचा एक अर्थ आहे
                                                      माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
                                                      माझे प्रेम नि:स्वार्थ आहे...............



                                                      जीवन कसे पक्ष्यां सारखे असावे
                                                      कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
                                                      आणि मरताना देखिल कधी कुणावर
                                                      आपले ओजे न देता जावे


                                                      माझ्यासाठी प्रेम म्हणजे
                                                      मोठ्ठ कुतूहल आहे
                                                      पडले नाही तरी लागते
                                                      अशी एक चाहूल आहे


                                                      आठवणींच्या मागे धावलो
                                                      कि माझं असंच होतं.
                                                      आठवणीं वेचत जाताना,
                                                      परतायचं राहुन जातं.

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

ही अखेरची तुझी आठवण

तू खुश तर आहेस ना???
कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस
काही कळलेच नाही..
एक एक दिवस जात होता ..
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन..
अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी..
तुझ्या प्रेमळ... मिठी साठी.. पण कदाचित ते शक्य नाहीये ... तुला ...
शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय
घेतलास ना..!! आपल ते प्रेम , आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..? कदाचित हो असेल तुझ उत्तर...
पण मनातल्या त्या एकांत कोपरयात माझी जागा कायम असेल
हेही मी जाणतो.. होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल कि ऐकल असतं
जर तेव्हाच मनच तर..
पण वेळ गेल्यावर काय करणार..
त्यावेळी कोणाला सांगावस वाटल तरी तुला ते शक्य
नाही होणार..!! आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित आपली भेट
होईलही ..
पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण महत्वाच असेल कि
कि
कि
तू खुश तर आहेस ना??? तू खुश तर आहेस ना???

letter to her


दोस्तांनो .. आपल्या आयुष्यात खूप गोष्टी घडत असतात ..
जेव्हा त्या भूतकाळात जमा होतात तेव्हा त्यांच्या आठवणी बनून जातात , अशाच काही आठवणी डोळ्यात आसू आणतात कधी ओठांवर हसू,,. अशीच आठवण एखाद्या प्रिय व्यक्तीची मनाला वेड लावून जाणारी
प्रत्येक श्वासागणिक, तुझ्या आठवणी जन्म घेत राहतात ..
आणि त्यांना मूर्तिमंत पाहताना संवेदना तरल होत जातात..
एकटीच जगत होते या अनोळखी जगात , कुठेतरी तुझी चाहूल लागली ..
अन प्रत्येक क्षण मोहरून आला.. सुंदर आहे जगणं हे जाणावू लागलं..
तुझ्यासाठीच जगावं अन तुझ्यासाठीच मरावं अस वाटू लागलं ..
पण .. या जगातल्या सगळ्याच गोष्टी क्षणभंगुर , तसाच तुझा सहवासही ..
कोणत्यातरी अजाण क्षणी , तू माझ्या आयुष्यातून निघून गेलास ..
माझ्या आनंदी आयुष्याचं, राखरखत वाळवंट बनवून ..
तुझं जाणं ठरलेलच होत जणू , म्हणूनच तुला दोषी ठरवणं नाही जमलं माझ्या मनाला..
आता तेच मन , तुझी वाट पाहतयं..आसुसून .. तहानलेल्या चातकाप्रमाणे ,
कदाचित तू येशील अन .. माझ्या तडफडणार्या मनाला चिंब सरींत भिजवशील.. तू येशील?
माझ्या आयुष्यात पुन्हा लाखो सूर्य घेऊन ?
पौर्णीमेचा चंद्र होऊन.. आमावस्येला चांदण्या आणि .. भरतीच्या लाटा होऊन ,
तू येशीलाही कदाचित .. कारण ,, अजूनही माझ वेडं मन गाणं गातं ..
स्वप्नं रंगवत, आणि तुझ्या आठवणींत स्वःताला हरवून बसतं ..
पण तू नाहीच आलास तर .. या वेड्या मनाची समजूत कशी काढू मी ?
असे विचार मनात आल्यावर , डोळे पाणावतात , स्वप्नांची असंख्य शकले होतात..
अन जीवनातले खाचखळगे खूपच जास्त वाटायला लागतात,
तू माझ्या आयुष्यात नसण, हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं ..
पण तुझं नसण आता खोल कुठेतरी जाणवायला लागलय,, म्हणूनच लवकर ये ..
 माझ्या मनाचा बांध तटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये,
जीवनाची शिवण उसवण्याआधी ये.. लवकर ये..
मी तुझी वाट पाहतोय,, क्षितिजापल्याड काहीतरी शोधतेय ,
शोधताना पडून ,ठेचकाळून .. रक्तबंबाळ होतानाही ..
माझे श्वास तुझेच असतात अन तुझे श्वास माझे..
निदान माझ्या स्वप्नांच्या अवकाशात ये ..
माझा आत्मा तुझ्याचभोवती रुंजी घालतोय , त्याच्यासाठी तरी ये ,.....
तू ये किंवा नको येऊ , पण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत ..
मी तुझी अन फक्त तुझीच वाट पाहणार आहे..
कारण .. या वेड्या मनाला .. तुझी अन फक्त तुझीच .. ओढ आहे......

रविवार, २५ डिसेंबर, २०११

Love Dairy


डायरी डायरी लिहिली .. माझी मीच वाचली..
नको ती आठवण.. पुन्हा डोळ्यात साचली..
नको ते मला अस तीचं रोज रोज दिसणं
भुतकाळाच ते माझ्या वर्तमानात असणं सारखं सारख दिसून..
ते मला असं खिजवणं भरत आलेल्या जखमेला
तिचं रोज ते खाजवणं फाडून टाकलं मग एकेक पान टरा टरा..
केराच्या टोपलीत फेकून दिलं भरा भरा..
आता नाही ना पुन्हा मला ती त्रास देणार..? आजच्या क्षणाना..
सरलेल्या क्षणांचा भास देणार? पण मनातले आठव.. त्याला कसे बरं पुसावे..
डोळे केलेत ना बंद.. तरी स्पष्ट सारे का दिसावे..
डायरी फाडली खरं मी पण मनातली पाने काही फाटत नाहीत.. 
दिवस.. वारच काय.. वेळ सुद्धा आठवतेय..
मनातली ही डायरी, मिटू म्हटलं तरी मिटत नाही..........