Breking News

सोमवार, ७ मे, २०१८

उंट सवारीतून मिळतोय रोजगार

नंदुरबार व सारंगखेड्यातील युवकांची चरितार्थासाठीची धडपड

शिक्षण करूनही नौकरी मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही. बेरोजगार राहण्यापेक्षा काहीतरी उद्योग करून चारीतार्थ चालविण्यासाठी  अनेकांची धडपड असते.त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार व सारंगखेडा येथील काही युवकांनी राजस्थानमधील पावागड येथून काही उंटाची खरेदी करत स्वतःसाठी रोजगाराचे साधन उपलब्ध केले. उंटाची सावरीचा आनंद देत दररोज ४०० टे ५००  रुपयांची मिळकत या तरुणांना मिळत आहे. तळोदा परिसरात हे चित्र पहावयास मिळत आहे.
                                 नंदुरबार व सारंगखेडा येथील काही तरुणांनी ३ ते ४ उंट राजस्थान व पावागड येथून विकत आणले असून या उंटावर बसवून बालकांना उंटाची सैर करवत आहेत. उंट पालन करणारे व्यावसायिक मुलांच्या शाळेच्या सुट्यांचा अंदाज घेत शनिवार, रविवार दाखल होत आहेत. पूर्वी ग्रामीण भागात कधीतरी उंट, हत्ती, असे दुर्मिळ प्राणी बघायला मिळत होते. मात्र आता शहरासह खेडे गावात देखील वारंवार असे प्राणी दृष्टीस पडत आहेत. उंटाला राजस्थानमधील जहाज ओळखले जाते. पूर्वी बिकानेर, राजस्थान, ज्योतपुर येथील उंट कधीतरी यायचे मात्र आता जिल्ह्यातीलच युवकांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी उंटांची खरेदी करुन अनेकांना सवारीचा आनंद देत स्वत:साठी रोजगाराचे साधन उपलब्ध करुन घेतले आहे. . सारंगखेड्यातील युवकांची चरितार्थासाठीची धडपड नंदुरबार येथील विकास भीमराव चव्हाण, अनिल सुका पाथरे, कैलास विकास चव्हाण आदींसह काही तरुणांनी उंटाचे नर-मादीची जोडी ६० हजारामध्ये विकत आणली आहे. आज हे तरुण गावोगावी
जाऊन प्रत्येक गाव पिंजून पोटाची खळगी भरण्यासाठी बच्चे कंपनी, लहान-मोठया मुलांना उंटाची सफर घडवून दोन पैसे मिळविताना दिसत आहे. पालक देखील हौशीने आपल्या मुलांना, नातवाना उंटांवर बसविण्याच्या आनंद घेत आहे. उंटावर एकावेळी दोन ते तीन मुलांना बसवून काही अंतरापावेतो सफर घडवून आणत आहे. एका पालकांकडून उंटाच्या मालकाला १० रु. मिळत आहेत. दिवसभरातून हे तरुण ३०० ते ४० रुपये कमवत आहेत. उंटांना दिवसभरात चारा पाण्याची सोय करीत हाताला चांगला रोजगार मिळत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ठिकठिकाणी काही शेतकरी या उंटांना मोफत चारा देतात. बाळ-गोपालांना या उंटावर बसण्याच्या वेगळाच आनंद असतो. उंट पाहण्यासाठी लहान बालके मोठया प्रमाणात गर्दी करीत असून उंटामागे मागे फिरत मनोरंजन करीत आहेत. मुलांची उंटावर  बसण्याची इच्छा पूर्ण होते. तर यातून तरुणांना यातून रोजगार ही मिळतो आहे..

    विकास भिमराव चव्हाण 
        नंदुरबार साक्री रोड
                  

                       
 प्रतिक्रिया
   ➤ शिक्षण करून देखील नौकरी मिळत नाही, याकरिता मागील वर्षी पावगड येथून 60 हजार किमतीचे नर मादी असे 2 उंट विकत आणले आहेत. बालकांना उंटाचे आकर्षण मोठ्या प्रमाणात असते या व्यवसायामुळे चांगला रोजगार प्रात होत आहे. पुढे उंटाची संख्या वाढवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.. 








रविवार, ६ मे, २०१८

आवाजवी खर्च व जुन्या प्रथांना फाटा देत आदर्श विवाह...

तालुक्यातील मोदलपाडा येथील रिता व शरद या नवदापत्याने पारंपरिक प्रथा व विवाहाला लागणारा अवाजावी खर्चला फाटा देत, एका दिवसात लग्न लावून आलेल्या वऱ्हाडीचा वेळ वाचवत नव्या आयुष्याची सुरुवात आदर्शरित्या केली. याबाबत सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
                           लग्न म्हटलं कि बँड, बाजा, बाराती असे चित्र पाहण्याची सवय आपल्याला झाली आहे. पण या संपूर्ण प्रथा आणि परंपरेला फाटा देण्याचे काम तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथील रिता व शरद यांनी केला आहे. तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथील भानू सोमला वळवी यांची जेष्ठ सुकन्या तर कै. लालसिंग नूऱ्या वळवी माजी जि. प.सभापती यांची पुतणी रिता हिचा विवाह अक्कलकुवा तालुक्यातील बाभलपूर येथील रोहिदास टेडया पाडवी यांचा सुपुत्र शरद याच्याशी जुडला. NIM नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झालेल्या रिताने राज्यात वेळोवेळी पडत असलेला दुष्काळ, शेतकऱ्यांची होत असलेली आत्महत्या, स्थलांतर सह शिक्षण बेरोजगारी आदी विविध समस्यांनी ग्रासलेला आदिवासी समाजातील विवाहात अवाजवी खर्च होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विवाह या शुभ प्रसंगी वाद उफाळून आल्याचे अनेक प्रकार घडतात. यावर आळा बसावा याकरिता विवाहात अवाजवी खर्च टाळत पारंपरिक व साध्या पद्धतीने विवाह करण्याच्या निर्णय तिने घेतला. तिने याबाबत तिचे वडील भामु सोमला वळवी यांना बोलून दाखवले, यावर वडिलांनी शिका मोर्तब करत त्यांचे व्हायी रोहिदास वळवी व जावई शरद यांना विचारणा केली. त्यांनी देखील याबाबत सकारात्मकता दाखवल्याने दोघे कुटुंबियांकडून लग्नात अवाजवी खर्च न करण्याच्या निर्णय घेतला. विवाहात पारंपरिक वाद्य वाजवून तसेच उन्हात आलेल्या वऱ्हाडी मंडळीं, तान्हुनले बालकांचे हाल होऊ नये हा हेतू ठेवत त्यांनी विवाह एका
दिवसात आटोपण्याचे ठरवले. 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 दरम्यान हळद 11 ते 2 दरम्यान आहेर व 4 ते 6 दरम्यान लग्न अश्या पद्धतीने एका दिवसात विवाह पार पडला. या विवाहास खासदार हिना गावित, आमदार विजय गावित, रमेश गावित तंटामुक्त अध्यक्ष, अमरसिंग वळवी, ग्रा.सदस्य जगदीश वळवी उपसरपंच, सतिराम वळवी यासह मान्यवरणी उपस्थिती लावून वधू वरास आशीर्वाद दिले तर माजी मंत्री पद्माकरजी वळवी, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, पो.पाटील विलास पाडवी, दक्षता समिती सदस्य सरपंच बळीराम पाडवी, यांनी या नवंदाम्पत्याचे सत्कार करून त्याच्या या कार्याचे कौतुक केले. 2 दिवस लागणारी हळद, त्यात येणाऱ्या मंडळींचे नियोजन, विविध खाद्य पदार्थ, बँड बाजा, डी.जे. घोडा बग्गी, फोटो शूटिंग,आहेर, मंडप, स्टेज, वाजंत्री, संगीत सजावट आदींसह विवाहास होणाऱ्या खर्चाला फाटा देत अगदी साधेपणाने आदिवसी पारंपरिक ढोल वाद्य लावून, जुन्या रूढी प्रथाना बगल देत, रिता व शरद यांचा विवाह सोहळा पार पडला. विवाहात लाखोंची उधळपट्टी करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा विवाह ठराणार असून लग्नात अवाजावी खर्च करणे टाळत समाजपयोगी कार्य करा असा सल्लाच रिता व शरदने या विवाहातून दिला आहे.......

 प्रतिक्रिया 
रिता व शरदने दाखवले धाडस, तसेच लग्नात आर्थिक उधळण करण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने केलेला एकदिवसीय विवाह सोहळा हा येत्या काळात आदिवासी समाजात परिवर्तन घडविणारा असेल.. 
    *माजी मंत्री पद्माकरजी वळवी* 

 विवाह समारंभाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून तो सर्वसामान्यास पेलावला जात नाही. बँड, डी. जे. आदीवर आवाजावी खर्च होतो. परिणामी अनेकवाडा वाद होऊन आनंदादायी सोहळा हा सुखमय होतो. तसे होऊ नये याकरिता नवीन पायंडाची सुरवात आम्ही करण्याचा प्रयत्न केला... 
          भामु वळवी वधू पिता





शनिवार, ५ मे, २०१८

अथक प्रयत्न, कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर रतीलाल पावराने डोंगराळ जमिनीवर फुलवली आमराई...

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पहिल्या रांगेतील डोंगर कपारीत असलेल्या रावलापाणी या ऐतिहासिक भूमीवर पाणी विज व रस्ताची समस्यां, असताना त्यावर मात करत केवळ आपल्या जिद्द व चिकाटीने रतिलाल कामा पावरा या तरुणाने वनहक्क दाव्यानुसार मिळालेल्या डोंगराळ जमिनीवर 200 आंब्याची रोप लावत आमराई फुलवली आहे.
                               तळोदा तालुक्याची ओळख ही आदिवासी बहुल तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले रावलापाणी हे छोटेशे गाव सातपुड्याच्या डोंगराच्या शेवटच्या टोकावर व डोंगर - दऱ्यांवर वसलेले आहे, पाणी व विजेची समस्या असलेल्या या गावात फक्त 31 घरं व 180 सदस्य राहतात, या गावातील शेतकरी पारंपरिक शेती करीत उदरनिर्वाह करतात. मात्र पारंपरिक शेती ऐवजी कायंस्वरूपी उत्पन्न मिळावे हा हेतू डोळा समोर ठेवून रतिलाल कामा पावरा व त्यांचा कुटूंबाने धाडस दाखवित आपल्या शेतात एक नवीन प्रयोग केला आहे.. आपल्या डोंगर वजा शेतात चक्क "आंब्याची फळबागेची" लागवड करीत ती चांगलीच फुलवलेली आहे. रतिलाल पावरा यांचे वडील कामा पावरा यांचे 2013 मध्ये निधन झाले, त्यामुळे कुटुंबांची सर्व जबाबदारी घरातील मोठा सदस्य असल्यामुळे रतिलाल पावरा यांचावर आपसूकच आली. सुरुवातीला
पारंपरिक पिकं घेत, त्यांनी संसाराचा गाडा हाकलण्यास सुरुवात केली. परंतु त्यात जास्त उत्पन्न मिळत नव्हते व कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. मग रतिलाल पावरा यांनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करीत काही तरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला व शेतात आंब्याची फलबाग लावण्याचे ठरविले. परंतु त्यांचा समोर सर्वात मोठी अडचण होती ती पैश्यांची. त्यामुळे रतिलाल पावरा यांनी धडपड करीत शासनाकडून काही तरी मदत मिळते का? या दृष्टिकोनातून माहिती मिळवित तळोदा तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला. तालुका कृषी
अधिकारी पी. व्ही. भोर यांचे मार्गदर्शनाने कृषी पर्यवेक्षक एस. डी. पवार, कृषी सहाय्यक पी. के. देशमुख व मंडळ कृषी अधिकारी ए. एफ. गावीत आदींनी वेळोवेळी भरीव अशी मदत करत फळबागासाठी अनुदान मंजूर करीत त्यांना 2016 साली एकूण 200 आंब्याची रोप दिलीत. रस्ते नसल्याने वाहन जाणे या भागात कठीण होते. याकरिता कुटुंबीयांनी 4 की.मी.पायपीट करत आपल्या शेतापर्यंत डोक्यावर घेऊन 200 रोपे शेतात पोहच करत डोंगराळ, खाच खडगे असलेल्या आपल्या शेतात स्वतः 200 खड्डे खणत, जून 2016 मध्ये आंब्यांची रोप लावलीत. कुटुंबातील सर्व सदस्यांनी जीवापाड मेहनत घेतली, आता सर्व रोप जवळपास 4 ते 5 फुटांची झाली आहेत. रतिलाल पावरा यांना आतापर्यंत सव्वा ते दीड लाख पर्यंतचा खर्च आला आहे. या आम्रईला नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया व अनेक अधिकाऱ्यांनी रावलापाणी येथे प्रत्यक्ष जावून रतिलाल पावरा व त्यांचा कुटुंबाने फुलवलेली फळबाग बघितली असून सर्वांनी कुटुंबियांचे कौतुक केले आहे....

                  प्रतिक्रिया----- 
 12 वी पर्यत शिक्षण झाल्यानंतर अर्ध्यातच वडील सोडून गेले, कमी वयात कुटुंबाची जबाबदारी आली. केवळ पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतात काहीतरी नवीन करण्याचा धाडस करीत आंब्याची फळबाग लावण्याचे ठरविले. भविष्यात कायमस्वरुपी उत्पन्न मिळावे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून फलबागेची लागवड केली आहे. :- रतिलाल पावरा शेतकरी, रावलापाणी....

 ➤ 600 फूट लांब असलेल्या शेतात, नदीतून पाणी पोहचविले :- 
 रावलापाणी गावात वीज, पाण्याची सोय नसल्यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी निझरा नदीतुन पाणी ओढण्यात आले. त्यासाठी एक डिझेल इंजिन मशीन नदी वर बसविण्यात आले व नदी पासून 300 फूट लांबी वर एक छोटसं शेततळ तयार करुन त्यात पाणी साठविण्यात आले. मग शेत तळ्याजवळ दुसरे डिझेल इंजिन मशीन बसवून तेथून पुढे 300 फूट लांब असलेल्या शेतात पाणी पोहचविण्यात यश मिळवले आहे. अश्या रीतीने नदी पासून एकूण 600 फुट लांब असलेल्या शेतात वेळेचे नियोजन साधत आठवड्यातुन दोन दिवस पाणी दिले जाते....

➤ शेतात नैसर्गिक खतांचा वापर :- 

 रतिलाल पावरा यांचा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे महागडी रासायनिक खते विकत घेणे त्यांना परवडणारे नव्हते, याकरिता आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरित्या पाला, पाचोळा पासून तयार केलेले कंपोस्ट खत, शेण खत आदींचा वापर करीत फलबागेतील आंब्याचे रोप वाढविले आहेत....

➤ ➤ लहान बंधारा बांधत पाण्याचा समस्यांवर केली मात 

रावलापाणी सारख्या दुर्गम भागात पाण्याची सोय नसल्यामुळे रतिलाल पावरा, त्यांचे लहान भाऊ रविंद्र पावरा व भीष्मा पावरा, बहीण काजोल पावरा व अरुणा पावरा तसेच आई लावीबाई पावरा आणि पत्नी आशा पावरा यांनी स्वतः कठोर मेहनत घेत, शेतीपासून 600 फूट लांब असलेल्या निझरा नदीवर लहान बंधारा बांधत नदीचे पाणी अडविले आणि या अडविलेल्या पाण्याचा शेतात काटकसरीने वापर करीत पाण्याचा समस्यांवर मात करीत फुलबाग फुलविली आहे....

➤ शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा :- 
 रतिलाल पावरा यांचा शेतातील आंब्याची फळबाग आता चांगलीच बहरलेली आहे. परंतु शेताला कुठल्याच प्रकारचे कुंपण नसल्यामुळे, त्यांना गुरांचा त्रासला नेहमीच सामोरे जावे लागते. त्यामुळे रतिलाल पावरा यांचा कुटुंबातील एक सदस्य रात्र दिवस शेतात थांबून बागेची राखण करीत असतो. त्यामुळे रतिलाल पावराचा कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे जेणेकरुन शेताला कुंपण घालता येईल.....
















शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

अखेर कुटुंबीयांना मिळाला त्यांच्या नावाचा धनादेश

दै.'पुण्यनगरी'कडून करण्यात आला होता पाठपुरावा.
रूग्णवाहिकेच्या अपघातात मयत अनिल गुरव यांच्या कुटूंबियांना बीव्हीजी ग्रुपतर्फे अनावधानाने दुसऱ्या नावाने देण्यात आलेला धनादेश परत घेण्यात आला होता. मात्र दै.'पुण्यनगरी' ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर काल तात्काळ गुरव कुटूंबियांना त्यांच्या नावाचा धनादेश देण्यात आला. . गेल्या महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्त करून येत असताना नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात घडल्याने यामध्ये चालक अनिल गुरव, अल्लारखा मक्रानी, भिक्कन पवार, या तिघांच्या मृत्यू झाला होता. वेळोवेळी याबाबत दै.पुण्यनगरीने पाठपुरावा करून सदर विषयाला वाचा फोडल्यामुळे मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तातडीने उपलब्ध झाली. आर्थिक मदतीचा धनादेश पुणे व नाशिक पथकाने मयताच्या कुटुंबियांना स्वाधीन केले. काही दिवसांपूर्वी अनावधानाने कंपनीच्या सदस्यांकडून गुरव यांच्या धनादेश देण्याऐवजी भिक्कन पवार यांच्या धनादेश गुरव यांना देण्यात आला होता. सदर बाब दुसऱ्या दिवशी कुटूंबियांना दूरध्वनीद्वारे कळविल्यानंतर तातडीने कंपनीच्या सदस्यांनी तो परत घेतला. याबाबत लेखी मागितली असता ती देण्यात टाळाटाळ केल्याने कंपनीने सोबत नेलेला धनादेश कधी परत मिळतो याबाबत कुटुंबीय प्रतीक्षेत होते. मात्र दै. पुण्यनगरीच्या वृत्तानंतर तातडीने डॉ.यु.आर.साने जिल्हा व्यवस्थापक, राकेश पाटील, राजेश परदेशी आदीनी येऊन पंडित गुरव यांना धनादेश स्वाधीन केला. गुरव कुटुंबीयांनी दै.'पुण्यनगरी' चे आभार मानले.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

पुढाऱ्याने बिव्हिजीच्या व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावताच दिले ३० हजार...

मयत कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश देताना 
नंदुरबार - दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर मयताच्या कुटुंबियांना भारत विकास ग्रुपतर्फे आठ हजाराची मदत देऊन थट्टा करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त दै.पुण्यनगरीने प्रकाशित केल्यानंतर मयताच्या कुटुंबियांना मदतीसाठीच्या हालचाली गतिमान होऊन एक लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. असे असले तरी अनावधानाने धनादेश बदली झाल्याने सदर धनादेश कंपनीने परत घेतला असून आता पुन्हा धनादेश कधी मिळतो याची प्रतीक्षा आहे.         यादरम्यान कंपनीच्या व्यवस्थापकाने मयताच्या कुटुंबियांना मिळालेल्या रक्कमेच्या अपहार केल्याच्या प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्त करून येत असताना नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात घडल्याने यामध्ये चालक अनिल गुरव, अल्लारखा मक्रानी, भिक्कन पवार, या तिघांच्या मृत्यू झाला होता. नेहमी रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी आटापिटा करणाऱ्या तिघे मयत तरुणांची आर्थिक परिस्थिती बेताची असून भारत विकास गृपतर्फे अवघ्या आठ हजाराची मदत करून गुरव कुटुंबियांची थट्टा केल्याचे वृत्त दै.पुण्यनगरीने 2 एप्रिल रोजी प्रकाशित केले. यानंतर मदतीसाठी हालचाली गतिमान झाल्या. दि. २१ एप्रिल रोजी नाशिक येथील विभागीय प्रमुख बाळासाहेब कंकराळे, पुण्याचे डॉ.ज्योत्सना माने, विभागीय अधिकारी डॉ.किशोर देव, रोहित शिंदे या पथकाने तळोदा गाठून गुरव कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश दिला. मात्र अनावधानाने गुरव कुटुंबियांना दुसऱ्याच नावाने धनादेश देण्यात आल्याने सदरचा धनादेश कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परत घेतला आहे. यामुळे आता परत धनादेश कधी मिळतो, याकडे लक्ष लागून आहे. यावेळी उपस्थितीतांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अंत्यसंस्काराप्रसंगी मदतीची अपेक्षा होती. केवळ आठ हजार आर्थिक मदत देऊन कंपनीकडून थट्टा करण्यात आल्याचे रहवाश्यांनी सांगितले. यावर संबंधीत कंपनीकडून घटनेनंतर तातडीने 50 हजार रु नंदुरबार व्यवस्थांकाच्या खात्यात व 50 हजार रु धुळे येथील डॉ.चव्हाणच्या खात्यावर टाकून मदत करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी संबधित व्यवस्थापकाने सदर रक्कमेच्या अपहाराचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

*आणि व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली*
मयताच्या कुटुंबियांना मदतीसाठी प्रत्येकी 33 हजार रुपये याप्रसंगी कंपनीने मदत पाठविलेली असताना व्यवस्थापकाने प्रत्येक्षात मात्र केवळ आठ हजार रुपये याप्रमाणे मयताच्या कुटुंबियांना मदत केल्याने स्थानिक नेते संतापले. नेत्यांमध्ये व कंपनीच्या व्यवस्थापकात बाचाबाची झाली. शाब्दिक चकमक वाढल्याने स्थानिक राजकीय पुढाऱ्याने व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली. यावेळी वातावरण सुन्न झाले आणि तात्काळ एक लाखाचा धनादेश पंडित गुरव यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच उर्वरित 30 हजार रुपये देखील गुरव कुटुंबियांना देण्यात आले. त्याचप्रमाणे पी.एफ, पेंशन इन्शुरन्स, एलआयसीच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचे सांगितले.

  *कारवाईकडे लक्ष*
भारत विकास ग्रुप राज्यासह परराज्यात देखील आपल्या सेवेमुळे नावलौकिक आहे, मात्र व्यवस्थापकाने केलेल्या चुकांमुळें कंपनी बाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. कंपनी संबंधित व्यवस्थापकवार काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.... *रुग्णकाहिका कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र विमा काढणे गरजेचे* स्वतःच्या जीव धोक्यात घालून रुग्णाना तातडीने सेवा मिळावी म्हणून रुग्णवाहिकेत असलेले कर्मचारी प्रयत्न करतात. बऱ्याचदा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागतो. याकरिता रूग्णासोबत असणाऱ्या नर्स, वाहन चालकांचे कंपनीकडून स्वतंत्र विमा काढणे आवश्यक आहे. तसेच अपघात घडल्यास भरीव आर्थिक मदत करणेही गरजेचे आहे.

 *108 रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांचे मागण्यांबाबत बीव्हीजीला निवेदन* 
 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागनीबाबत बिव्हीजीचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या निवेदना म्हटले आहे की, रुग्णवाहिकेचा अपघातात जिल्ह्यातील अनिल गुरव, भिक्कन पवार, अल्लरखा मक्रानी या तिघांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विविध मागण्यामध्ये ओंनड्युटी मृत्युमुखी झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. कुटुंबियामधील एखादया व्यक्तीस नौकरीत सामावून घेण्यात यावे. तिघांचे प्रॉव्हिडंट फंडातील पैसे तात्काळ मिळवण्याची व्यवस्था करण्यात यावी, सदरच्या मागण्या येत्या चार दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा 108 कर्मचारी संघटनेने निवेदनातून दिला आहे.

 *प्रतिक्रिया* 
 कँपनीकडून 1 लाख रु देण्यात आले होते.मात्र व्यवस्थापकांकडून 8 हजार रु मयताच्या कुटुंबियांना देण्यात आले. यातून गैरसमज निर्मान झाला असून घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठाना कडविले आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून योग्य तो निर्णय घेतील..
 *डॉ.ज्योत्स्ना माने*

 *प्रतिक्रिया* 
कँपनीकडून मयताच्या कुटुंबियासाठी नंदुरबार करीत 50000 रु देण्यात आले होते तर 50000 रु धुळे येथील डॉ. निलेश चव्हाण यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र सदर रक्कम एकत्रितरित्या धनादेश स्वरूपात अथवा रोख न देता 3 दिवसाचा दुखवटा पाळण्यासाठी लागणारा खर्च घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांचा हातात द्यावा, असा आदेश वरिष्ठांकडून देण्यात आला होता. या आदेशांचे पालन केले. सदर 8 हजार एवढी रक्कम कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी नाकारली.
 व्यवस्थापक बिव्हीजी ग्रुप नंदुरबार

 *प्रतिक्रिया*
अपघातात कमवता मुलगा गेला आहे. वाहन दुरुस्तीचे नाव करून वयक्तिक कामाकरिता सदर वाहन नेले असल्याचे आम्हास कळत आहे. याबाबत अर्ज फाटे करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आर्थिक मदत म्हणून देण्यात आलेला धनादेश हा आमच्या नसून भिक्कन पवार यांचा आहे. तो आम्ही परत केला असून अद्याप पावेतो आमच्या नावाचा धनादेश प्राप्त झालेला नाही.
 पंडित गुरव मयत अनिलचे वडील




सोमवार, २ एप्रिल, २०१८

रूग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र विमा काढणे गरजेचे

रुग्णवाहिकेवरील चालकाच्या मृत्यूनंतर कुटूंबियांची थट्टा भारत विकास गृपतर्फे आठ हजाराची आर्थिक मदत
दिवस असो की रात्र, पाऊस असो अथवा वादळ वारा मात्र कसलीही पर्वा न करता कठीण परिस्थितीतही वेळेवर रूग्णवाहिका रूग्णालयापर्यंत पोहचवुन असंख्य रूग्णांचे जीव वाचविणाऱ्या रूग्णवाहिकेवरील चालकाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर मात्र त्याच्या कुटूंबियांची थट्टा करण्यात आली आहे. तळोदा येथील वाहन चालक अनिल गुरव याचा रूग्णवाहिका दुरूस्त करून येत असतांना दोंडाईचा जवळील धावडे गावाजवळ अपघात घडला. आणि यात काळाने घाला घालत अनिलसह दोघांचा मृत्यू झाला.अनिलच्या मृत्यूनंतर मात्र भारत विकास गृपतर्फे अवघ्या आठ हजाराची मदत देवून थट्टाच करण्यात आली आहे. . तळोदा येथील अनिल पंडीत गुरव हे गेल्या आठ वर्षांपासुन भारत विकास गृप कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवर चालक म्हणुन कार्यरत होते. अनिल गुरव अनेक रूग्णांसाठी देवदूत ठरले. मात्र नियतीचा खेळ कोणालाही समजत नाही. काळाने घाला घातला आणि गेल्या आठवड्यात धुळ्याहून रूग्णवाहिका दुरूस्ती करून आणत असतांना दोंडाईचानजीक धावडे गावाजवळ ट्रकने रूग्णवाहिकेला धडक दिल्याने भिषण अपघात घडला. आणि यातच अनिल गुरव यांच्यासह त्यांचे मित्र भिकन बापु पवार (रा.तामसवाडी) व अल्ला रखा मक्राणी (अक्कलकुवा) यांचा मृत्यू झाला. अनिल गुरव यांनी तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, मोलगीसह परिसरातील रूग्णांची सेवा केली आहे. नेहमी रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी आटापिटा करणाऱ्या अनिलचाच मृत्यदेह रूग्णवाहिकेतून घरी पोहचल्यावर मात्र त्याच्या कुटूंबियांचा आक्रोश हृदय हेलवणारा होता. अनिलचा मृतदेह पाहुन सर्वांनी एकच टाहो फोडला. अनिल गुरव यांची परिस्थिती बेताची असून वडील पंडीत गुरव शहरातील हनुमान मंदिर बाहेरच फुलांची दुकान लावतात. चार भावंडांपैकी अनिल तिसऱ्या क्रमांकाचा असून वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षीच घरातील कर्ता मुलगा हरपल्याने अनिलच्या कुटंूबियांवर दुख:चा डोंगर कोसळला. अनिलचे मोठे बंधु आदिवासी प्रकल्पात रोजंदारीवर कार्यरत आहेत. तर दुसरा भाऊ वडीलांना दुकानावर मदत करतो व अनिलचा
 लहान भाऊ पतपेढीचे दैनिक बचत खाते गोळा करतो. अनिल गुरव यांची परिस्थिती बेताची असल्याने अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. मित्र परिवार, नातेवाईक, सगेसोयरे सर्वच अनिल गुरव यांच्या कुटूंबियांच्या दुख:त सहभागी झाले. मात्र आठ वर्ष ज्या कंपनीचे वाहन अनिल प्रामाणिकपणे हाकले, रात्रंदिवस रूग्णांची सेवा हेच आद्य कर्तव्य मानले. त्याच कंपनीने कृतघ्नता दाखवत अवघी आठ हजारांची आर्थिक मदत करून त्याच्या कुटूंबियांची थट्टाच केली आहे. सदर लाजिरवाणा प्रकार पाहून पंडित गुरव यांनी आर्थिक मदत नाकारली. . रूग्णवाहिकेत रूग्णासोबत असणाऱ्या नर्स, वाहन चालकांचे कंपनीकडून स्वतंत्र विमा काढणे आवश्यक आहे. तसेच अपघात घडल्यास भरीव आर्थिक मदत करणेही गरजेचे आहे. यामुळे कंपनीने मयत अनिलच्या कुटूंबियांची थट्टा न करता भरीव आर्थिक मदत देवून भक्कम आधार देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे..











रविवार, १ एप्रिल, २०१८

तळोद्याचे माजी उपनराध्यक्ष छबुलाल परदेशी यांचे निधन

तळोदा शहरातील भाजी व्यापारी तसेच माजी उपनगरअध्यक्ष छबुलाल ताराचंद परदेशी यांचे काल निधन झाले. यांच्यावर मागील दीड महिन्यापासून सुरत व नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दि.३१ मार्च रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. एका संघर्ष मुर्तीच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.. तळोदा शहरासह तालुक्यात सर्वाना परिचित असलेले छबुलाल परदेशी स्पष्ट वक्ता, विनोदी स्वभाव, उदार मन, मदत करण्याची धडपड, शेतकऱ्यांना आडद दुकानात चांगला भाव मिळावा म्हणून सदैव प्रयत्नशील असलेले, गोर गरिबांचा मदतीला धावून जाणारे व्यक्तमत्व. वडील ताराचंद परदेशी यांच्या आडत दुकानापासून छबुलाल परदेशींनी व्यवसायासह राजकाणाचेही धडे घेतले. शहरात परदेशी समाज हा अल्पसंख्याक असताना देखील केवळ मदत आणि संपर्काच्या जोरावर सर्वांशी कौटुंबिक नाते निर्माण केले. सन.१९८७ साली वयाच्या १९ व्या वर्षी नगरसेवक म्हणून उमेदवारी केली व निवडून आले. कणखरपणा, विकासाचे धोरण, सुस्वभाव या जोरावर पुढील १९९१-९२ वेळी पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होवून उपनगराध्यक्ष झाले. त्यानंतर विकासाचा ध्यास बाळगून छबुलाल काका यांनी पत्नीस राजकारणात आणुन नगरसेविका केले. परदेशी कुटुंबीयाच्या समाजकारणाच्या जोरावर त्यांचा मुलगा अजय परदेशी तीनवेळा नगरसेवक व आता लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आहेत. कधीही बडेजाव न मिरवीत गावात कोणत्याही पानाच्या ठेल्यावर मित्र परिवारात सहज रमणारे, छबुलाल परदेशी यांना मागील काळात कर्करोगाने पछाडले. नाशिक, मुंबई, सुरत नंदुरबार अश्या ठिकाणी उपचार सुरु होते. सात वर्षे कर्करोगाशी झुंज देत अखेर काल (दि.३१ मार्च) रोजी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्यावर शहरातील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरीकांसह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी व व्यापारी विजय परदेशी यांचे वडील होत..

सोमवार, २६ मार्च, २०१८

बेढब आकाराचे गतिरोधक वाहनधारकांसाठी जीवघेणे

 बेढब आकार, गरजेपेक्षा जास्त संख्या, उंची व रुंदी प्रमाणात नाही, निकषाप्रमाणे एकही गतिरोधक बनविण्यात आलेले नसल्याने तळोदा शहरात गतिरोधक वाहनधारकांसाठी जीवघेणे बनले आहेत. ओबड-धोबड आकाराच्या गतिरोधकांमुळे अनेकदा वाहनधारकांना दे धक्का करत वाहन पुढे न्यावे लागत असल्याने डोकेदुखी ठरत आहेत..
तळोदा शहरात कॉलनी परिसरांमध्ये तयार करण्यात आलेले गतिरोधक सर्व निकष धाब्यावर बसवून तयार करण्यात आले आहेत. शहरातील काही मुख्य रस्त्यांवर देखील अशाच प्रकारचे गतिरोधक दिसून येत आहेत. त्यामुळे ओबड-धोबड गतिरोधक ओलांडतांना वाहनधारकांना कसतर करावी लागते. गतिरोधकांच्या गरजेपेक्षा जास्त उंचीमुळे वाहने बंद पडणे, ग्राऊंड लेव्हल कमी असल्यास वाहन गतिरोधकावर घसरणे यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. गतिरोधक ओलांडतांना किरकोळ अपघातही घडतात. गतिरोधकांची गरजेपेक्षा जास्त संख्या असल्याने
अनेकजण पर्यायी रस्त्याने जाणे पसंत करतात. शहरातील शंभर ते दोनशे मीटर अंतराच्या रस्त्यावर देखील तीन ते चार गतिरोधक असल्याचे चित्र आहे. गतिरोधक असणाऱ्या ठिकाणी दुचाकी जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी काही ठिकाणी गतिरोधक तोडल्याचेही दिसून येतात. नविन रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणे, त्यावर करण्यात आलेल्या गतिरोधक निकषाप्रमाणे बनविण्यात आले आहेत किंवा नाही याची तपासणी करणे पालिकेचे काम असतांना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मात्र वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ओबड-धोबड गतिरोधकांचे सर्वेक्षण करुन निकषाप्रमाणे गतिरोधक टाकणे गरजेचे झाले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पांढरेपट्टे व दिशादर्शक फलक नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे रस्त्यावर पांढरेपट्टे मारणेही अपेक्षित आहे. गतिरोधक उभारतांना गतिरोधकाची उंची निकषाप्रमाणे २.५ ते १० से.मी. केल्यास वाहनधारक गतिरोधकाकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवतात, असे पालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे..