Breking News

गुरुवार, २७ जुलै, २०१७

धरणामुळे 272 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

मागील 15 वर्षांपासून रखडलेल्या धनपूर धरणाचे काम पूर्ण झाल्याने सातत्याने लढा देणाऱ्या संघर्ष समितीला खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. या धरणामुळे 272 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. बोरद सह परिसरातील खेड्या पाड्यासह 20 ते 25 गावातील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार आहे. परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांचा पाण्याच्या प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
                               1 जुले 1998 रोजी नंदुरबार जिल्हा निर्मीतीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाठबंधारे मंत्री एकनाथ खडसे आदीं उपस्थित असताना कै. पी.के.अण्णा पाटील यांनी धनपूर धरणाचा प्रस्ताव सादर करून या विषयाला चालना दिली. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे नंदुरबार जिल्हा दौरावर असताना भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते लखनजी भतवाल यांच्या साखर कारखान्याच्या विशेष भेटी दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र राजपूत, प्रवीणसिंग राजपूत, डॉ.शशिकांत वाणी, अजय परदेशी, विजय राणा, संजय चौधरी आदींनी धनपूर धरणाचा आहवाल यावेळी सादर केला. तर निझरी नदीवर धरण व्हावे यासाठी 2003 साली कॉ.जयसिंग माळी, यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय धनपूर संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पुरुषोत्तम नारायण पाटील, उदेसिंग पाडवी, विजय चतुरसिंग राणा, कांतीलाल नारायण पाटील, राजेंद्र राजपूत प्रवीणसिंग भटेसिंग राजपूत, उद्धव पाटील, जर्मनसिग वळवी, कै. लालसिंग वळवी, विजय मराठे, ब्रिजलाल चव्हाण, असे 11 सदस्य या संघर्ष समिती स्थापन केली. प्रथम या संघर्ष समितीने 3 सप्टेंबर 2003 साली मोड येथे रस्ता रोको करून आंदोलन केले. त्यानंतर 26 जानेवारी 2005 रोजी आमलाड येथे अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गवार 5 हजार शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यावेळी प्रांताधिकारी रिचा बागला यांच्या मध्यस्थीने तत्कालीन पालक मंत्री शिवणकर यांची भेट घेऊन चर्चा करून आंदोलन स्थगित करण्यात आले. या बैठकीनंतरच धरणाला खरी चालना मिळाली. मात्र या धरणाचा क्षेत्रात वनविभागाची पाडळपूर, धनपूर, सावरपाडा, राणीपुर, खर्डी पेठे, आदी परिसरातील जमीन जात असल्याने तेवढी जमीन वनविभागाला शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात शासकीय दरात धनपूर धरणाचा मोबदल्यात देण्यात आली. व यामुळे धनपूर धरणाचा कायमचा मोठा अडसर असलेला प्रश्न सुटला. हे धरण पूर्ण होण्यासाठी माजी खासदार माणिकराव गावित, माजी पालकमंत्री ऍड.पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार स्वरूपसिंग नाईक, यांनी
शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला, तर विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी 2016 साली अर्थ समितीचे अध्यक्ष आमदार आशिष देशमुख यांच्या सबोट जाऊन धनपूर धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. व त्याच वेळी विशेष निधीतून 9 कोटी रुपी या धरणाच्या कामासाठी पदरी पाडून घेतले. व धनपूर धरणाचा प्रश्न मार्गी लागला.... त्यामुळे हे धरण पूर्ण झाले. व जून 2017 पासुन या धरणाच्या पाणी साठवण केली जात आहे. हे धनपूर धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कडमसारा, धनपूर, सिलिंगपूर, पाडळपुर, खर्डी, लाखपूर, फॉ. न्युबन, छोटा धनपूर, राणीपुर आदी गावातील 272 हॅकटर जमीन ओलिता खाली येणार आहे. या परिसरातील शेती बागायती होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. व शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवूंन सुखी समाधानी होणार आहेत. हा परिसर पूर्णपणे आदिवासी परिसर असून सातपुड्यावर राहणारा आहे. आदिवासी बंधूं आहेत. त्यांच्या परिसरातील बदल झाल्यावर मुलांच्या क्षिकणाकडे कल झुकणार आहे. यासाठी धनपूर धरण हे या परिसरातील आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश होता तो कायमचा सुटला आहे. या धरणाची लांबी 422 मीटर असुन उंची 20.18 मीटर तर 160 मी. खोली आहे. पाण्याची पातळी वाढण्यानंतर कमी अधिक प्रमाणात धरणाचे पाणी, निझरी नदीत सोडण्यात येणार आहे. या धरणामुळे परिसरातील बोरवेल मध्ये, पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेहमीचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. 15 वर्षानंतर या धरणाचे काम पूर्ण स्वरूपाने परिसरातील शेतकऱ्यांची स्वप्न पूर्ती झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाचे लोकप्रतिनिधीचे, व विशेषतः धनपूर धरण संघर्ष समितीचे आभार मानले आहेत. या धरणाला तत्कालीन मुख्यमंत्री ना.मनोहरराव जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, यांच्या शासनाने मंजुरी दिली. या धरणाच्या तत्कालीन पाठबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने या धरणाला चालना मिळाली आहे. हे धरण धनपूर येथे व्हावे यासाठी कै. पी.के अण्णा पाटील यांनी कृती आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. तेव्हापासून धरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. विशेषतः यावर्षीच शेतकऱ्यांना या धरणाचा फायदा जाणवू लागला आहे. परीसरातील खालावलेली पाण्याची पातळी या धरणामुळे वर आली आहे.











तळोदा पालिकेचे आरक्षण जाहीर...

 तळोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अ जा, अ ज, ना मा प्र, आणि त्यामधील महिला व
सर्वसाधारण महिला संबंधी आरक्षण सोडती द्वारे प्रभाग निश्चित करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी तथा करण्यात आले आहे निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेत काढण्यात आले तळोदा नगरपरिषदचे सार्वत्रिक निवडणुक २०१७ चा आरक्षण व सोडत कार्यक्रम आज पालिकेचा आवारात घेण्यात आला. यावेळी निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र सैंदाणे, कार्यालयीन लिपिक नितीन शिरसाठ तसेच माजी नगरसेवक सुभाष चौधरी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, पंकज राणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष जगदीश परदेशी, सेनेचे तालुकाध्यक्ष अनुप उदासी, संजय पटेल, आनंद सोनार, बापू कलाल, गणेश पाडवी आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.... यावेळी एकुण ९ प्रभागातील १८ जागांसाठी अनुसूचित जाती (एस सी), अनुसूचित जमाती (एस टी), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यांमधील महिला व सर्वसाधारण महिला यांचे प्रभागनिहाय आरक्षण प्रेमकुमार गबा अहिरे या मुलाच्या हस्ते ईश्वर चीट्टी द्वारे काढण्यात आले. त्यानुसार
प्रभाग १ मध्ये अ अनुसूचित जमाती (एस टी) ब सर्वसाधारण महिला.
प्रभाग २ मध्ये अ अनुसूचित जाती (एस सी) ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला.
प्रभाग ३ मध्ये अ अनुसूचित जमाती महिला (एस टी) ब सर्वसाधारण व्यक्ती.
प्रभाग ४ मध्ये अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला. ब सर्वसाधारण व्यक्ती.
प्रभाग ५ मध्ये अ अनुसूचित जमाती (एस टी) ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला.
प्रभाग ६ मध्ये अ अनुसूचित जमाती महिला (एस टी) ब सर्वसाधारण व्यक्ती.
प्रभाग ७ मध्ये अ अनुसूचित जमाती (एस टी) ब सर्वसाधारण महिला.
प्रभाग ८ मध्ये अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला.
प्रभाग ९ मध्ये अ अनुसूचित जमाती महिला (एस टी) ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
याप्रमाणे अनुसूचित जमाती (एस टी) साठी ६ जागा त्यांपैकी ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती साठी १ जागा तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी ५ जागा त्यांपैकी ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी ३ जागा राखीव आहेत आणि सर्वसाधारण व्यक्तियांसाठी ३ जागा याप्रकारे एकुण १८ जागांसाठी आरक्षण निघाले आहे. आज काढण्यात आलेल्या प्रभागातील आरक्षण सोडतीवर व प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदांचा आरक्षणाची रहीवासांचा माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरिता २४ जुलै पर्यंत प्रसिद्धी करणे. हरकती व सूचना यांवर कार्यवाही साठी २४ जुलै ते ३१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे....

चांदसैली घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत.

सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक असणाºया चांदसैली घाटात ठिकठिकाणी दरडी
 कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच धुक्यांमुळे या घाटातील प्रवास सध्या अधिकच जिकरीचा झाला आहे. चांदसैली मार्ग हा धडगावला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे तळोदा, नंदुरबार, परिसरातील वाहनधारक धडगावला जाण्यासाठी चांदसैली घाटमार्ग जाणे अधिक पसंत करतात. या मार्गाने वेळेसह पैशांचीही बचत होते. शिवाय सातपुड्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागाला जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडणारा चांदसैली घाट हा महत्त्वाचा दुवा आहे. यामुळे दिवसभर या घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मागील आठ ते दहा दिवसापासून सातपुड्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरवर्षाप्रमाणे या घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मागील दोन वर्षापेक्षा या वर्षी घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्याभरात चांदसैली घाटात पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. दरडी कोसळल्याने घाटातील रस्त्यांच्या कडेला माती व दगडांचा ढिगारा साचला असून, अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीचे ढिगारे रस्त्यांवर पसरले असून, अर्धा रस्ता साकला गेलेला आहे. आधीच घाटात रस्ता अरूंद व त्यातच रस्त्यावर साचलेल्या मातीच्या ढिगाºयांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत घाटातून वाहने चालवावी लागत आहे. अनेक ठिकाणी मातीच्या ढिगाºयांमुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाला असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडत आहेत. या प्रकारांमुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे मागील दोन दिवसात चांदसैली घाट परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने घाटात दिवसभर दाट धुके दिसून येत आहे. या धुक्यांमुळे घाटातील रस्ता हरवल्यासारखी स्थिती निर्माण होते. अगदी पाच ते सहा फुटांवरील वाहनेदेखील नजरेस दिसून येत नाही. आधीच या घाटात ठिकठिकाणी दरडींमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने त्यात दाट धुक्यांची भर झाल्याने घाटातून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने घाट रस्त्यावर कोसळलेल्या मातीचे ढिगारे हटविण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घाटातून प्रवास करताना वाहनधारकांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. घाटात सुरक्षा कठडे चांदसैली घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे बसवायची गरज असून, संरक्षक कठड्यांअभावी प्रवाशांचा जीव टांगणीला असतो. या विषयी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून संरक्षक कठड्यांची मागणी लावून धरल्यामुळे चांदसैली घाटात ठिकठिकाणी नव्याने संरक्षक कठडे बसविण्यात आले आहेत.



अतिवृष्टी काळात धरण व नदीपरिसरात सावधानतेने फिराण्याचा सूचना

तळोदा सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात मुसळधार पाऊस होत तालुक्यातील धनपुर व बोरद परिसरास वरदान
ठरलेल्या धनपुर धरण दीड महिन्याचा पावसात पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने जलसाठा साठवणूक झाल्याने सांडवल वरून पाणी वाहतअसून ओव्हरफ्लोअ झाल्याने निझरी नदी खळखळून वाहत आहे धरण भरल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे धरण परिसरात तहसीलदार व संबधित विभागाचे अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली नागरिकांनी अतिवृष्टी काळात धरण व नदीपरिसरात सावधानतेने फिराण्याचा सूचना दिल्या आहेत. तळोदा तालुक्यातील धनपुर धरण गेल्या १४वर्षांपासून रखडले होते आमदार उदयसिंग पाडवी यांचा प्रयत्नातून ९ कोटी निधी उपलब्ध झाला होता एकूण २६ कोटी खर्च लागलेल्या या लघुप्रकलपात ३.१८ द ल घ मीटर पाणीसाठा झाला आहे धरण परिसरात एकूण २७२ हेक्टर जमीन सिंचना खाली येणार असून शेतकऱयांना रब्बी व खरीप हंगामात पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे परिरात भुर्गभातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल शेतकरी आर्थिक उन्नती साधण्यात मदत होईल आप्रिल मे महिन्यात पूर्ण झालेल्या धनपुर धरण दीड महिन्याचा पावसात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला असून धरणाचा सांडवल वरून ओसंडून वाहत आहे धरण परिसरात तहसीलदार योगेश चंद्रे यांनी संबंधीटविभागाचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे धरण परिसरात जातांना ग्रामस्थानीं सावधान सतर्क बाळगावी अश्या सूचना परिसरात दिल्या आहेत. धरण असलेल्या निझर नदी खळखळून वाहत आहे मोड,मोरवड,खेडले या भागातील गावात पाणी शिरलं होत यामुळ काही घरात व शेतात पाणी शिरून काही प्रमाणत नुकसान झालं आहे दरम्यान या बाबत तहसीलदार योगेश चन्द्रे यांच्याशी संपर्क केला असता कोणतेही जीवित नुकसान झालं नसून शेतात शिरलेले पाणी ओसरले आहे ,आता सांडवाच्या सुरक्षित जागेतून पाणी वाहत आहेत अति वृष्टीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठी घर असलेल्या ग्रामस्थांनी पुराचा पाण्याचा पासून सावधानता बाळगावी असे असे आवाहन केले आहे

बुधवार, २६ जुलै, २०१७

शासकीय मदतीसाठी मयताच्या वडिलांची अधिकारी लोकप्रतिनिधीकडे चकरा!


 धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तळोदे शहरातील दोघा भावांचा तोल जाऊन नदीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना धडगाव तालुक्यात बिलगाव येथे वर्षभरापूर्वी घडली होती. या घटनेचा शासकीय पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी अधिकारी व लोकप्रतिनिधीनी भेटी देऊन शासकीय शासकीय निधी मिळवून देण्याचे पालकांना आश्वासन दिले होते. या घटनेला काल सोमवारी एक वर्ष पुर्ण झाला आहे. मात्र शासकीय निधीसाठी मयताचे वडील गेल्या 6 महिन्यापासून प्रशासनाच्या दारी चकरा मारत आहेत. अधिकारी त्यांना कागदोपत्राची पूर्ततासाठी वेळोवेळी त्यांची दिशाभूल करीत आहेत. यामुळे मुलांच्या अपघाती निधनानंतर मनाने खचलेले वडील शरीरानेही खचले असून त्यांना संबंधीताना वेळीच शासकीय मदत उपलब्ध करून धीर देण्याची गरज आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की; धड़गाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिलगाव येथे "बारामुखी" धबधबा आहे, पावसाळ्यात नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.यात तरुण वर्गाचा मोठा प्रमाणात समावेश असतो. तळोदे शहरासह जिल्ह्यातील तरुणांचे ग्रुप बिलगाव येथील धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी हजेरी लावतात. मागील वर्षी तळोदयातील सात मित्रांचा ग्रुप बिलगाव येथे सहलीसाठी गेला होते. त्यातील काही तरुणधबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने, त्यातील राहुल पाटील व विशाल पाटील हे दोघे सखे भाव पाण्यात बुडाले. यावेंळी बाकीच्या तरुणांनी मानवी साखळी करून त्याना वाचविण्याचा पर्यन्त केले मात्र त्यांना यश आले नाही. पाण्यात बुडल्याने दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबत पंचनामा करून शासकीय सोपस्कार करण्यात आले. यावेळी मयताच्या कुटूंबियांना सांत्वन देण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पो.अधिक्ष राजेंद्र दहाडे, यांच्यासह आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी भेटी दिल्या होत्या. अधिकारी व लोकप्रतिनिधीनी मयताच्या कुटुंबियांना सांत्वन करताना नियमानुसार शासनकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला वर्ष होऊन देखील अद्याप शासनाकडून मदत उपलब्ध करण्यात आली नाही. या मदतीसाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते यांच्याशी देखील संपर्क करण्यात आल्याचे कळते.मयताचे वडील देविदास पाटील हे जिल्हा बँकेत शिपाई पदावर कार्यरत असून त्यांनी दरम्यानच्या काळात आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली आहे. याबाबत देविदास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, शहादा प्रांताधिकारी कार्यालय, तळोदा प्रांताधिकारी व तहसील कार्यालय, धडगाव पो.ठाणे व तहसील कार्यालयासह मुंबई मंत्रालयात निधीसाठी पाठपुरावा केला आहे. मात्र प्रयत्न सुरू आहे. असे त्यांना सांगितले जात आहे.देविदास पाटील हे मुलांच्या निधनानंतर खचले आहेत. तर मदतीसाठी आता त्यांना शासकीय दरबारी चकरा माराव्या लागत असल्याने शरीराने ही खचत असल्याचे त्यांना चेहऱ्यावरील भाव सांगतात. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने मदतनिधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.




गुरुवार, १३ जुलै, २०१७

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज तळोदा क्रीडा संकुलाचे उदघाटन

आपले तळोदे- तळोदा तालुक्यातील क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेल्या तालुका क्रीडासंकुल लोकार्पण सोहळा पर्यटन मंत्री तथा जील्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा हस्ते आज होणार आहे. या सोहळ्याला खासदार हिनाताई गावित आमदार उदयसिंग पाडवी जिल्हाधिकारी मलीनाथ कलशेट्टी, तसेच क्रीडायुवक सेवा संचानालय नाशिक विभाग संचालक जयप्रकाश दुबळे तसेच उपविभागीय अधिकारी तळोदा अमोल कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या क्रीडा संकुलाचे लोकार्पण व्हावे याकरिता तळोदा शासकीय विश्राम गृहात आमदार उदेसिंग पाडवी यांचा प्रमुख अध्यक्षतेखाली विविध सदस्यच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी तळोदा तहसीलदार योगेश चन्द्रे, जिल्हाक्रीडाधिकारी घानश्याम राठोड कार्यकारी अभियानता अनिल पवार आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहादा व तळोदा तालुका क्रीडा संकुलाच्या हस्तांतरण तसेच इतर म्हत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. शनिवारी दिनांक १० रोजी शहादा व तळोदा या दोन्ही ठिकाणच्या तालुका संकुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे ठरले.. तळोदयातील आय. टी. आय. कॉलेजचा शेजारी तालुका क्रीडा संकुलाचा बांधकाम करण्यात आले आहे. याकरिता आमदार उदेसिंग पाडवी यांनी क्रीडा संकुलाचा निर्मितीकडे विशेष लक्ष दिले आहे. लवकरच क्रीडा संकुल तयार होवून त्याचा उपयोग खेळाडूंना घेता येनार आहे. क्रीडा संकुलला रंग रंगोटी करून लोकार्पनासाठी तयार करण्यात आले आहे, येत्या 10 तारखेला पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, आमदार उदेसिंग पाडवी आदींच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संकुलाचे उदघाटन होणार आहे. या क्रीडा संकुळामुळे शहरातील व तालुक्यातील खेळाडूं व क्रीडा पटूंना हक्काचं स्थळ उपलब्ध होणार आहे, संबंधित ठेकेदाराने अद्याप पावेतो संकुलाची इमारत क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरित केलेली नसल्याने क्रीडा प्रेमींचा हिरमोड होत होता, इमारत हस्तांतरित झाल्यानंतरच क्रीडा संकुलाचा इमारतीत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांचे तर परिसरात खो - खो, कबड्डी आदी खेळांसाठी आवश्यक असणारे साहित्य व त्यासाठी लागणारे मैदान तयार करता येणार आहे, क्रीडा संकुलाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. आणि उर्वरित काम झाल्यानंतर शहरातील व तालुक्यातील खेळाडूंना सरांवासाठी आपल्या हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे. या सर्व खेळांना त्याद्वारे एकप्रकारे चालना मिळण्यास मदत होणार आहे....


तळोदा शहर हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी.

 तळोदा शहरात राष्ट्रीय एकात्मता बंधु भाव सामाजिक सलोखा राखणे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे समाज सलोख्यासाठीची भूमिका कौतुकास्पद असून मराठी पत्रकार संघाचा या विविध उपक्रमातुन दिसून येते. असा सुर उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला. तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर, हिन्दू - मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आ उदेसिंग पाडवी हे होते. तहसीदार योगेश चन्द्रे, पोलिस उप अधीक्षक शिवाजी गावित, पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे, न पा गटनेते भरत माळी, भाजपा प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, मौलाना शोएब रजा नूरी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, पंकज राणे, अजय परदेशी, निसार मक्रानी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, अनिल माळी, हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, अकबर शेख, अकील अंसारी, रईसअली अब्बास अली, इम्तेयाज कुरैशी, शब्बीर पिंजारी हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, संदीप परदेशी, अदि उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी, मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार उदेसिंग पाडवी, मौलाना शोएब रजा नूरी, निसारदादा मक्राणी, आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की; इफ्तार पार्टी मुळे जातीया सलोखा जपन्यास मदत होते बंधुभाव भाईचारा अधिक वृंदिगत होतो तसेच तळोदा शहरात पूर्वीपासून असलेल्या या दोन्ही पंथियांचे एकीचा संबंधाचे दाखले दिलेत. हिन्दु - मुस्लिम या दोन्ही पंथियांनी गुण्या गोविंदयाने रहात, शहराची शांतता कशी टिकून राहील या बददल ही मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात तळोदा शहराला समाज कंटकांमुळे लागलेला डाग पुसून काढण्यास दोन्ही समाजाच्या वतीने प्रयत्न झाले पाहीजे.. तळोदा शहराचे नाव राज्यभरात हिंदू मुस्लिम एकतेसाठी ओळखले जाईल. तसेच मराठी तालुका पत्रकार संघाने असे प्रभोधणात्मक कार्य पुढेही सुरु ठेवावे अशी अपेक्षा सर्वांनी आपल्या मनोगनत व्यक्त केली. यावेळी मुस्लिम समाजातील लहान बालकांचा संपूर्ण एक महीना रोजे केलेल्या बालकांचा प्रमुख अथितींचा हस्ते सत्कार करुन त्यांना गिफ्ट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शेवटी सर्वांना केळी, खजूर व शरबत वाटप करण्यात आले, मुस्लिम बांधवांनी फराळ खाऊन आपला उपवास सोडले कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव उल्हास मगरे यांनी केले तर सूत्र संचालन फुंदीलाल माळी व आभार संघाचे सदस्य सुधाकर मराठे यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर मराठे, सचिव उल्हास मगरे, विकास राणे, फुंदीलाल माळी, सुधाकर मराठे, किरण पाटील, चेतन इंगळे, राकेश पवार, तुषार नाईक, नरेश चौधरी अक्षय जोहरी आदींनी परिश्रम घेतले...











बुधवार, १२ जुलै, २०१७

वीजबिल भरण्याकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

जनजागृतीचा अभाव : १३ हजारपैकी ४७८ ग्राहकांनी भरले ऑनलाईन बिल ऑनलाईन

 महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, तळोदा तालुक्यात १३ हजार ग्राहकांपैकी केवळ ४७८ ग्राहकांनीच या सुविधेतंर्गत वीजबिलाचा भरणा केला आहे. यामुळे ग्राहकांनी या सुविधेला प्रतिसाद न देता चक्क याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. एकूण महावितरण विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. महावितरण मोबाईल अँपद्वारे महावितरणच्या सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. विजबिल भरणा करणो आदींसह विविध समस्यांचे निराकरण घरबसल्या व्हावे, याकरिता महावितरण विभागाकडून विविध ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तळोदा तालुक्यात १३ हजार १९0 एवढी विजग्राहकांची संख्या आहे. यातील थकबाकीधारकांकडे ३१ कोटींपेक्षा अधिक बिलांची थकबाकी आहे. वीजबिल भरणा करण्यासाठी वीजवितरण विभागांना विविध उपयोजना करण्यात आल्या आहेत. वीजबिल भरण्यासाठी वीजबिल भरणा केंद्राजवळ अनेक ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत होती. तालुक्यातील ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागत होती. यामुळे वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. शिवाय वेळ व पैसाही वाया जात होता. यामुळे महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय मोबाईल अँपवरही सदर सुविधा उपलब्ध आहे. मात्र या सुविधेकडे ाग्राहकांनी पाठ् फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. १३ हजार १९0 ग्राहकांपैकी जानेवारी महिन्यात १५२ ग्राहकांनी चार लाख ६४ हजार, फेब्रुवारी महिन्यात १५४ ग्राहकांनी तीन लाख २७ हजार तर मार्च अखेरीस १७२ ग्राहकांनी चार लाख सात हजार एवढाच वीजबिल भरणा केला आहे. त्यातही औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनीच ऑनलाईन वीज बिल भरणा केल्याचे समजते. वीजवितरण विभाग याबाबत जनजागृती करण्यात कमी पडत असल्याने ग्राहकांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांनी वेळ वाचवून घरच्या घरी सदर बिल अदा करणो गरजेचे आहे. मात्र आदिवासी बहुल जिल्हा असून तालुक्यातील काही भाग दुर्गम भागात वसला आहे. यामुळे विविध अडचणी निर्माण होवून अनेकांना ऑनलाईन वीजबिल भरणा करता येत नाही. याबाबत संबंधित विभागाने कार्यक्षाळेचे आयोजन अथवा ठिकठिकाणी ऑनलाईन भरणा करण्याबाबत मार्गदर्शक फलक लावून जनजागृती करणो गरजेचे आहे.

ऑनलाईन पेमेंट  घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक,  शेतीपंप
जानेवारी २0१७ ग्राहक वसूली १0६ ६९000 २३ २४, ८000 २३ १४, ७000 00 00 १५२ ४६,४000 
फेब्रुवारी २0१७ ग्राहक वसूली १0५ ६९000 २२ ८१,000 २३ १,६३,000 0४ १४,000 १५४ ३२,७000
मार्च २0१७ ग्राहक वसूली १२0 ८४,000 २७ १,३५,000 २४ १,६७,000 0१ २१,000 १७२ ४0,७,000 



 

तळोदा तालुक्यातील विजग्राहकांकडे तब्बल 31 कोटी विज बिल थकले

तळोदा तालुक्यातील विजग्राहकांकडे तब्बल 31 कोटी विज बिल थकले असून हि
रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच विज कंपनी सरसावणार आहे. शिवाय भारनियमातही लवकरच वाढ करण्याचे संकेत कंपनीने दिले आहे... तळोदा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात विज पोहचावी याबाबत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विज मिटर मिळण्याबाबत असंख्य ग्राहकांचे अर्ज दररोज कार्यालयात येत आहेत. ग्रामीण भागासह शहरात देखील विज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच कोट्यवधीने थकीत असलेल्या विजबिलामुळे विजमंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक उपाय करून हि थकीत जमा होत नसल्याने.. विज मंडळ विविध उपाय योजना राबवत आहे. तळोदा तालुक्यात सर्वप्रकारची 13 हजार दोनशे 21 एवढी ग्राहक संख्या आहे. यात बहुतांश ग्राहकांकडे साधारणतः 32 कोटी एवढी थकबाकी आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, औद्योगिक, व्यावसायिक घरगुती, आदींच्या समावेश आहे. तर सर्वाधिक वीज बिल शेतक-यांकडे थकीत असून त्याच्या आकडा 26 कोटी वर गेला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललेला आहे. भारतीय जनता पक्षाचे व शिवसेनेचे युती।सरकार आल्यानंतर शेतकरऱ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र युतीच्या सरकार कडून आश्वासन पूर्तता झाली नाही. आश्वासनाच्या भरोस्यावर अनेक शेतकरी अद्याप हि प्रतीक्षेत आहेत. आस्मानी सुलतानी संकटाना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागते. याविविध कारणांमुळे ग्रामीण भागातून शेतक-यांनी कृषीपंपाची वीजबिले आदी बिले थकली आहेत. शेतकरी हवालदील झाले असताना बिल भरण्यास विविध संकटे येत आहेत. यांच्या फटका मात्र विजवितरण विभागाला होत आहे. विज कंपनीकडून घरगुती विज ग्राहकांवर कारवाई सुरू करण्यात आली असुन विजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा विज पुरवठा खंडित केला जात आहे. विज गळती व विज चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तालुक्यात ठिकठिकाणी भर दुपारी देखील पथदिवे सुरु असतात. अनेक शासकीय कार्यालय, बँका, आदी ठिकठिकाणी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित नसताना हि ac पंखे, कुलर आदींच्या गैरवापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यातून नाहक विज वाया होत आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. अश्या विविध कारणामुळे विज कंपनिला प्रचंड आर्थिक नुकसानिला सामोरे जावे लागत आहे.

*विजग्राहक*                               *संख्या*                         *थकबाकी* 
घरगुती ग्राहक                               6522                        86 लाख 40000
व्यावसायिक ग्राहक                        566                         13 लाख 23000
औद्यीगिक ग्राहक                          187                         2 लाख 7 हजार 
तालुक्यात पाणीपुरवठा                   70                          1 कोटी 2 लाख 23000 
शेतीपंप                                          5784                     26 कोटी 63 लाख 33000
पथदिवे                                           92                        2 कोटी 47 लाख 92000

तालुक्यात एकूण 13221 ग्राहक संख्या असून 31 कोटी 15 लाख 23 हजार एवढी थकबाकी आहे... 

*विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीम बनवण्यात आली असून विजबिल थकीत असलेल्या ग्राहकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसा बजावूनही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे तात्पुरता स्वरूपात विज खंडीत करण्याचे कामे सुरु आहेत. दिर्घकाळा पासून विजबिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांचे कायमस्वरूपी विज खंडीत करण्याचे कामे सुरू आहेत. तालुक्यात रिक्षा फिरवून बिल भरण्याचे आव्हान करने सुरु आहे. ग्राहकांना विज बिले भंरण्याचे आव्हान सहाय्यक अभियंता सचिन काळे यांनी केले आहे.*

तळोद्याच्या सरवारे दांम्पत्याने समाजापुढे एक नवा आदर्श

स्वत:साठी तर सर्व जगतात. मात्र, जे जिवंतपणी व मृत्यूनंतर देखील दुसर्‍यांसाठी जगतात ते खरच आदर्शवत ठरतात. जिवंतपणी समाजासाठी देह झिजवत असलेले पण मृत्यूनंतर देखील देहदान करून मानवतेसाठी सर्व काही अर्पण करणार्‍या तळोद्याच्या सरवारे दांम्पत्याने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तळोदा शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रा.पुरुषोत्तम शंकरसा सरवारे (कलाल, वय ८३) व त्यांच्या अर्धांगिनी सौ.लीलावती सरवारे (वय ७७) यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्र विभागाला त्यांचे देह सूपूर्द केले जाणार आहे.
 वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना चिकित्सा व संशोधनासाठी मानवी देहाची गरज असते. परंतु देहांच्या अभावापोटी ते योग्य शिक्षण घेऊ शकत नाही. या विद्यार्थ्यानी आपल्या देहाचा उपयोग करून मानवी शरीराची रचना अभ्यासून चिकित्सक बनावे व पुढे आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत रुग्णांवर योग्य उपचार करून रुग्णांचे जीवन वाचवावे, अशी प्रा.पुरुषोत्तम सरवारे यांची इच्छा असून यासाठी त्यांनी आपल्या मृत्युपत्रात सुद्धा आपल्या देहदानाचा संकल्प लिहून ठेवला आहे. पतीच्या देहदानाने प्रेरित होऊन त्यांच्या पत्नी सौ.लीलावती सरवारे यांनी देखील पतीप्रमाणो देहदानाची इच्छा आपल्या मुलांजवळ मांडली. मुलांनी संमती दिल्याने या उभयतांची देहदानाची संकल्पपूर्ती त्यांच्या मरणोत्तर त्यांचे मुले योगेश सरवारे, डॉ.हेमंत सरवारे, पंकज सरवारे, मुलगी सौ.श्यामला नारायण सोनवणो हे करणार आहेत.
                                       प्रा.सरवारे यांनी पुणो विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले असून तळोदा येथील कॉलेज ट्रस्टचे ते माजी कार्यकारिणी सदस्य होते. त्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी तळोद्यात हिंदी सेवा संघाची स्थापना केली. सध्या ते जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष असून ते उत्कृष्ट हिंदी सूत्रसंचालक आहेत. सरवारे दाम्पत्याचा देहदानाच्या संकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.


मृत्यूनंतर सदगती मिळते या अंधश्रद्धेपायी शरीर जाळून नष्ट करण्याऐवजी चामड्यासह सर्व शरीराचा अधिकाधिक उपयोग मानवजातीला व्हावा, सर्व अवयवांच्या गरजू व योग्य लोकांना फायदा व्हावा, जास्तीत जास्त लोकांना देहदानाची प्रेरणा मिळावी, या हेतूने आम्ही देहदानाचा निर्णय घेतला आहे. कालबाह्य रूढी-परंपरा तसेच वेळ व पैसा वाचविण्यासाठी आमच्या मृत्यूनंतर उत्तरकार्य देखील पाच दिवसाचे व त्यात फक्त गोती कुटुंबच सहभागी होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रा.पुरुषोत्तम शंकरसा सरवारे (कलाल)

शुक्रवार, ३० जून, २०१७

तळोद्यात उद्यानाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण

तळोदा शहरातील एकमेव उद्यानाचे आज जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.. जेष्ठ नागरिक संघाकडून उद्यानाला बसण्याकरिता बाक तर तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून 2 कचरा कुंड्या जाहीर करण्यात आल्या... तळोदा पालिके मार्फत विमलनगर या नवीन वसाहतीत गो.हु. महाजन शाळेला लागून तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चन्द्रे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नगराध्यक्षा रत्ना चौधरी, पालिकेचे गटनेते भरत माळी, उपनगराध्यक्ष रुक्सानाबी सैयद, बांधकाम सभापती, संजय माळी, नगरसेवक पंकज राणे, सुभाष चौधरी, प्रकाश ठाकरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, यु.जी.पिंपरे आदी उपस्थित होते. तळोदा पालिका उद्यान हे जेष्ठ नागरिक व बाल गोपालांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली असून, अश्या लोकाभिमुख कामा करिता प्रशासन नेहमी सकारात्मक आहे. येत्या काहीं काळात विरुगुळा सेंटर आदींसह जेस्ठसाठी व बालकांसाठी मनोरंजसाठी विविध उपाययोजना राबविणार असल्याचे मत जिल्हाधिकारी मलीनाथ कलशेट्टी यांनी लोकार्पण सोहळा प्रसंगी व्यक्त केलं. यावेळी भरत माळी यांनी देखील शहरात विविध विकासकामे माजी मंत्री पदमाकर वळवी यांच्या मार्गदर्शन खाली होत असून पुढील काळात देखील अशीच विकास कांमासाठी आम्ही बांधील आहोत असे प्रतिप्रदान केले. तळोदेकर जनतेसाठी हक्काचे उद्यान तयार झाले असून जेष्ठ नागरिक व बालकांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. यावेळी जेष्ठ नागरिक संघ व गावातील मान्यवरांनी उद्यानात बसण्यासाठी बाक देण्याचे आव्हान केले तर, उद्यान परिसर स्वच्छ व सुंदर राहावा या हेतूने तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे डॉल्फिन आकाराच्या 2 कचराकुंडी देण्याचे जाहीर केले. या उद्यानात बालकांसाठी क्रीडा साहित्य व खेळणी आदी बसविण्यात आले आहेत. उद्यानाला काँक्रीटची संरक्षण भिंत बांधण्यात आली असून, या उद्यानाला दोन प्रवेश द्वार असणार आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी व सायंकाळी पायी फिरण्यासाठी कॉंक्रीटचे पथ तयार करण्यात आला आहे. लहान मुलासाठी घसरगुंडी , छोटे झुले,सी,सॉ, व खेळणी असणार आहेत तसेच उद्यानाचा मद्यह्भागी पाण्याचे भलेमोठे कारंजे लावण्याचे काम जोरात सुरू आहे. तयार होत असलेले नवीन उद्यान हे शहराच्या मध्यभागी बसस्थानक जवळ व चिनोदा रस्त्या आदी वर्दळ ठिकाणी असल्याने या उद्यानात तरुणांसह बालके व वृद्ध मोठ्या संख्यने हजेरी लावतील अशी आशा आहे. उदघाटन प्रसंगी उद्धव पिंपळे, नगरसेविका सुनंदा पाडवी, कांता ठाकरे, अरविंद मगरे, बापू कलाल, गणेश सोशल ग्रुपचे हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, संदीप परदेशी, आदींसह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार रमेश भट यांनी मानले.
  माजी मंत्री पद्माकर वळवी, गटनेंते भरत माळी, यांच्या मार्गदर्शनाने शहरातील विविध समस्यां सोडविण्यात यश येत आहे. शहरात हक्काचे उद्यान तयार झाले असून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. उद्यानात लावण्यात आलेल्या झाडे व खेळणी आदींची निगा राखणे तसेच स्वछता राखणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 
रत्नाताई चौधरी नगराध्यक्षा










गुरुवार, २९ जून, २०१७

आता म्हणे जुलै मध्ये हातोडा पुल सुरू होणार.

तळोदा तालुक्याच्या थेट जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या नंदूरबारशी संपर्क यावा,
यासाठी तत्कालीन मंत्र्याच्या प्रमुख पुढाकाराने सन २००७ - ०८ मध्ये हातोडा पूलाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाली. तेव्हा पासूनच या पुलाचे उद्घाटन दोन मंत्र्यानी केल्याने पूल चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा सेतू म्हणून ओळखला जाणारा गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी पुलावरील भराव खचून पूल चर्चेचा विषय बनला होता. तर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार उदेसिंग पाडवी यांनी जून 2016 मध्ये पूल सुरू करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे पुल तयार होण्यास विलब झाला होता... तर सध्या पूल पूर्णतः तयार होण्यापूर्वीच आमदार उदेसिंग पाडवी यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हातोडा पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली होती. मात्र हातोडा पुलाची सध्याची स्थिती पाहता अद्याप काही महिने तरी पूलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे चित्र समोर आहे. दि:-16 मे रोजी पुन्हा आमदार पाडवी यांनी अभियंता व सहकाऱ्या सोबत जाऊन पुन्हा एकदा पुलाची पाहणी केली. अभियंता पिंगळे यांनी जुलै मध्ये हतोडा पुलाचे कामे पूर्ण होऊन पूल उदघटनास तयार असले असे संगीतले. त्यावर पाडवी यांनी जुलैला हातोडा पुलाचे उद्घाटन होनार असल्याची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली. सध्याची पुलाची स्थिती पाहता, 1 स्लॅब भरणे एवढेच काम जरी उरले असले तरी, क्रेनची आवश्यकता, येणाऱ्या तांत्रिक अडचणीसह, पाऊसाची चाहूल, यामुळे पुलाचे उद्घाटन लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊसाला सुरुवात होण्याआधी उरलेला 1 स्लॅब आज जरी भरून काढला तरी, साधारणतः तो स्लॅब सव्वा ते दीड महिना वाळण्यासाठी तसाच राहू द्यावा लागेल. मात्र सध्यातरी स्लॅबही भरण्यात आलेला नाही.... एकही मुसळधार पाऊस झाला, तरी 4 महिने पुलाचे कामे थांबविण्याशिवाय पर्याय राहणार नाही... लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेले हतोडा पूल लोकप्रतिनिधींनी, व बांधकाम विभागासाठी केवळ विरुगुंळाचा विषय बनला आहे. आहिराणीतील एक प्रचलित म्हण यावर खरी ठरत आहे. उंदिरना ना जीव जास अन मांजर ले खे व्हस.... पाहूया आता कधी सुरू होतो हतोडा पूल....



बुधवार, २१ जून, २०१७

अश्लील चित्रफित टाकणारा तो अधिकारी कोण?

जिल्हाधिकारीसह विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व यंत्रणेशी संबंधीत कर्मचारी असलेल्या
whatsapp ग्रुपवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हाट्सअप्प ग्रुपवरती तळोदा तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अश्लील चित्रफीत टाकून त्याच्या बुद्धिमतेचा प्रत्यय दिला आहे. संबंधितांच्या या घृणास्पद कारनाम्याबाबत ग्रुपवरील महिला पुरुष अधिकाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्यक्तीवर प्रचंड टीका केली जात आहे. मात्र सदर प्रकार हा वरिष्ठ अधिकारी व जबाबदारअधिकाऱ्यांना माहीत असून देखील त्यांनी याबाबत चुप्पी साधल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधता यावा, विविध कामे व योजनांची माहिती एकमेकांपर्यंत पोहचावी, आपापल्या भागातील मिटिंगस, करण्यात येणारी कामे याबाबत अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवादासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हाट्सअप्प ग्रुपचालविला जातो. या ग्रुपवर महिला तसेच पुरुष अधिकारीव कर्मचारी असून यातून प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा आगामी कामे याबाबत संवादाची देवाण घेवाण हाच प्रमुख हेतू असून या माध्यमातून ग्रुप सुरू आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्यकार्यकारी अधिकारी मंगळे, प्रकल्प अधिकारी, निमा अरोरा, सिव्हिल सर्जन डॉ.भोये. आरोग्य विभागातील सर्वच डॉ. WHO चे प्रतिनधी, समीर पवार, चंद्रकला जयस्वाल, टाटा ग्रुपचे कोपोषण मुक्तचे अधिकारी, युनिसेफचे प्रतिनिधी राजलक्ष्मी नायर, राजमाता जिजाऊचे संचालक गोपाळ पंढगे, युनिसेफचे डॉ.तरुण खडेलवाल, नंदुरबारच्या सर्व पर्यवेक्षिका, (मुख्य सेविका) जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, युनिसेफचे राजलक्ष्मी नायर, प्रकल्पाचे बागुल,जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आदींसह वरिष्ठ अधिकारी महिला अधिकारी आदींच्या समावेश आहे.दरम्यान दि 16 जून रोजी तळोदा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या एका जबाबदार डॉक्टराने अश्लील फोटो असलेली दोन पीडीएफ फाईल टाकल्याने खळबळ उडाली आहे. संबंधितांच्या या घृणास्पद प्रकाराचे चांगलेच पडसाद उमटले असून महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केला गेला आहे. सदर प्रकार हा अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप देखील करण्यात येत आहे.तर अनेकांनी महिलांव्हा आदर करण्याच्या सल्ला ग्रुपवरून दिला आहे. संबंधित हे एका विभागाचे जबाबदार असून त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना किती अडचणीचा सामना करावा लागत असेल असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे संबंधीत ग्रुपवर संतापाची लाट पसरली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ ग्रुपच्या अडमीनने संबंधित अधिकारी, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रुपमधून रीमुव्ह केल्याचे समजते. सदर प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहू देखील याबाबत चुप्पी साधल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महिलांचा आदर न बाळगणाऱ्या संबंधितांची पाठराखण का केली जात आहे. असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. वर्षभरापूर्वी देखील संबंधित व्यक्तीने अन्य एका ग्रुपवर असा प्रकार केल्याची कुजबुज सुरू आहे. संबंधितांकडून सदर प्रकार हा पहिल्यांदा नसून तिसऱ्यादा घडल्याचे बोलले जात आहे. अश्लील चित्रफीत टाकून अनादर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात येत आहे.

सोमवार, १९ जून, २०१७

चिनोदा चौफुलीला आदिवासी क्रांतीकारकाचे नाव द्या.

तळोदा शहरात मुख्य रस्त्यावर अथवा मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात
आलेल्या चौफुलीवर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, आदिवासी क्रांतिकारक यांचे नाव अथवा पुतळे उभारून आदिवासी संस्कुर्तीचे जतन करा अशी मागणी तळोदा आदिवासी महामोर्चा संघटने कडून करण्यात आली आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार व लोकप्रतिनिधीना निवेदन देण्यात आले आहे. तळोदा शहराच्या मुख्य रस्त्यावर अथवा मोक्याच्या ठिकाणी आदिवासी संस्कृती टिकावी या करिता चौफुलीना क्रांतीवीर किंवा आदिवासी संस्कृतीचे प्रतीके, पूर्णकृती पुतळे, आदिवासी क्रांतीवीर बिरसामुंडा अथवा आदिवासी क्रांतीवीर यांचे चौफुलीला नाव देण्यात यावे, अथवा पूर्णकृती पुतळे बसविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन आदिवासी महामोर्चा संघटनेकडून मुख्याधिकारी जनार्दन पवार सह जिल्ह्यातील आमदार खासदार आदींसह लोकप्रतिनिधीना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा हा आदिवासी म्हणून ओळखला जात असून. तळोदा तालुका हा आदिवासी समाजाच्या गड समजला जातो. तळोदा तालुक्यात 90/ आदिवासी समाज राहतो. मात्र तळोदा शहराला आदिवासी महापुरुषाचे एकही चौफुली अथवा रस्त्याला महपुरुषाचे नाव, पूर्णकृती पुतळे, बसविण्यात आले नसल्याने आदिवासी समाजावर एकप्रकारे अन्याय होत असून ही गँभिर बाब असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तळोदा शहरात बसस्थानक समोरील चिनोदा रस्त्यालगत असलेल्या चौफुलीला महापुरुष क्रांतिकारी बिरसामुंडा यांचे नाव देण्यात यावे. क्रांतीवीर बिरसामुंडा यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी अत्यंत कमी वयात ब्रिटिशांविरुध्द लढा देऊन सळो की पळो करून सोळले होते. इंग्रजांनी त्यांना कपटनीतीने पकडून फ़ाशी दिली. त्यांचा रक्ताचा प्रत्येक थेंब स्वतंत्रयासाठी त्यांनी वाहून देशासाठी बलीदान दिले. त्यांचे बलीदान व्यर्थ न जाता त्यांचे कार्य सतत तरुण पिढीला स्मरणात रहावे. या हेतूसत्व क्रांतिवीर बिरसामुंडा यांची पूर्णकृती पुतळा अथवा त्यांचे नाव, तथा आदिवासी सांस्कृतीचा प्रतीके अथवा पुतळे बसस्थापक समोरील चिनोदा चौफुलीत बसविण्यात यावे. येत्या 15 नोव्हेंबर क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती पूर्वीच पालिकेने याबाबत निर्णय घोषित करावा अन्यथा आदिवासी समाजाचा वतीने तळोदा तालुक्यात हजारोंच्या संख्येच्या उपस्थित रस्ता रोको व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर अध्यक्ष गणपत पाडवी, उपाध्यक्ष योगेश रमेश पाडवी, सचिव उमेश वसावे, दिनेश पाडवी, दिपक वळवी, जेमलाल वळवी, ईश्वर पाडवी, चंदन पाडवी, रवि पाडवी,विष्णु गावीत, अजय वळवी, विजय पावरा, उमेश पाडवी, सागर पाडवी, राजूदादा पाडवी, सुनिल पाडवी, नितेशदादा पाडवी, पिंटू पाडवी, गोविंदा पाडवी, देविसिगं पाडवी, अमृत वळवी, आदींच्या सह्या आहेत....