Breking News

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

स्वकर्तृत्वावर उभारलेला व्यवसाय आणि दुर्लक्षित राजकीय कार्यकर्ता: गोकुळ पवार

15 डिसेंबर 2023
           

स्वतःच्या मेहनतीने आणि चिकाटीने यशस्वी व्यवसायिक बनलेला गोकुळ पवार हा एक उद्यमशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात वडिलांकडून चालविल्या जाणाऱ्या सुतारकामाच्या पारंपरिक व्यवसायापासून झाली. शिक्षण अर्धवट ठेवून गोकुळने वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी रंधा हातात घेतला. प्रामाणिक मेहनत, कामाशी प्रचंड निष्ठा आणि हळव्या स्वभावामुळे गोकुळने या व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
क्रिकेटमधील सुरुवात

९० च्या दशकात गोकुळ क्रिकेटमुळे परिसरात ओळखला जाऊ लागला. शनिगल्लीतील "जय महाराष्ट्र" संघ आणि "त्रिमूर्ती क्रिकेट संघात" खेळणाऱ्या गोकुळने आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खेळातला लढवय्या स्वभाव आणि स्वभावातील विनोदबुद्धीमुळे तो सगळ्यांचा लाडका बनला.

व्यवसायिक यश

लाकडी सुतारकामाच्या पलीकडे पाहत, गोकुळने ॲल्युमिनियम सेक्शनमध्ये नशीब आजमावले आणि या क्षेत्रात यशस्वी ठरला. त्याने नंतर ग्लासच्या कामाकडेही वळण घेतले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यवसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

राजकारणातील प्रामाणिक कार्यकर्ता

प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेला गोकुळ सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता राहिला आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा असतानाही वरिष्ठांच्या आदेशामुळे त्याला अर्ज मागे घ्यावा लागला. त्याच्या प्रामाणिकतेचा सन्मान म्हणून दरवर्षी स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वासन मिळाले, पण त्याची पूर्तता झाली नाही. भाजपमधील एकनिष्ठ पण दुर्लक्षित कार्यकर्त्यांमध्ये गोकुळचे नाव आवर्जून घेतले जाते. भोळा आणि आपलेपणाने वागणाऱ्या गोकुळने गरिबीतून उभारी घेत कुटुंबाला यशस्वीपणे सक्षम केले आहे.

मस्तीखोर आणि आनंदी व्यक्तिमत्त्व

          गोकुळ पवार हे नाव जसे त्यांच्या व्यवसायिक कर्तृत्वासाठी परिचित आहे, तसेच त्यांच्या मस्तीखोर आणि आनंदी स्वभावासाठीही ते साऱ्यांच्या हृदयात खास जागा निर्माण करतात. स्वतः हसत राहणे आणि इतरांना हसवत ठेवणे हा त्यांचा स्वभावच, ज्यामुळे कुठलेही वातावरण त्यांनी आनंदी आणि जिव्हाळ्याचे बनवले आहे.

         गोकुळचा हा गुण फक्त दैनंदिन आयुष्यातच नाही, तर प्रवासातही तेवढाच ठळकपणे जाणवतो. त्यांच्या सोबत अमरनाथ यात्रा, केदारनाथ-बद्रीनाथ अशा पवित्र तीर्थयात्रा केल्या, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मस्तीखोर स्वभावाने आणि विनोदबुद्धीने संपूर्ण प्रवास स्मरणीय बनवला. थकवा, अडचणी यांसारख्या गोष्टी त्यांच्या सोबत राहून कुणालाच जाणवल्या नाहीत. त्यांचा हास्यविनोद, गमतीदार किस्से आणि इतरांना आनंदी ठेवण्यासाठी लढवलेल्या विविध क्लृप्त्या या प्रवासाला नेहमीच लक्षात राहणारे क्षण बनवून गेल्या.
             गोकुळचा हा स्वभाव म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जिवंतपणा आणि समाजात ते जोडलेल्या नात्यांची साक्ष देणारा आहे. कुठल्याही प्रसंगात त्यांच्या सोबत राहिलेले लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांची सोबत सतत हवीशी वाटते. गोकुळ पवार यांनी आनंद देत आणि निखळ हसत-हसवत केलेले हे क्षण आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहतील!

            कष्टातून स्वतःचे जीवन उभारणाऱ्या आणि समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या गोकुळ पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले कर्तृत्व असेच प्रेरणादायी राहो आणि राजकारणातही योग्य स्थान मिळो, हीच सदिच्छा!

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

दिपक परदेशी: चप्पलविरहित कार्यकर्ता आणि भाजपाचा निष्ठावंत

दिपक परदेशी हे नाव म्हणजे ऊर्जा, आत्मविश्वास, आणि निष्ठेचे प्रतिक. त्यांच्या साध्या राहणी, परंतु प्रभावी स्वभावामुळे ते आज लोकांमध्ये चर्चेचा विषय आहेत. पायात कधीही चप्पल न घालणारा, हाप चड्डी आणि टी-शर्ट असा नेहमीचा पेहराव करणारा हा माणूस मित्रांमध्ये आणि समाजात एक वेगळा ठसा उमटवत आहे.

हिंदुत्व आणि भाजपाच्या कार्यात अग्रणी

हिंदुत्वाच्या प्रचारासाठी असो किंवा भारतीय जनता पक्षाच्या पाठराखणीसाठी, दिपक कधीच मागे हटत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपाचा झेंडा हातात घेऊन तो अग्रस्थानी दिसतो. कुठलाही मतदारसंघ असो, दिपकचे काम नेहमीच पक्षासाठी उपयुक्त ठरते. पक्षाच्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी वकीलपत्र घेऊन काम करण्याची त्याची तयारी नेहमीच तत्पर असते. त्याच्या "इस्की टोपी उसके सर" या कौशल्यामुळे तो नेहमीच चर्चेचा ठरतो.

सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क

दिपकचा दांडगा जनसंपर्क हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे. मित्रपरिवार असो किंवा कार्यकर्ते, दिपक नेहमी लोकांशी संपर्क ठेवतो. नवीन रेसिपी बनवून मित्रांना खाऊ घालणे हा त्याचा आवडता छंद आहे. किचनमध्ये प्रयोग करताना तो जितका आनंदी असतो, तितकाच तो मित्रांमध्ये त्याच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेताना असतो. त्यामुळे दिपकचा मित्रपरिवार मोठा आहे, आणि त्याच्या या सवयीमुळे तो नेहमी सगळ्यांच्या जवळचा वाटतो.

साध्या जीवनातून प्रभावी भूमिका

पायात चप्पल न घालण्याची त्याची सवय म्हणजे त्याच्या साध्या जीवनशैलीचे प्रतीक आहे. मात्र, त्याचा साधेपणा म्हणजे कमजोरी नाही, तर त्याच्या धडाडीची साक्ष आहे. कोणत्याही कठीण प्रसंगी कुणाशीही भिडायला तो तयार असतो. त्याच्या धैर्याने आणि निष्ठेने भाजपामधील ज्येष्ठ नेतेही प्रभावित झाले आहेत.

दिपक: एक प्रेरणा

दिपक परदेशी हे नाव म्हणजे नुसतेच कार्यकर्त्याचे नाही, तर लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. त्याचे साधेपणा, जिद्द, आणि मित्रत्वाचे गुण समाजासाठी दिशादर्शक आहेत. दिपकचे हे कार्य नेहमीच भाजपाच्या यशाला चालना देणारे ठरेल यात शंका नाही.

दिपक परदेशी यांची ओळख म्हणजे संघर्ष, साधेपणा, आणि सगळ्यांना जोडणारा एक अद्वितीय दुवा. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात असे निष्ठावंत कार्यकर्ते समाजाला दिशादर्शक ठरतात.

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

क्रिडा शेत्रातील एक अवलिया ; सुनिल सुर्यवंशी उर्फ कालू

21 व्या शतकातील हरवत चाललेला शब्द म्हणजे “मैदानी खेळ” यापूर्वी अनेक लोक एकत्र येऊन खेळ खेळत होते परंतु आज प्रत्येकाच एक स्वतंत्र मैदान आहे ते म्हणजे “मोबाईल” 6 इंच च्या डिस्प्ले हेच एक मैदान आजच्या पिढीचे क्रीडांगण झाले आहे. वयाच्या 4 ते 5 वयापासून पालक हे मैदान मुलांच्या हातात सोपवतात आणि याच 6 इंच च्या मैदानात मुलं आपली आयुष्य सोपवून टाकतात. दोष फक्त फक्त मुलांचा नाही अगदी पालक वर्ग देखील मैदान आणि मैदानी खेळाबाबत उदासीन झालेत. पालक सायंकाळी मैदानावर घेऊन जाणारी पिढीच संपुष्टात येत असल्याचे धोकादायक चित्र आज आहे. 
        मात्र अश्या काळात देखील विद्यार्थ्यांना दररोज मैदानाची सवय लावण्याची कामगिरी तळोदा येथील गो.हु.महाजन हायस्कूलचे क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी मागील दोन दशकांपासून करत आहेत. अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत केवळ मैदानावर ठाण मांडून विद्यार्थी घडवणाऱ्या एक अवलिया अशी ख्याती त्यांनी मिळवली आहे. आयुष्य जगत असताना देखील खेळाडू वृत्ती असलेले कुठल्याही खेळात मेहनतीचा व कठोर परिश्रमाचा जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या खेळाडूना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी धडपड करणारे अशी एक आगळी वेगळी ओळख त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांना प्राप्त केली आहे. खेळा बाबत असलेली आपली निष्ठा व प्रामाणिकपणा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे बऱ्याचदा संघाला त्याचे परिणाम देखील सोसावे लागले आहेत. खेळात होत असलेला लबाडी त्यांनी कधीच खपवून घेतली नाही, परिणामी जिंकत असलेला संघ त्यांनी मैदानातून काढून घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्या जोरावरच शाळा, गाव, तालुका ते नाशिक विभागीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. खेळाडू प्रती असलेला त्यांचा आदर व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ते कायम तत्पर असतात. स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूना गणेवेश मिळावा म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी खेळाडू यांच्याशी संपर्क करून वेळोवेळी विविध खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी गणवेश उपलब्ध करून संघातील खेळाडू मध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करतात.
       तळोदा येथील गो हू.महाजन (न्यू हायस्कूल) शाळेचे वरिष्ठ लिपिक सुरेश सूर्यवंशी यांचे ते लहान चिरींजव त्यांनी आपले शिक्षण बी.ए (इतिहास) बी.पी.एड. एम.पी.एड. जळगाव विद्यापीठातून पूर्ण केले. सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षमय काढला, वीणा अनुदानित शाळेत आपले कर्तव्य बजावले त्यांच्यात असलेले परिश्रम क्षमता पाहून कालांतराने त्याच संस्थेत अनुदानित शाळेत त्यांना रुजू करून घेण्यात आले. त्यांचे आजोबा स्व.रणछोड सुर्यवंशी (गुरुजी) हे तळोद्यातील नामांकित शिक्षक होते. संपूर्ण गाव त्यांना गुरुजी नावाने ओळखत ज्यांनी तालुक्यात खेळा प्रती एक वेगळा आदर्श निर्माण केला. तळोदा शहर हे कुस्ती, मल्ल खांब, कबड्डी अश्या विविध खेळासाठी प्रसिद्ध होते.  पहेलवानाचं गाव’ म्हणून एकेकाळी तळोदा शहराची पहेचान होती. शहरात माजी नगराध्यक्ष स्व.बबनराव छगनराव माळी व स्व. संभाजी चौधरी असे नामांकित मल्ल त्यांच्या कसरतीत घडले. याशिवाय असंख्य यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आजोबांच्या संस्कारात राहिलेले सुनिल सुर्यवंशी हे केवळ खेळाडू घडवत नसून समाजात आवश्यक असणारे विचार खेळाडूमध्ये निर्माण करून समाजात आदर्श तरुण घडवत आहे. 
 
          आदिवासी भागात खेळात मोठी प्रतिभा आहे. परंतू त्यांना संधी उपलब्ध होत नाही अशी खंत मनात असताना त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील अडीच दशकांपासून वर्षापासून पहाटे व सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय मैदानात खेळाडू सोबत घाम गाळत हँडबॉल या खेळाचे ते क्रीडा प्रशिक्षण देत आहेत. त्यांची सुरुवात दिवंगत क्रीडा मार्गदर्शक  व  त्यांचे गुरू प्रा.पी.पी.भोगे यांनी संघ क्रीडा मार्गदर्शक (कोच) म्हणून  वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय. चा  संघाची जबाबदारी टाकली त्यांचा मार्गदर्शनात क्रिकेट व हँडबॉल संघाला 1999 -2000 साली वरिष्ठ महावि्यालयीन संघ हँडबॉल आणि क्रिकेट या दोघे संघाने अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत अजिंक्य पद पटकाविले. राजकारण विरहित असणाऱ्या अध्यापक शिक्षक  मंडळ संस्थेत संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुण कुमार महाजन यांच्या व कॉलेज ट्रस्ट चे संचालक श्री अरुण कुमार महाजन दिवंगत प्रा पी.पी.भोगे संस्थेचे सचिव रमेश सूर्यवंशी यांनी क्रीडा क्षेत्रात शाळा व संस्थे मधील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून त्यांची म्हणून नेमणूक केली. २००१ पासून शाळेचे क्रीडा संघ तयार करत आहेत. अनेक खेळ असले तरी त्यांनी त्यांचा आवडता खेळ हँडबॉल चे संघ तयार केले. पहिल्याच वर्षी १७ वर्षाचा संघ विभाग पातळीवर २००१ साली श्री गणेश केला. शाळा व संस्था त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे.आज शाळेचे प्राचार्य अमरदिप महाजन त्यांना सतत क्रीडा स्पर्धा बाबत सदैव उत्साह वाढवितात २००१ पासून हँडबॉल खेळ क्रीडा प्रकारात १४ वर्ष मुले मुली, १७ वर्ष मुले मुली, १९ वर्ष मुले मुली क्रीडा स्पर्धेत वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच राज्य स्तरीय निवड समितीत  त्यांच्या संघातील ३ खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. दुर्दैवाने त्यांची निवड झाली नसली तरी आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी निवड समिती समोर चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजही सुनील सुर्यवंशी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेकरिता प्रोत्साहन देत असून क्रीडांगण हेच माझे विश्व आहे, असे मोठ्या अभिमानाने ते सांगतात. 

        विद्यार्थी व शिक्षकांचे नाते केवळ पुस्तकापर्यंत मर्यादित नाही. एक साधा शिक्षक मनात ठरवून कामाला झपाटले तर क्रीडा प्रशिक्षकाला जे सहज साध्य होत नाही ते अत्यंत कठीण काम करू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमातून दिसते. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक येथे क्रीडा साधना व के.एन.डी. बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक तसेच क्रीडा महासंघ महारष्ट्र यांचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
तसेच मालती बाई नामदेव आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
*शालेय आवारात तयार केले दर्जेदार मैदान*
          शालेय आवारात हँडबॉल खेळण्यासाठी मैदान होते मात्र ते उंच सखल होते. परिणामी विद्यार्थ्यांना दुखापत होईल या भीतीने हँडबॉल मैदान तयार करण्यासाठी मदत मिळावी  म्हणून त्यांनी तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांच्याकडे मदतीची अपेक्षा बोलून दाखवली होती. पाडवी हे देखील पैसे देवू करत होते. मात्र पैसे न घेता लागणारे साहित्य उपलब्ध करून द्या अशी स्पष्ट भूमिका घेवून त्यांनी मैदान बनविण्यासाठी लागणारे मुरूम, विट, माती, विटाचा भुगा असे साहित्य मिळवून घेतले व प्रत्यक्ष मैदानावर घाम गाळून त्यांनी दिवस रात्र करून मैदान तयार केले.. त्यानंतर २०१७ साली  तत्कालीन आमदार उदेसींग पाडवी यांच्या हस्ते या मैदानाचे लोकार्पण करून आमंत्रित संघांच्या हँडबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

*रणछोड बाबा क्रीडा मंडळ नावाने स्पोर्ट्स क्लबची केली स्थापना*
        आजोबा स्व.रणछोड सुर्यवंशी यांचा नावाने रणछोड बाबा क्रीडा मंडळ या स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली असून या माध्यमातून दरवर्षी बॅटमिंटन, हॉली बॉल या खेळासह अन्य विविध खेळाचा क्रीडा स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळाडूसाठी विनामूल्य उन्हाळी क्रीडा शिबिराचे देखील आयोजन करण्यात येते.

*आफ्टर ४० क्रिकेट लीगची केली सुरुवात*
          ९० चे दशक गाजवणाऱ्या सर्व खेडाळूना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी क्रिडा शिक्षक सुनिल सुरेश सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला, सोशल मीडियावर समूह तयार करून  खेडाळूना एकत्रित केले. स्वतः मैदानावर उतरून मैदान आखणे, खेळ पट्टी तयार करणे त्यावर पाणी मारणे, रोलिंग करण्याचे कामे हाती घेतले, ७० खेडाळूनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. वेळोवेळी बैठका घेवून स्पर्धेचे नियोजन करून ६ संघ तयार करून खुल्या टेनिस बॉल वर ही स्पर्धा खेळवली. तळोदा शहर व तालुक्यातील असंख्य खेळाडू घडविणारे दिवंगत क्रीडा मार्गदर्शक प्रा.पी.पी.भोगे सरांचा स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेला त्यांचे नाव देण्यात आले. याशिवाय ६ संघाना भारतीय क्रिकेट संघाचे ज्येष्ठ खेळाडूंचे नावे देण्यात आले.

सोमवार, १७ जुलै, २०२३

सर्व सामान्यांचा जिंदादील नेता ; अजयभय्या परदेशी

सुधाकर मराठे: 
 काही व्यक्ती ह्या कितीही उंच, मोठ्या पदावर गेल्या तरी त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेली नात घट्ट जुळलेली असते. त्यांच्यातील असणारा सामान्यपणा ते कधीही सोडत नाही आणि त्यांचा मोठेपणा ते समजला जातो.त्यांचा या सर्वसामान्य वागणूकीतून ते सर्वांना आपले वाटतात. त्यातूनच त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत जाते.तळोदा शहरातील असच एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैय्या परदेशी. त्यांचा आज ......वा वाढदिवस.... अजयभैय्या यांच्या जन्म 17 जुलै 1973 मध्ये झाला. समाजकारण, राजकारण यांचा वारसा त्यांना घरातून लाभला. त्यांचे वडील स्व.छबुलाल ताराचंद परदेशी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी संघर्ष उभा केला होता. त्यांच्या आई प्रमिलाबाई परदेशी 1984 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे वडील छबुलाल परदेशी हे सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.काही काळ त्यांनी तळोदा शहराचे उपनगराध्यक्षपदी देखील भूषवले आहे. आई-वडिलांकडून मिळालेला हा वारसा अजयभैय्या यांनी पुढे जपत आपल्या सामाजिक-राजकिय जीवनाची सुरुवात केली.


 1997 मध्ये अजयभैय्या यांच्या खांद्यावरभाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून भाजपने जबाबदारी सोपविली. कमी कालावधीत त्यांच्याकडे तळोदा शहरातील लोकप्रिय युवा नेता म्हणून बघितले जाऊ लागले.सर्वसामान्य जनतेशी जुळून असलेली परदेशी कुटुंबाची नाळ व लोकांचा विश्वास म्हणून अजयभैय्या 2012 पावेतो सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.2017 पर्यत नगरसेवक होते. 2009 भाजपा शहराध्यक्ष, 2012 साली विधानसभा क्षेत्र प्रमुख, 2015 भाजपा जिल्हा सरचिटणीस, अशी जिल्ह्याचे महत्वपूर्ण पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. 2006  सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी श्रीराम सोशल ग्रुप स्थापन केला.श्रीराम सोशल ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सार्वजनिक रामनवमी उत्सवाची सुरुवात शहरात ग्रुपच्या माध्यमातून केली गेली.याशिवाय शहरात शव वाहिनी,स्वर्ग रथ व रुग्णवाहिका ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यात येते. कोरोणाच्या पहिल्या लाटेत श्रीराम सोशल ग्रुपने भरीव योगदान दिले गुजरातमधून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोचवणे, त्यांच्या जेवणाची,शहरातील निराधार व्यक्तीना जेवण व निवासाची सोय देखील श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने सातत्याने दीड-दोन महिने करण्यात आली.  2017 मध्ये नगरपालिका निवडणूक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.त्यांचा जनसंपर्क त्यांच्यातील असलेल्या कणखरपणा विकास धोरण सुस्वभावी या जोरावर ते लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाले. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अजयभैय्या यांनी शहरात विकासकामांचा सपाटा सुरू केला.

             शहरात विकास कामे करत असताना सुरुवातीला त्यांना तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी व विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची मोलाची साथ लाभली आहे.तळोदा पालिकेत सत्ता स्थापनेपासून स्वच्छ व सुंदर शहर या मोहिमेला प्राधान्य देत आहेत. शिवाय शहरातील पायाभूत समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला असून शहरातील रस्ते पाणी गटारीच्या समस्या पळवून शहराचा कायापालट करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली आहे शहरात प्रवेश करणारा चारही रस्त्यांना प्रवेशद्वार काम नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले आहे. त्यापैकी शहादा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे काम गेल्या वर्षभरापूर्वी पूर्णत्वास आले असून त्याचे लोकार्पण केले गेले आहे. 'आप संत श्री गुलाब महाराज' यांचे नाव या प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. तर हातोडा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वास आले असून आज त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार' असे या प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले आहे. या शिवाय नेत्रग-शेवाडी राष्ट्रीय महामार्गावर अक्कलकुवाकडून तळोदा शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देखील प्रवेशद्वाराचे काम हाती घेण्यात येणार आहे. 
सन 2021-22 मध्ये तळोदा नगरपालिका हद्दीतील चाचण्या रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे बांधकाम, यमुना नगर मधील मोकळी जागा विकसित करणे,तळोदा शहरातील सर्वे नंबर 373 शहादा रोड कडील दक्षिण भागात दामोदर नगर अंतर्गत रस्त्यावर गटारीत बांधकाम करणे, भगवान सीताराम नगर मध्ये रस्ते पाईप गटार बांधकाम करणे,कालभैरव मंदिरापासून नगरपालिकाहद्द पावेतो गटार बांधकाम करणे, कॉलेज रोड डांबरीकरण दुभाजक व फुटपाथ, पाईप गटार बांधणे, विद्यानगरी अंतर्गत रस्ते व काँक्रिटीकरण गटार तयार करणे, आमराईफळी जवळ खर्डी नदीवर पूल बांधकाम करणे,आंबेडकर चौक ते 150 मीटर लांबी पावेतो गटारीवर स्लॅब टाकणे ही कामे सुरू आहेत.                                                                                                                                                            
 पायाभूत सुविधांच्या बाबतीत शहराचा कायापालट झाला तळोदा शहरात विकसनशील शहर म्हणून नावारूपाला आले आहे. नगराध्यक्ष अजय भैय्या परदेसी यांच्या नेतृत्वात तळोदा शहरातील बिरसा मुंडा चौकापासून तर थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे व गटारी वर स्लॅब टाकण्यात आहे.पथ मार्ग तयार केले गेले आहे. शहादा रस्त्यावर तीन छोट्या नाल्यांवर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.मीरा कॉलनीत व प्रतापनगर येथे एक कोटी चार लाखांचा लॉन्च उभारला गेला असून अद्ययावत गार्डन याठिकाणी तयार झाले आहे. विमल नगर येथे ज्येष्ठ महिला व पुरुषांसाठी हक्काची खोली तसेच विरंगुळ्यासाठी उद्यान निर्मिती करण्यात आली आहे. देशपांडे फोटो स्टुडिओ पासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत नवीन नवीन रस्त्यांची कामे पालिकेच्यावतीने अजय भैय्या परदेशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेले आहे. बिरसा मुंडा चौक ते चिनोदा चौफुली पर्यत रुंदीकरण व दुभाजकाचे काम केले गेले आहे.हातोडा रस्ता पासून न्यायालयापर्यंत व रुंदीकरण देखील करण्यात आलेले आहे.  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय मागील रस्तापासून मरीमाता मंदिरामार्गे हातोडा रस्त्यापर्यत रस्त्याचे रुंदीकरण व गटारी वर स्लॅब टाकण्यात आलेला आहे. विमल नगर, हरकलाल नगर, शिवरामनगर, गुरुकृपा कॉलनी, विक्रम नगर, बडा दादा नगर,खटाई माता मंदिर परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत व गटारी देखील तयार करण्यात आलेली आहे. याशिवाय शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आले आहेत त्यासाठी सुरुवातीला नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी स्वखर्चातून शहरात ओपन जिम बसवली होती.शहादा रस्त्यावर मॉर्निंग व इवेनिंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांना भक्तीमय आल्हाददायक वातावरण लाभावे यासाठी रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीट लॅम्प वर साऊंड सिस्टिम देखील अजय भैय्या परदेशी यांच्या संकल्पनेतून बसवण्यात आली आहे. याशिवाय एफ एस टी पी प्रकल्प पूर्ण कार्यान्वित आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती मंजुरी प्रस्तावित असून अजयभैय्या परदेशी यांच्या पुढाकाराने पालिका राज्यात 49 क्रमांकावर आली असून पहिल्या 50 शहरात तळोदा शहराचा समावेश झालेला आहे. माझी वसुंधरा योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या योजनेत 1250 वृक्ष लागवड करण्यात आली आहे। याशिवाय इलेक्ट्रिक व्हेकल चार्गिंग पॉइंत शहरात ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.शहरात स्वच्छतेसाठी सहा घंटागाडी, व्याक्युम क्लिनर,शववाहिनी, रुग्णवाहिका पालिकेच्या माध्यमातून अजय भैया यांनी  कार्यान्वित करण्यात केली आहे. कोरोना काळात सफाई कामगारांना नगरपालिकेच्या वतीने अजयभैय्या यांच्या संकल्पनेतून अन्नधान्य वाटप करण्यात आले. नवीन वसाहतीत 2018-19 ला घरपट्टी लावलेली असताना लोकांच्या मागणीनुसार पहिल्या अपिलात दहा टक्के तर नंतरच्या अपिलात 15 टक्के अशी एकूण 25 टक्‍के घरपट्टी कमी करण्यात नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

           राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांना आठ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. 65 फेरीवाल्यांना पंतप्रधानपद विक्रेता निधीमधून प्रत्येकी दहा हजार रुपये कर्जाचे वाटप केले गेले आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीतून 65 लाभार्थ्यांना पंधराशे रुपये अनुदान देण्यात आले आहे. स्वयंरोजगार पत्र विक्रेता सर्वेक्षण अंतर्गत 310 पत्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.विविध प्रशिक्षण योजना प्रस्तावित केलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 300 घरकुल मंजूर असून 185 शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत रामकडे 167 घरकुल मंजुरीसाठी शासनाकडे पाठवलेले आहेत 280 लक्ष घरकुल अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित केले आहे पुढील अनुदान 450 लाखाची मागणी केलेली आहे.
          या सर्व कामांमध्ये तळोदा शहरातील रुपये पूर्णपणे पालटले असून नगराध्यक्षांनी जर ठरवले तर शहराच्या कसा विकास होऊ शकतो याचे उदाहरण अजय भैय्या परदेशी यांनी आपल्या कार्यशैलीने सर्वांपुढे पुढे ठेवले आहे. सामान्यांच्या नेता म्हणून अजयभैय्या परदेशी यांची ओळख आहे. शहरातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रश्नावर जर काही समस्या असेल तर ते थेट अजयभैय्या परदेसी यांना फोन करतात व आपली समस्या त्यांच्या पुढे मांडतात. आपला हक्काचा माणूस म्हणून अजयभैय्या यांनी आपली ओळख आहे.भैय्या देखिल ती ओळख जगण्याच्या सतत प्रयत्न करतात. व्यक्ती किती मोठा आहे, किती सामान्य आहे याला भैय्या महत्त्व देत नसून 'प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे व मी त्याच्या प्रती देणे लागतो', ही अजयभैय्या यांची कामाची शैली आहे. यातून त्यांनी शहरात जिवाभावाच्या मित्रांचा गोतावळा व मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी अजय भैया या नावावर शहरातील सर्व नेते,लोकप्रतिनिधी विकासासाठी एकत्र येतात हा आजवरचा अनुभव आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून अजयभैय्या परदेशी यांच्याकडे बघितले जाते.अशा या दिलदार व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा......


रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

लढाऊ बाण्याचे शिलेदार'सुहासदादा नाईक'


आदिवासींच्या खडतर प्रवासात १९७०-८० चे दशकही तसे संघर्षाचेच राहिले. अशा काही संघर्षांना सुहासदादा नाईक हे बाल साक्षीदार ठरले. १९७२ मध्ये जन्मलेले नाईक यांच्या डोळ्यासमोर अनेक घडामोडी घडतच होत्या. त्यातून समाज हिताचे काय अन् विघातक काय याची उकल सुहासदादा नाईक यांना बालपणीच होत होती. या घडामोडीतून अस्वस्थ होणारे दादा हे सामाजिक संघर्षास प्रेरीत झाले. बालवय असले तरी त्यांनी अन्य बाबी तथा घटकांमधून बोध घेण्यास सुरुवात केली. पुढे तळोदा तालुक्यातील रामपूर येथील महाराज वेच्या नाईक यांच्या प्रतिष्ठीत परिवारातला एक चाणाक्ष बुद्धीमत्तेचा नवयुवक म्हणून नवी ख्याती त्यांना मिळाली. मुंबईच्या चळवळीतून
 पुढे आलेले क्रांतीचे प्रणेते
शाळा-महाविद्यालयीन जीवनही नेतृत्वाचेच राहिले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे पेलवत मुंबईसारख्या महानगरात अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदावरुन आदिवासींची धुरा समर्थपणे सांभाळली. मुंबईत राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर तत्कालीन धुळे जिल्ह्यातील अन्य समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील ते लढत होते. यातून'आपली माती; आपली नाती' हे ब्रीद ते जपत होते. 
विद्यार्थ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देत त्या सोडविण्यासाठी सुहासदादा हे थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करीत होते. हेच नेतृत्व मुंबई, ठाणे महानगरपालिका व मुंबई बेस्ट भरतीतही आदिवासी व धुळे जिल्ह्यातील मुलांच्या पाठीशी राहिले.
सातपुड्याच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागातील  असंख्य तरुण मुंबईसह अन्य मेट्रो सिटींमध्ये नोकरीच्या शोधासाठी जात होते. आदिवासी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी सुहासदादा सातत्याने प्रयत्न करत होते. विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करुन देत होते. यातून अनेकांनी कठीण परिश्रमातून नोकरी मिळविली देखील. यामुळे की काय अनेक परिवार आजही सुहासदादांच्या संपर्कात येऊन त्यांचे आभार मानतात. दादांकडे असलेल्या दातृत्वातून अनेक आदिवासी बांधवांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आदिवासी तरुणांप्रती असलेल्या या तळमळीमुळेच ते आज आदिवासी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अशा या भक्कमपणे उभ्या नेतृत्वाने अनेक परिवारात सुख-समृद्धी आणली. या सुख प्राप्त परिवाराने हृदयाच्या एका कोपऱ्यात सुहासदादांचे नाव कायमचे कोरले असून ते त्यांच्या प्रती ऋणही व्यक्त करीत आहे. या सुखी परिवाराच्या अन्य नात्यागोत्यांच्या माध्यमातून दादांची ख्याती सर्वदूर निर्माण झाली.

या आदिवासी नेत्यांची मुंबईत चळवळ सुरु असतानाच समाज कल्याण विभागाने आदिवासी आरक्षणाची टक्केवारी कमी करण्याचा घाट घातला. तसा शासन निर्णयही जारी केला. ही बाब समाजासाठी कधीही भरुन न निघणारे नुकसानच होते. दरम्यान, या उमद्या नेत्यांने आदिवासींचा आवाज बुलंद केला. काही राजकीय नेत्यांच्या सहकार्याने तत्कालीन आदिवासी विकास मंत्री गोविंदराव चौधरी यांच्यावर दबाव टाकत शासनास संबंधित शासन निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. हे आदिवासींच्या चळवळींपैकी एक क्रांतिकारी यश ठरले. या क्रांतीचे प्रणेते म्हणून सुहासदादा नाईक यांनाच श्रेय दिले गेले.

कायदा व हक्क यातील उज्वल नेतृत्व
 राज्यशास्त्र व इतिहास विषयातील पदवीधर दादांनी एलएलबीला प्रवेश घेत वकिली तथा कायद्याची धडेही मुंबईत गिरवले. भूतलावरील सर्व आदिवासी संस्कृती, रुढी, बोलीभाषा, इतिहास व मौखिक परंपरा यांची खोलवर माहिती, सोबतीला भारतीय कायदा, आदिवासी हक्क व अधिकार यांचा चिकित्सक अभ्यास. यातून आदिवासी चळवळीशी त्यांचे नाते जोडले गेले. चिकित्सक अभ्यासामुळे ख्यातीप्राप्त सुहासदादा हे ख्यातनाम वक्तेही ठरले. व्याख्यान व प्रबोधनासाठी राज्यभर फिरताना त्यांना त्यांच्या ऋणानुबंधातले जुन्या मित्रांच्या भेटी होत गेल्या व नवे मित्रही त्यांच्याशी जुळत गेले. दादा त्यांच्या प्रत्येक व्याख्यान व मार्गदर्शनात जराशीही कसर सोडत नसत अगदी काळजाला भिडणाऱ्या भाषेतून ते थेट श्रोत्यांच्या मनात घर करुन जातात. आदिवासी चळवळ व लढ्यांच्या बाबतीत प्रत्येक बांधवांमध्ये सुहासदादांनी चेतना जागवलीत. कायद्याच्या चिकित्सक अभ्यासामुळे आदिवासींचे हक्क व अधिकार व्याख्यानातून प्रत्येकाच्या मनावर बिंबवत गेले. त्यांचे प्रभावी व्याख्यान आदिवासी बांधवांमध्ये संघर्ष सज्जतेची उर्जाच भरुन जाते. त्यातून केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही लढा अन् विद्रोहासाठी उभा ठाकतो. सुहासदादा 'लढाऊ बाण्याचे उज्वल नेतृत्व' ठरतात.

बोगस आदिवासींच्या विरोधातील वादळ
 आरक्षणदृष्ट्या आदिवासींना वाढलेल्या ताटाकडे अनेकांचे वर्षानुवर्षे लक्ष लागून आहे. त्यांनी ताटातलाच नव्हे तर आदिवासींच्या तोंडचा घासही पळवला. अशा बोगस आदिवासींविरुद्ध सुहास दादांनी नवा लढा उभारला. देशाच्या कानाकोपऱ्यात नेमका आदिवासी कोण, कुठे विखुरला? याचा दादांना गाडा अभ्यासच. त्यामुळे खरा कोण, खोटा कोण ते त्यांना सहज कळते. सेवा सहकार्य व दानधर्म पाळताना सुहास दादांनी जातीचा विचार न करता मानवी मुल्ये जपत सढळ हाताने मदत केली. मात्र जातीबाबत ते अगदी गंभीर राहिले. आदिवासी समाज अधोगतीला प्रमुख कारण ठरणाऱ्या बोगस आदिवासी नोकरदार, विद्यार्थी यांचा सुहासदादा प्रत्येक पातळीवर सुक्ष्म निरीक्षण करतात. ही त्यांची विशेष ओळख. बोल-चालीतूनच व्यक्तींची जातीविषयक पारख करणारे सुहास दादा जात प्रमाणपत्रबाबत दक्ष राहण्याचा इशारा अवघ्या खान्देशातील आदिवासींना देतात.
लाखो बोगसांनी आदिवासींच्या नोकऱ्या, जागा बळकावल्याने सुहासदादांनी शस्त्रांची नव्हे कायद्याच्या लढाईला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून बोगसांच्या मुद्दयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यासाठी त्यांच्यावर संकटाचे आभाळच कोसळलेत मात्र  दादा डगमगले नाही. समाजाप्रती एकनिष्ठ राहिले. बोगसांविरुद्ध प्रखरतेने व्यक्त होणारे दादा आजही समर्थपणे लढतच आहे. म्हणून बोगसांची बीपी वाढवणारे दादा आज खोट्यांच्या विरोधातील वादळच ठरत आहे.

शिष्टाचारपूर्ण प्रगल्भ राजकारणी
 सुहासदादा सन २००३ पासून राजकारणात असले तरी बहुतांश राजकीय बाबी त्यांना नवीन नव्हत्या. १९९५ मध्ये माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी तळोद्यातून विधानसभेची अपक्ष उमेदवारी केली. त्यावेळी दोन तालुक्यांच्या विशाल प्रदेशात प्रचाराची अवघड असे आव्हान एकट्या दादांनी स्वीकारले. ते त्यांनी सहज पेलवलेही. विद्यार्थी दशेतच मोठ्या नेत्यांनाही लाजवेल अशी महान कामगिरी त्यांनी मुंबईसारख्या महानगरात राहून बजावली होती. विधी शाखेचा अभ्यास व राज्यशास्त्रातील पदवीमुळे त्यांना जणू राजकीय वलयच होते. २०१४ मध्ये अमोनी ता.तळोदा गटातून निवडून आल्यानंतर २०१६ ते २०१९ पर्यंत त्यांनी जि.प.उपाध्यक्षपद भूषविले. जि.प.मध्ये प्रतिनिधित्व करताना जनसेवेत तत्परता, पारदर्शकता ठेवणारे दादा निष्पक्ष राहिले. त्यांच्यातील शिष्टाचारपूर्ण वागणुकीने दादाांना नवी प्रतिष्ठा लाभली. अधिकारी-पदाधिकारी, जनता, कर्मचारी यांच्यात समन्वय राखणाऱ्या दादांच्या प्रगल्भतेमुळे त्यांच्याशी अवघ्या जिल्ह्याची जनता जोडत गेली. जनसंपर्कात मोठी भर पडली अन् बघता-बघता ते जिल्ह्याचेच नेते बनले.

जनतेच्या नजरेत भविष्यातला कर्तव्यदक्ष आमदार
 मुळात सेवा, सहकारी पार्श्वभूमीचे सुहासदादा प्रत्येकाला आपलेसे वाटू लागले. निष्पक्ष सेवेमुळे भविष्यातला कर्तव्यदक्ष आमदार या नजरेतून जनता त्यांच्याकडे पाहू लागली. दादांना विधीमंडळात पाठवायचे व तेथे पाहायची इच्छा जिल्ह्याची तरुणाई व अबालवृद्धांकडून व्यक्त होऊ लागली. जनतेत दादांप्रति विश्वासार्हताही वाढीस लागली. यामुळे त्यांनी २०२४ ची तयारी सुरू केली. त्या दिशेने पाऊल टाकतांना काँग्रेस विचारधारेचे सुहास दादांनी पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांची सदिच्छा भेटही घेतली. तेथे नंदुरबार जिल्हा व गांधी परिवार यांच्यातील जुन्या नात्यावर चांगलीच चर्चा रंगली. दरम्यान, आपले विचार व काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या सुहास दादांच्या विधानसभा उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा करीत राहुल गांधींनी त्या दृष्टीने शब्दही दिला. त्यामुळे 'आदिवासी चळवळी व संघर्षातून उदयास आलेला हा लढाऊ बाणा' राजकारणात 'ध्रुवा'सारखे आपले अढळ स्थान निर्माण करेल यात
शंका नाही.  

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

अन् ८० फुटावर लागले पाणी...

                    गणेश स्थापनेच्या दिवशी बोअरवेल करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थापने नंतर म्हणजेच १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्षात बोरवेल करण्यास सुरुवात केली, पाणी कोणत्या दिशेला लागेल याबाबत कुठल्याही तज्ञाशी चर्चा न करता अथवा कुणालाही न दाखवता पाणी या ठिकाणी हमखास लागेल, कारण चिंतेश्वर महादेव शेजारी आहे याशिवाय पश्चिमेला बाजूला सार्वजनिक व उत्तरेला खुशाल सागर यांचे असे साधारणत: २० फुटाच्या अंतरावर दोन बोअरवेल असल्याने पाणी लागेलच अशी श्रद्धा व आत्मविश्वासावर आम्ही बोरवेल करण्याचा निर्णय घेतला. घराचा लांबी रुंदी नुसार व घर बांधकाम सर्व सोय सुविधायुक्त यावे याशिवाय आपल्यामुळे अन्य कुणाला अडचण भासू नये म्हणून जागेच्या अनुषगाने बोअरवेल बैठक हॉल मध्ये म्हणजेच घराचा ईशान्य कोपऱ्यात येणार होती. तसेच आज दोन खोलीचे नियोजन असल्याने व भविष्यात काही बदल केल्यास एक खोलीचे बांधकाम केल्यास सदर बोअरवेल ओट्यावर यावे म्हणून मंदिरापासून ६ फूट व पश्चिममे कडील असलेले शेजारी राजेंद्र बोरसे (शिंपी) यांच्या घराला लागून साधारणत: १७ फूट येवढे बोअर करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता ठेकदार दिलीप शिंदे, इंजि. आयुष्य गांधी यांनी प्रत्यक्ष भेटून मोजमाप करून जागा निश्चित केली.
                 गुरूवार (१ सप्टेंबर २०२२) रोजी आई-वडिलांचा आशीर्वादाने त्यांच्याच हस्ते बोरवेलचे पूजन करून सुरुवात केली. दुपारी उशिरा काम सुरू झाल्यामुळे पहिल्या दिवशी केवळ चाळीस फूट खोल बोरवेल करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते एक वाजेच्या दरम्यान पुन्हा ४० फूट खोल बोरवेल करण्यात आली. ऐंशी फुटावर मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे संबंधित बोरवेलकर्त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने या दिवशी दिवसभरात साधारणता १५० फूट खोल बोरवेलचे पाईप आम्ही उतरवले. 
         उद्या दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी देखील पुन्हा वीस ते तीस किंवा चाळीस फूट पावतो खोल बोरवेल जाऊ देण्याचा आमचा इरादा होता मात्र अखेर १६० फुटा पावेतोच बोअर गेले, बोरवेल झाल्या नंतर सुपर टेक कंपनीचे सहा इंची पाईप पीयुष गांधी, गांधी ट्रेडर्स यांच्याकडून १९०० रू प्रमाणे ८.५ पाईप खरेदी केले. सोलेशन ५०० रू व भाडे ५०० असा एकूण खर्च आला. काळ्या रंगाचे पीव्हीसी पाईप व डुक् कंपनीचे १.५ ची मोटार व स्विच शहरातील अण्णा भोई यांच्याकडून २२००० रू घेतला. 
                  कष्टभंजन बोअरवेल बबलू महाजन (खान्देशी गल्ली) यांना ९० रू फूट प्रमाणे बोरवले करण्याचे काम दिले. सुरुवातीला ६०० रू खड्डे करण्यासाठी दिले. त्यानंतर दोन माणसे प्रकाश वळवी (बहुरूपा) व पिंटू वळवी (कढेल) येथील २ घे जणांनी  बोअरवेलचे खड्डे केले. शेवटी बोअरवेल धुण्यासाठी ३२०० रू लागले. बोअरवेल करताना लागणारे पाण्याचे टँकर अनिलभाऊ मोरे (भोई) यांनी उपलब्ध करून दिले. अश्विनभाऊ परदेशी यांनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिली. ४ सप्टेंबर २०२२ रोजी बोअरवेलचे होल साधारणतः ४ तास मोटार सुरू ठेवून धुण्यात आले. अपेक्षेप्रमाणे पाणी लागल्याने सर्वांचा सेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले.   
               बोअरवेल कुठे करावी कशी करावी, किती खोल करावी, पाईप किती उतरवावे, बोअरवेल दरम्यान लागलेली रेतीत असलेले लहान सफेद दगडांवरून पाणी साठा मुबलक असतो, बोअर खड्डे अधिकाधिक स्वच्छ करावे ज्यामुळे जमिनीतील झरे मोकळे होतात व पाण्याची क्षमता वाढते, कुठल्या कंपनीचे पाईप टाकावे, मोटार टाकावी अश्या बारीक सारीक बाबी व अन्य बारकावे गल्लीतील शशिकांत माळी, सचिन माळी, धीरज माळी, राहुल सागर, विलास हिवरे, जगन्नाथ अग्निहोत्री, व्ही.बी.पाटील, गौरव वाणी, सुनील सुर्यवंशी (कालू भाऊ), अक्षय जोहरी मोठे बंधू योगेश मराठे आदीनी समजवले यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे खूपच सहकार्य लाभले...           

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

वारसाने मिळालेल्या संधीला कर्तुत्वाने सिद्ध करणारे... तळोदा शहराचे उमदं नेतृत्व


वारसाने संधी मिळते.
कर्तृत्व सिद्ध करावे लागते 
या उक्ती प्रमाणे राजकीय वारस असला तरीही ते सिद्ध करणे टिकवून ठेवणे व वारसा पुढे नेणे हे महत्वाचे असते असेच काही सिद्ध करत वारसा पुढे नेणारे युवा नेतृत्व म्हणजे शहरातील राजकारणात अवस्थेत येत असून अनेक तरुण राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरात सर्वच राजकीय पक्षात तरुण असले तरी एक नवीन सुशिक्षित चेहरा तळोदा शहराचा जनतेसमोर येत असून कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने ज्या व्यक्तीकडे भविष्यातील लोकप्रतिनिधी म्हणून जनता पाहत आहे असे जितेंद्र सूर्यवंशी.... असून तळोदा नगर पालिकेचे राजकारण असो अथवा सहकार क्षेत्र असो अथवा शैक्षणिक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रात राजकीय वजन असणारे माळी कुटुंबातील एक तरुण नेतृत्व जितेंद्र सूर्यवंशी यांच्या रूपात पुढे येत आहे.
          माजी नगरअध्यक्ष भरत माळी यांच्या राजकीय छत्रछायेखाली राजकीय क्षेत्रात अतिशय कमी वयात उडी घेतली असून राजकीय वारसा असल्याने विविध राजकीय डावपेच लहान पणा पासून जितेंद्र सूर्यवंशी यांनी गिरवले. याच काळात राष्ट्रीय काँगेसचा माध्यमातून त्यांचा संपर्क युवा काँग्रेस संघटनसाठी काम करत असताना सत्यजित तांबे यांच्या जवळ आला. एक विचार जुळले त्यामुळे राष्ट्रीय काँगेसचे तांबे यांचा विश्वास असल्याने त्यांना युवक काँग्रेसची जिल्ह अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली मागील काळात झालेल्या राजकीय घडामोडी तसेच जिल्हा व शहरातील राजकीय वातावरण पाहता अत्यंत धाडसी निर्णय घेत त्यांनी भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय घेत असताना त्यांना अनेक स्वकीय यांनी निर्णय घाईत घेवू नका असे सांगितले. मात्र जितेंद्र माळी यांनी अतिशय विचाराअंती भाजप प्रवेश निश्चित केला. आपले कुटुंब जरी काँग्रेस संघटनेत सुरुवातीपासून काम करत असेल तरी विकास हा मुद्दा महत्वाचा असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडवणीस तसेच डॉ विजय कुमार गावित तसेच विद्यमान आमदार राजेश पाडवी यांचा कामाचा झंझावात पाहून हा निर्णय घेतला आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शाखाली पुढील राजकीय वाटचाल ते आता चालणार आहेत. त्यांची तिसरी पिढी मागील राजकारणात पुढे येत असून त्यांचे बाबा स्व. बबनराव छगनराव माळी यांनी नगरअध्यक्षपद भूषविले होते. त्यांचा आजी विमलताई बबनराव माळी या देखील नगर अध्यक्ष व नगरसेविका होत्या. तर त्यांचे काका भरत माळी यांनी तळोदा नगर पालिकेवर तब्बल तीन दशके राज्य केले असून त्यांचे वडील लक्ष्मण बबनराव माळी हे समाजकार्य सोबतच शेक्षणिक संस्था सांभाळत आहेत. तर काका संजय माळी हे आज सभागृहातील सर्वात जेष्ठ नगरसेवक आहेत.
          याबाबत जितेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांचा राजकीय वाटचालीबाबत सांगितले ....... मला राजकीय वारसा जरी असला तरी मी स्वतः ग्राऊंडवर जाऊन काम केल्याने शहरातील युवकांचा मोठा प्रतिसाद मला या काळात मिळाला. मला पहिली संधी मिळाली ती म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून. ही नियुक्ती पद्माकरजी वळवी साहेब. भरतभाई माळी यांनी दिली त्यामुळे शहरातील लोकांचा समस्या जाणून सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत.
       मा.ना. के.सी पाडवी साहेब व सत्यजीतदादा तांबे यांनी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्या माध्यमातून जिल्हाभरात हेल्पलाईन नंबर दिला. कोविड काळात लोकांची सेवा करू शकलो. जिल्ह्यात स्वतंत्र कॉविड तपासणीसाठी लॅब मंजुरीसाठी मागणी केली व तत्कालीन पालकमंत्री मा.ना.के सी.पाडवी साहेब यांनी मंजुरी दिली. त्याचा काळात सत्यजीतदादांच्या मार्गदर्शन खाली जिल्हाभरात गरजू लोकांना शिधा वाटप, गरजूंना दैनंदिन अन्नदान, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संधी -सोबत मिळाली हे कार्य करत असतानाच जिल्हा भरातून युवकांचा प्रतिसाद मिळाला.
        कृषी उत्पन्न बाजार संचालक म्हणून मा. आ. उदेसिंग समितीच्या प्रशासकीय नियुक्त संचालक म्हणून दादा यांचा नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या तळोदा शहरातील नामांकित ह शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शाळेचा 3 चेहरा मोहरा बदलला, गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलंत यात सर्व कर्मचारी सहकाऱ्यांचे मन जिंकुन त्यांचा सोबत काम करून त्यांच्यातला एक सहकारी म्हणून वावरत असतांना त्यांचा समस्या समजल्या त्या एक संघ होऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत.
सत्यजीत दादा यांचा एस.एम. गर बी.टी. हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गरजु लोकांना पण वैद्यकीय मदत करून देता येत आहे. मा आ राजेश पाडवी यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधुन महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले त्यात १०७७ रुग्ण तपासणी करून आवश्यक त्या शस्त्रक्रियासाठी घोटी येथील एस.एम. बी. टी. हॉस्पिटल येथे य रुग्णांना स्वखर्चाने पाठवले. अजूनही गरजू रुग्णांना जरी त्याठिकाणी सवलतीत योजनेतून  उपचारासाठी मदत होत असते. शहरात एक नावीन्य उपक्रम राबविला मला wifi zone स्मारक चौक परिसरात सेवा आजही कार्यरत आहे. जेव्हा इतर शहरात जात असतो गून त्यावेळेस त्या त्या ठिकाणी जे जे चांगले आहे ते ते माझ्या शहरातही असले पाहिजेल या भावनेतूनच प्रामाणिकपणे सर्वच समाजातील युवकांना सोबत घेऊन काम सुरू आहे....
       कोविड काळात लसीकरणचे विविध शिबिर राबविली. दरवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थीसाठी शेक्षणीक साहित्य वाटप केले जाते. तसेच १७ जानेवारी सुधीर तांबे यांचा वाढदिवसानिमित्त  पुस्तक दिवस म्हणून साजरा करत पुस्तकांचे वाटप केले जाते.

*वारसाने संधी मिळते कर्तव्य हे सिद्ध करावे लागते.*

यावडीप्रमाणे मी माझा काम गेली पाच वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे अविरत करत आहे प्रसिद्धीच्या मागे कधीही लागलो नाही माझा उद्देश एकच ठेवला आपण केलेल्या कार्याचा लाभ हा सरळ लाभार्थ्याला कसा होईल. यासाठी प्रयत्न करत आलो. तसेच जो नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो त्याला माझी पाठिंबा असतो. . 

*सर्व जाती धर्माला संधी देणारे कुटुंब*

       भरतभाई माळी यांनी मागील ३५ वर्षात त्यांचा राजकीय वाटचालीत. कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व जाती धर्माचे समाजाचे लोकांना सोबत घेत वाटचालच केली नाही तर अनेकांना राजकीय दृष्ट्या उभे केले व राजकीय संधी दिल्या तसेच मोठ मोठ्या पदावर सन्मान दिला. विविध समाजाचे लोकांना नगरसेवक यात नगर अध्यक्ष, उपनगरअध्यक्ष, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक त्यात आदरणीय दीपाली वळवी पहिल्या आदिवासी महिला नगराध्यक्ष बसवत असताना भरतभाई यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. तसेच कलाल समाजाचा आदरणीय ताराबाई बागूल कलाल समाजातील नगराध्यक्ष केल्या. रत्ना चौधरी चौधरी समाजातील नगराध्यक्षा केल्या. वाणी समाजातील अल्पसंख्याक व्यक्ती गौरव वाणी याना उपनगराध्यक्ष केलं. रुकसनाबी सैय्यद उपनगराध्यक्ष, नंदूगिर गोसावी यांना उपसभापती पं.स. सदस्य मार्केट कमिटी मार्केट कमिटी, विजय क्षत्रिय यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले.  दत्तात्रय पाटील उपसभापती त्यांचा नेतृत्वखाली हितेंद्र क्षत्रिय तसेच संदीप परदेशी यांचा पत्नी अनिता परदेशी या नगरसेवक पदी निवडून आल्या असे अनेक लोकांना सर्व समाजातील घटकांना विविध क्षेत्रात संधी दिली.
*भरतभाईचे तळोदा शहरातील महत्त्वाचे निर्णय*

     तापी पाणी शुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्यात आणला. तसेच राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित व तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमुदिनी गावित यांचा माध्यमातून १२ कोटी रुपये इतका निधी जलशुध्दीकरण प्रकल्पसाठी सतत पाठपुरावा करून मंजूर करून आणला. त्यात पहिल्या टप्प्याचा निधी त्याच काळात प्राप्त झाला. तसेच पालिकेचे व्यापारी संकुलाचे निधी मंजूर व भूमिपूजन त्यांच्याच काळात झाले. नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे निर्माण हद्दवाढ प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवली. नवीन वसाहतीत खुल्या जागा संरक्षण भिंती, गार्डन निर्माण शहादा रोड दुभाजक शहरातील जुने चिखलमय रस्ते चे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यास सुरवात त्यांचा नेतृत्व खाली असणाऱ्या माजी नगर अध्यक्षा रत्ना सुभाष चौधरी यांचा काळात झाली. शासनाकडे पाठपुरावा करत मोठा निधी याच काळात आला. भरतभाईकडे त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहे. ते राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळीही नगरसेविका होत्या. पत्नी सौ. योजनाताई माळी ह्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. तसेच त्यांचे मोठे बंधू आप्पासाहेब लक्ष्मण माळी हे शेक्षनीक व सामजिक क्षेत्रात सदैव सक्रिय असतात तर लहान काका संजय माळी हे आज सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून परिचित असून श्री गणेश सोशल ग्रुपचा माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतात. आज या राजकीय दृष्ट्या संपन्न असणाऱ्या कुटुंबाचा राजकीय वारसा जितेंद्र सूर्यवंशी यांच्या खांद्यावर आला आहे. अनेक अडचणींवर मात करत आला त्याचा सोबत नाही आला त्याचा विचार न करता... राजकीय वाटचाल करत आहेत. कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी काय करावे लागते या बाळकडू त्यांना लहान पणी मिळाले असले तरी त्या काळातील राजकीय स्थिती व आजची राजकीय स्थिती या दोघांची सांगड घालून नवीन जे आवश्यक बदक ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबत कुटुंबाची अनुभवाची शिजोरी आहेच. येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी सर्व समाज व जाती धर्मांना सोबत घेवून नवीन दृष्टीकोन घेत तळोदा शहराचा विकासासाठी पक्ष संधी देईल त्या पदावर राहून बदल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
बबनराव पेहलवान यांचा तळोदा शहरातील सांस्कृतिक वाटचालीत एक वेगळेच महत्व होते. पूर्वी या कुटुंबाचा लाकूड व्यवसाय होता त्या वेळी शहरातील मानाचा दादा गणपतीचा मंडपासाठी लागणारे लाकडी खांब पुरवण्यासाठी स्व. बबनराव पेहलवान यांची मोलाची साथ लाभली होती.तसेच शहरातील कालिका मात्रा उत्सव काळात पूर्वी त्यांचा स्मारक चौकमधील हॉटेल गणेश समोर उंच लाकडी मंडप हे आकर्षण होते. त्यांना व्यायामाची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे कुस्ती प्रेम पाहता इतर तरुण मुलांना देखील कुस्ती खेळण्यासाठी संधी मिळावी म्हणून व्यायामशाळा काढली व तरुणांना व्यायामाबाबत प्रेरित केले.


शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

सत्काराने भारवल्या आशा, अंगणवाडी व आरोग्य सेविका लसीकरणासाठी राबणाऱ्या यंत्रणेच्या पत्रकार संघातर्फे सन्मान

तळोदा : तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात लसीकरणासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या आशा, अंगणवाडी व आरोग्य सेविका यांचा सत्कार करण्यात आला.या सत्काराने आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविका भारावून गेल्या.ग्राऊंड लेव्हलवर काम करत असताना अनेक अडचणींना तोंड देत वर्षभर लसीकरण मोहिमेत त्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाची दखल घेत पत्रकार संघाने सन्मानित केल्याने अनेक आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविकांच्या डोळे भरून आले.
          तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ व कै.कलावती फाउंडेशन सोमावल यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुक्यात लसीकरणात अग्रस्थानी असणाऱ्या प्रथम पाच गाव व त्या गावात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी राबणाऱ्या घटकांचा सन्मान सोहळा तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात आज पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण,पचायत समिती सभापती यशवंत ठाकरे,सदस्य दाज्या पावरा,विजय राणा, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस श्याम राजपूत,  नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय, संदीप परदेशी,रा.का.शहर अध्यक्ष योगेश मराठे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस शाम राजपूत, मोडचे सरपंच जयसिंग माळी, मोहन ठाकरे,नाथ्या पावरा, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विशाल चौधरी,मुस्लिम समाज अध्यक्ष आरिफ नुरा,आदी उपस्थित होते.
        कार्यक्रमात गेल्या वर्षभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात तळोदा तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या पहिल्या पाच गावांना विशेष पुरस्कार देण्यात आले. त्याप्रमाणे या गावात दिवसरात्र लसीकरणासाठी मेहनत घेणाऱ्या आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका,आशासेविका,आशा गटप्रवर्तक यांचा देखील सन्मान सोहळा पत्रकार संघाच्या वतीने पार पडला.
      यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य विजयसिंग राणा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,ग्राउंड वर काम करणारे हे कर्मचारी नेहमीच दुर्लक्षित असून पत्रकार संघाने त्याची यथोचित दखल घेत कोरोणा लसीकरणासाठी राबणाऱ्या यंत्रणेच्या सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल पत्रकार संघाचे विशेष कौतुक केले.
        आमदार उदेसिंग पाडवी यांनी देखिल कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी यंत्रणेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून इतर गावांनीही सत्कार झालेल्या गावांकडून प्रेरणा घ्यावी व आपले गाव देखील लसीकरणात अग्रस्थानी हे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असून पत्रकार संघाने आदर्श पायंडा निर्माण केला असल्याची भावना त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. अध्यक्षीय मनोगतात  नगराध्यक्ष अजय परदेशी म्हणाले की,पत्रकार देखील सर्व यंत्रणेच्या सोबत शहर व तालुक्यात ग्राउंड लेव्हल वर काम करत होते. तत्कालीन उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा,तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे,तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण,तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांचा देखिल नामोल्लेख करत त्यांनी सर्व यंत्रणेचे विशेष कौतुक केले.
         कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले तर पत्रकार संघाचे सचिव उल्हास मगरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नारायण जाधव,सम्राट महाजन, कोषाध्यक्ष सुधाकर मराठे,भेट भामरे, ईश्वर मराठे, महेंद्र लोहार, नरेश चौधरी, सुशील सूर्यवंशी, किरण पाटील, दीपक मराठे, डॉ.नारायण जाधव, अक्षय जोहरी, महेंद्र सूर्यवंशी यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले
 
*यांचा झाला सन्मान*
१)  झिरी : डॉ.गौरव सोनवणे,अरुणा वसावे,लतिका  वळवी,विमल सुदाम वळवी ,विजय वळवी,अविनाश भरतसिंग वळवी, सरपंच मीनाबाई वळवी 
२)  धानोरा  : 
डॉ.सागर महाजन,संध्या साळवे,ज्योती साळवे,चंद्रकला पावरा,मोहन ठाकरे , सरपंच जंगलसिंग मोहन ठाकरे  
३)  तळवे :  डॉ.प्रियांका वळवी,आर.के.पाडवी,आक्काबाई नारायण केदार ,पुष्पा सीताराम पाटील, सरपंच बारीकराव
४) आष्टे (मोड): विमल रडत्या पाडवी,अंजना राजू माळी,रजनी अशोक शिंदे,बबिता सत्तेसिंग वळवी,सरपंच जयसिंग माळी.
५) रेवानगर :  डॉ.भरत पावरा,डॉ.महेंद्र ब्राम्हणे,फेंदा पावरा, सविता गावित,अनिता पावरा,संगीता पावरा,दाज्या पावरा