Breking News

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

पाडळपुर वटवाघुळाचे गाव

शहरापासून उत्तरेला अवघ्या 15 km अंतरावर पाडळपुर हे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे सदर गाव सातपुड्याच्या पायथ्याशी वेसले असून हे गाव एका विशिष्ट कारणाने तालुक्यात परिचित आहे. ह्या गावात प्रवेश करतानाच आपल्याला एका मोठ्या झाडावर शेकडो वटवाघूड़े उलटे लटकलेले आढळून येतात. जणू गावात येणाऱ्या पाहुन्यांचे ते वटवाघुळे स्वागतच करीत असावेत असे वाटते. रात्रीच्या प्रावासानंतर दिवस उजाडण्यापूर्वी सर्व वटवाघुळे पुन्हा त्या झाडावर विसावतात ते आधार होण्यापर्यन्त हां दररोजच्या उपक्रम असुन दिवसा झाडावर उलटे लटकलेले हे वटवाघुळे आकर्षणाच्या विषय ठरतात. महाराष्ट्रात मुंबई नजिक मामाचे गाव आहे. ते पर्यटकांचे आकर्षण असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्यालागत असलेले नंदुरबार जिल्ह्यातील तलोदा तालुक्यात पाडळपुर हे गाव वटवाघुळाचे गाव म्हणून परिचित आहे. ह्या गावात वटवाघुळे हजारोच्या संखेने चिंचेचा झाडावर वास्तव्य असल्याने ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे आकर्षण ठरते.. तलोदा तालुक्यातील पाडळपुर हे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव,गावात सुमारे एक हजार लोक वास्तव्यास आहेत.
गावाला लागुणच सातपुड्याच्या पर्वतरांगा चहुबाजुनी लहान मोठ्या टेकड्या पाडळपुर,गढ़वली नजिक लघुप्रकल्प वरपाड़ा गावा नजिक छोटेसे मातीचे बांध ह्यांच्यात गावाचे वास्तव्य शेती व शेतमजुर हां गावकऱ्याचा पारंपारिक व्यवसाय असला तरी गावाला राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. गावाचे पोलीस पाटील म्हणून ओळख असलेले ग्रामपंचायत सदस्य ते जि.प.सभापती राहीलेले माजी जि.प.सदस्य धनसिंग ठाकरे ह्यांच्या घराजवळ चिंचेचे दोन तीन झाडे आहेत.सदर झाडे हे सुमारे सव्वाशे वर्षापुर्वीचे असल्याचे जानकार सांगतात. सुरवातीपासूनच ह्या झाडांवर वटवाघुळाचे वास्तव्य आहे. दिवसभर पक्ष्याचा किलबिलाट सायंकाळी आधार पडल्यावर अन्न व पाण्याच्या शोधात निघालेली ही वटवाघुळे दिवस उजाळण्या अगोदर पुन्हा ह्या झाडावर येवून विसावतात गावकरी देखील वटवाघुळावर प्रेम करतात.लग्न असो वा इतर समारंभ वटवाघुळाना त्रास जानवेल म्हणून गावात कधीच फटाकडे फ़ोडले जात नाहीत. सदर पक्षयांचे उड़ने व परत येणे ह्यातून
गावकऱ्याना वेळ समजत असे, सदर वटवाघुळे पुरातन काळात दुष्काळाच्यावेळी येथे वास्तव्याला आले असावेत असे जानकार म्हणतात.पाडळपुर हे निसर्गाच्या वास्तव्यात वेसले आहे सातपुद्यांच्या पर्वत रांगा लहान मोठ्या टेकड्या गढ़वली,रोझवा, ह्यासह विविध गावातील लहान मोठे बंधारे ह्यामुळे श्रावन महिन्यात निसर्गप्रेमी व पर्यटक ह्या गावास भेटी देतात. चिंचेच्या झाडावर वटवाघुळाच्या वास्तव्याने व त्यांची किलबिलाट पर्यटकांचे लक्ष्य वेधुन घेते. मोठ्या कुतुहलाने पर्यटक ह्याबबतची माहिती गावकऱ्याकडून जाणून घेतात. पर्यटक व्म निसर्गप्रेमिना ही वेगळीच नेजवानी असते.आपला मोबाईल व कैमेरात ह्या वटवाघुळाचे चित्र कैद करण्याचा मोह पर्यटकाना होने स्वाभाविक आहे.



मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

तळोदा नगरपालीका

तळोदा नगरपालीका नगराध्यक्ष 

गोंविंद दिनुराम राठोड़ 
मुरार हरी माळी 
अमृत मगन सोनार 
गंगाराम तुकाराम सुर्यवंशी 
जीवन नारायण वाणी 
शंकर गुलाल माळी 
गुलाल बुलाखी माळी 
धजा चुनीलाल माळी 
गोरख सदु कुकावलकर 
ईश्वर अमृत माळी 
नटवर विनायक जोशी 
हिरालाल हुलाजी टवाळे 
जगदीश संभु चौधरी 
भरत बबनराव माळी 
दिपाली राजेंद्र वळवी 
वंदना हेमलाल मगरे 
एस.के.पाडवी (प्रभारी) 
ताराबाई हिरालाल बागुल
सौ. हेमलता बच्चुसिंग परदेशी 
विमलबाई काशीनाथ सोनवणे 
भरत बबनराव माळी 
सौ.हेमलता विलास डामरे 
सौ.योजना भरत माळी 
सौ.रत्नाताई सुभाष चौधरी

 तळोदा नगरपालीका प्रशासक 

 झेड.एस.पाटील 
जी.सी.फलक 
जे.एस.कुलकर्णी 
ए.द.खरवंडीकर 
एस.जी.कोकणी
एस.डी.सोनवणे 
आर.बी.गोसावी 
एस.के.भंडारी
के.---दहाड़े 
जे.पी.पवार 

 तळोदा पंचायत समिती सभापती 

 गणपत आनाजी चव्हाण 
वेडू गबु शिंदे 
गोरजी सुरजी वळवी 
प्रतापसिंग बिलाड्या भामरे 
लालसिंग नुऱ्या वळवी 
शांतु रामु वसावे 
धनसिंग खेत्या ठाकरे 
पद्माकर विजेसिंग वळवी 
उमताबाई हंबरसिंग गिरासे 
जितेंद्र चंद्रसेन पाड़वी 
सतीश वेडू वळवी 
प्रभु गोरजी वळवी 
जहांगीर बोलगा पावरा 
मोहन सक्कन ठाकरे 
रेखाबाई वसंत पाडवी 
आकाश सतीश वळवी

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

चिमणी

चिमणी (house sparrow
साधारण १५ सेमी लांबीचा हां पक्ष भारतभर सर्वत्र आढळतो. नर-मादी आकाराने सारखे असले तरी रंग रूप भिन्न आहे. मादी फिकट मातकर रंगाची, पंखांवर, तपकीरी भूरकट रेषा असलेली असते. तर नाराचा कंठ छातीचा वरचा भाग काळा व पोट पांढरे असते. पंखावर तपकीरी, गडद रेषा आणि माथा करडा असतो. दोघांचाही चोच तपकीरी आखुड जाड असते. यांचा थवा जमिनीवर उतरून दाणा टिपताना दिसतो. दोन्ही पायांवर उड्या मारीत चालण्याची यांची वेगळी पद्धत आदी यांचा `चिवचिवाट' सर्वश्रुत आहे. दिल्लीचा राज्य पक्षी आहे. सुंदर फुललेल्या बागेतील फूल कळ्या फस्त करतात. 1960 च्या दशकात चीनमध्ये चिमण्या मारण्यात आल्या होत्या. कारण एक चिमणी 50 ग्रॅम धान्य खाते, असा हिशेब त्यांनी केला होता. चिमण्या मारल्यास तेवढ्या धान्याची बचत होईल, असे चीन सरकारचे गणित होते. त्यानंतर एक-दोन वर्षांत चीनमध्ये धान्य उत्पादनात वाढ झाली, पण नंतरच्या कालावधीत किडे व कीटकांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली, की त्यांची पिके नष्ट होण्याची वेळ आली. त्या वेळी चिमणीचे महत्त्व चीनसह सर्वांनाच समजले. तसेच चिवू ये! दाना खा! पाणी पी' असे म्हणुन बाळासाठी घरात बोलावलेली ही चिमणी फोटो फ्रेम,दिव्याची शेंड, खिड़क्याची तावदाने, वळचण सगळीकडे घूसखोरी करुण असायची आणि चाहूल लागताच भुरर्कन उडायची. वाङा संस्कृती लोप पावली. त्याच बरोबर चिमणी ही हद्दपार झाली. मात्र अजुनही परस, अंगन, बगीचा, जिथे आहे तिथे बरवस्तित सुद्धा या पक्षाचा तुरळक वावर आहे.



हुबेहूब चित्र तुझे




हुबेहूब हे चित्र तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
ओठ गुलाबी, गहिरे डोळे
त्यांत परी ना तूच कुठे!


हुबेहूब हे शिल्प तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
हसरा चेहरा, सुडौल बांधा
त्यांत परी ना तूच कुठे!



घेता हात हातांत तुझा मी
कळले मज ते काय उणे
हुबेहूब हे चित्र, शिल्प तरी स्पर्श,
गंध त्यां तुझा कुठे?




निरभ्र आकाश,
झरे खळाळते चंद्र
तूच अन तूच चांदणे
उमलते फुल, तान मधुर पहाट
तूच अन तूच धुके आकाश,
धुके हे चंद्र, चांदणे फुल,
तान जरी रूप तुझे पहाट
धुक्यापरी सर्व हि खोटे कारण.........
स्पर्श, गंध त्यां तुझा कुठे?

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

कुशल मार्गदर्शक नेतृत्व: लक्ष्मणराव माळी

कुशल मार्गदर्शक नेतृत्व: लक्ष्मणराव माळी
शिक्षण महर्षी आप्पा साहेब लक्ष्मण बबनराव माळी ह्यांच्या वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था पी.ई.सोसायटीचे ते गेल्या 15 वर्षापासुन अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळात संस्थेने वैभव प्राप्त केले. आदिवासी भागात शाळा कॉल्लेजेसच्या माध्यमातून तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी विध्यार्थ्याना त्यानी शिक्षणाची द्वारे मुक्त केली. पी.ई.सोसायटीच्या शाळेत शिकुन असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. त्यांचे श्रेय आप्पासाहेबाना जाते. मागास भागातील संस्थांची अवस्था काय असते हे सर्वाना माहीत आहे. मात्र आप्पासाहेब लक्ष्मण माळी ह्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेला एक वेगळे स्वरुप प्राप्त करुण दिले. ह्यासंस्थेतून ज्ञानाची दिशा घेणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजे असा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे संस्थेतील शिक्षक कर्मचारी वर्ग मोठ्या परिश्रमाने संस्थेच्या नाव लौकीकात भर घालत आहे. परिसरातील मुले शिकुन मोठे व्हावेत व आपल्या भागाचा विकास करावा हेच आप्पाचे धेय आहे. पिताश्री स्व.बबनराव माळी पेहलवान व आई विमलबाई माळी ह्यांच्या आशिर्वादाने आप्पासाहेबानी हे यश मिळवले आहे. लहान बंधु भरतभाई माळी व संजय माळी ह्यांची त्याना साथ मिळाल्याने आप्पासाहेबानी कधी मागे वळून पाहिले नाही. वडिलांच्या निधनानंतर सारे कुटुंबाला आप्पासाहेबानी आधार दिला. वटवृक्षा सारखी मायेची सावली दिली. शैक्षणिक संस्थेच्या व्यापात देखील आप्पा घरच्या शेतीत चांगलेच रमतात नवनविन प्रयोग राबवुन चांगले उत्पन्न घेतल्याने त्यांची प्रगतशील शेतकरी म्हणुन ते प्रसिद्ध आहेत. आप्पासाहेबाना त्यांच्या पत्नी सौ.शारदाताई ह्यांची मोलाची साथ लाभली आहे. त्यांच्या सुन सौ योजनाताई भरत माळी ह्या तलोदा नागरपालिकेच्या नगराध्यक्षा आहेत. आप्पा साहेबांचे जीवन म्हणजे एक मार्गदर्शक दीपस्तंभासारखे आहे. अश्या मार्गदर्शक नेतृत्वास मनपूर्वक शुभेच्छा....                
                                                                सुधाकर मराठे ( उपशिक्षक )
                                                          न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु कॉल्लेज अक्कलकुवा.

रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

कोणत्याही रिलायन्स युजर चे आडनाव जाणून घ्या !

कोणत्याही रिलायन्स युजर चे आडनाव जाणून घ्या ! रिलायन्स नंबर च्या मालकाचे डीटेल्स कसे शोधयाचे.

1.सर्वप्रथम या लिंक वर जा
2. तुमच्या पुढे एक पेज उघडेल त्यात तो नंबर टाका . (इमेल अड्रेस देण्याची काही आवशकता नाही )
3.आता  Continue या बटणावर क्लिक करा * या द्वारे आपण फक्त त्या वापरकर्त्याचे आडनाव आणि ठिकाण जणू शकतो.


3.आता Continue या बटणावर क्लिक करा 
* या द्वारे आपण फक्त त्या वापरकर्त्याचे आडनाव आणि ठिकाण जणू शकतो.



प्रेरणादायी व्यतिमत्व: भरतभाई माळी

प्रेरणादायी व्यतिमत्व: भरतभाई माळीतळोदा पालिकेचे प्रतोद व समस्त माळी समाज सुधारणा मंडळाचे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशाचे अध्यक्ष भरतभाई माळी यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. भरतभाईच्या व्यक्तिमत्व व कर्तुत्व १९८० दशकात नावारुपाला आले. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी परिषद् निवडणुकीत भाग घेवुन राजकारणाचा कित्ता गिरवायला सुरुवात केली. १९९१ साली वयाचा केवळ २४ व्या वर्षी तळोदा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होण्याचा मान त्यानी मिळवला. तेव्हापासुन ते आजतागत भरतभाई माळी व तळोदा शहर हे समीकरण तयार झाले आहे. आज तळोदा शहराचे वा किंबहुना नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण असो वा समाजकारण असो भरतभाईना वगळून पुर्ण होवु शकत नाही. मागील २० वर्षापासुन या राजकारण व समाजकारण महत्वाचे केंद्रबिंदु राहिले आहेत. त्यांच्या स्वभावातील महत्वाचे गुणवैशिष्टयामुळे त्यांच्यावर प्रेम व आस्था राखणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पक्षाबरोबरच राजकारणातील विरोधकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. नगराध्यक्षापदी विराजमान होवुन त्यानी शहराला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले आहे. रस्ता दुभाजकाचे पडलेले काम पूर्णत्वाकडे आणले आहे. रस्ते विकास,चौक सुशोभिकरण व तापी पाणीपुरवठा योजना मंजुर करुण तळोदा शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्याच्या पर्यत्न सुरु आहे. हे सर्व करीत असताना समाजकारण अजिबात सोडले नाही. माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष म्हणुन ज्या ज्या ठिकाणी माळी समाज राहतो. त्या त्या गावी जावुन समाजात बैठक घेणे व चालिरिती, परंपरा यांची चर्चा करणे, त्यात सुधारणा घडवुन आणणे हे अविरतपने सुरु आहे. जळगाव येथे विद्यार्थ्याना शिक्षणासाठी हाल अपेष्टा भोगाव्या लागतात. हे हेरुण सुधारणा मंडळाचे वस्तीगृह त्यांच्या नेतृत्वाखाली नावारुपाला येत आहे. भरतभाई माळी खरेखुरे समाजभुषण, तळोदा भुषण आहेत. या सर्व कामी पिताश्री कै. बबनराव पहेलवान यांनी दिलेल्या मंत्र सदैव प्रेरणादायी आहे. मातोश्री विमलबाई माळी, मोठे बंधु आप्पासौ. लक्ष्मण माळी यांचे आशीर्वाद मार्गदर्शन लहान बंधु नगरसेवक तसेच गणेश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय माळी, पत्नी नगराध्यक्षा सौ.योजना माळी यांची साथ या जोरावर भरतभाईनी या शहराचा गाड़ा समर्थपने चालविला आहे. शाहराची पर्यायाने जिल्ह्याची उत्त्तरोतर प्रगती होवो यासाठी भरतभाईना उदंड आयुष्य लाभों. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

२० वर्षाचा प्रतिक्षेनंतर पोहचली ठाण्याविहीरला बस

२० वर्षाचा प्रतिक्षेनंतर पोहचली ठाण्याविहीरला बस 
        `पुण्यनगरी' वृत्ताची दखल,
गावकऱ्यानी साखर वाटून साजरा केला आनंद.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या उत्तरेकाडील 10 ते 15 गावातील 16 हजारापेक्षा अधिक नागरिकांना मागील विस वर्षापासुन बससेवे पासुन वंचित राहावे लागले. सुमारे 20 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टित फरशी पुल तुटलाने बससेवा बंद करण्यात आली होती. बससेवा सुरु करण्याकरिता परिसरातील          ग्रामस्थ ठाण्याविहीरचे पदाधिकारी व न्यू इंग्लिश स्कुलच्या शिक्षकांच्या नियमित पाठपुरावामुळे 26 जानेवारी गणतंत्रदिनी सदर बस सेवा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. याबाबत पुण्यनगरी मधुन आमचे प्रतिनिधी सुधाकर मराठे ह्यांनी वारंवार बस सेवा सुरु करण्याबाबत मागणी सातत्याने केली.
त्या वृताची वरिष्ठ पातळीवर द्खल घेवुन बससेवा सुरु झाली आहे. गावात आलेली बस पाहण्याकरीता गावकऱ्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ग्रामस्थानी साखर वाटप करुण आपला आनंद साजरी केला... अक्कलकुवा तालुक्यांतील ठाणाविहीर परिसरात पक्के रस्ते असुनही गावकऱ्याना बससेवा पासून वंचित राहावे लागत होते. तालुक्यातील उत्तरे भागातील ठाणाविहिर, आमली, सावर, गुलीआंबा, पिंपळगाव, कुंडलेश्वर, इच्छागव्हान, पिंपरपाड़ा, मोवलीपाड़ा, सिंगपुर, हुजुड़बा, अलिविहिर, नवलपुर, सोजड़ांन, अश्या 10 ते 15 खेड़े गाव आहेत. ह्या गावांची एकूण लोकसंख्या 16 हजारापेक्षा अधिक आहे.
वरील सर्वच गावातुन 300 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेण्याकरीता अक्कलकुवा, तलोदा, येथे पायपीठ करीत येत असतात. 20 वर्षापुर्वी झालेल्या अतिवृष्टित ठाण्याविहीर फरशी पुल वाहून गेल्याने सदर बससेवा बंद झाली होती. काही दिवसांनी फरशी पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र अक्कलकुवा आगाराकडून रस्ते सर्वेक्षण अभावी गावकऱ्याना बस सेवा सुरु करण्यात आली नव्हती. ह्याबाबत ठाण्याविहीर ग्रुपग्रांमपंचायतचे सरपंच मानसिंग वळवी, रामसिंग नाईक(गुरूजी) ग्रामसेवक जी जे वसावे, आदिनी बससेवा सुरु करण्याकरिता सातत्याने आगार प्रमुखांकडे मागणी केली. मात्र यावर पोकळ आश्वासने देण्यात
येत होती. न्यू इंग्लिश स्कुल येथील प्राचार्य एस.एस.साळवे, पर्यवेक्षक व्ही.बी.पाटील व शिक्षक ह्यांच्या सहकार्याने नविन नियुक्त झालेले अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील ह्यांची भेट घेतली. श्री पाटील ह्यांनी त्वरित धुळे विभागीय कार्यालयाकडे रस्ता सर्वे करण्याचा मागणी प्रस्ताव सादर केला. मंत्रालयाकडून रस्ता सर्वे करुण जीपीएस ट्रक मिळाला. 26 जानेवारी ह्या दिवसाचे औचित्य साधुन त्वरित बससेवा सुरु करण्यात आली. तब्बल विस वर्षानंतर गावात सुरु झाल्यामुळे गावकऱ्यानी अबाल वृद्धसह गर्दी केली. ह्यावेळी गावकऱ्यांचा
आनंद वाखाडणाजोगा होता. आणि त्याहुन अधिक आनंद झड़कत होता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कारण शिक्षणासाठी मैलोमेल करावी लागणारी पायपीठ त्यांची थांबणार होती. यावेळी अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील,स्थानक प्रमुख रविंद्र जगताप, वाहन चालक अनिल वसावे, कंडक्टर पोपटराव गोफने, वाहतूक निरीक्षक सागर पाडवीं, आगार लेखाकार बी.के.वसावे, सहायक वाहतूक निरीक्षक एस.एस.खरडे,कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रताप वळवी, इंग्लिश स्कुलचे पर्यवेक्षक व्ही.बी.पाटील, शिक्षक एम्.जी.मगरे, व्ही.एस.साळवे, के.आर.वळवी,सुधाकर मराठे, टी.आर.सावरे ह्यांच्या सरपंच मानसिंग वळवी,
उपसरपंच पाडवी, ग्रामसेवक जी.जे.वसावे, सुरूपसिंग नाईक, सरवरसिंग नाईक,भगतसिंग सुनीताबाई पाडवी, कविताबाई पाडवी, शंकर कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर ग्रामस्थ, सरपंच व विद्यार्थ्यांकडून शिक्षक तथा पुण्यनगरी प्रतिनिधी सुधाकर मराठे ह्यांच्या विशेष सत्कार करुण त्यांचे आभार मानले...
न्यू इंग्लिश शाळेतील शिक्षकांकडून
विद्यार्थ्यांना फुकट बस पासेस, ठाण्याविहिर परिसरातील 70 ते 80 विद्यार्थी नियमित पने अक्कलकुवा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेण्याकरिता पायपीठ करुण यावे लागत होते. तर काही विद्यार्थी हे खाजगी वाहनात कोंबुन शाळेत येत होते, ह्याकरिता न्यू इंग्लिश स्कुल येथील  प्राचार्य एस.एस.साळवे, प्रयवेक्षक व्ही.बी.पाटील शिवदे, सुधाकर मराठे, एम्.जी.मगरे ह्यांनी नियमित अर्ज फाटे करुण बससेवा सुरु
करण्याबाबत पाठ पुरावा केला. सदर बससेवा सुरु झाल्याने गावातील ग्रामस्थानी शिक्षकाचे शॉल पुष्पगुच्छ देवून आभार मानले. ठाण्याविहीर परिसरातील 65 विद्यार्थ्याना शिक्षकांच्या वैयक्तिक खर्चातून बस पासेस काढून देण्यात आले. त्यात मानवविकास योजना व सावित्रीबाई योजना अश्या विविध योजनाचा फायदा विद्यार्थ्याना मिळवून दिला. सदर पासेस काढण्या करिता व्ही.बी.पटेल,एस.डी.शिवदे, के.के.आर.वळवी, एम्.जी.मगरे,सुधाकर मराठे टी.सावरे आदिनी परिश्रम घेतले                             
(महेंद्र पाटील आगार प्रमुख अक्कलकुवा) अक्कलकुवा ते इच्छागव्हन हि बस दररोज अक्कलकुवा येथून पहाटे 6:30 वाजता निघणार आहे , तसेच दुपारी 12:30 वाजता व सायंकाळी 5 वाजता अश्या तीन वेळेस बसचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. तसेच सदर बसचा विविध योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील ह्यांनी केले आहे. (तब्बल विसवर्षानंतर गावात बससेवा सुरु झाल्याने ग्रामस्थानी आनंद साजरी केला.. विस् वर्षापुर्वी वंनविभागाकडून ठाणाविहीर परिसरात बससेवा सुरु होती. मात्र अतिवृष्टित ठाणाविहीर रसत्यावरील फरशी पुल वाहून गेल्याने सदर बससेवा बंद करण्यात आली होती. तदनंतर तब्बल 20 वर्षानंतर बससेवा सुरु झाल्याने गावातील ग्रामस्थाचा आनंद गगनात महावेनसा झाला. बस पाहण्याकरिता गावातील बालक गृहस्थ सर्वाणीच् मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लहान बालकानी नाचुन तर मोठ्यानी साखरेचा प्रसाद वाटून आपला आनंद साजरी केला.

10 जुन ह्या रोजी दै.पुण्यनगरी वृत्तपत्रात छापुन आलेली बातमी. पत्रकार सुधाकर मराठे ह्यांच्या सत्कार करुण आभार मानताना सरपंच व ग्रामस्थ





 


 

शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

मनातले कोणीतरी ओळखावे

न बोलता मनातले कोणीतरी ओळखावे,
 न सांगताही कोणीतरी प्रेम करावे.
 मनाला हवे तेच का सांगावे,
 न सांगताही कधीतरी प्रेम करावे.
 मनातल्या भावानांसोबत भरभरून जगावे,
 न सांगताही कधीतरी प्रेम करावे. प्रेम आपल्याही वाट्याला यावे,
 न सांगताही कोणीतरी प्रेम करावे. नेहमीच बह्यसौंदर्य का पाहावे,
 कधीतरी अंतरर्गातही झाकावे,
 न सांगताही केव्हातरी प्रेम करावे. नेहमी राग रुसवा आणि का भांडावे,
 न सांगताही कोणीतरी प्रेम करावे. तिने त्याला अन् त्याने तिला सहज ओळखावे,
 न सांगताही कोणीतरी प्रेम करावे. सांगता न येण्याएवढे कठीण का करावे,
 न सांगता बोलून सांगण्यायेवढे सोपे करावे. इतरांपेक्षा थोडे वेगळे,
न सांगताही प्रेम करावे. आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे.


गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

प्रेम भावना

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
 माझ्या मनाच्या कोपऱ्यात नयनांच्या माझ्या पापण्यात थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 तुझ्या एका नजरे साठी असतो सदा तुजपाठी मज भरकटलेल्या जीवन मार्गावर आणशील का?
 माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 एकच ध्येय माझ्या जगण्याचे तुला माझी झालेली बघण्याचे करण्या मज इच्छापूर्ती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 तुझ्यात असतो मी गंभीर करतेस मज तू अधीर शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का? माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

वेड




तुझ्या बदमाश ओठांना थांबवू कशी ?
 रोखून पाहणाऱ्या नजरेला रोखू कशी ?
 एकाच नजरेत जीवघेणे वेड लावतोस मग माझ्या बहकणाऱ्या मनाला आवरू कशी?

वाण्याविहीर येथे दुर्मीळ कासव

तालुक्यातील वाण्याविहीर येथे शेतात दुर्मीळ कासव आढळून आल्याने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत
आहे. पाठीवर नक्षत्राच्या आकाराचे नैसर्गिक आकृत्या असलेले हे कासव दुर्मीळ प्रजातीचे असल्याची माहिती जाणकारांकडून मिळाली आहे. कन्हैयालाल शिवदयाल परदेशी या शेतकर्‍याच्या शेतमळ्यात राहणार्‍या रमेश रामदास तडवी यांच्या घराच्या ओट्यावर हे कासव येऊन थांबल्याचे आढळून आले. कासवाच्या पाठीवर दुरून पाहिले असता नक्षत्राच्या आकाराच्या आकृत्या दिसतात. सोनेरी रंगाच्या पाठीवर 'सप्तर्षी' या नक्षत्राप्रमाणे चांदण्यांचे नक्षीकाम करून निसर्गाने या कासवाला वेगळीच ओळख दिली आहे. मात्र जवळ गेले असता एक एक आकृतीचा आकार हा कोळी या किटकासारखा दिसतो. सुमारे तीन किलो वजनाचे हे कासव पाहण्यासाठी अक्कलकुवा परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली आहे. हे कासव परिसरात उत्सुकतेचा विषय बनले आहे.
■ वाण्याविहीर येथे मिळून आलेले कासव हे 'एशियन स्टार टॉरटॉईज' या प्रकारातील आहे. ही कासवे आठ इंचापेक्षा मोठी असतात. 'समोबेट्स' (Psammobates) प्रजातीच्या या कासवाच्या पाठीवर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकृत्या निसर्गत:च असतात. भारत, म्यानमार आणि श्रीलंका या तीन देशातील समुद्र किनारे आणि विविध जलस्रोतांमध्ये हे दुर्मीळ जीव आढळून येतात. साधारणत: १00 वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकारातील कासव जन्माला येण्याची प्रक्रिया घडत असल्याची माहिती आहे. भारतात आढळणार्‍या 'समोबेट्स' कासवाच्या प्रजाती ह्या प्रामुख्याने वर्षा ऋतूवर जगत असल्याचे 'अमेरिक न वाईल्डलाईफ र्जनल' यात नमूद केले आहे.
वाण्याविहीर येथे आढळून आलेल्या कासवाच्या प्रामुख्याने तीन प्रजाती असल्याची माहिती समजते. हे कासव दुर्मीळ असून भारतात ते साधारणत: दक्षिणेकडील राज्यात सापडते. ज्या शेतकर्‍याला हे कासव सापडले ते कुठून आले याचा शोध घेतला पाहिजे. सातपुड्यात अशी कासवे असल्याचे अजूनतरी माहिती नाही. पण खरोखरच ते त्या भागात सापडले असेल तर तेथे केवळ एकच कासव नसेल. अनेक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही संशोधन झाले पाहिजे. -प्रा.अशोक वाघ

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

डॉ.शशिकांत वाणीना लाखमालेाच्या शुभेच्छा

सातपुड्याच्या राजकारणातील तळपता सूर्य डॉ.शशिकांत वाणी
 भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख दादासाहेब डॉ. शशिकांत वाणी यांचा आज वाढदिवस. तळोदा तालुक्यातील प्रतापूर या छोट्याशा गावातून राजकारणात पुढे आलेले डॉ. शशिकांत वाणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून घेतले. स्वयंसेवक म्हणून काम करताना सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यातील माणसाला संघ विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख दादासाहेब डॉ. शशिकांत वाणी यांचा आज वाढदिवस. तळोदा तालुक्यातील प्रतापूर या छोट्याशा गावातून राजकारणात पुढे आलेले डॉ. शशिकांत वाणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून घेतले. स्वयंसेवक म्हणून काम करताना सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यातील माणसाला संघ विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. 1982 मध्ये भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पक्षातील त्यांची यशस्वी वाटचाल आजपर्यंत थांबलेली नाही.
तळोदा तालुकाध्यक्ष, भाजयुमोचे सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून दादांची संघटनात्मक भरारी सुरू राहीली. पक्षात काम करीत असताना सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षांकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. सातपुड्यातील माणसाच्या गरजा काय आहेत, याचा अभ्यास केला.कै. दिलवरसिंग पाडवी पतसंस्थेची उभारणी केली. कै.दिलवरसिंगदादा पाडवी ग्राहक भांडार सुरू केले. तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम करताना शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेतले. सातपुड्यातील गोरगरीब जनता शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी दादासाहेबांनी श्री साईनाथ शिक्षण संस्थेची उभारणी केली. संस्थेच्या माध्यमातून अनंतदिप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कोठार, ता. तळोदा, विद्यावर्धिनी निवासी माध्यमिक शाळा,जांभीपाणी ता. अक्कलकुवा तसेच भुषण आदिवासी 100 मुलांचे केंद्रीय वस्तीगृह सुरू केले. अयोध्या येथील रामजन्मभूमि आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झाले त्यावेळी त्यांना उत्तरप्रदेशातील ङ्गैजाबादमध्ये 15 दिवसांचा तुरूंगवास झाला. सहा डिसेंबरच्या अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला. राजकारणात असले तरी दादांनी समाजसेवेला अधिक प्राधान्य दिले. सातपुड्यातील माणसाला प्रेम दिले.
दु:खीतांचे अश्रु पुसले. हाच वसा पुढेही कायम ठेवला आहे.सतत नवनवीन प्रयोग करीत राहणे, आपल्या सहकार्यांना, शिक्षकांना प्रोत्साहन देत राहणे, यावर दादांचा भर असतो. प्रचंड जनसंपर्क, अतिशय समजूतदारपणा, कनवाळू मन, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेणे, अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग शोधणे आणि तेवढीच कडक शिस्त राबविणे हा दादांचा स्वभाव आहे. दादांच्या रूपाने आम्हाला लाभलेला हा वटवृक्ष अनेकांच्या दु:खावर मायेची ङ्गुंकर घालत आहे. सावली देण्याचे काम करीत आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनिता वाणी या नगरसेविका असून वॉर्डातील समस्या सोडवित आहेत.सुपूत्र अभिषेक आणि आदित्य हे वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सुसंस्काराच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत. आज डॉ.शशिकांत वाणीचा वाढदिवस. जनसामान्यांच्या या आमच्या लाडक्या व्यक्तीमत्वाला आमच्या लाखमालेाच्या शुभेच्छा.........


मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद
सन्मानीय व्यासपीठ आदरणीय गुरूजन व येथे जमलेल्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज मी स्वामी विवेकानंदबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचीतेने ऐकावे अशी मी नम्र विनंती करतो.
 इ.स. 1893 मधे अमेंरिकेत शिकागो येथे भरलेल्या, जागतीक सर्व धर्म परिषदमधे माझ्या प्रिय बंधु आणि बघिनीनो असे उदगार काढून विश्व बन्धुत्वाचे नाते प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद कोणाला बरे परिचित नाही. आपण त्याना स्वामी विवेकानंद ह्या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते १२ जानेवारी १८६३ ह्या दिवशी त्यांचा जन्म झाला.त्यांचा वडिलांचे नाव विश्वनाथ बाबु व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते, त्याचा स्वभाव उदार व दुःखीन विषयी कणव असणारा होता. आई भुवनेश्वरी देवी बुद्धिमान व वृतीने धार्मिक होत्या. अश्या मात पिताने नरेन्द्रांवर उत्तम संस्कार करुण त्यांचा वृत्ती घडविल्या. लहानपणी बाल नरेंद्र फार खोड़कर होते. त्याना विविध खेळाची आवड होती. त्यांचा वडिलांनी त्यांना थोर समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांच्या शाळेत घातले. तेथेही नरेन्द्रांवर उत्तम संस्कार घडले. १ में १८९७ रोजी त्यानी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून जनतेच्या उद्घारासाठी सेवासेना उभारण्याचे आपले स्वप्न बोलून दाखवले, हां विचार सर्वांमधे पटला. व रामकृष्ण परमहंस मिशनची स्थापना झाली. निरनिराळया धर्माच्या अनुयामधे बंधुभाव उत्पन्न व्हावा ह्यासाठी रामकृष्ण परमहंसानी केलेल्या कार्याची धुरा ह्या मिशनने खांद्यावर
 घेतली अवघे ३९ वर्षाचे आयुष्य स्वामी स्वामी विवेकानंदाना लाभले. पण ह्या अल्पावधित त्यानी युगानुयुगाचे प्रचड कार्य केले. त्यानी पाश्चिमात्य देशात बहुतीक वादाचा भारतीय अध्यात्म वादाशी समन्वय साधन्याचा पर्यत्न केला. भारताच्या थोर संस्कृतिच्या व उदात्व मानवतावादी तत्वज्ञानाचा जगाला परिचय करुण देण्याचे महान कार्य करुण स्वामी विवेकानंदानी भारताच्या भावी पिढ्यांसाठी एक थोर आदर्श व वारसा ठेवला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द् संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र.......

सोमवार, १२ जानेवारी, २०१५

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद 
आजच्या कंप्यूटर युगात मोबाइलमैन बनून गेलेल्या तरुण मिलो दूर संवाद साधतो, पण त्याला स्वतःच्या परिवारात सुसंवाद साधन्याच्या वेळ नाही. आजची युवा पिढी इतरांच्या तालावर नाचने पसंत करते. पण नाचत नाचत स्वताचीच ताल विसरत आहे. ह्या ताल विसरलेल्या बेताल सुरालातर म्हणावेच लागेल ``हात में कंगन कान में बाली मुह में लाली और सर है बिलकुल खाली" ह्या खाली मार्गाला जीवनाची खरी वाट नरेंद्रने दाखवली म्हणजेच स्वामी विवेकानंद दाखवली, तर आजच्या माझ्या विषय आहे स्वामी विवेकानंदजीचे विचार व आजची युवा पीढ़ी आता यांच्यात म्हणायचे झाले तर युवा पिढीत मी पण मोड़तो. आता म्हणाल तर युवा पिढ़ी काय? मग मी काय माहितच आहे हो पण स्वामीजींचे विचार व् आपले विचार ह्यांच्याशी सुसंगत घालण्यासाठी आपल्याला स्वामीजींचे विचार माहीत असणे आवश्यक आहे. मग युवांच्या बाबतीत म्हटले म्हणजे आली जयंती लावा फ़ोटो, घाला माळ मग बघताच हे पुढच्या वर्षी तरी पण वक्तुत्वाच्या हिशोबाने जे काही स्वामीजींचे दोन चार विचार पाठ करुण आलो आहे, ते तुम्ही शांत पणे ऐकावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो. स्वामीजींच्या विचारांच्या बाबतीत पहिले म्हणावे लागेल की स्वामींसारखा हिरा जगी जन्मला नाही दुसरा त्यांचे गुन गान म्हणु किती वाणीत पडेल शब्द माझा अडून त्यांचा पहिला विचार मी मांडेल तो म्हणजे शिक्षणाबाबतीत
शिक्षण म्हणजे नौसर्गिक विकास होय. तर आजची युवा पीढ़ी ह्याच्याशी बिलकुल सहमत आहे. त्यांचा दुसरा विचार म्हणजे ते नास्तिक होते त्यांना देव कुठे आहे, हे कळतच नव्हते त्याना प्रश्न पड़े आजची युवा पिढी ह्याच्याशी अतिशय सहमत आहे. ते म्हणजे परमेश्वरावर विश्वास नाही पण त्यांच्या बाबतीत प्रदर्शन भलतेच् फावते ते असे की स्टेजवर जाययचे व म्हणायचे `हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे', हे तर आपणास माहितच आहे की ते नास्तिक होते पण त्याना जेव्हा राम कृष्ण परमहंस भेटले व् त्यानी सांगितले की भगवंत तुझ्या हृदयात आहे आणि आजची युवा पिढीच्या आणि आजच्या युवा मुला मुलींच्या हृद्यात् आधीच इतके विचार असतात की त्यात परमेश्वराची जागाच् कसली. स्वामीजीना शिकागो येथील धर्म परिषदेत त्यांना बंधू आणि बघीनिनो
हे वाक्य उचारुण समाजात विश्व बंधुत्व निर्माण करण्याचा पर्यत्न केला व आजची युवा पिढी जेव्हा समाज कार्यासाठी कधीतरी व्यासपिठावर जाते, तेव्हा तरुणांचे पहिलेच वाक्य असते मित्र आणि मैत्रीनिनो हयात किती विसंगतता आहे. आपले विचार सुसंगत तर आहेत. पण तेवढेच विसंगत ही जाणवते. त्यांनी सांगितले तुम्ही स्वालंबी व्हा, आपण परावलंबी आहोत. त्यानी सांगितले तुम्ही स्वाभिमानी बना मात्र आपण एक दोन गुणांमुळे पहाडायेवढा अभिमान बाळगतो. सगळे येतात व्यासपीठावर स्वामीनबद्दल म्हणतात त्यानी हे कार्य केले त्यानी ते सूत्र मांडली त्यानी सगळे केले पण मी म्हणतो ते आजच्या युवा पिढीने किती आत्मसात केले? त्यांच्या जीवनातील इतिहासाची पाने धाड़ धाड़ उतरवुंन लावण्यापेक्षा त्यांच्या प्रत्येक विचारावर विचार करुण त्यास आपल्या दैनंदिन जीवनात आणले पाहिजेत. हे मी माझ्या वकृत्त्वातुन सर्वाना सांगू इच्छीतो स्वामींच्या बाबतीत मी म्हणेल की मुक्या मनातून किती उधडावे शब्दांचे बुडबुड़े तुझे पवाडे गातील पुढती तोफाचे चवघड़े... जय हिंद जय महाराष्ट्र...

शनिवार, ३ जानेवारी, २०१५

आहिरानी भाषण सावित्रीबाई फुले.

सावित्रीबाई फुले
सन्मानीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमानसर्व गुरुजन वर्ग आणि आठ सगळा उपस्थित मना भाऊ आणि बहिनी आज सावित्रीबाईनी जयंती शिक्षणनी देवी सावित्रीबाई फुले हाई मायना जन्म 3 जानेवारी 1831 ले सातारा जिल्हांम्हना न्यायगाव ह्या खेड़ामा व्हयना. सावित्रीबाईना बापन नाव खांडोजी पाटील तर मायन नाव लक्ष्मीबाई अस व्हत. सावित्रीबाईना माय बाप दोन्ही अडानी व्हतात.1840 साल म्हा सावित्रीबाईन ज्योतिराव फुले ह्यासना जोडे लगीन व्हयन.लगीनना वेळेस सावित्रीबाई 9 वर्षणी व्हती. सावित्रीबाईना माय बापकड़े जशी वागणूक व्हती तसच ज्योतीरावना मायबापकड़े व्हती. सावित्रीबाई कामसु,हुशार व बुद्धिमान व्हती. ज्योतीरावले शिकाडानी गोड़ी व्हती. सावित्रीबाईले पण ज्योतीरावन देखिसन शिकानी इच्छा व्हयनी म्हणुन ज्योतीराव स्वतः शिकाळेत सावित्रीबाईन लगीन व्हानंतर ती शिकनी. तवय इंग्रज सरकारंन राज्य व्हत. तवय भहलताच वईट रूढ़ी परंपरा समाज म्हा व्हतात. कोत्याच् जातना बाईसले नही शिकाळेत. त्यासले घरना बाहेर जावु देत नहीत. शिकाळ म्हणजे धर्म बुडीन, ज़ातले कलंक लागीन अस समज व्हती. तरीपंन सावित्रीबाईनी बठास्ना वाईटपना लीन त्या 4थी पास झायात. आणि भारतमा पहिली मास्तरिन बनाना मान पटकावा. 1 जानेवारी 18 शे 1948 ले पुना शहरमा 1 ली शाळा काढ़ी. त्या शाळामा बाई स्वतःच मास्तरिन बनिसन शिकाळाले जाये. तवय जास्त साडी संगे लईसन जाये. पहिला दिन शिकाळाले गई ते डोक फुटन, लोकेसनी दगड मारी फेकात, रूढ़ी वाला लोकेसले ते चाले नही. त्या इत्ररसले हलका समजेत शेन माती दगडे मुले सावित्रीबाईनी साडी खराब व्हई जाये. शाळामा जावा नंतर बाईले साडी बदलनी पड़े....जख्मी व्हय रक्त पड़े पण बाई काई घाबरनी नाई आणि मांगेबी सरकनी नहीं,बांईनी पोरीसले सिकाडनं चालूच ठेव. ह्या दोन्हीसन कार्य इतल महान व्हत की वीचारु नका जे काम ज्योतिराव करे तेच काम सावित्रीबाई करे पतिवर बाईंनी पुरी निष्ठा होती,1876 सालमा भारत माँ दुष्काळ पड़ना तवय अन्नना करता लोक भूका मरेत तवय सावित्रीबाइनी गोर गरीबसले अन्नछत्र उघाड़ व स्वतः भाकरी करिसन त्यासना आत्मा शांत करे. इतल महान कार्य काय त त्याले आज कोठेच तोड़ नही. सावित्रीबाईले लेकरु बाळ वह्यन नही.म्हणून तिने विधवा बाइना पोऱ्याले दत्तक लिनह. आणि त्याले माया ममता दिनी. विधवा बाइसले तवय लगींन करानी मनाई व्हती आइ पद्धत सावित्रीबाईनी बंद करी. त्याकाळमा बालहत्या मोठा प्रमाणमा व्हय बाईनी बालहत्या बंद करी. सुधारगृह काढ त्यामा लोकना पोरे स्वतः समायात. त्यासले माया ममता दिनी. अशी सावित्रीबाई शेकडो पोरेसनी माय बननी. सावित्रीबाई एकदम साधी राहे. सावित्रीबाई ज्योतिराववर प्रेम व्हत ज्योतिरावले लखवा वह्यना तवय सावित्रीबाईनी खुप सेवा करी. 28 नो ज्योतिरावनी जगना निरोप लीना. तरीभी सावित्रीबाई घाबरनी नही. ज्योतिरावले अग्नीदाग देवाना टाइमले खांदा लावाना ठिकाने वाद घाला पण सावित्रीबाई पक्की होती. तिन्ही भाऊ बंदकीसले सुनाई दीन टीटव मी धरसु आणि सत्यशोधक खांदया देतील. ज्योतिरावना मरा नंतरभी सावित्रीबाई आपन कार्य सुरूच ठेव. 1897 सालमा प्लेगनी लागन वह्यनी हजारो लोक तवय मरणात लोकेसना जिव वाचाळा करता डॉ. यशवंतले मोफत इलाज कराले सांग. इलाज करिसन चांगल कर असाच एक प्लेग व्हइल पोऱ्याले खांद्यावर धरिसन लई जाये. त्यामाच सावित्रीबाईले प्लेग वह्यना अशी अनाथासनी माय 10 मार्च 1897 सालमा कार्य करता करता अमर व्हईगई.स्वतःना जिवनी भी परवा करी नही. कोणताभी चांगला कामले त्या पाठिंबा देत स्वतः कार्य करिसन त्या महान वह्यनात त्यासनी समाज माँ सुधारना करयात कधी जातिभेद पाळा नहीं. अशी शेकडो अनाथासनी माता कार्याना जोरमा अजरामर शी म्हणून अनाथासनी माय सावित्रीबाई फुले हाइ मायले मना कोटी कोटी प्रणाम...... जय ज्योती जय क्रांती, जय हिंद जय खान्देश